विषय «पुस्तक परीक्षण»

पुस्तक परीक्षण – कोऽहम्

कादंबऱ्या सामाजिक असतात. ऐतिहासिक-राजकीय पौराणिक अशा विषयांवरून त्यांचे आणखीही प्रकार करता येतात. ह्या कादंबऱ्या कथानकाच्या बळावर लोकप्रिय होतात. लेखकाचे निवेदनकौशल्य, कथावस्तूतील नाट्य, चित्रित झालेले जीवनदर्शन वाचकाला मनोहारी वाटते. परंतु वामन मल्हार जोश्यांची रागिणी ह्या सर्वांपेक्षा वेगळ्या कारणाने आपल्या लक्षात राहिलेली असते. तिच्यातील तत्त्वचर्चा वाचकाला विविध विचारव्यूहांमधून फिरवीत राहते. रागिणी, सुशीलेचा देव ह्या कादंबऱ्या तुम्हाला नुसती कथा सांगत नाहीत, विचारात गुरफटत नेतात अन् शेवटी अशा बिंदूवर आणून सोडतात की तुम्हीच तुमचा निर्णय घ्यायला मोकळे असता.

सुरेश द्वादशीवारांची कोऽहम् ही लघुकादंबरी तशी आहे.

पुढे वाचा

इकोटोपिया पर्यावरणीय जीवनशैलीचे कल्पनाचित्र

कादंबरी हा साहित्यप्रकार किती सर्जनशीलपणे हाताळता येऊ शकतो याचा अद्भुत प्रत्यय अर्नेस्ट कॅलनबाख यांची इकोटोपिया ही कादंबरी वाचताना येतो. मानवी संबंधातील गुंतागुंत, ताणतणाव, सृजनशील पैलू, विश्वाचे आकलन, मनुष्य आणि विश्व यांच्यातील सहसंबंध हे असे कादंबरीचे विविधांगी विषय असतात हे आपण नेहमीच अनुभवतो. लेखकाची कल्पनारम्यता, चिंतनशीलता, भाषेच्या माध्यमातून एखाद्या कथेच्या अनुषंगाने कादंबरीत व्यक्त होते. याशिवाय ही कादंबरी वाचकाला खूप काही देऊ शकते हे इकोटोपिया वाचताना लक्षात येते. विश्वातील मनुष्यप्राणी व निसर्ग यांच्यातील सहसंबंध कसे आहेत हे प्रभावीपणे सांगणे पुरेसे न मानता, हे सहसंबंध कसे असावेत, हे कसे घडवले पाहिजेत, काय केले म्हणजे ते संबंध अधिक न्याय्य, आनंददायी होतील, याची एक ब्लू प्रिंट देण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे.

पुढे वाचा

हसरी किडनी अर्थात् ‘अठरा अक्षौहिणी’ [लेखिका : पद्मजा फाटक, अक्षर प्रकाशन मुंबई, पृष्ठे बावीस + ४३७]

‘हसरी किडनी’च्या लेखिकेचे नागपूरशी नाते आहे. जन्माने. विचाराने ‘आजचा सुधारक’शी त्यांची माहेरची बांधिलकी आहे. पुस्तकाला आ.सु.च्या संस्थापक-संपादकांचा पुरस्कार आहे. तो त्यांनी आग्रहाने मिळवला आणि पद्मभूषणासारखा मिरवला आहे. ‘अशा प्रकारचे एकमेव पुस्तक’ ही त्यांची प्रशस्ती. विजय तेंडुलकर, सरोजिनी वैद्य यांच्यासारख्या नामवंत सारस्वतांनी तिला संमतिपूर्वक मान मोलावली आहे.

या पुस्तकाचे प्रकाशन १६ जून २००१ या दिवशी झाले. लेखकाला आपल्या पुस्तकाचे जे जे व्हावेसे वाटते ते सर्व सोहळे त्याला लाभले आहेत अशा तेंडुलकरांच्या अभिप्रायासमवेत आलेली प्रकाशनसमारंभाची व्हिडियो कॅसेट अमेरिकेत लगेचच लेखिकेच्या सौजन्याने प्रस्तुत परिचयकर्त्याने पाहिली आहे.

