विषय «इतर»

पुस्तक परीक्षण

‘ग्यानबाचा सहकार’

मराठी मध्यमवर्गाच्या मनातील सहकारी साखर कारखान्यांची प्रतिमा मुख्यतः भ्रष्टाचाराशी निगडित आहे. ऊस लावणारा शेतकरी, त्या उसाची साखर करणारे कारखानदार, ह्यांना सरसकट भ्रष्ट म्हणून मानण्याची पद्धत आहे. अशा विचारामध्ये एका महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष होते, की शेतीमाल-प्रक्रियेचे उद्योग सहकारी तत्त्वावर चालवणे हा भारताने केलेला एक अभिनव आणि यशस्वी आर्थिक प्रयोग आहे. महाराष्ट्रातील तीसेक टक्के जनता या ना त्या स्पात सहकारी संस्थांची सदस्यसंख्या घडवते! ह्या सर्व सहकारी संस्थांमधून रु. ३५,०००/- कोटींची वार्षिक उलाढाल होते —- राज्याच्या अंदाजपत्रकाच्या जवळपास दुप्पट आहे, ही रक्कम!

पुढे वाचा

धर्मप्राय श्रद्धेची सार्थकता

निसर्गसृष्टीतील घडमोडींविषयीचे वैज्ञानिक अज्ञान, त्यापोटी वाटणारे भय आणि येणारे दुबळेपण, निसर्गाच्या अनाकलनीय शक्तींना ‘संतुष्ट’ करून स्वतःचे जीवन आश्वस्त, सुरक्षित व समृद्ध करण्याची कांक्षा व धडपड यामधून ‘धर्म’ या गोष्टीचा उदय झाला, ही एक ‘बुद्धिप्रामाण्यवादी’ वर्तुळातील प्रतिष्ठित व शिष्टमान्य मांडणी आहे.
आधुनिक विज्ञानाच्या युगाच्या उत्कर्षाने ज्ञानाची प्रभा सर्वदूर पसरल्या-नंतर, ज्ञानांधकारात भरभराटलेल्या धर्माची व धर्मसंस्थेची गरज संपुष्टात आलेली आहे. भौतिक विज्ञानांच्या जोडीला, सतराव्या शतकापासून, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानवस्वभावप्रकृतिशास्त्र, समाजशास्त्र अशी मानवी व्यापारांचे नियम, त्यांचे गतिशास्त्र यांची उकल करणारी शास्त्रे उत्कर्ष पावली आहेत. जे जसे वास्तवात आहे, वास्तवात जे घडते त्यांचा वैज्ञानिक (शास्त्रीय) विचारपद्धतीचा अवलंब करून अभ्यास करून निष्पन्न झालेले ज्ञान (‘पॉझिटिव्ह नॉलेज’) यावर ही सर्व मानवीय शास्त्रे रचलेली आहेत.

पुढे वाचा

आदम आणि बाळाची आई

अमेरिकन निसर्गशास्त्र संग्रहालयातले डायनोसॉर्जचे प्रदर्शन पाहून आलेला आदम न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये एका बाकावर बसला आहे, संध्याकाळच्या वेळी, आपल्या जीवजातीच्या हलचाली पाहात.
“आणि ही एवढी सारी माणसं म्हणजे पृथ्वीच्या साऱ्या लोकसंख्येचा एक छोटासा भाग! सारे माझ्या नात्यातले! सारे, सारे! हौवा हवी होती बरोबर. तिला मनापासून आनंद झाला असता. नातलग भेटला की तिचा स्वतःवर ताबा नाही राहात. सगळ्यांच्या पाप्या घ्यायचा प्रयत्न करेल ती. गोरे, काळे, सगळेच्या सगळे”. एक बाबागाडी ढकलत नव्याने आई झालेली बाई बाकावर आदमजवळ येऊन बसते. बाबागाडीला संथ झोका देते.
“किती कमी बदल झालाय—-काहीच नाही, खरं तर—मला पहिलं बाळ आठवतं —- केव्हा बरं?

