जॉर्ज ऑरवेलची नॅशनॅलिझमवरची टीका ही समूहवादाला उद्देशून होती, राष्ट्रवादाला नव्हे हे मी सप्टें. ०४ च्या अंकातील पत्रात स्पष्ट केले होते. तशीच चूक मीरा नंदा ह्यांच्या ‘आधुनिकोत्तरवाद’ ह्या लेखात दिसते. भारतात इ.स. १३०० पासून मुस्लिमांनी जिहादच्या नावाने प्रचंड कत्तली घडवून आणल्या आहेत. ह्याची प्रतिक्रिया म्हणून शिवाजीच्या वेळेपासून हिंदू समाजाचे संघटित होण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच परिणाम टिळक, सावरकर, हेडगेवार यांच्या राष्ट्रवादाच्या पुरस्कारात झाला आहे. ही तथ्ये नाकारली आहेत.
हे मुस्लिम दहशतवादी अत्याचार आजही चालू असून त्याविरुद्ध राष्ट्रवादी शक्ती उभ्या करणे ही काळाची गरज आहे.
विषय «पत्र-पत्रोत्तरे»
पत्रसंवाद
आ.सु. सप्टेंबर २००४ च्या अंकात पृष्ठ क्र. २८७ वर श्री.पु.नी. फडके यांचे पत्र आहे. त्याच्या शेवटी असलेल्या संपादकीय टिपणींमधील दोन मुद्दे खटकण्यासारखे आहेत.
१. “हे सारे आमच्या भूमिकेच्या पूर्ण विरोधात आहे.” असे संपादकांचे म्हणणे आहे. येथे एक विनंती करावी वाटते की ज्याप्रमाणे वाईच्या ‘नवभारतात’ पहिल्याच पानावर नवभारतची भूमिका छापलेली असते तशी आपली भूमिका आपण छापावी. कारण माझ्यासारख्या नवीन वाचकांना तुमची भूमिका काय आहे हे कधी कळणारच नाही.
२. “घेणे, न घेणे, अर्थातच आपल्यावर सोडतो.’ या टिपणीबाबतीत भाष्य करायचे झाल्यास त्याच शब्दांत हे पत्र छापावे वा न छापावे, मला काही फरक पडत नाही असे म्हणणे औद्धत्याचे आपल्याला वाटणार नाही का?
पत्रसंवाद
एस. पी. देशपांडे
लेखांचे विषय जरी त्या-त्या विशेषज्ञांनी निवडले असले आणि जगदीशचंद्र बसूंच्या मुखपृष्ठावरील उताऱ्यावरून एकच सर्वसमावेशक विज्ञान असले तरी त्याच्या विविध उपांगांचा ह्या अंकात समावेश करण्याची घेतलेली खबरदारी स्पृहणीय आहे. ज्यांना पानपूरके म्हणतात ती किंवा ज्यांना अवतरणे किंवा चौकटी म्हटले आहे त्या, सुप्रसिद्ध व्यक्ती आणि संशोधकांच्या विज्ञानविषयक निबंधांतून उद्बोधक विचार डोळसपणे निवडून मधून मधून अंकात पेरल्याने ह्या अंकाच्या गुणवत्तेला एक वेगळाच आयाम प्राप्त झाला आहे.
एका अत्यंत महत्त्वाच्या विज्ञानशाखेची गैरहजेरी तीव्रतेने जाणवते, ती म्हणजे रसायनशास्त्र शाखेची. मानवी जीवनावर प्राचीन काळापासून परिणाम करणारा व त्याच्या साहाय्याने विज्ञानाच्या शाखोपशाखात भर टाकणारा, विशेषतः आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित अशा औषधशास्त्रात रसायनशास्त्राचे अनन्यसाधारण महत्त्व असताना, अशी महत्त्वाची शाखा कशी सुटली?
पत्रसंवाद
विज्ञानाचे स्वरूप सांगणारा विशेषांक फारच चांगला झाला आहे. त्यात दिलेली माहिती प्रत्येक सुविद्य माणसाला माहीत हवीच.
