‘श्रीरामाची अयोध्या उत्तरप्रदेशात नसून अफगाणिस्थानात असावी’ असा दावा बंगलोर येथील इन्डियन इन्स्टिस्टूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्सचे डॉ. राजेश कोछर यांनी केल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इन्डियाच्या दि. २० ऑक्टोबर १९९२ च्या अंकात प्रसिद्ध झाले आहे. दुसरी अशाच प्रकारची बातमी नागपूरच्या हितवाद च्या दि. २३ नोव्हेंबर १९९२ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. त्या बातमीत म्हटले आहे की, डॉ. आर.के. पाल नावाच्या हौशी प्राच्यविद्या संशोधकाने गौतम बुद्ध हा मेसोपोटेमियात होऊन गेला, असा शोध लावला. दोन्ही शोध निश्चितच पारंपरिक मताला धक्के देणारे आहेत. जुनी कागदपत्रे, शिलालेख वा पुरातत्त्वीय अवशेष यांच्या नवीन उपलब्धीमुळे नवीन प्रमेये मांडली जातात आणि इतिहासावर नवा प्रकाश पडतो.
Author archives
विवाहाविषयी आणखी थोडे
श्री संपादक, आजचा सुधारक, यांस,
आपल्या ऑक्टोबर १९९२ च्या अंकामध्ये विवाह आणि नीती ह्या विषयावर आपण आपली स्वतःची भूमिका मांडली आहे. नोव्हेंबर-डिसेंबरच्या अंकात स्त्री उवाच ह्या वार्षिकाचा परिचय अनुराधा मोहनी ह्यांनी करून दिला आहे, त्यात विवाह हा विषय आहे, आणि त्याच अंकात श्री. गं.र. जोशी ह्यांचे ‘समतावादी कुटुंब!’ ह्या शीर्षकाचे पत्र त्याच विषयावर आपण प्रकाशित केले आहे. त्यांपैकी श्री गं.र. जोशी ह्यांच्या पत्राविषयी माझे मत.
लग्न ह्या विषयाचा आवाका फार मोठा आहे. त्याचे अगणित पैलू आहेत. ती आपल्या सध्याच्या कुटुंबसंस्थेची आधारशिला असल्यामुळे तो संपूर्ण मानवजातीच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
तत्त्वज्ञानाची ओळख (भाग-१)
तत्त्वज्ञान का शिकले पाहिजे?
तत्त्वज्ञान का शिकले पाहिजे? या प्रश्नाला सामान्यपणे पुढील उत्तर दिले जाईल. ‘तत्त्वज्ञान शिकण्याची काहीच आवश्यकता नाही. तत्त्वज्ञान म्हणजे घटपटाची निरर्थक झटापट करणारा उद्योग. रिकामटेकड्या लोकांनी वेळ घालविण्याकरिता निर्माण केलेला एक खेळ. त्याचा जीवनात कसलाही उपयोग नाही. जीवनाच्या कोणत्याही समस्येशी त्याचा कोणताही संबंध नाही. ज्याला हिंदीत ‘बाल की खाल निकालना’, म्हणजे केसाची साल काढणे, म्हणतात, ते करणारा व्यवसाय. केस ही मुळात किती बारीक वस्तु, तिची साल काढल्यावर शिल्लक काय उरणार? म्हणजे जिथे कसलाही भेद नाही तिथे भेद उकरून काढणारा हा विषय आहे.’
सुधारणा झाल्या?
प्रश्न : स्त्रिया… डॉक्टर-इंजीनिअर झाल्या आहेत, विमानेसुद्धा चालवण्याचे प्रयोग झाले आहेत, तरी तुम्हाला स्त्रीजीवनात सुधारणा झाली असं वाटत नाही. सुधारणा म्हणजे नेमके कोणते बदल तुम्हाला अपेक्षित आहेत?
गीता साने : हे विशिष्ट वर्गात-मध्यमवर्गात झालेले बदल आहेत. … मध्यमवर्गात शिक्षण वाढलं, विचार वाढला, जीवनसंघर्षही वाढला, यातून विशिष्ट वर्तुळात काही सुधारणा झाल्या. पण मध्यमवर्गाचं प्रमाण फक्त आठ टक्के आहे. बाकीचा सगळा खालचा वर्ग आहे. या वर्गात परिवर्तन झाल्याशिवाय पूर्ण चित्र बदलणार नाही. या बायकांना कोणतंही स्वातंत्र्य मिळालेलं नाही. कायदे तुम्ही वाटेल ते करा, त्यांच्यापर्यंत ते पोहोचत नाहीत….
संपादकीय २ – लोकसंख्यावाढ आणि कुळकर्णी सामितीचा अहवाल
महाराष्ट्र सरकारने लोकसंख्या व कुटुंबनियोजन कार्यक्रम यांच्या स्थितीची पाहणी करण्याकरिता नेमलेल्या कुळकर्णी समितीचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. सरकारची आणि लोकांचीही झोप खाडकन उतरावी असे त्या अहवालाचे स्वरूप आहे. गेल्या २५-३० वर्षांत कुटुंबनियोजनाचा जो कार्यक्रम देशात चालू आहे त्याला लोकसंख्यावाढीला आळा घालण्याच्या कामात प्रचंड अपयश आले आहे हे त्यातून स्पष्ट होते. १९७१ ते १९८१ या दहा वर्षांत महाराष्ट्राची लोकसंख्या ५ कोटी ४ लाखांवरून ६ कोटी २८ लाखांवर आणि पुढील दहा वर्षात १९९१ साली ती जवळपास ८ कोटीवर गेल्याचे आढळून आले आहे.
