विषय «पत्र-पत्रोत्तरे»

पत्रव्यवहार

जातिधर्म निरपेक्ष समुदाय निर्माण व्हावा
संपादक, आजचा सुधारक यांस,
मार्च ९९ च्या अंकातील चिंतामणी गद्रे लिखित जाति-धर्म-निरपेक्ष-विवाह-निर्धारदिन’ त्यातील विचार वाचले. त्यांच्या काही मुद्दयांशी मी सहमत आहे. मी १९७७ साली ग्रॅज्युएट झाले. माझ्या School Leaving Certificate मध्ये जातीचा कॉलम कोरा आहे. त्या जागी छोटी रेघ आहे. (अर्थात् आडनाव हा फॅक्टर जात ओळखण्यास आपल्याकडे फार मोठा आहे.)
हुंडा न देता साधेपणाने लग्न करीन एवढीच प्रथम इच्छा होती. नंतर नोकरी लागल्यावर जातपात कधीच न मानल्याने आंतरजातीय (अर्थात हाच वाक्प्रचार प्रचलित असल्याने) लग्न करीन. त्याची जात विचारण्याचा प्रश्नच झाला नाही.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

घटस्फोटितांच्या कुंडल्यांमध्ये साम्य नाही
श्री. संपादक, आजचा सुधारक
आजचा सुधारक (जानेवारी १९९९) पान ३१६. माधव रिसबुडांचे पत्र : ‘फलज्योतिषाला वैज्ञानिक आधार नाहीच.
वरील पत्र वाचून मला माझा ह्या क्षेत्रातील अनुभव येथे नोंदवावासा वाटला. १९९० च्या सुमारास कै. वि.म. दांडेकर ह्यांच्या सांगण्यावरून घटस्फोट घेतलेल्या ३०० युगुलांची जन्मतारीख आणि जन्मवेळ (मी व वि.म. दांडेकरांनी) जमा केली. संगणकाच्या साहाय्याने त्यांच्या ३०० पत्रिका करणे सोपे गेले. जवळजवळ आठ सेकंदाला एक ह्या वेगाने जन्मतारीख व जन्मवेळ ह्यांच्या सहाय्याने ज्यांना कुंडल्या म्हणतात त्या तयार करून आम्ही एका समंजस वाटणाच्या ज्योतिष्यापुढे टाकल्या.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

निरपराध्यांना आणि गुन्हेगारांना एकच न्याय?
संपादक, आजचा सुधारक
स.न.वि.वि.
श्री. दत्तप्रसाद दाभोलकर यांचे ‘मी नथुराम…. वर बंदी नको’ ह्या शीर्षकाचे पत्र वाचले. मी नथुराम…’वर बंदी नको असे माझेही मत आहे. परंतु हे मत नोंदवताना श्री. दाभोलकरांनी केलेला युक्तिवाद मात्र मला पटत नाही. गांधीजींचा खुन ही एक ऐतिहासिक घटना होती आणि नथुराम ही एक ऐतिहासिक व्यक्ती होती असे म्हणून दाभोलकरांनी गांधी आणि गोडसे या दोघांनाही एकाच मापाने मोजण्याचा प्रयत्न केला आहे.
गोडसेचे आधीचे चरित्र निश्चितच वाईट नव्हते. पण तेवढ्याने त्याने केलेल्या गांधींच्या खुनाला मूल्याधिष्ठित म्हणता येत नाही.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

आजचा सुधारक तरुणांना आवडेल असे काहीतरी करा
संपादक, आजचा सुधारक
नुकतीच ३ आठवड्यांपूर्वी माझी प्रा. प्र. ब. कुलकर्णी यांच्याशी ओळख झाली. त्यांच्याकडून आजचा सुधारक चे काही जुने अंक मला वाचायला मिळाले. ते मला अतिशय
आवडले. विशेषतः आपण लिहिलेले विवेकवादावरचे लेख तर फारच आवडले. सर्वच लिखाण उत्कृष्ट व वाचनीय आहे व त्याचबरोबर विचारप्रवर्तकही आहे. आपले लेख वाचून मनात आलेले विचार मी या पत्राबरोबरच परंतु वेगळे लिहून पाठवीत आहे.
आपण विवेकवादाचा पुरस्कार करून आगरकरांचेच कार्य पुढे चालवत आहात यात शंका नाही. मला स्वतःला आगरकरांबद्दल फार प्रेम आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

मी नथुराम…..वर बंदी नको
संपादक, आजचा सुधारक,
मी नथुराम गोडसे बोलतोय… या नाटकावरील बंदीच्या संदर्भात झालेली चर्चा वाचली. नाटकावर बंदी घालणे चूक आहे असे मला वाटते व या विषयावर अधिक व्यापक चर्चा होणे अगत्याचे आहे. माझ्या भावना दुखावतात म्हणून एखाद्या व्यक्तीबद्दल वा कलाकृतीबद्दल ‘फतवा काढण्यासारखे काही कृत्य करून आपण त्याचे समर्थन करीत आहोत काय?
व्यक्तिगत दृष्ट्या एक गोष्ट मला प्रथमच स्पष्ट करावी वाटते. मी व्यक्तिशः आजपर्यंत तरी गांधीजी हे महात्मा आहेत व नथुरामने केलेले कृत्य चुकीचे व वाईट आहे असे मानत आलो आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

