गीतेवरील माझ्या लेखावर प्रा. श्री. गो. काशीकर यांनी घेतलेल्या आरोपांना मी जे उत्तर दिले ते त्यांना पटले नसून त्यांनी आता नवविवेकवादाची गरज आहे’ या शीर्षकाचे प्रत्युत्तर पाठविले आहे. हे प्रत्युत्तर या अंकात अन्यत्र छापले असून त्याबद्दलची माझी भूमिका येथे देत आहे.
प्रथम मी प्रा.काशीकरांचे आभार मानतो, कारण त्यांनी एका गोष्टीकडे माझे लक्ष वेधले आणि माझा एक गैरसमज दूर केला. माझी अशी समजूत होती (आणि अजूनही बर्या च प्रमाणात आहे) की विश्वाची उत्पत्ती हा विषय वैज्ञानिक पद्धतीच्या आटोक्यात नाही. काही वैज्ञानिक विश्वरचनेच्या (cosmology) क्षेत्रात काम करीत आहेत हे मला माहीत होते.
विषय «विवेकवाद»
आता नवविवेकवादाची गरज आहे
‘आजचा सुधारक’च्या फेब्रुवारी १९९२ च्या अंकात प्रा. दि. य. देशपांडे यांच्या गीतेवरील लेखांवर आक्षेप घेणारा माझा ‘हे विवेकवादी विवेचन नव्हे!’ हा लेख व त्यावरील प्रा. देशपांडे यांचा मर्यादित खुलासा प्रसिद्ध झाला आहे.
ह्या मर्यादित खुलाशातही मी उपस्थित केलेल्या मुद्यांना सोयीस्कर कलाटणी देण्यात आली आहे. उदाहरणार्थ, मोक्षशास्त्र हे बुद्धीच्या आवाक्यापलीकडे आहे असे मी म्हटलेले नाही. उलट, विज्ञान मोक्षशास्त्रालाही बुद्धीच्या आवाक्यात आणीत आहे याची उदाहरणे मी दिली आहेत. हा प्रयत्न पुरेसा निर्णायक होईपर्यंत मोक्षशास्त्राबद्दल पूर्णविश्वास किंवा पूर्ण अविश्वास व्यक्त न करणे हेच विवेकवादाशी सुसंगत होईल असे मी म्हटले आहे.
विवेकवाद – २०
नीतीचा आणखी थोडा विचार
या लेखमालेत नीतीचा विचार अनेक लेखांकांत आला आहे. विवेकवाद – ९, ‘नीतिविचार धर्मविचाराहून निराळा (जाने. ९१), विवेकवाद -१२ व १३, ‘उपयोगितावाद, १ व २’ (मे, जून १९९१), विवेकवाद – १८, नैतिक मूल्यांविषयी
आणखी थोडेसे (डिसेंबर ९१)- हे ते लेखांक.
या लेखांकांत जे विवेचन आले आहे त्याच्याविषयी अनेक वाचकांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत. त्यामुळे नीतीच्या काही कल्पनांचे थोडे विस्ताराने विवेचन झाल्यास बरे होईल असे वाटते.
विवेकवादाचे विवेचन करताना विवेकाचे कार्य ज्ञान आणि कर्म या दोन क्षेत्रांत काय आहे याचा विचार आपल्याला करावा लागला.
