विषय «श्रद्धा-अंधश्रद्धा»

उत्तम निरौला ह्यांचे भाषण

नमस्कार, आणि आपणां सगळ्यांनाच धन्यवाद. विशेषकरून कुमारजींना, विशेष अतिथी अलकाजी, प्रसन्नजी, अविनाश पाटीलजी, असीमजी, प्रो. नायक-ज्यांच्याकडून मी बरंच काही शिकलो आहे आणि महाजनजी-यांनी मला अनेक प्रकारची मदत केली आहे. तसेच या नास्तिक परिषदेत आलेले सुज्ञ, विचारवंत यांचेही आभार. 

या परिषदेत सहभागी होणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मी भारतात अनेकदा आलो आहे, परंतु अशाप्रकारे लोकांशी संवाद साधण्याची माझी ही पहिलीच वेळ! मी भारतात साधारणपणे ज्या कार्यक्रमांसाठी येतो, त्या कार्यक्रमांत लोक भरपूर असतात, पण तिथे संवाद कमी आणि भाषणं जास्त होतात. इथे मात्र संवादाला अधिक जागा दिलेली दिसते आहे.

पुढे वाचा

नरेन्द्र नायक ह्यांचे भाषण

नमस्कार मित्रांनो. आज या नास्तिक परिषदेसाठी तुम्ही मला आमंत्रण दिले, याबद्दल धन्यवाद. हा माझा व्यक्तिगत सन्मान नाही, तर हा मला आमच्या चळवळीचा सन्मान वाटतो. गेली अनेक वर्षे जवळजवळ ८० संस्थांचे मिळून FIRA हे संघटन आम्ही चालवतो आहोत. या माध्यमातून आम्ही खूप लोकांपर्यंत पोहोचतो. त्या कामाचाच हा सन्मान आहे असे मी समजतो.

मी गेले ६० वर्षांपासून नास्तिक आहे. मी नास्तिक म्हणून दोनदा जन्माला आलो. जन्माला येणारं प्रत्येक मूल नास्तिक म्हणून जन्माला येतं. वाढत्या वयात देव, धर्म या निरर्थक गोष्टी त्याच्या मेंदूत कोंबल्या जातात.

पुढे वाचा

प्रसन्न जोशी ह्यांचे भाषण

नास्तिकांच्या परिषदेत सगळ्यांना नमस्कार केला तर चालतो का? बरं मला लँग्वेज ऑफ इंस्ट्र्क्शन काय आहे? नाही, म्हणजे सगळे बहुतांश कोण आहेत? मराठी चालेल ना? Ok. तसेही, महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय गोष्टी वस्तुतः पुणे, लोणावळा, ठाणे, कल्याण, डोंबिवली याच लेव्हलला असतात त्यामुळे मराठीच बोलावं लागतं. मी फार वेळ घेत नाही कारण वस्तुतः शेड्यूलनुसार आता लंचटाईम होणं अपेक्षित होतं. त्यामुळे मी जास्तीत जास्त पंधरा मिनिटं घेईन. आणि त्यानंतर आपण परब्रह्माच्या आराधनेसाठी बाहेर जाऊ. तर मी विचारपीठावरील-नास्तिक परिषदेमध्ये व्यासपीठ म्हणायचे नसते, विचारपीठ म्हणायचे असते. विचारपीठावरील सगळे मान्यवर, आणि पुरस्कारार्थी, त्यामध्ये अलकासुद्धा आहे.

पुढे वाचा

प्रसन्न जोशी ह्यांच्या सूचनांबद्दल आयोजकांची मते व खुलासे

१. पारलौकिक संदर्भ असलेल्या ‘शुभेच्छा’, ‘दुर्दैव’, इ. शब्दांच्या आणि रूढींच्या सयुक्तिकतेविषयी जोशी यांनी विनोद केले. परंतु, गांभीर्याने पाहिले तर अनेक शब्दांचे आणि रूढींचे अर्थ कालौघात बदललेले आहेत. समाजावर पारलौकिक धारणांचा पगडा होता तेव्हा भाषेत आणि संस्कृतीत त्यांचे प्रतिबिंब दिसणारच. पुत्र या शब्दाची व्युत्पत्ती ‘पुत्’-नरकातून वाचवणारा अशी आहे. Mundane या शब्दाचा मूळ अर्थ ‘ऐहिक’ असा आहे. नास्तिक या शब्दाचा मूळ अर्थही ‘वेदप्रामाण्य न मानणारे’ असा आहे. हे शब्द आता वेगळ्या अर्थाने वापरले जातात. मूळ अर्थ टाळणे पूर्णपणे शक्य किंवा आवश्यक आहे का याविषयी आम्हाला खात्री नाही आणि ऐहिकतेसाठी भाषाशुद्धी हा विषय आमच्या प्राधान्यक्रमातही नाही.

पुढे वाचा

प्रमोद सहस्रबुद्धे ह्यांचे भाषण

माझ्यावर मुख्य दोन जबाबदाऱ्या आहेत. एक म्हणजे आभार मानायचे. पण मी सुरुवातीला आजच्या सत्राबद्दल बोलणार आहे. शिवाय संघटनेला कशाची गरज आहे आणि तुम्ही त्यासाठी काय करू शकता, हेही सांगणार आहे.

तर आजचं सत्र मी खरोखर एन्जॉय केलं. मला वाटलं नव्हतं की या बाजूने एन्जॉय करणं मला कधी जमेल! पण खाली बसून एन्जॉय करण्यासारखंच हे सत्र होतं. प्रत्येक वक्ता खूपच इंटरेस्टिंग बोलला असं मला वाटलं. इथं मुख्यतः, मला फार चांगलं वाटलं की प्रसन्न इथे आलेत आणि त्यांनी एक वेगळी बाजू मांडली. आपल्याकडे कसं असतं, एक कुणी संशयवादी असतो.