सामान्य माणसाच्या जीवनात मात्र विज्ञान फारसे शिरत नाही. त्यातले काही न समजताही तो फोनची बटने दाबून, स्कूटरला किक मारून, कम्प्यूटरचा ‘उंदीर’ चालवून आपला कार्यभाग साधत असतो. त्याची बुद्धी स्थल-काल, द्रव्यगुण या पारंपारिक संकल्पनांशी जुळलेली असते. या सर्वच कल्पना जिथे विलय पावतात, ऊर्जेचा पुरावा असतो पण द्रव्याचा पुरावा नसतो, तरीही गुरुत्वाकर्षण शक्ती असते, स्थल-काल हे स्वतंत्र पदार्थ नसून ते एका जटिल गणिती संबंधाने जुळलेली कशाचीतरी रूपे असतात अशा ‘नेति, नेति’ कल्पना सामान्य मनुष्याच्या पचनी पडत नाहीत.
पत्रसंवाद
स्त्रियांच्या प्रश्नांसंबंधी मी काहीही लिहिण्याचे टाळतो कारण ते प्रश्न नाजुक तर आहेतच पण त्यातले काही अपरिवर्तनीय वास्तव पुढे मांडणे हे पुरुषी अहंकाराचे लक्षण मानले जाते.
(एखाद्या स्थितीला, ती) “आज आणि इथे आहे या कारणासाठीच मान्यता देणे मला शक्य नाही’ असे तुम्ही म्हणता. परिस्थिती बदलायची धडपड जो कोणी करतो तो असेच म्हणतो. पण वास्तव किती बदलता येईल हा प्रश्न पडतोच. स्त्री ही शारीरिकदृष्ट्या दुर्बल आहे. ती कामसुखाकरता पुरुषाच्या इच्छेतर अवलंबून आहे (पुरुष मात्र तसा नाही) व बाळंतपण, बाळांना स्तनपान देणे या नैसर्गिक प्रक्रियांमुळे तिच्यावर बंधने येतात, ती परावलंबी होते.
पत्रसंवाद
“ ‘मित्र’च्या निमित्ताने’ या सुनीती देव यांच्या लेखासंबंधी (आ.सु. ऑक्टोबर, २००३) माझी प्रतिक्रिया : सुनीतीबाईंशी बऱ्याच बाबतीत माझे मतैक्य आहे. त्या म्हणतात तसे दादासाहेबांचा दलितांविषयीचा ग्रह न समजण्यासारखा आहे. बऱ्यापैकी बुद्धिवादी वाटणारा माणूस स्वतःस येणाऱ्या एका अनुभवामुळे सबंध जमातीविषयी एवढा आकस धरू शकेल असे वाटत नाही. त्याचे अधिक खोल जाणारे कारण दिले असते तर त्या पात्राला पोषक ठरले असते. तसेच आपल्या आग्रहीपणाने ते मुलांवर त्यांना वृद्धा-श्रमात पाठविण्याचा निर्णय घेणे भाग पाडत आहेत, हे त्यांना कळण्यासारखे आहे. पण या बाबतीत निदान असे म्हणता येईल की कळूनही त्यांचे खचणे व तो निर्णय न पटवून घेणे समजण्यासारखे आहे.
पत्रसंवाद
जे. के. रोलिंग या ब्रिटिश लेखिकेने लिहिलेल्या हॅरी पॉटर नायक असणाऱ्या कादंबऱ्यांनी सध्या जगातील बालमनाचा पगडा घेतला आहे. लेखिकेला मिळालेले हे यश कौतुकास्पद आहे यात शंकाच नाही पण ज्या मुलाची मातृभाषा व संस्कार भारतीय आहेत त्यांनीही या पुस्तकासाठी रांगा लावाव्यात असे या पुस्तकात काय विशेष आहे या कुतूहलाने त्यातील एका भागाचे मराठी भाषांतर ‘हॅरी पॉटर आणि गुपितांचे दालन’ वाचून मोठी निराशा पदरी पडली. केवळ एवढेच नव्हे तर अशी पुस्तके आपल्या पाल्यांना वाचायला देण्यापूर्वी जागरूक पालकांनी ती स्वतः वाचून त्या वाचनाचा मुलांवर काय परिणाम होईल याचा विचार करायला हवा असे वाटते.