विवाह आणि नीती (भाग १८)
मानवी मूल्यांत कामप्रेरणेचे स्थान
कामप्रेरणेविषयी लिहिणार्या लेखकांवर, या विषयाची वाच्यता करू नये असे मानणार्या लोकांकडून, त्याला ह्या विषयाचा ध्यास लागलेला आहे असा आरोप होण्याची भीती नेहमीच असते. या विषयात त्याला वाटणारा रस त्याच्या महत्त्वाच्या तुलनेत प्रमाणाबाहेर असल्यावाचून फाजील सोवळया लोकांकडून होणारी टीका तो आपल्यावर ओढवून घेणार नाही असे मानले जाते. परंतु ही भूमिका रूढ नीतीत बदल केले जावेत असे म्हणणाऱ्या लोकांच्या बाबतीतच घेतली जाते. जे वेश्यांच्या छळाला उत्तेजन देतात, आणि जे नावाला गोऱ्या गुलामांच्या व्यापाराविरुद्ध असलेले, पण वस्तुतः ऐच्छिक आणि स्वच्छ विवाहबाह्य संबंधांविरुद्ध असलेले, कायदे घडवून आणतात; जे आखूड झगे घालणार्या आणि लिपस्टिक लावणार्या स्त्रियांचा निषेध करतात, आणि जे अपुर्या वस्त्रांत पोहणार्या स्त्रियांचा शोध घेत समुद्रकिनारे धुंडाळत असतात, त्यांना मात्र लैंगिक ध्यास आहे असे कोणी म्हणत नाही.
विवेकवाद – १९
गीतेतील नीतिशास्त्र – आक्षेपांना उत्तरे
‘गीतेतील नीतिशास्त्र’ या माझ्या लेखावर आमचे अनेक मित्र नाराज झाले आहेत. त्यांपैकी प्रा. सुधाकर देशपांडे आणि प्रा. देवदत्त दाभोलकर यांची पत्रे जानेवारी १९९२ च्या अंकात प्रसिद्ध झाली असून प्रा. श्री. गो. काशीकर यांचा लेख या अंकात अन्यत्र छापला आहे. प्रा. सुधाकर देशपांडे यांनी माझ्यावर सत्यशोधकाचा नि:पक्षपातीपणा सोडून वकिली बाणा स्वीकारल्याचा आरोप केला आहे, प्रा. काशीकर यांनी हे विवेचन विवेकवादी नव्हे असा सरळ निर्णय दिला आहे; आणि प्रा. दाभोलकर यांनी मला विनोबा भाव्यांचे ‘स्थितप्रज्ञदर्शन’ हे पुस्तक वाचण्याची आणि त्याला त्याच तोलाचे उत्तर देण्याची शिक्षा फर्मावली आहे.
हे विवेकवादी विवेचन नव्हे !
प्रा. दि. य. देशपांडे यांचे ‘गीतेतील नीतिशास्त्र ह्या शीर्षकाखाली दोन लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांत त्यांनी गीतेच्या तत्त्वज्ञानावर प्रखर टीका केली आहे. गीतेवर ह्यापेक्षाही प्रखर टीका इतरांनी केलेली आहे. सत्यान्वेषणाच्या दृष्टीने केलेली कोणतीही टीका स्वागताईच ठरावी; कारण त्यातून सत्य अधिकाधिक स्पष्ट होण्याला मदत होते. तेव्हा टीका कोणत्या दृष्टीने केली हे महत्त्वाचे ठरते.
गीतेतील तत्त्वज्ञानाचे आपण ‘विवेकवादी भूमिकेवरून परीक्षण करीत आहोत असे प्रा. देशपांडे म्हणतात. ह्या क्षेत्रांतील त्यांचा अधिकार मान्य करूनही त्यांचे प्रस्तुत परीक्षण विवेकवादाला धरून नाही असे नम्रपणे सुचवावेसे वाटते….
गीता हे मुख्यतः मोक्षशास्त्र किंवा अध्यात्मशास्त्र आहे हे प्रा.
विवेकवाद -१६
गीतेतील नीतिशास्त्र
तुमचा सगळा कटाक्ष आमच्यावरच का?
