Author archives

स्टोन्स इन्टू स्कूल्स

नुकतंच ‘स्टोन्स इन्टू स्कूल्स’ (लेखक ग्रेग मॉर्टेन्सन, अनुवाद – सुनीति काणे) हे पुस्तक वाचून झालं.

ग्रेग हा अमेरिकन गिर्यारोहक. तो काराकोरम पर्वतराजीतल्या K2 या जगातील दुसऱ्या सर्वोच्च (एव्हरेस्ट नंतर) शिखराच्या मोहिमेवर एकटाच गेलेला असतो. वातावरण खूप खराब झाल्यामुळे परतताना White-out झाल्याने तो वाट हरवून बसतो व काही दिवसांनी कोर्फे या पाकिस्तानातील एका भलत्याच गावात पोहोचतो. येथील गावकरी त्याला आसरा देतात. मदत करतात.

काही दिवसांनी तो परत जायला निघतो तेव्हा, त्याला त्या छोट्या गावातील लोक निरोप द्यायला जमतात. त्यातील एका चिमुरडीला ग्रेग विचारतो की मी तुला काय देऊ?

पुढे वाचा

मन मेलं आहे… आणि हातावरच्या रेषा

मन मेलं आहे…

आता दुःख करणंही सोडलं आहे,
सुन्न होणं दूरच
आता 
हळहळ करणंही सोडून दिलं आहे.

निर्भया बलात्कारानंतर वाटलेला
क्रोआक्रोश आटला आहे.
कशासाठी कोणासाठी मेणबत्त्या लावायच्या?
अन्याय होतो, पण न्यायासाठी व्यक्ती मात्र या जगातही नाही.

दगडाला सुद्धा जिथे पाझर फुटतो असं म्हणतात,
तिथे आता हृदयाला पाझर फुटणं कठीण झालं आहे.
मुद्दामच, कळूनही, माणसाने स्वत:तील माणुसकी
कुठे तरी संपवून टाकली आहे
.
जिथे असे नरभक्षक, वासनांध जन्माला येतात, निर्माण होतात,
ज्यांना कोणाचं भान रहात नाही,
तिथे आता स्व
तःची कीव करावीशी वाटते.

पुढे वाचा

मनोगत

कुठल्याही शैक्षणिक संस्थेत एखादा विषय अभ्यासक्रमाच्या स्वरूपात घेतला जातो, तेव्हा त्या विषयावर लिहिलेल्या साहित्याकडे प्रमाणित साहित्य म्हणूनच बघितले जाते. तेव्हा ज्योतिषकलेत येणाऱ्या कुंडली, पत्रिका, ग्रह-ताऱ्यांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम या साऱ्यांविषयीची माहिती प्रमाणित होऊन सामान्य माणसाच्या मानसिकतेवर तिचा गंभीर परिणाम होण्याचा धोका संभवतो. ज्योतिष हे शास्त्र नाही हे सिद्ध करणारे अनेक प्रयोग झालेत, परंतु ते शास्त्र आहे असे आजवर तरी सिद्ध झालेले नाही या पार्श्वभूमीवर आम्ही ज्योतिषाला ‘कला’ असे संबोधले आहे.

ज्योतिषाची गरज माणसाला का पडते? याची मानसशास्त्राला माहीत असलेली अनेक कारणे आहेत.

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ – भाग ४

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलता झाला.

“राजन्, भारतीय तत्त्वज्ञानाच्या षट्दर्शनांतील प्रत्यक्ष आणि अनुमान ह्या दोन प्रमुख ज्ञानस्रोतांच्या कसोटीवर फलज्योतिष हा यथार्थज्ञानाचा स्रोत नसून निव्वळ भ्रम कसा आहे हे तू सिद्ध केलंस. त्यामुळे आता ते मान्य करणं तर भागच आहे. पण असं सिद्ध केल्यानं फलज्योतिषाची लोकप्रियता कमी होईल असं तुला खरोखरंच वाटतं का? “

“खरं सांगू का? फलज्योतिष हे केवळ भ्रामक कल्पनामात्र आहे, हे सिद्ध केल्याने त्याची लोकप्रियता कमी होण्याची सूतरामही शक्यता नाही!”

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ – भाग ३

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.

“राजन्, आपल्या भारतीय तत्त्वज्ञानातील षट्दर्शनांच्या प्रत्यक्षप्रमाण ह्या कसोटीवर फलज्योतिष हा यथार्थज्ञानाचा स्रोत नाही, हे तू गेल्या खेपेत सिद्ध केलंस. परंतु फलज्योतिष हे भविष्याचा वेध घेतं, त्यामुळे आपण ते ‘अनुमान’ ह्या ज्ञानाच्या दुसऱ्या स्रोताच्या कसोटीवर तपासून बघायला नको का?”

“खरं सांगू का, ‘प्रत्यक्षप्रमाण’ ह्या भारतीय तत्त्वज्ञानातील दर्शनांच्या सगळ्यात जास्त महत्त्वाच्या कसोटीवर जी गोष्ट निव्वळ ‘भ्रम’ आहे हे सिद्ध झाले आहे, त्याविषयी आणखीन काही चर्चा करणे निरर्थक आहे.

