विषय «विवेकवाद»

विवेकवाद – १०

स्वामी धर्मव्रत यांच्या पत्रास उत्तर

याच अंकात, अन्यत्र, स्वामी धर्मव्रत यांचे पत्र छापले आहे. नवा सुधारकच्या नोव्हेंबर अंकात मी प्रा. श्याम कुलकर्णी यांच्या पत्राला जे उत्तर दिले त्याच्या संदर्भात स्वामी धर्मव्रत यांनी हे पत्र लिहिले आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की मी एक फार मोठी चूक करतो आहे, आणि केवळ मीच नव्हे, तर सर्वच आंग्लविद्याविभूषित तत्त्वज्ञानी आत्मविचाराच्या बाबतीत ती चूक करतात. आमच्या विवेचनात एक प्रचंड घोटाळा आहे. हा घोटाळा काय आहे, आणि आम्ही करीत असलेली चूक कोणती हे समजून घेण्याचा आणि स्वामी धर्मव्रतांच्या आक्षेपांना उत्तर देण्याचा येथे विचार आहे.

पुढे वाचा

विवेकवाद-९

नीतिविचार धर्मविचाराहून निराळा
नवा सुधारकाच्या ऑक्टोबर अंकाच्या मुखपृष्ठावर छापलेल्या आगरकरांच्या उतार्‍याचे शीर्षक आहे,‘नीतिविचार धर्मविचाराहून निराळा’. या विषयावर स्पष्टीकरणात्मक असे काही लिहावयाचा आज विचार आहे.

आजपर्यंत ‘विवेकवाद’ या शीर्षकाचे जे आठ लेख प्रसिद्ध झाले आहेत त्यांसंबंधाने काही चमत्कारिक विचारणा आमच्याकडे केल्या गेल्या आहेत. एक वाचक म्हणाले की तुमच्या विवेकवादात भावनांना काहीच स्थान नाही काय? तुमच्या लेखांवरून आमचा असा समज झाला आहे की तुम्हाला फक्त तर्ककर्कश गोष्टीच मान्य दिसतात. तुमच्या व्यवस्थेत भावनेला काहीच स्थान दिसत नाही. दुसरे एक वाचक म्हणाले की तुम्ही धर्मावर असे तुटून पडला आहात की तुमच्या विवेकवादात केवळ सुखप्राप्तीलाच तेवढे स्थान आहे.

पुढे वाचा

विवेकवाद -८

अध्यात्म आणि विज्ञान याच अंकात अन्यत्र वाचकांच्या पत्रल्यवहारात प्रा. श्याम कुलकर्णी यांचे एक पत्र छापले आहे. ते इत्र विवेकवादावर घेतल्या जाणार्‍या आक्षेपांचे प्रातिनिधिक मानायला हरकत नाही. प्रा. कुळकर्णी म्हणतात की जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्माची सुरुवात होते. प्रा. कुळकणी विज्ञानाचे प्राध्यापक आहेत, आणि म्हणून त्यांनी विज्ञानाचे अधिकार आणि त्याच्या मर्यादा यांविषयी व्यक्त केलेल्या मताला वजन आहे असे मानले जाणे स्वाभाविक आहे. त्यामुळे या पत्राला काहीसे सविस्तर उत्तर देण्याचे ठरविले आहे.

जिथे विज्ञानाचे क्षेत्र संपते तिथे अध्यात्माच्या क्षेत्राची सुरवात होते म्हणजे नेमके काय ?

पुढे वाचा

विवेकवाद – ७

शब्दप्रमाण
धर्मवाद्यांच्या, श्रद्धावाद्यांच्या शस्त्रागारातील एक महत्त्वाचे आयुध म्हणजे शब्दप्रमाण. जगातील सर्व धर्मानी शब्दाचे (म्हणजे विशिष्ट वाक्यांचे किंवा वचनांचे) प्रामाण्य मानले आहे. ख्रिस्ती नोक बायबलातील वचने, मुसलमान कुराणातील वचने, बौद्ध गौतम बुद्धाची वचने पूर्णपणे सत्य आणि अशंकाई मानतात, तसेच हिंदृही वेद, उपनिषदे, आणि विविध स्मृती यांतील वचने पूर्णपणे विश्वसनीय आणि संशयातीत मानतात. शब्दाला किंवा एखाद्या वाक्याला हा अधिकार कोठून प्राप्त होतो? अशी काही वचने आहेत हे खरे आहे काय? अशी वचने आहेत हे मी मानले जाते? इत्यादि प्रश्न येथे उपस्थित होतात.

