विषय «पत्र-पत्रोत्तरे»

निसर्ग आणि मानव : श्री वसंत पळशीकरांना उत्तर

१८ जुलैच्या साधनेत श्री नानासाहेब गोरे यांचा ‘निसर्ग आणि मानव’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाच्या उत्तरार्धात नानासाहेबांनी गांधीवादी पर्यावरणवाद्यांवर परखड टीका केली आहे. तिला श्री वसंत पळशीकरांनी २९ ऑगस्टच्या साधनेत उत्तर दिले आहे. त्या उत्तरावरील ही प्रतिक्रिया.

ज्याला आपण निसर्ग म्हणतो तो प्रथमतः भौतिक, निर्जीव पदार्थांचा आणि शक्तींचा, आणि नंतर वनस्पती आणि प्राणी यांचा, त्यांच्या जीवनव्यवहारांचा बनलेला आहे. यांपैकी भौतिक निसर्ग हा पूर्णतः अचेतन, निर्जीव अशा शक्तींचा आणि त्यांच्या घडामोडींचा वनलेला आहे; परंतु निसर्गाचा जो भाग वनस्पती आणि प्राणी यांचा बनलेला आहे त्यात जीव, संज्ञा, हेतुपुरस्पर कृती या गोष्टी आढळून येतात.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

समतावादी कुटुंब!
संपादक आजचा सुधारक यांस,
ऑक्टो. ९२ च्या ‘आजचा सुधारक’मध्ये ‘विवाह आणि नीती-आमची भूमिका’ या संपादकीयात समतावादी कुटुंबाची केलेली तरफदारी केवळ भयानक आहे. समतावादी कुटूंब कोणाला नको आहे? प्रत्येक गृहस्थाला व गृहिणीला ते हवेसे वाटते. ते सहजी होणारे नाही हे खरे, पण प्रयत्नसाध्य तर आहेच. जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त सुख ह्या व्यवहार्य तत्त्वालाही कोणाचा विरोध असण्याचे कारण नाही. पण वरील संपादकीयात तथाकथित समतावादी कुटुंबाची ज्या पद्धतीने भलावण केली गेली आहे ती समाजस्वास्थ्यावरच घाला घालणारी आहे.
कामप्रेरणा ही भुकेसारखी स्वाभाविक व प्रबल प्रवृत्ती असल्याने तिची पुरुषार्थात गणना होऊन तिला वाट मिळून विवाहसंस्थेत तिचे उदात्तीकरण झालेले आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री. संपादक आजचा सुधारक
स. न. वि. वि.
श्री. निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी माझे वाक्य उद्धृत करताना त्याच वेळी, दुसर्याअ अंगाने हे शब्द गाळले आहेत. सावरकरांच्या सुधारणेची प्रेरणा त्यांच्या अनुयायांवर जे परिणाम घडवून आणताना दिसते त्याकडे मला लक्ष वेधायचे होते. सुधारणेमागील प्रेरणा आणि परिणाम यांचा काही अंगभूत संबंध आहे असे मला सुचवावयाचे होते. त्यांनी सावरकरांचे जे युक्तिवाद उद्धृत केले आहेत ते लक्षात घेतलेच पाहिजेत यात शंका नाही. ते ध्यानात घेऊन मी माझी मांडणी सुधारून घेऊन असे जरूर म्हणेन की, सावरकरांच्या सुधारणाकार्याची प्रेरणा संमिश्र व गुंतागुंतीची होती.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