पुढे वाचा

श्री. ह. चं. घोंगे ह्यांच्या लेखाला (ऑ. २०००) हे माझे उत्तर

स्त्रियांच्या योनिशुचितेला दिल्या गेलेल्या अवास्तव महत्त्वाची स्त्रियांनी जबरदस्त किंमत मोजली आहे. माझ्या मते स्त्रियांना योनिशुचितेच्या कल्पनेच्या बेडीतून मुक्त करण्याची अत्यंत जरुरी आहे. त्यामागचे हेतू श्री. घोंगे लिहितात त्या लेखापेक्षा पूर्ण वेगळे आहेत.
१. विवाहपूर्व, विवाहित अथवा वैधव्यात कामेच्छा पूर्ण करण्यास संधी स्त्रीला मिळावी हा माझा हेतू नाही.
२. “अनोळखी स्त्रीपुरुषांनी जवळीक साधायची कशी?” “साठी उलट-लेल्या स्त्रीपुरुषांना परस्परांबद्दल आकर्षण निर्माण झाले तर रतिक्रीडेत गुर-फटण्याचे क्षण शोधायचे कसे?’ हे प्रश्न श्री. घोंगे विचारतात. हे प्रश्नही मला अप्रस्तुत (irrelevant) वाटतात. लैंगिक मुक्तीचा हेतू मुक्त कामजीवन (माझ्या मते) आज तरी नाही.

पुढे वाचा

नैतिक प्राणी (भाग १)

प्रस्तावना: एखाद्या माणसाच्या गुणधर्मांपैकी कोणते आनुवंशिक असतात आणि कोणते संगोपनामधून आणि संस्कारामधून घडतात, हा एक जुनाच प्रश्न आहे. स्वभाव विरुद्ध संस्कार (Nature versus Nurture) ह्या नावाने तो अनेकदा मांडला जातो. सुट्या माणसांच्या पातळीवर प्रश्न असा असतो —- “ह्या व्यक्तीचे कोणते गुण आईवडलांकडून आनुवंशिकतेने आलेले आहेत आणि कोणते पालनपोषणाच्या काळात संस्कार झाल्याने रुजले आहेत?’ पूर्ण मानवजातीच्या पातळीवरही आपण हा प्रश्न विचारू शकतो —- “कोणते गुण उत्क्रांतीतून घडलेले आहेत आणि कोणते सामाजिक संस्थांमुळे घडलेले आहेत?”
सुधारणा करू इच्छिणाऱ्यांच्या दृष्टीने हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

पुढे वाचा

अरवली गाथा

श्री. जयंत फाळके यांचे वरील मथळ्याखाली आ. सु.मध्ये दोन लेख छापल्याबद्दल अभिनंदन. बरेचसे सामाजिक बदल हे आर्थिक बदलांमुळे होत असतात. असे असूनही आ.सु.मध्ये तात्त्विक आणि तत्त्वज्ञानाच्या चर्चांना खूप जास्त प्रमाणात जागा दिली जाते असे माझे मत झाले आहे उ. ११ व्या वर्षातही ‘विवेकवाद’ कशाला म्हणायचे यावर लिखाण चालू असते.
जयंत फाळके यांनी कथन केलेले तरुण भारत संघाचे काम खरोखरच प्रशंसनीय आहे. एखाद्या दुर्गम भागात जाऊन, मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या समाजात आपली मते आणि स्व बाजूला ठेवून स्थानिक समाजाचा स्वाभिमान जागृत करून त्याला एकसंध कार्यप्रवृत्त करणे खरोखरीच फार अवघड आहे.

पुढे वाचा

निरामय जीवनासाठी

सीने में जलन, आँख में तुफान सा क्यों है?
इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है? आजकाल आजूबाजूला पाहिले तर आपल्या संपर्कात येणारे नातेवाईक जवळचे दूरचे, मित्रमैत्रिणी, सहकारी, कामाला येणारी बाई, दुकानदार, बँका ऑफिसेसमधील कर्मचारी, विद्यार्थी, इतकेच काय पण प्रवासात होणारी घडीभराची संगत, अशा सर्व व्यक्ती ‘सीने में जलन’ व ‘आँखों में तूफान’ घेऊन वावरताना दिसतात. आपापल्या ‘परेशानी’ त बुडून गेलेली व त्याचा आविष्कार त्यांच्या बोली व शारीर भाषेतून (body larguage) प्रकट करताना दिसतात. जीवन धकाधकीचे झाले आहे. सतत स्पर्धेला तोंड द्यावे लागते.

