विषय «संघटना-व्यक्ती विशेष»

डॉ. भीमराव गस्ती – एक व्रतस्थ जीवन

‘चोर-दरवडेखोर’ अशी मुद्रा धारण करणार्‍या महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रदेशातील बेरड-रामोशी जमातीत जन्माला आलेला एक कर्तृत्ववान माणूस – भीमराव गस्ती. उच्चभ्रू सभ्य समाजाच्या कुत्सित निंदेचे विषारी बाण सहन करीत केवळ जिद्द आणि कष्ट यांच्या भरंवशावर अत्युच्च शिक्षण घेऊन एक उच्च विद्याविभूषित शास्त्रवेत्ता झाला, केमिस्ट्रीत पीएच्.डी. ही अत्युच्च पदवी मिळविली. मनात आणले असते तर इतर विद्याविभूषितांसारखेच डॉ. गस्तींनाही सुखासमाधानाचे पांढरपेशी जीवन जगता आले असते. पण आपली आरामाची सरकारी नोकरी सोडून देऊन आपल्या बेरड-रामोशी जमातीच्या उद्धारासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले. अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला येणारा छळ, निंदा, मनस्ताप वगैरे सर्व निमूटपणे सहन करून डॉ.

पुढे वाचा

प्रोफेसर रेगे –एक उत्तमपुरुष

प्रोफेसर रेगे हे एक कूट आहे. त्याला अनेक उपांगे आहेत. त्यातली काही उकलतात. काहींच्या उत्तरासाठी त्यांनाच बोलते करावे लागेल.

एक सोपे कोडे असे की प्रो. रेगे यांची योग्यता आणि त्यांना मिळालेली मान्यता यांत एवढी तफावत का?

तत्त्वज्ञान हा रेग्यांचा प्रांत. त्यात आज अग्रपूजेचा मान त्यांचा. महाराष्ट्रातच नाही तर अखिल भारतात. तो त्यांना लाभलेला अजून दिसत नाही. मात्र त्याचे दुःख त्यांना नाही. इष्टमित्रांनाच तेवढी हळहळ. भारतात स्वातंत्र्याच्या पहाटेच तत्त्वज्ञानाला बरे दिवस लाभले. इंडियन कौन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च स्थापन झाली. निवडक विद्यापीठात तत्त्वज्ञानाच्या अध्ययनास्तव अॅडव्हान्स्ड सेंटर्स उघडली गेली.

पुढे वाचा

श्री. अनंतराव भालेराव

दि. २६ ऑक्टोबर १९९१ रोजी श्री. अनंतराव भालेराव यांचे निधन झाले. पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक धगधगते यज्ञकुंड शांत झाले. अनंतरावांचा जन्म खंडाळा, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद येथे १४ नोव्हेंबर १९९१ या दिवशी झाला. त्यांचे वडील काशीनाथबुवा वारकरी होते. शिवूरच्या शंकरस्वामी मठातील फडाचे ते प्रमुख होते. वैजापूर, गंगापूर आणि औरंगाबाद येथे शिकून १९३६मध्ये अनंतराव मॅट्रिकची परीक्षा पास झाले. या परीक्षेत त्यांना संस्कृत या विषयात सर्वाधिक गुण मिळाल्यामुळे शिष्यवृत्ती मिळाली. पुढील शिक्षणाची सोय झाली. याच काळात श्री. गोविंदभाई श्राफ औरंगाबादच्या सरकारी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले.

पुढे वाचा

यशोदाबाई आगरकर

यशोदाबाई आगरकर ह्या थोर समाजसुधारक कैलासवासी गोपाळ गणेश आगरकर यांच्या पत्नी होत. आगरकर बी.ए. च्या वर्गात असताना कऱ्हाडजवाज गावातील मोरभट फडके यांची कन्या अंधुताई हिच्याशी त्यांचा विवाह झाला. विवाहानंतर तिचे नांव यशोदाबाई ठेवण्यात आले. या विवाहाच्या वेळी यशोदाबाईचे वय दहा वर्षांचे होते. आगरकर पुण्याला शिकत असल्यामुळे आणि यशोदाबाईचे वय लहान असल्यामुळे त्या या काळात माहेरी म्हणजे उंब्रजला रहात असत. आगरकर सुट्टीत आले की, मग त्या टेंभूला सासरी जात.

सन १८८० मध्ये आगरकर एम.ए. झाले आणि वर्षभरात ते पुण्याला न्यू इंग्लिश स्कूल व केसरी या कार्यांत गुंतल्यावर त्यांनी पुण्याला संसार थाटला.

पुढे वाचा

विदर्भातील पुरोगामी विदुषी – कै. प्रा. मनू गंगाधर नातू

माझे औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातील गुरू डॉ. भालचंद्र फडके मला १९६६ मध्ये अमरावती येथील विदर्भ महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रमुख प्रो. श्रीमती म. गं. नातू यांच्याकडे घेऊन गेले. डॉ. भालचंद्र फडके यांनी माझी हमी घेतल्यामुळे बाईंनी मला पीएच्. डी. करिता मार्गदर्शन करण्याचे मान्य केले. मी विदर्भातील नोकरी सोडून पैठणला आलो. १९७६ मध्ये मला पीएच्. डी. मिळाली. बाईंशी या निमित्ताने आलेला ऋणानुबंध पुढेही कायम राहिला. १९४६ पासून १९७७ पर्यंत बाई विदर्भ महाविद्यालयात होत्या. निवृत्त झाल्यानंतर त्या नागपूर येथे स्थायिक झाल्या. दि. ३ एप्रिल १९८८ रोजी बाई नागपूर येथे निधन पावल्या.

पुढे वाचा

“बाई”

सुमारे ३० वर्षापूर्वी मी नातूबाईंना प्रथम पाहिले. “वाचक पाहिजे” अशी जाहिरात त्यांनी दिली होती. मला शिक्षण घेता घेता करण्याजोगे काही काम हवे होते. त्यांच्या खोलीत मी प्रवेश केला तेव्हा खोलीत काळोख होता. पडदे सरकवलेले होते. पंखा मंद सुरू होता आणि हाताशी असलेल्या आटोपशीर स्टुलावर डोके खाली केलेला टेबललॅम्प जळत होता. बाई पलंगावर किंचित रेलून, विसावून पहुडलेल्या होत्या. अंगावर शुभ्र सुती साडी, कपाळावर अगदी बिंदुले काळे कुंकू, लख्ख गोरा वर्ण, काळेभोर केस. त्यांनी पुस्तक पुढे केले तेव्हा दिसलेला मृदू गुलाबी तळवा आणि नाजुक त्वचा.

पुढे वाचा