आजचा सुधारक सर्वांना आपला’ सुधारक वाटायला हवा
संपादक, आजचा सुधारक
आमच्या लेखावर सुनीती देव यांची प्रतिक्रिया वाचली. आमचे म्हणणे आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहचले नाही असे वाटते. सोबत काही अलीकडील कात्रणे पाठवत आहेत. या कात्रणांवरून आपल्या असे लक्षात येईल की समाजातील उच्चवर्णीयांची मागासवर्गीयांबद्दलची मानसिकता अजून बदललेली नाही. पुरोगामी समजल्या जाणा-या महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील बोरगाव येथे दलित वस्तीतील घरे सवर्णाकडून जाळली जातात, त्यांच्यावर बहिष्कार टाकला जातो. Words Like Freedont या पुस्तकात सिद्धार्थ दुबे हा लेखक म्हणतो की दलितांच्या आर्थिक व सामाजिक स्थितीत स्वातंत्र्य मिळून ५० वर्षे झाली तरी काही बदल झालेला नाही.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

राजेंद्र व्होरा यांच्या आगरकरांविषयीच्या टीकेस आपण प्रत्युत्तर देणे आवश्यक होतेच का? व्होरा यांचे आगरकरांच्या लिखाणाविषयीचे निरीक्षण आपण अप्रत्यक्षपणे मान्य केले आहे, त्यांचा निष्कर्ष आपणास मान्य नाही. पण आगरकर हे उत्तुंग व्यक्तिमत्त्व असले तरी त्यालाही मर्यादा असल्यास हरकत नसावी.
– मधुकर देशपांडे
३ राज अपार्टमेंटस्, ४४/१
शिवदर्शन चौक, विद्यानगरी, पुणे ४११००९

संपादक,
आजचा सुधारक
आपल्या मासिकाचा मी नुकताच वर्गणीदार झालो आहे. मागील १०-१५ अंक मागून घेतले होते तेही माझ्याजवळ आहेत. सहज अंक चाळून पहात असता मला काही विचार सुचले ते आपल्यापुढे मांडत आहे.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

ब्राह्मणेतर समाजवर्ग व आजचा सुधारक – एक प्रतिक्रिया
आजचा सुधारकच्या ऑगस्ट १९९८ च्या अंकात प्रभाकर नानावटी व टी.बी. खिलारे ह्या दोघांनी मिळून लिहिलेला पत्रस्वरूपाचा लेख प्रसिद्ध झाला आहे. आजचा सुधारकची एक वाचक म्हणून (संपादक मंडळातील एक म्हणून नव्हे !) मला ह्या लेखकद्वयासमोर काही मुद्दे विचारार्थ मांडावेसे वाटतात म्हणून हा पत्रप्रपंच!
आजचा सुधारकचे वाचक ‘ह्या’ दृष्टिकोनातून अंक वाचतात ह्याचा खेद झाला. एकीकडे आठ वर्षांची वाटचाल पूर्ण केली ह्याबद्दल अभिनंदन करून तसेच त्यातील लेखन ‘रूढ अर्थाने ब्राह्मणीवृत्तीला पोषक आहे असा आरोप कोणीही करण्यास धजवणार नाही’ असा निर्वाळा देऊन दुसरीकडे मात्र आजचा सुधारक ह्या मासिकात लिहिणारे व ते वाचणारे केवळ उच्चजातीय आहेत’ हा अर्थ काढायचा ह्या वृत्तीचे आश्चर्य वाटले.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

गुणवत्ता – यादीचे कौतुक पुरे !
संपादक, आजचा सुधारक यांस,
‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या म्हणीप्रमाणे १० वी, १२ वी, चे निकाल लागले की, शिक्षण आणि परीक्षा या संबंधातील चर्चा वर्तमानपत्रांतून एखादा महिना चालते व नंतर शिक्षणक्षेत्रात आणि शासनाच्या शिक्षण-खात्यात पुन्हा सामसूम होते.
लॉर्ड मेकॉलेने, भारतात शिक्षण-पद्धती सुरू केल्यावर ‘ही शिक्षण-पद्धती केवळ आज्ञाधारक सेवकवर्ग तयार करणारी आहे’ – अशी तीवर टीका झाली. परंतु दुर्दैवाने या पद्धतीत अजूनहि फारशी सुधारणा झालेली नाही.
वास्तविकरीत्या ‘परीक्षा’ याचा अर्थ परि+ईक्षण म्हणजे सर्व बाजूंनी पाहणे. बौद्धिक विकासामध्ये कार्यकारणभाव समजणे, तरतम-भाव समजणे, साम्यविरोध समजणे या सगळ्या प्रक्रिया येतात आणि याची परीक्षा घेतली गेली पाहिजे.

पुढे वाचा

पत्रव्यवहारे

शेरशहा ते अटलबिहारी
जवळ जवळ रोज आपल्याला अशी बातमी वाचायला मिळतेः- “समोरून येणा-या वाहनाला चुकवताना बसगाडी रस्ता सोडून बाजूला गेली व झाडावर आदळली. ड्रायव्हर मृत व इतर ७ अत्यवस्थ.” फरक इतकाच की कधी बस, कधी ट्रक किंवा कधी कार, किंवा रस्ता सोडून बाजूला जाण्याचे कारण बदलते. कधी टायर फुटल्याने, कधी वाहन चालकाला डुलकी लागल्याने, तर कधी चुकार पादचायाला किंवा सायकलस्वाराला वाचवताना गाड़ी रस्त्याबाहेर जाते.
हायवे शेजारी जर मोठे वृक्ष, मजबूत बांधकामे, मोठे मैलाचे दगड अशा गोष्टी नसल्या तर रस्ता सोडून बाजूला गेलेली गाडी शेतातील पिकांमध्ये किंवा माळावरील झुडुपांमध्ये घुसून हळू हळू थांबेल, फार तर उलटी होईल.

पुढे वाचा