संपादकीय
आजच्या संपादकीयाचे स्वरूप वेगळे आहे. श्रीमती दुर्गाबाई भागवत यांनी आमच्या सल्लागार मंडळाच्या एक सभासद डॉ. रूपा कुळकर्णी यांच्या धर्मान्तराच्या निमित्तानेआम्हाला पाठविलेल्या पत्रामुळे काही खुलासा करण्यासाठी हे आम्ही लिहीत आहोत.
आजचा सुधारक हे विवेकवादाला वाहिलेले मासिक सुरू झाल्याला लवकरच तीन वर्षे पूर्ण होतील. ह्या अवधीत आम्हाला महाराष्ट्रातील विचारी वाचकांकडून पुष्कळच प्रोत्साहन मिळाले आहे. ह्या मासिकात कोणते विषय कसे मांडले जातात त्याकडे आमच्या वाचकांचे बारीक लक्ष असते.
ह्या मासिकाच्या संचालनासाठी दोन मंडळे नेमली आहेत. एक संपादक मंडळ व दुसरे सल्लागार मंडळ. संपादक मंडळाचे सभासद संपादकांना दैनंदिन कामात मदत करतात.
पुस्तकपरिचय
सुदृढ समाजनिर्मितीसाठी स्त्री-पुरुषसमानता या तत्त्वाचा उद्घोष स्त्रीमुक्ती आंदोलन सुरुवातीपासून करीत आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून स्त्री उवाच वार्षिक प्रकाशित होत असते. या वार्षिकाचा सहावा अंक मार्च ९२ मध्ये प्रकाशित झाला. स्त्रीचा व त्या अनुषंगाने समाजाचा ‘मायक्रोस्कॉपिक व्ह्यू’ घ्यावा तसे या अंकाचे स्वरूप आहे. स्त्रीजीवनावर परिणाम करणार्या सर्व महत्त्वाच्या सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक-अंगांचा ऊहापोह तर यामध्ये केला आहेच, परंतु समाजापासून सहसा दडवून ठेवलेले असे जे स्त्रीचे कौटुंबिक जीवन, त्यावर या अंकात विशेष भर दिला आहे. सर्वप्रथम या अंकातील स्त्री कुटुंबातील आई म्हणून कशी आहे ते बघू .
पुस्तकपरीक्षण -‘सत्या’पेक्षा अधिक ‘विपर्यासां’चाच ऊहापोह।
सावरकरांचे एक निष्ठावंत व व्यासंगी अभ्यासक म्हणून प्रा. शेषराव मोरे यांचे नाव आता प्रतिष्ठित झाले आहे. व्यावसायिकदृष्ट्या अभियांत्रिकीत पारंगत असलेले प्रा. मोरे इतिहास, समाजशास्त्र, तर्कशास्त्र व भाषा वगैरे विषयांचेही जाणकार आहेत. स्वातंत्र्यवीर हा तर त्यांच्या अध्ययन-मनन-चिंतनाचा नव्हे तर निजिध्यासाचाच विषय गेल्या अनेक वर्षांपासून ठरला आहे. यातूनच निष्पन्न झालेल्या त्यांच्या ‘सावरकरांचा बुद्धिवाद : एक चिकित्सक अभ्यास’ या ग्रंथराजाने चार वर्षांपूर्वी अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्या ग्रंथाच्या दुसर्या आवृत्तीसोबतच ‘सावरकरांचे समाजकारण : सत्य आणि विपर्यास’ नामक त्यांचा दुसरा बृहद्ग्रंथ प्रकाशित झाला आहे.
विवेकासाठी चळवळ हवी!
व्यक्तिजीवन आणि समाजजीवन सुख-शांतीचे व्हावयाचे असेल तर त्यासाठी विवेकाच्या संगोपन-संवर्धनाची नितान्त आवश्यकता आहे. बुद्धिप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा आणि विवेक या संकल्पना परस्परांच्या फार जवळ आहेत. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोण आणि बुद्धिप्रामाण्य यांना सोडून विवेक असू शकणार नाही आणि विवेक नसेल तर खऱ्या अर्थाने विज्ञाननिष्ठा आणि बुद्धिप्रामाण्य असू शकणार नाहीत. विवेक ही अधिक व्यापक अशी जीवनसंवर्धक संकल्पना आहे. विवेकाची सविस्तर चर्चा केल्यास बुद्धिप्रामाण्य, विज्ञाननिष्ठा, reason, श्रद्धा, अंधश्रद्धा इत्यादी सर्व विषयांचा ऊहापोह होऊन जाईल.
सृष्टीतील अचेतन आणि सचेतन अशा सर्व वस्तूंना निश्चित गुणधर्म असतात. अचेतन वस्तूंमध्ये स्वतःच्या अंगचे चैतन्य नसते तर सचेतन वस्तूंमध्ये (वनस्पती आणि प्राणी) अंगभूत चैतन्य असते.
लोकहिताचे विवेकी भाष्यकार : लोकहितवादी
उणीपुरी दोन वर्षे आपण महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी उत्सवाने काढीत आहोत. आपला समाज ज्यावेळी गलितगात्र, स्तंभित आणि संवेदनाहीन होऊन पडला होता त्यावेळी त्यांनी आपल्या आयुष्याच्या कशा मशाली पेटवल्या आणि त्याला चेतवले याचे संस्मरण करणे आपले कर्तव्यच आहे. याच भावनेने आपण आणखीही एका पणतीची आठवण ठेवली पाहिजे. ही आठवण करणे हे जेवढे सौजन्याचे तेवढेच औचित्याचे आणि कृतज्ञपणाचेही होणार आहे. त्या मिणमिणत्या पणतीने पुढे मोठमोठ्या दीपस्तंभांना ज्योत पुरविली आहे. आणि आज तिची गरज आपल्याला मुळीच उरली नाही असेही नाही.