विषय «पत्र-पत्रोत्तरे»

पत्रसंवाद

न. ब. पाटील, अ-३७, कमलपुष्प, वांद्रे रिक्लमेशन, मुंबई — ४०० ०५०
सृष्टिज्ञान मासिक ७३ वर्षांचे झाले. मराठी विज्ञान परिषदेनेही पस्तिशी ओलांडली. विज्ञान अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावे हेच ह्या दोघांचेही उद्दिष्ट आहे. मागे वळून पाहण्याच्या उद्देशाने त्या दोन्ही संस्थांनी संयुक्तपणे पुण्यात एक छोटासा मेळावा दि. १९ व २० मे २००१ रोजी आयोजित केला होता. या प्रसंगी ‘विज्ञान वाङ्मय निर्मिती’ या विषयावर एक चर्चासत्र आयोजले होते. एका सत्रार्धाचे अध्यक्षत्वही मी केले. दि. १९ रोजी दुपारी १२.३० वाजता हे चर्चासत्र सुरू झाले. पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र आणि संपादन विभागाचे निवृत्त विभाग प्रमुख प्रा.

पुढे वाचा

पत्रसंवाद

प्रियदर्शन पंडित, किल्ला रोड, महाल, नागपूर — ४४० ००२
मे महिन्याच्या आ.सु. मध्ये खादीवर स्फुट आले आहे. मी स्वतः पूर्ण खादी वापरणारा आहे. मी रोज सूत काततो. माझे वडील तर साध्या टकळीवर सूत कातीत. तेही पूर्ण खादी वापरीत. तेव्हा खादी हा माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा भाग आहे. म्हणून हा लेखनाचा प्रपंच करीत आहे.
माझ्या या लिखाणात माझे अनुभव आणि माझी काही वैयक्तिक माहिती येईल तरी तिला अहंमन्यता असे समजू नये ही विनंती, कारण आपल्या एकूण व्यवहारात आपण स्वतःसंबंधी उल्लेख टाळतो त्याचप्रमाणे व्यक्तींची नावे येऊ देत नाही.

पुढे वाचा

पत्रसंवाद

शशिकांत हुमणे, १२, राजीव सह-गृहनिर्माण संघटना, बांद्रा-कुर्ला संकुल, मुंबई — ४०० ०५१
एप्रिल महिन्यात १४ तारखेला डॉ. आंबेडकरांचा जन्मदिवस येतो. त्यानिमित्त एक जुने शुभेच्छापत्र पाठवीत आहे, ज्यात डॉ. आंबेडकरांचे मौलिक विचार आहेत. हे विचार एप्रिलच्या अंकाच्या मुख्यपृष्ठावर छापावे, तसेच नोबेल प्राईझविजेता इलियास कॅनेटी याचे त्याच पत्रातील विचार मे च्या अंकाच्या मुख-पृष्ठावर छापावे.

“ते” आणि “आपण’ हे हिंदुधर्मातील संपूर्ण जातीजमातींचे नाजुक दुखणे आहे. जातीशिवाय हिंदू किंवा हिंदुधर्म नाही. आणि हिंदूंशिवाय जगात इतरत्र कुठेही जाती-वेडेपणा व जाती-मत्सर उपलब्ध नाही. जातीच्या संसर्गरोगाची लागण मुस्लिम आणि ख्रि चन धर्मीयांनाही झाली असल्यास नवल नाही, परंतु या पापाचे धनी सुद्धा हिंदू आणि हिंदुधर्मच आहेत असे खेदाने म्हणावे लागते.

पुढे वाचा

पत्रसंवाद

गंगाधर गलांडे, 4 Aldridge Court, Meadway, IIIGII WYCOMBE, Bucks. IIP 11 1SE, UNITED KINGDOM

काही महिन्यांपूर्वी, अकस्मात वाढलेल्या टपालखर्चामुळे, काही आर्थिक मदत करण्याबद्दल आवाहन केले होते आपण वर्गणीदारांना. त्याला साद देण्यासाठी मी अेकदा संगणकापुढे बसलेलोही होतो. मधेच कसलेतरी खुसपट उपटल्याने स्थगित झाले ते लेखन. क्षमस्वमे. सोबत १० पौडांचा धनादेश जोडत आहे. कृपया, त्याचा स्वीकार व्हावा.