पुढे वाचा

पुस्तकपरिचय

श्रद्धांजली
लेखक : विजय हर्डीकर, प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, मूल्य : १७५
‘जनांचा प्रवाहो चालिला’ या पुस्तकाचे लेखक म्हणून आपल्याला परिचित असलेल्या श्री. विनय हर्डीकरांचे श्रद्धांजली हे नवे पुस्तक. यात आपले जीवन श्रीमंत करणार्याल चौदा व्यक्तींच्या कर्तृत्वाचे आलेख आहेत असे ते म्हणतात. पण पुस्तक वाचून होताच वाचकाच्या मनावर ठसते ते पंधरा व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व. कारण या चौदा जणांच्या कार्याची ओळख करून देत असताना अभावितपणे लेखकाचीही ओळख पक्की होत जाते. या पुस्तकातून हर्डीकर लेखक कमी आणि कार्यकर्ते जास्त असे दिसून येतात. लेखकाचे जीवन समृद्ध करणार्याय या महानुभावांची व्यक्तिवैशिष्ट्ये चितारताना त्यांनी जागोजागी स्वानुभवाचे अस्तर लावलेले आहे.

पुढे वाचा

सत्याग्रही सॉक्रेटिसचे वीरमरण

गांधींना वाटले, ‘पॅसिव्ह रेझिस्टन्स’ या शब्दात न्यून आहे. ऐकणाराला ते निर्बलांचे हत्यार वाटते. त्यात द्वेषाला जागा आहे असे वाटते. शिवाय त्याची परिणती हिंसेतही होऊ शकेल. दक्षिणआफ्रिकेत आपण जो लढा उभारला त्याला काय म्हणावे या विचारात त्यांना आधी ‘सदाग्रह’ (सत्+आग्रह) आणि मग ‘सत्याग्रह’ हा शब्द सुचला. सॉक्रेटीस त्यांना जगातला पहिला सत्याग्रही वाटला.’इंडियन ओपिनियन’ या आपल्या पत्राच्या गुजराती भागात त्यांनी त्याची कथा सांगितली. त्याचे चरित्र आणि चारित्र्य यावर ६ भाग लिहिले. त्याच्या विचारसरणीतून आपल्याला नवसंजीवन मिळाले असे ते म्हणतात.

सत्याग्रही सॉक्रेटिसचे वीरमरण हे श्री.

पुढे वाचा

पुस्तक परीक्षण- “हिंदु-मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद”

डॉ. रावसाहेब कसबे यांचे हे पुस्तक इतिहासातून आजच्या प्रश्नांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करते. आज झालेले धर्मशक्तींचे ध्रुवीकरण व त्यातही नवहिंदुत्ववाद्यांची वाढती आक्रमकता लेखकास पुस्तक लिहिण्यास प्रवृत्त करते. अध्यात्माचे राजकारण’ वा राजकीय कारणांसाठी धर्माचा वापर करण्याची वृत्ती, याने लेखक अस्वस्थ झाला आहे. राजकीय हेतूसाठी अशा शक्तींनी केलेल्या बुद्धिभेदाला बळी पडलेल्या पुरोगामी वआंबेडकरवादी लोकांना जागे करणे हाही या ग्रंथाचा उद्देश दिसतो.
सहाशेहून अधिक पानांचा हा ग्रंथ बहुतांशी मूळ साधनांवर आधारित आहे. शिवाय विषयसूची व संदर्भसूची दिल्याने त्यास स्वतःचे वजन प्राप्त झाले आहे. ग्रंथाचा उद्देश सद्यःपरिस्थितीशी संबंधित असला, तरी ग्रंथाचा मुख्य विषय इतिहास व त्याचे विश्लेषण हा आहे.

पुढे वाचा

पुस्तक परीक्षण – समतामूलक पर्यावरणवादी वैश्विक समाजरचनेचा वेध

या विश्वपसाऱ्यामध्ये माणसाचे स्थान खरे तर बिंदुवत्. परंतु निसर्गाने बहाल केलेल्या बुद्धिमत्तेमुळे माणूस पृथ्वीवरील इतर प्राणिमात्रापेक्षा वरचढ ठरला, तर सुखासीनतेच्या लालसेतून एका शोषणयुक्त समाजव्यवस्थेचा तो प्रेरक ठरला. आज पृथ्वीवरील सृष्टीचे एकूणच अस्तित्व माणसाच्या विवेकी वा अविवेकी वागणुकीने ठरणार आहे. माणसाचे जीवसृष्टीतील नेमके स्थान, त्याच्या प्रेरक व कारक शक्ती, त्याच्या स्वभावाची गुंतागुंत, त्याच्या जीवनातील ईश्वरी प्रेरणेचे स्थान, मानवी जीवनाचे प्रयोजन हे नेहमीच अध्यात्म, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र व समाजशास्त्र यांच्या अभ्यासकांचे चिंतनाचे विषय राहिले आहेत. श्री. श्रीकांत कारंजेकर यांनी लिहिलेल्या “वैश्विक जीवनाचा अर्थ ” या छोट्या पुस्तकातून अशाच प्रश्नांचा इहवादी दृष्टिकोनातून मागोवा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