श्री. संपादक,
आजचा सुधारक स.न.वि. वि.
श्री केशवराव जोशी यांना पळशीकरांनी दिलेले उत्तर वाचले (आजचा सुधारक, ऑगस्ट ९२). सावरकरांची ‘धार्मिक-सामाजिक सुधारणेमागची प्रेरणा …. माणसांना कडवी, आंधळी, निरुंद, निर्दय, वैरवृत्तीची बनविणारी, विध्वंसक व विनाशक होती, असे पळशीकर म्हणतात. हिंदुसमाज बलवान करण्यासाठी सावरकरांना समाजसुधारणा हवी होती, त्यामागे न्याय, माणुसकी ही प्रेरणा नव्हती, असा आरोप समोर ठेवून पळशीकरांनी हे विधान केलेले आहे.
मी थोडाबहुत सावरकर वाचलेला आहे. अस्पृश्यता पाळणे म्हणजे ‘मनुष्यत्वाविरुद्ध अत्यंत गर्छ असा अपराध करणे होय असे सावरकर म्हणतात (खंड ३, पृ.४८३). न्यायाच्या दृष्टीने, धर्माच्या दृष्टीने, माणुसकीच्या दृष्टीने ते कर्तव्य आहे, म्हणूनच अस्पृश्यतेचे बंड आपण हिंदूंनी साफ मोडून टाकले पाहिजे.

पुढे वाचा

चर्चा-केशवराव जोशी यांच्या पत्रास उत्तर

श्री. केशवराव जोशी यांचा मी आभारी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव मी उल्लेख केलेल्या नामवलीत घेणे शक्य होते. पं. नेहरूंनी, सावरकरांप्रमाणे, जाणीवपूर्वक समाजसुधारणेचे कार्य केले असे म्हणता येणार नाही. जसे रानड्यांचे शिष्य नामदार गोखले यांनीही केले नाही. पण या दोघांचेही जीवन व कार्य सामाजिक सुधारणांना उपकारक ठरले. पं. नेहरू दीर्घकाळ पंतप्रधान नसते तर केंद्रशासनाचे वळण जेवढे सुधारणांना अनुकूल राहिले तेवढेही राहिले नसते हे अगदी शक्य आहे.
मला जो मुद्दा करावयाचा होता त्या दृष्टीने सावरकरांचे नाव तेथे घेणे आवश्यकचहोते असे मात्र नाही.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

प्रा. काशीकर ज्या स्टीफन हॉकिंगचे संदर्भ देतात त्या (आजचा सुधारक, मे-जून ९२) प्रोफेसर हॉकिंग यांचेबद्दल थोडी अधिक माहिती वाचकांना नसल्यास करून द्यावीशी वाटते. डॉ. स्टीफन हॉकिंग (वय वर्षे ५०) हे केंब्रिज विद्यापीठात थिऑरेटिकल फिजिक्सचे प्राध्यापक आहेत. त्यांचे शिक्षण ऑक्सफर्ड व नंतर केंब्रिज विद्यापीठात झाले व वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी १९६६ मध्ये “Universe could have sprung from a singularity, and there is a singularity in our past” हा विश्वाच्या उत्पत्तीसंबंधीआपला Ph.D. चा प्रबंध मांडला व तो सर्वमान्यही झाला.
वयाच्या २१ व्या वर्षापासून हॉकिंग यांना ‘अ-मायोट्रॉफिक स्क्लरोसिस’ या भयानक रोगाची प्रारंभिक लक्षणे दिसू लागली.

पुढे वाचा

प्रा. काशीकरांचा नवविवेकवाद!

गीतेवरील माझ्या लेखावर प्रा. श्री. गो. काशीकर यांनी घेतलेल्या आरोपांना मी जे उत्तर दिले ते त्यांना पटले नसून त्यांनी आता नवविवेकवादाची गरज आहे’ या शीर्षकाचे प्रत्युत्तर पाठविले आहे. हे प्रत्युत्तर या अंकात अन्यत्र छापले असून त्याबद्दलची माझी भूमिका येथे देत आहे.
प्रथम मी प्रा.काशीकरांचे आभार मानतो, कारण त्यांनी एका गोष्टीकडे माझे लक्ष वेधले आणि माझा एक गैरसमज दूर केला. माझी अशी समजूत होती (आणि अजूनही बर्या च प्रमाणात आहे) की विश्वाची उत्पत्ती हा विषय वैज्ञानिक पद्धतीच्या आटोक्यात नाही. काही वैज्ञानिक विश्वरचनेच्या (cosmology) क्षेत्रात काम करीत आहेत हे मला माहीत होते.