या प्रकारच्या वचनांच्या अधिकाराविषयी प्रत्येक धर्माची स्वतंत्र उपपत्ती आहे.

पुढे वाचा

विवेकवाद – ६

सत्य, सत् आणि साधु
या लेखमालेच्या पहिल्या लेखांकात आपण सत्य म्हणजे काय? या प्रश्नाचा विचार केला. आपण असे म्हणालो की ‘सत्य’ हे विशेषण फक्त विधानांनाच लागू पडू शकते. विधान म्हणजे स्थूलमानाने बोलायचे तर एखाद्या गोष्टीचे वर्णन. वर्णन हे यथार्थ किंवा अयथार्थ असते; म्हणजे वर्य वस्तूचे स्वरूप जसे असेल तसे विधानात सांगितलेले असते, किंवा ते जसे नाही तसे सांगितलेले असते. जेव्हा विधानातील वर्णन यथार्थ असते तेव्हा ते सत्य असते, आणि अयथार्थ असते तेव्हा ते असत्य असते. उदा. ‘पृथ्वी गोल आहे’ हे विधान सत्य आहे, कारण त्यात पृथ्वीच्या आकाराचे वर्णन तो जसा आहे तसे केले आहे; उलट ‘पृथ्वी सपाट आहे हे विधान असत्य आहे कारण त्यात पृथ्वीचा आकार जसा नाही तसा असल्याचे सांगितले आहे.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग ६)

कल्पनात्म प्रेम (Romantic Love)
ख्रिस्ती धर्म आणि बर्बर टोळ्या यांच्या विजयानंतर म्हणजे रोमन नागरणाच्या (civilization) पराजयानंतर स्त्री आणि पुरुष यांचे संबंध कित्येक शतकांत गेले नव्हते अशा पशुतेच्या पातळीवर गेले. प्राचीन जग दुराचारी होते, पण ते पाशवी नव्हते. तमोयुगांत धर्म आणि बर्बरता यांनी संगनमत करून जीवनाच्या लैंगिक अंगाचा अधःपात घडवून आणला, विवाहात पत्नीला कसलेच हक्क नव्हते; आणि विवाहाबाहेर सर्वच लैंगिक संबंध पापमय असल्यामुळे अनागरित (uncivilized) पुरुषाच्या स्वाभाविक पशुत्वाला वेसण घालण्याचे कारणच उरले नाही. मध्ययुगात दुराचार सर्व दूर पसरले होते, आणि ते किळसवाणे होते.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग ५)

ख्रिस्ती नीती
‘विवाहाची मुळे कुटुंबात रुजलेली आहेत, कुटुंबाची विवाहात नाहीत’ असे वेस्टरमार्क म्हणतो. हे मत ख्रिस्तपूर्व काळात उघडे सत्य म्हणून स्वीकारले गेले असते; परंतु ख्रिस्ती धर्माच्या आगमनानंतर ते एक महत्त्वाचे विधान झाले असृन त्याचे प्रतिपादन त्यावर जोर देऊन करावे लागते. ख्रिस्ती धमनि, आणि विशेषतः सेंट पॉलने, विवाहाविषयी एक अगदी नवीन कल्पना मांडली: ती अशी की विवाह प्राधान्याने अपत्योत्पादनाकरिता नसून तो अविवाहितांमधील लैंगिक संबंधाच्या (fornication) पापाचे निवारण करण्यासाठी आहे.
सेंट पॉलची विवाहविषयक मते कॉरिंथमधील रहिवाश्यांना त्याने लिहिलेल्या पहिल्या पत्रात पूर्ण स्पष्टपणे व्यक्त झाली आहेत.