पुढे वाचा

पुस्तक-परिचय

मृत्यूनंतर
लेखक: शिवराम कारंत. अनुवादक: केशव महागावकर, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया. चौथी आवृत्ती, मूल्य ११.५०

मृत्यूनंतर काय, ही महाजिज्ञासा आहे, नचिकेत्याची होती. माझीही आहे. तुमचीही असावी. मी तिच्यापोटी थोडेबहुत तत्त्वज्ञान पढलो. पण तत्त्वज्ञान हे बरेचसे पांडित्यपूर्ण अज्ञान आहे अशीच माझी समजूत झाली. निदान या असल्या महाप्रश्नांपुरती तरी. शाळकरी वयात वाटे-आपण संस्कृत शिकू, वेद-उपनिपदे वाचू. यम-नचिकेता संवाद मुळातून वाचू. थोडेसे संस्कृत शिकलो. भाष्यकारातें वाट पुसत ठेचाळण्याइतके. पण दुसरे एक अनर्थकारक ज्ञान झाले.ते असे की, शब्द आणि शब्दार्थ, वाक्ये आणि वाक्यार्थ सर्वांसाठी सारखेच नसतात.

पुढे वाचा

पुस्तकपरीक्षण -‘सत्या’पेक्षा अधिक ‘विपर्यासां’चाच ऊहापोह।

सावरकरांचे एक निष्ठावंत व व्यासंगी अभ्यासक म्हणून प्रा. शेषराव मोरे यांचे नाव आता प्रतिष्ठित झाले आहे. व्यावसायिकदृष्ट्या अभियांत्रिकीत पारंगत असलेले प्रा. मोरे इतिहास, समाजशास्त्र, तर्कशास्त्र व भाषा वगैरे विषयांचेही जाणकार आहेत. स्वातंत्र्यवीर हा तर त्यांच्या अध्ययन-मनन-चिंतनाचा नव्हे तर निजिध्यासाचाच विषय गेल्या अनेक वर्षांपासून ठरला आहे. यातूनच निष्पन्न झालेल्या त्यांच्या ‘सावरकरांचा बुद्धिवाद : एक चिकित्सक अभ्यास’ या ग्रंथराजाने चार वर्षांपूर्वी अभ्यासकांचे लक्ष वेधून घेतले होते. त्या ग्रंथाच्या दुसर्‍या आवृत्तीसोबतच ‘सावरकरांचे समाजकारण : सत्य आणि विपर्यास’ नामक त्यांचा दुसरा बृहद्ग्रंथ प्रकाशित झाला आहे.

पुढे वाचा

पुस्तकपरिचय

सुदृढ समाजनिर्मितीसाठी स्त्री-पुरुषसमानता या तत्त्वाचा उद्घोष स्त्रीमुक्ती आंदोलन सुरुवातीपासून करीत आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून स्त्री उवाच वार्षिक प्रकाशित होत असते. या वार्षिकाचा सहावा अंक मार्च ९२ मध्ये प्रकाशित झाला. स्त्रीचा व त्या अनुषंगाने समाजाचा ‘मायक्रोस्कॉपिक व्ह्यू’ घ्यावा तसे या अंकाचे स्वरूप आहे. स्त्रीजीवनावर परिणाम करणार्‍या सर्व महत्त्वाच्या सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक-अंगांचा ऊहापोह तर यामध्ये केला आहेच, परंतु समाजापासून सहसा दडवून ठेवलेले असे जे स्त्रीचे कौटुंबिक जीवन, त्यावर या अंकात विशेष भर दिला आहे. सर्वप्रथम या अंकातील स्त्री कुटुंबातील आई म्हणून कशी आहे ते बघू .

पुढे वाचा