पुढे वाचा

आता नवविवेकवादाची गरज आहे

‘आजचा सुधारक’च्या फेब्रुवारी १९९२ च्या अंकात प्रा. दि. य. देशपांडे यांच्या गीतेवरील लेखांवर आक्षेप घेणारा माझा ‘हे विवेकवादी विवेचन नव्हे!’ हा लेख व त्यावरील प्रा. देशपांडे यांचा मर्यादित खुलासा प्रसिद्ध झाला आहे.
ह्या मर्यादित खुलाशातही मी उपस्थित केलेल्या मुद्यांना सोयीस्कर कलाटणी देण्यात आली आहे. उदाहरणार्थ, मोक्षशास्त्र हे बुद्धीच्या आवाक्यापलीकडे आहे असे मी म्हटलेले नाही. उलट, विज्ञान मोक्षशास्त्रालाही बुद्धीच्या आवाक्यात आणीत आहे याची उदाहरणे मी दिली आहेत. हा प्रयत्न पुरेसा निर्णायक होईपर्यंत मोक्षशास्त्राबद्दल पूर्णविश्वास किंवा पूर्ण अविश्वास व्यक्त न करणे हेच विवेकवादाशी सुसंगत होईल असे मी म्हटले आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

प्रा. काशीकर ज्या स्टीफन हॉकिंगचे संदर्भ देतात त्या (आजचा सुधारक, मे-जून ९२) प्रोफेसर हॉकिंग यांचेबद्दल थोडी अधिक माहिती वाचकांना नसल्यास करून द्यावीशी वाटते. डॉ. स्टीफन हॉकिंग (वय वर्षे ५०) हे केंब्रिज विद्यापीठात थिऑरेटिकल फिजिक्सचे प्राध्यापक आहेत. त्यांचे शिक्षण ऑक्सफर्ड व नंतर केंब्रिज विद्यापीठात झाले व वयाच्या २४ व्या वर्षी त्यांनी १९६६ मध्ये “Universe could have sprung from a singularity, and there is a singularity in our past” हा विश्वाच्या उत्पत्तीसंबंधीआपला Ph.D. चा प्रबंध मांडला व तो सर्वमान्यही झाला.
वयाच्या २१ व्या वर्षापासून हॉकिंग यांना ‘अ-मायोट्रॉफिक स्क्लरोसिस’ या भयानक रोगाची प्रारंभिक लक्षणे दिसू लागली.

पुढे वाचा

प्रा. स. रा. गाडगीळांना उत्तर

श्री. स. रा. गाडगीळ यांनी ‘सेक्युलॅरिझम’ या शब्दाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे. “लौकिक-ऐहिक व्यवहाराचे नियंत्रण करणारी शासनसंस्था (स्टेट) आणि पारलौकिक संकल्पनेच्या नावे लौकिक व्यवहाराचे नियमन करू पाहणारी धर्मसत्ता यांची पूर्ण फारकत म्हणजे सेक्युलॅरिझम”. त्यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे युरोपात दीर्घकाळ संघर्ष चालला तो धर्मपीठ (चर्च) व राजसत्ता यांच्यात. कशावरून? तर अंतिम सार्वभौम सत्ता कोणाच्या हाती असावी, आणि नियंत्रण-नियमनाच्या क्षेत्रांची विभागणी कशी असावी हे मुख्य दोन मुद्दे. सेक्युलर राज्यातही धर्मपीठाचे अस्तित्व राहिले, एवढेच नव्हे तर लौकिक व्यवहारातही धर्मपीठाच्या आदेशांचे स्थान व महत्त्व राहिले. उदा.

पुढे वाचा