नोव्हेंबर २०००च्या अंकातील श्री. आत्रे यांचा जातींचा उगम—-एक दृष्टिकोन हा लेख वाचत असता सहज एक विचार मनीं आला व मला उत्तर सापडेना म्हणून आवर्जून हे पत्र लिहीत आहे मी आपणांस.

पुढे वाचा

पत्रसंवाद

सूचना
क) काही महिन्यांपूर्वी ‘सायंटिफिक टेंपर प्रमोशन ट्रस्ट’ने आम्हाला रु. ५००/- पुरस्कार दिला होता. आता या संस्थेने दिलेल्या इतर पुरस्कारांची माहिती उपलब्ध झाली आहे, ती अशी—-
१. डॉ. विठ्ठल प्रभु :– स्त्री-पुरुष-संबंधाविषयी वास्तवपूर्ण आणि सडेतोड विचार प्रचारासाठी, अंधश्रद्धा दूर करण्यासाठी गेली ४० वर्षे अविश्रांत धडपड
२. आजचा सुधारक :– गेली ५ वर्षे सातत्याने वैचारिक आणि संशोधनपर लेख लिहून पुरोगामी विचार प्रसृत करण्याबद्दल
३. मासिक चालना :– जातिभेद नष्ट करणे आणि पुरोगामी विचार गेली ५० वर्षे सातत्याने मांडणे ह्याबद्दल.
४. स्त्रीमुक्ति संघटना :– स्त्रियांचे प्र न झुंजारवृत्तीने सातत्याने मांडून त्याविषयीची जनजागृती करण्याबद्दल
५.

पुढे वाचा

पत्रसंवाद

र. द. जोशी
आजचा सुधारकच्या ११.८ या अंकात श्री. पळशीकर यांचा जो लेख आहे त्याची एक चांगली प्रतिक्रिया, श्री. देशपांडे यांची त्याच अंकात आहे. मी थोड्या वेगळ्या अंगाने पुढील प्रतिक्रिया देऊ इच्छितो.

लेखाच्या पहिल्याच वाक्यात ‘धर्म या गोष्टीचा उदय झाला’ असे जे म्हटले आहे. ते योग्य नाही. उदय फक्त देव, दैवी शक्ती व श्रद्धा यांचा झाला.

भारतात धर्म या शब्दात कमीत कमी दोन तरी प्रमुख व वेगवेगळ्या संकल्पना अंतर्भूत मानायला हव्यात. एक म्हणजे देव, पितर, प्रत्यक्ष दिसणारी पंचमहाभूते यांना संतुष्ट करण्याच्या भ्रांत कल्पनांनी केली जाणारी, प्रार्थना, पूजा, व्रतवैकल्ये, होमहवन, यज्ञ इत्यादि आणि दुसरी म्हणजे विविध सामाजिक व्यवहार उदा.

पुढे वाचा

पत्रसंवाद

भ. पां. पाटणकर
३-४-२०८, काचीगुडा, हैदराबाद — ५०० ०२७
श्री. संपादक, आ. सु., यांस सप्रेम नमस्कार
आ. सु.चा सप्टेंबर २००० चा अंक बुद्धिवाद-विवेकवादाच्या अनेक अंगांना स्पर्श करून गेला आहे. पण विषय मोठा आहे आणि चर्चा त्रोटक आहे. अर्थात फार लांबलचक चर्चा कंटाळवाणी होते हेही खरे. पण त्रोटक चर्चेत अपूर्णताही पुष्कळ राहते.