पुढे वाचा

मानवी जीनोम (जैनिक संचित)

२६ जून २०० हा दिवस जीवशास्त्राच्या प्रगतीतील सोन्याच्या अक्षरांनी लिहिण्याजोगा ऐतिहासिक दिवस ठरला. त्या दिवशी वॉशिंग्टन (डी. सी.) येथून प्रसिद्ध होणाऱ्या ‘सायन्स’ या जागतिक प्रतिष्ठेच्या वैज्ञानिक साप्ताहिकात ‘मानवी जीनोम’ निचित करण्याचे कार्य जवळपास ९७% पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा प्रसिद्ध झाली व सर्व जगातील प्रसार माध्यमांच्या उत्साहाला उधाण आले. वृत्तपत्रे, नियतकालिके, टेलेव्हिजन, इंटरनेट, रेडियो या सर्वांनी या वैज्ञानिक उपलब्धीचा जयजयकार केला. त्याचसोबत या वैज्ञानिक ज्ञानामुळे जणू मानवाने निसर्गच जिंकला अशा थाटात लेखक व प्रवक्ते यांच्या लेखण्या व जिव्हा झिजू लागल्या! परंतु सामान्य-जनांना नेमके काय घडले व कशाबद्दल एवढा जल्लोष चालला आहे याचे नीटसे आकलन झालेच आहे असे म्हणता येत नाही.

पुढे वाचा

सुधारक कुसुम शर्मा

१९४९ चा तो काळ होता. स्वातंत्र्य मिळून जेमतेम दोन वर्षे झाली होती. आता स्वराज्याचे सुराज्यात स्पान्तर करावयाचे म्हणून पुष्कळसे देशभक्त धडपड करीत होते. कुसुमताई शर्मा त्यांच्यांतल्याच एक होत्या. विचाराने त्या साम्यवादी होत्या; आणि जाज्वल्य देशाभिमान त्यांच्या प्रत्येक कृतीत सळसळत होता. त्या दिवशी नागपूरच्या भंगीपुयाच्या सर्व घरांतील लोक बाहेर येऊन निचितपणे बसले होते. त्यांना कुसुमताईंच्या अटकेची कुणकुण लागली होती. तेवढ्यात अटक वॉरंट घेऊन आलेले पोलीस कुसुमताईंचा बारकाईने शोध घेत तेथे येऊन पोचले. त्यांनी घराघरांतून पुष्कळ तपास केला. पण व्यर्थ. खूप वेळ घालवूनही त्यांना काही त्या गवसल्या नाहीत.

पुढे वाचा

धोरण देशभक्तीचे, की परधार्जिणे?

स्वातंत्र्यानंतरच्या पन्नास वर्षांतील सर्वांत गंभीर अरिष्टाला भारतीय शेतीव्यवस्थेला सामोरे जावे लागत आहे. हे अरिष्ट निसर्गाच्या अवकृपेमुळे उद्भवलेले नसून, भारत सरकारच्या शेतीविषयक धोरणातून उद्भवलेले आहे. सरकारने जागतिक व्यापारी संघटनेत एप्रिल १९९४ मध्ये शेतीविषयक जो करार केला त्या कराराच्या शर्तीमुळे भारत सरकारला हे धोरण राबवावे लागत आहे. भाजप-नेतृत्वाखालील केंद्र सरकारने जुलैमध्ये आपले शेतीविषयक धोरण जाहीर केले आहे. ‘जागतिक व्यापारी संघटनेत शेतीविषयक कराराच्या अंमल-बजावणीसाठी हे धोरण स्वीकारावे लागत आहे,’ हे सरकारने धोरण जाहीर करतानाच सांगितले आहे. या कराराची अंमलबजावणी ज्या रीतीने केंद्र सरकार करीत आहे त्यामुळे अरिष्टांत भर पडून हे अरिष्ट अधिक गंभीर बनत आहे.

पुढे वाचा