पुढे वाचा

विश्वंभर चौधरी ह्यांचे भाषण

मित्र आणि मैत्रिणींनो, सगळ्यात आधी मी माझे मित्र कुमार नागे आणि ब्राइट्सच्या सगळ्या सदस्यांचे आभार मानतो. मी नास्तिक नसूनही त्यांनी मला आमंत्रण दिलं. हा सहिष्णुतेचा भाग आहे आणि ती तुमच्यात आहे त्याबाबत मला आनंद वाटला. आजकाल ‘माझी कोणती ओळख’ हे माझं मलाच कळत नाही. विचारधारांचा इतका गुंता झालेला आहे तरी, मी असं समजतो की मी काही भक्तांपैकी नाही. आणि मी असेही समजतो की त्यातल्यात्यात मला जवळची वैचारिक परंपरा रानडे, गोखले, गांधी, विनोबांची वाटते, वैचारिकदृष्ट्या! आणि ते जेवढे धार्मिक आहेत तेवढा मी धार्मिक आहे असेही मी मानतो.

पुढे वाचा

विश्वंभर चौधरी ह्यांच्या भाषणावरील खुलासा

विश्वंभर चौधरी यांनी ब्राइट्सच्या नास्तिक परिषदेत आपल्या भाषणाची सुरुवात “तुम्हाला जगण्याचा सांवैधानिक हक्क आहे, पण देशाच्या प्राचीन संस्कृतीला घेऊन चालावे लागेल” असे सांगून केली. उजवे लोक मुस्लिम लोकांना देतात तेवढी जगण्याची मुभा विश्वंभर यांनी आम्हा नास्तिक लोकांना दिली. अर्थातच, “हिंदुस्थान मे रहना होगा तो जय श्रीराम कहना होगा”. पण आपल्या खांद्यावर मृत इतिहासाचे ओझे वाहत आपण पुरोगामी कसे होणार?

चौधरी यांनी सुरुवातीलाच हे नमूद केले की politically correct असण्यासाठी धर्म गरजेचा असतो. पूर्ण भाषण politically correct पद्धतीने केल्यावर शेवटी मानाचा तुरा म्हणजे त्यांचे स्वतःला गांधी आणि आंबेडकर या दोघांचे अनुयायी आहे हे सांगणे.

पुढे वाचा

विचार तर कराल?

१८ डिसेंबर २०२२ रोजी पुण्यामध्ये ‘ब्राइट्स’ संस्थेतर्फे नास्तिक परिषद घेण्यात आली होती. नास्तिकता ही वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार जगण्याचा एक आयाम आहे याबद्दल दुमत नसले तरी ते आस्तिकांच्या पचनी पडणे कठीण असते. म्हणूनच काही आस्तिकांना नास्तिकांबद्दल घृणा, राग, द्वेष वगैरे वगैरे असतो. पण याची कारणे वैयक्तिक आहेत का? तर नाही. आस्तिकांना नास्तिकांबद्दल वाटणाऱ्या रागाचे एक महत्त्वाचे कारण, म्हणजे नास्तिकांकडून होणारी धर्माची चिकित्सा आणि धर्माच्या उन्मादाविरोधातील त्यांची भूमिका. म्हणूनच ‘देवा-धर्माची चिकित्सा करू नये, त्याबद्दल प्रश्न निर्माण करू नये’, अशी शिकवण असणाऱ्या आस्तिकांना नास्तिकांचा राग येणे स्वाभाविक आहे.

पुढे वाचा

पहिल्या पिढीतला नास्तिक

मी स्वतःला ‘पहिल्या पिढीतला नास्तिक’ म्हणत नाही आणि ही संज्ञा मी शोधलेली नाही, तरीही, ही संकल्पना मला इतकी भावली, की मी त्या विषयावर माझे विचार आणि आस्तिक-नास्तिक वाद-संवाद या संदर्भातले माझे अनुभव व्यक्त करायचे ठरवले.

लहानपणी घरचे वातावरण बुद्धिप्रामाण्यवादी होते, त्यामुळे घरात देवघर, पूजापाठ, व्रतवैकल्ये हे प्रकार अजिबात नव्हते, पण आजूबाजूला हे सर्वकाही भक्तिभावाने चालू असायचे. त्यामुळे वयाच्या पाचव्या वर्षीच मी वडिलांना देवाच्या अस्तित्वाबद्दल विचारल्याचे आठवते. तेव्हा त्यांनी दिलेले उत्तरही मला आठवते. “देव आहे की नाही हे आजवर खात्रीने कोणालाच समजलेले नाही.

पुढे वाचा

अंधश्रद्धा आणि आदिवासी समुदाय

गेल्या वीस वर्षात महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी मोठी चळवळ झाली आहे, अंधश्रद्धेबद्दल महाराष्ट्रातील काही भागातील जनता जागरुकही झाली असेल. परंतु आजही काही आदिवासी समाजात कमालीची अंधश्रद्धा आहे. त्यापैकीच एक फासेपारधी समाज, या समाजामध्ये आजारपणात घरच्याघरी उपचार करण्याच्या अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. हा लेख लिहायच्या आठ दिवसांआधी माझ्या पुतणीचा कान एका रात्री अचानक खूप दुखायला लागला, आणि ती वेदनेने तळमळून रडायला लागली. माझ्या आजोबांनी खूप वर्षांपूर्वी दिघाडा मादी (मोर) पक्षी मारला होता, त्याचा पाय माझ्या आज्जीने आताही जपून ठेवला आहे. तो पाय फल्ली तेलात कढवून सोनालीच्या, माझ्या पुतणीच्या कानात आणून फिरवला.

पुढे वाचा