प्रथम श्री. दप्तरीचेच विचार घेऊ. धर्म परिवर्तनीय आहे असे मानणे ही ऐतिहासिक पद्धत असल्याचे संपादकांनी म्हटले आहे. त्याने काय सूचित होते हे कळले नाही. ऐतिहासिक पद्धत याचा एवढाच अर्थ असायला पाहिजे की वेळो-वेळी काय वस्तुस्थिती होती याची नोंद घेणे.

पुढे वाचा

पत्रसंवाद

हर्षवर्धन निमखेडकर
माहूर, २९, देवतळे ले-आऊट नागपूर — ४४० ०१०
सुधारकने वेबसाईट उघडावी का?
आजचा सुधारक या मासिकाची इंटरनेटवर ‘वेब-साईट’ काढावी असा आग्रह मी अनेक दिवसांपासून संपादकांकडे करतो आहे. कधी ना कधी तरी ही इच्छा पूर्ण होईल, अशी मला आशा आहे. दरम्यान, याबाबत माझेच मला पडलेले काही प्र न मी येथे मांडतो. वेब-साईट उपयुक्त आहे की नाही, या विषयावर थोडी चर्चा व्हावी, या हेतूने. वेब-साईट सुरू करणे म्हटले तर फारसे खर्चाचे नाही—-पण तिचे संगणकीय आरेखन/आलेखन करणे व सातत्याने तिच्या मजकुरात बदल करणे—-यासाठी मात्र तंत्रज्ञांची मदत घ्यावी लागणार असल्याने ही बाब खर्चिक ठरते.

पुढे वाचा

पत्रसंवाद

सेक्युलॅरिझम् (धर्मनिरपेक्षता) शब्द प्रथम कोणी वापरला?
‘सेक्युलॅरिझम्’ या संकल्पनेच्या आशयाबद्दल वेगवेगळे विचारप्रवाह आहेत आणि म्हणूनच १५० वर्षापूर्वी हा शब्द प्रथम वापरला गेला तेव्हापासून आजतागायत या विषयावर अविरतपणे चर्चा चालू असते.

१८५० साली हा शब्द पहिल्या प्रथम वापरणाऱ्या जॉर्ज जेकब हॉलयोकचा जन्म १८१७ साली, इंग्लडमधील बर्मिंगहॅम या शहरात झाला. तरुण वयात त्याची धर्मावर अढळ श्रद्धा होती. धर्मप्रसारकांच्या सभा-बैठकांमध्येही तो सामील होत असे, एवढेच नव्हे तर या श्रद्धेप्रीत्यर्थ आवश्यक असणारा खर्चही तो स्वतःच्या खिशातून करीत असे. या त्याच्या कार्यातून त्याची बढती झाली, आणि १८३६ मध्ये म्हणजे वयाच्या १९ व्या वर्षी तो दर रविवारी प्रवचनेही करू लागला.

पुढे वाचा

पत्रसंवाद

प्रत्येक व्यक्तीच्या समाज–गटाच्या किंवा समाजाच्या जीवनामध्ये सतत भिन्न प्रकारच्या आर्थिक समस्या निर्माण होत असतात. त्या स्वतःच्या आर्थिक स्थितीतील बदलांमुळे किंवा इतरत्र (बाह्य) होणाऱ्या बदलांमुळे निर्माण होतात. त्यांचे परिणामही आपल्यावर काही प्रमाणात प्रत्यक्ष आणि काही प्रमाणात अप्रत्यक्षपणे घडतात त्या त्या प्रमाणात त्या समस्यांमध्ये आपला सहभाग (involvement) असतो. ज्या समस्यांशी आपला थेट संबंध असतो त्यांच्याबद्दलची आपली जाण चांगली असते. त्यामुळे त्यासंबंधीची इतरांची मते, सरकारी धोरणे कंपन्यांची धोरणे इत्यादी गोष्टी कितपत योग्य आहेत हे आपल्याला चांगले माहीत असते. परंतु थेट संबंध न येणाऱ्या क्षेत्रांतील घडामोडींचा तपशील आपल्याला कमी माहीत असतो.

पुढे वाचा