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ – भाग २

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही, झाडावरचे प्रेत त्याने खांद्यावर टाकले आणि तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला. थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.

“राजन्, अरे गेल्या खेपेला तू माझ्यावर एकदम तलवारच उगारलीस, त्यामुळे मी माझं पूर्ण समाधान झालं असं म्हणून तर टाकलं, पण खरं सांगू? माझं अर्धवटच समाधान झालं होतं. त्याविषयीचे आणखीनही बरेच प्रश्न मला छळताहेत.

आता हेच बघ ना, IGNOU, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय, आता फलज्योतिषाचा अभ्यासक्रम सुरू करणार असल्याचं ऐकतोय. त्यांच्या मते ते एक विज्ञानाधारित शास्त्र आहे. ह्याचा अर्थ प्रत्येकाचं नेमकं भविष्य सांगणं शक्य आहे तर!

पुढे वाचा

फलज्योतिष कशासाठी? याची मानसशास्त्रीय मीमांसा

एखादी हानिकारक गोष्ट उत्पन्न झाली तरी ती फार वेळ टिकून रहात नाही हे उत्क्रांतीच्या अभ्यासाने आपल्याला दाखवून दिले आहे. मानवी मेंदू हा सध्याच्या स्वरुपात काही लक्ष वर्षे टिकून आहे पण तो अशा अनेक गोष्टी निर्माण करतो ज्या तर्काच्या चाळणीत टिकत नाहीत. तरीही लिखित आणि मौखिक इतिहास असे सांगतो की या क्रिया, सवयी आणि परम्परा हजारो वर्षे अस्तित्वात आहेत. जगभर आहेत. कोणताही मानवी समूह – भाषा , धर्म, भौगोलिक जागा याने इतरांपेक्षा वेगळा पडला असला तरीही – या नियमाला अपवाद नाही.

जी गोष्ट हजारो वर्ष टिकून आहे ती काहीतरी उपयोगाची असावी असाही निसर्गनियम आहे.

पुढे वाचा

ज्योतिष : शास्त्र की अंधश्रद्धा?

प्राचीन काळापासून मानव जिज्ञासेपोटी निसर्गाची गूढं उकलण्याचा प्रयत्न करीत आलाय. त्या-त्या काळात त्याच्या प्रगल्भतेनुसार मनावर विविध प्रकारचे संस्कार होत गेलेत. त्यातूनच मानवानं प्रगतीची वाटचाल केलीय. काही वेळा समजून-उमजून जुन्या काळच्या मागासलेल्या विचारांना, समजुतींना त्यागलंय. तर काही वेळेस कळत असूनही त्याच गलितगात्र, भ्रामक समजुतींना चिकटून राहण्याचा वेडेपणाही तो करत आलाय. मग प्रश्न असा पडतो की, एका बाजूनं एवढा शहाणपणानं प्रगती करणारा माणूस दुसऱ्या बाजूनं एवढा पांगळा का होतो? हे पांगळेपण त्यानं तात्कालिक हितसंबंधांच्या जोपासनेपोटी तर आणलेलं नसतं ना? की मुद्दामहूनच आणलेलं असतं?

पुढे वाचा

ज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य

एकेकाळी मी पण ज्योतिषी होतो. पत्रिका वगैरे बघायचो, लोकांना मार्गदर्शन करायचो. एका ज्योतिषी असण्यापासून ते ज्योतिषाचा टीकाकार होणे या बदलाचे श्रेय माझ्या ज्योतिषशास्त्राच्या Empirical परीक्षणाच्या (Empirical testing) प्रयोगांना द्यावे लागेल. मी जसेजसे हे प्रयोग करत गेलो तसेतसे ज्योतिषविद्येविषयीचे माझे मत बदलत गेले आणि आज मी दहा वर्षांच्या संशोधनानंतर, अनेक प्रयोगांच्या आधारे आणि हजारो पत्रिकांच्या विश्लेषणानंतर असं विश्वासाने म्हणू शकतो की ज्योतिष हे विज्ञान नाही आणि शास्त्र म्हणून ते अथवा त्याची तत्त्वेही वैध नाहीत.

जेव्हा ज्योतिषविद्येची सत्यासत्यता तपासून बघण्याचा विषय येतो तेव्हा Double Blind परीक्षा हा सर्वात सोपा पर्याय असतो.

पुढे वाचा

विक्रम आणि वेताळ – भाग १

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत खांद्यावर टाकून तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला, आणि थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला. 

“हे राजन्, नेहमी मी तुला गोष्ट सांगतो आणि त्या गोष्टीच्या आधाराने तुला प्रश्न विचारतो, पण नेहमी मीच का सांगायची गोष्ट तुला? आणि खरंतर इतकी वर्षं तुला गोष्टी सांगून सांगून आता माझा गोष्टींचा स्टॉकही संपला आहे. तेव्हा असं कर की आज तूच मला गोष्ट सांग कसा! मग मी विचारीन त्यावर माझे प्रश्न!”

“असं कसं म्हणतोस तू?” विक्रमादित्य म्हणाला. “तू गोष्ट सांगायची हे तर नियत आहे, विधिलिखित! त्यात आपल्याला बदल कसा करता येईल?”

पुढे वाचा