आज गीतेतील नीतिमीमांसेची मीमांसा करण्याचा विचार आहे. पण त्याला आरंभ करण्यापूर्वी एका आक्षेपाला उत्तर द्यायला हवे. हा आक्षेप आमच्या वाचकांपैकी अनेकांनी प्रत्यक्ष बोलून दाखविला आहे, आणि त्याहून कितीतरी अधिक वाचकांच्या मनात तो वारंवार उद्भवत असावा यात संशय नाही. हा आक्षेप असा आहे : तुमचा सारा रोख आम्हा हिंदूंवरच का? आमच्यापेक्षा अधिक, निदान आमच्याइतकेच, अंधश्रद्ध, शब्दप्रामाण्यवादी, आणि तुम्ही दाखविता त्या सर्व दोषांनी युक्त असे अनेक धर्म-किंबहुना सगळेच धर्म आहेत. असे असताना तुम्ही इतर कोणत्याही धर्माचे नावही उच्चारीत नाही, आणि आमच्या धर्माला मात्र तुम्ही निर्दयपणे झोडपत सुटला आहात याला काय म्हणावे?’
विवेकवाद – १४
साक्षात्कार, विज्ञान आणि विवेकवाद
प्रा. श्याम कुळकर्णी यांच्या पत्राला उत्तर दिल्यानंतर त्यांची पुन्हा अनेक पत्रे आली आहेत. त्यांपैकी एक याच अंकात अन्यत्र छापले आहे. या पत्रात त्यांनी विवेकवादासंबंधाने मी जे वेळोवेळी लिहिले आहे त्यासंबंधी अनेक आक्षेप घेतले आहेत, आणि काही प्रश्न उपस्थित केले आहेत. वास्तविक या प्रश्नांपैकी बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे या लेखमालेत ठिकठिकाणी आली आहेत. ( विशेषतः ‘विवेकवाद – ४: जुलै १९९०, पृ. ११-१६ पहावा.) परंतु त्यांचे पुरेसे आकलन न झाल्यामुळे ते प्रश्न अनुत्तरित आहेत अशी त्यांची समजूत झाली आहे.
विवेकवादाच्या मर्यादा
[गेल्या फेब्रुवारी महिन्यात प्रा. मेघश्याम पुंडलीक रेगे यांनी नागपूर येथील धरमपेठ महाविद्यालयात ‘भारतीयांचा पुरुषार्थविचार’ व ‘विवेकवादाच्या मर्यादा’ या दोन विषयांवर दोन व्याख्याने दिली. प्रा. रेगे यांची गणना केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर अखिल भारतीय अग्रगण्य विद्वानांत केली जाते ही गोष्ट सुपरिचित आहे. त्यांचा पाश्चात्य आणि भारतीय दोन्ही तत्त्वज्ञानाचा व्यासंग अतिशय विस्तृत आणि सखोल असून व्याख्यानांच्या विषयांवरील त्याचा अधिकार निर्विवाद आहे. त्यांनी केलेले विवेकवाद आणि त्याच्या मर्यादा यांचे विवेचन ‘आजचा सुधारक’च्या वाचकांना उद्बोधक वाटेल, म्हणून ते व्याख्यान येथे उद्धृत करीत आहोत.
-संपादक]
रॅशनॅलिझमचे (rationalism) ‘विवेकवाद’ हे भाषांतर आहे अशी कल्पना मी करतो.
विवेकवाद – ११
श्रद्धेचे दोन प्रकार – विधानांवरील आणि मूल्यांवरील ‘श्रद्धा’ किंवा ‘विश्वास’ हा शब्द दोन वेगळ्या अर्थानी वापरण्यात येतो. एका अर्थी श्रद्धा म्हणजे एखादे विधान सत्य आहे असा दृढविश्वास, तर दुसऱ्या अर्थी श्रद्धा म्हणजे एखाद्या मूल्यावरील निष्ठा. ह्या दुसऱ्या अर्थी ‘श्रद्धा’ या शब्दाऐवजी ‘निष्ठा’ हा शब्द वापरणे श्रेयस्कर आहे, कारण तो व्यर्थी नसल्यामुळे त्याच्याविषयी गैरसमज होण्याची भीती नाही. अमुक गोष्ट मूल्य आहे म्हणजे ती स्वार्थ १. वांछनीय आहे अशी दृढनिष्ठा. याच्या उलट पहिल्या प्रकारची श्रद्धा म्हणजे एखादे विधान सत्य आहे अशी पक्की खात्री.