श्री. मोहनींच्या पत्रावर प्रतिक्रिया व्यक्त करण्याची इच्छा आहे. ‘हिंदू असणे’ आणि ‘धार्मिक’ असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. खुद्द शंकराचार्यांनाही ‘प्रच्छन्न बौद्ध’ म्हटले गेले. (बुद्ध हा तर’ निरीश्वरवादी’आणि ‘आत्मा’ न मानणारा होता.) तरीही ते ‘हिंदू’च होते. ही सहिष्णुता हिंदुधर्मीयांशिवाय अन्यत्र कोठे दिसते?
‘हिंदू-मुसलमानांचे दंगे’ आणि ‘धर्म – त्यांतही वैदिक धर्म आणि विज्ञान’ यांतील वाद या वेगळ्या गोष्टी आहेत. त्यांची गल्लत करण्यात अर्थ नाही.
हिंदू समाजात मी जन्मलो, घडलो, वाढलो म्हणून बर्या वाईट गोष्टींसह मी हिंदूच आहे. त्याबद्दल खंत कशासाठी?
ईश्वरविषयक ‘भाविकता’ ही आणखी एक वेगळीच ‘मनोव्यथा’?