पुढे वाचा

विवेकवाद – ५

या लेखमालेच्या पहिल्या लेखांकात ‘आपण कशावर विश्वास ठेवावा?’ अरा प्रश्न आपण विचारला होता, आणि त्याचे उत्तर ‘अर्थात् सत्य विधानांवर’ असे एका वाक्यात दिले होते. परंतु यावर एक आक्षेप असा घेतला जाऊ शकेल की ‘सत्य विधानावर विश्वास ठेवावा’ हे उत्तर पूर्णपणे बरोबर नाही. त्यावर विश्वास ठेवणे नेहमीच इष्ट असेल असे नाही. कित्येकदा सत्यदर्शन अनिष्टही असू शकते. उदा. एखाद्या मनुष्याला जर गंभीर आजार झाला असेल तर पुष्कळदा रोग्याला डॉक्टर ते सांगत नाही. रोगी कदाचित् मानसिक धक्क्याने आणि निराशेने हातपाय गाळील, आणि रोगाला प्रतिकार करण्याची त्याची शक्तीच नाहीशी होऊ शकेल.

पुढे वाचा

विवाह आणि नीती (भाग ४)

लिंगपूजा, तापसवाद आणि पाप
जेव्हा पितृत्वाचा शोध लागला त्या क्षणापासून धर्माला लैंगिक व्यवहारात मोठा रस उत्पन्न झाला. हे अपेक्षितच होते; कारण जे जे गूढ आहे आणि महत्त्वाचे आहे अशा सर्व गोष्टींत धर्म रस घेतो. कृषीवलावस्था आणि मेंढपाळ अवस्था यांच्या आरंभीच्या काळात राहणाऱ्या मनुष्यांच्या दृष्टीने सुपीकपणा, मग तो जमिनीचा असो, गुराढोरांचा असो, किंवा स्त्रियांचा असो, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती. शेती नेहमीच पिकत नसे, आणि तसेच मैथुनातून अपत्यजन्मही नेहमी होत नसे. म्हणून धर्म आणि जादू (अभिचार) यांना इष्टफलप्राप्तीसाठी आवाहन केले जाई. सहानुभवात्मक अभिचाराच्या (sympathetic magic) तत्कालीन समजुतीनुसार लोक असे मानीत की मानवांतील बहुप्रसवत्व वाढले की जमिनीचेही वाढेल; आणि तसेच मानवांतील बहुप्रसवत्वाची आदिम समाजात मोठी मागणी असल्यामुळे तिच्याही वृद्ध्यर्थ विविध धार्मिक आणि अभिचारात्मक कर्मकांड सुरू झाले.

पुढे वाचा

विवेकवाद – ४

विज्ञान, अध्यात्म आणि साक्षात्कार
गेल्या दोन लेखांकांत आपण पाहिले की ईश्वरारितत्वसाधक कोणताही युक्तिवाद निर्णायक नाही. त्यांपैकी काही निराधार गोष्टी गृहीत धरून त्यावर आधारलेले आहेत, तर काहींत स्वच्छ व्याघात आहे असे आपल्याला आढळून आले. पण एक युक्तिवाद अजून तपासायचा राहिला आहे, आणि त्यावर ईश्वरवाद्यांची बरीच भिस्त आहे. हा युक्तिवाद म्हणजे ईश्वराचा साक्षात्कार होतो या दाव्यावर आधारलेला. त्याकडे आता वळू.

या लेखमालेच्या पहिल्या लेखांकात असे म्हटले होते की कोणत्याही विधानावर विश्वास ठेवायचा (किंवा ते स्वीकारायचे) तर तो त्या विधानाच्या पुराव्यावर आणि त्या पुराव्याच्या प्रमाणात ठेवावा; आणि पुरावा आपल्याला तपासता येत नसेल, तर त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना प्रमाण मानावे.

पुढे वाचा