पत्रसंवाद
वर्ष 14, अंक 4, हा जुलैचा अंक वाचला. त्यांतील दोन विषयांवर काही मते मांडत आहे.
1. गांधीजी व सावरकर यांच्या एकूण वैचारिकांची तुलना करणे योग्य होईल. अस्मृश्यता निवारण सोडल्यास हे दोघे मान्यवर पुढारी दोन विरुद्ध टोकाना उभे होते. गांधीजींचे अर्थकारण, राजकारण व समाजकारण सुसंगत होती. शेतीप्रधान व खेडीप्रधान अशी उत्पादनाची रचना, सूतकताई व हाथविणाई असा खादी-उद्योगाचा पुरस्कार, नांगरासाठी सशक्त बैल, दुधासाठी सशक्त गायी असा गोरक्षण कार्यक्रम, वैयक्तिक आचरणांत ब्रह्मचर्य व अहिंसा यावर अतिरेकी भर, ही गांधींच्या वैचारिकेची मुख्य सूत्रे होती. सावरकर हे गिरण्यांचे कापड, आधुनिक(तम) तांत्रिकी, अतिरिक्त गोधनाची हिंसा, इत्यादीचा पुरस्कार करीत.
पत्रसंवाद
जॉर्ज ऑर्वेलच्या -1984′ या उपहासगर्भ पुस्तकातील शासनाची एक घोषणा ‘इग्नोरन्स इज स्ट्रेंग्थ’ ही आहे. या पुस्तकातल्यासारख्या शासनाविषयी घृणा बनविण्यासाठी हे पुस्तक लिहिले गेले. देवरायांच्या समर्थकांनाही ही घोषणा आवडत नसावी या गृहीतकावर पुढील लिखाण आहे.
औषधशास्त्रात प्लॅसिबो ही एक महत्त्वाची संकल्पना आहे. खोट्या समजुतीचा सुद्धा औषधासारखा परिणाम घडत असेल तर त्यास प्लॅसिबो परिणाम म्हणतात. मात्र प्लॅसिबो परिणाम केवळ खऱ्या औषधाची परिणामकारकता तपासण्यासाठीच वापरला जातो. रोग निवारण्यासाठी प्लॅसिबोचे बुजगावणे वापरले जात नाही. फसवणूक करून लोकांवर अगदी त्यांच्या भल्यासाठीसुद्धा राज्य करू नये असा टूमन शो किंवा मेट्रिक्स या चित्रपटांचा विषय आहे.
पत्रसंवाद
गांधींना छोटा करणारा नथुराम मोठा कसा?
एप्रिल 2003 चा आजचा सुधारक वाचला त्यातील शांताराम कुलकर्णी यांच्या पत्रावर माझ्या प्रतिक्रिया देत आहे.
‘महात्मा’ही गांधींना मिळालेली पदवी त्यांच्या महान कार्याविषयीची पोहोच पावती होती. ‘अहिंसा’, ‘सत्याग्रह’ यासारख्या प्रभावी हत्यारांनी, शांततामय मार्गांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अध्यात्माचा आधार घेऊन गांधींनी नैतिकतेतून सामान्य माणसाला स्वातंत्र्यलढ्यासाठी तयार केले. म्हणूनच स्वातंत्र्य-प्राप्तीनंतर हाच महात्मा स्वतंत्र भारताचा ‘राष्ट्रपिता’ झाला.
आपल्या पित्याविषयीसुद्धा वाईट विचार व्यक्त करताना मुलगा आपल्या घराण्याच्या संस्कृतीचा चांगल्या विवेकी जीवनमूल्यांचा विचार करतो. ‘पिता’ हा कुटुंबाचा पालक असतो, म्हणूनच कुटुंबीय त्याला गुणदोषासहित स्वीकारीत असतात.