विषय «इतर»

पुनर्जन्म, धम्म आणि आरक्षण

आजचा सुधारक अप्रत्यक्षरीत्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार उचलून धरीत आहे. त्यामुळे दलितोद्धाराच्या कामास हातभार लागत आहे. डॉ. आंबेडकरांना देव व आत्मा यांचे अस्तित्व मान्य नव्हते. आजचा सुधारकला हा विचार आपल्या विवेकवादातून मांडावयाचा आहे.

आपल्या जुलै १९९९ च्या अंकात श्री. अनिलकुमार भाटे लिहितात, बौद्धधर्माचा कर्मसिद्धान्त व हिंदुधर्माचा कर्मसिद्धान्त एकच आहे. बौद्धधर्मात ईश्वराचे अस्तित्व मानले नाही तरी हा कर्मसिद्धान्त अबाधित राहतो. अनेक जन्मांमध्ये पडलेल्या (संचिताच्या) असंख्य प्रतिबिंबाचा प्रचंड साठा आपण सदैव वागवीत असतो.”

याउलट डॉ. चिंचोळकरांनी सप्टेंबरच्या अंकात तर्कशुद्ध बाजू मांडली. कर्मसिद्धान्त सृष्टिनियम आहे असे मानल्यास एखाद्या चेतनशक्तीद्वारे कर्मफल उत्पन्न होते व कर्मसिद्धान्त चालतो, असे मानावे लागेल.

पुढे वाचा

धर्मांतर-ग्रॅहॅम स्टीन्सची हत्या

सांप्रत धर्मांतर हा आपल्या देशांत, कधी नव्हे तो अतिशय वादग्रस्त विषय बनलेला आहे. ओरिसामध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या करण्यात आलेल्या हत्या, गुजरातमध्ये अल्पसंख्यक ख्रिस्ती समाजावर आदिवासींकडून झालेले तथाकथित हल्ले, या सर्वांचे मूळ धर्मांतर आहे असे म्हटले जाते. त्यांचे जगभरांत पडसाद उमटले. निरनिराळ्या देशांतील वृत्तपत्रांनी या प्रकरणाला अशी काही प्रसिद्धी दिली की हिंदूधर्माचा सहिष्णुतेचा दावा पोकळ वाटावा. एवढा गदारोळ माजल्यानंतर विरोधी पक्षनेत्या श्रीमती सोनिया गांधी आणि पंतप्रधान श्री. अटलबिहारी वाजपेयी यांनी डांग जिल्ह्याला भेट दिली. डांगमधील ख्रिश्चन आणि आदिवासी यांच्यातील संघर्ष किरकोळ असून त्याची विदेशी वृत्तपत्रांनी अतिशयोक्त आणि अतिरंजित वर्णने दिली आहेत असा पंतप्रधानांनी खुलासा केला.

पुढे वाचा

जातिव्यवस्था आणि नीरद चौधरी

एवढ्यातच, निधन झालेल्या सुप्रसिद्ध लेखक व इतिहासकार नीरद सी. चौधरी यांच्या “दि कॉन्टिनन्ट ऑफ सर्सी” या ग्रंथाबद्दल मला एक कुतूहल वाटते.
संदर्भ आहे, हिंदूंच्या जातिव्यवस्थेचा. हा मुद्दा चावून चोथा झालेला आहे, हे मान्य आहे. पण त्याचे महत्त्व वा अस्तित्व अजूनही कायम असल्याने, त्यावर पुन्हापुन्हा बोलले-लिहिले जाते. नव्या सहस्रकाच्या उदयाला जेमतेम एक वर्ष बाकी आहे. सा-या जगाचे स्वरूप इंटरनेटसारख्या साधनांनी बदलून गेले आहे. पण हिंदू लोक अद्यापही कालबाह्य झालेली जातिव्यवस्था मानतात आणि आपली मानसिकता बदलायला तयार नाहीत, हे सत्य आहे. त्यातच, नीरद चौधरीसारख्यांनी जातिव्यवस्थेची केलेली भलावण वाचून माझ्यासारख्या जिज्ञासू पण अल्पवुद्धी माणसाला गोंधळल्यासारखे होते.

पुढे वाचा

एकविसावे शतक : बायोगॅस तंत्रज्ञानासमोरील आव्हाने

आपल्या देशामध्ये वायोगॅस तंत्रज्ञानाच्या मोठ्या प्रमाणावरील प्रसारकार्याला साधारणपणे २० वर्षांचा इतिहास आहे. या २० वर्षांमध्ये एकीकडे बायोगॅस तंत्रज्ञानाने, ग्रामीण भागामध्ये विकेंद्रित व पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून योग्य, अशा पद्धतीने ऊर्जेची व खताची समस्या सोडविण्यामध्ये एक नवा आशावाद जागविला असला, तरी दुसरीकडे गावोगावी उभारलेल्या बायोगॅस-संयंत्रापैकी अनेक संयंत्रे बंद असल्यामुळे त्या त्या ठिकाणी गावकऱ्यांमध्ये तंत्रज्ञानासंबंधी उदासीनता आली आहे व काही ठिकाणी “बायोगॅस संयंत्रे चालू शकत नाहीत, हे तंत्रज्ञान कुचकामी आहे” अशा प्रकारचा नकारात्मक दृष्टिकोन तयार झाला आहे. या वीस वर्षांच्या इतिहासामधून आपण धडा शिकलो नाही व तंत्रज्ञानाच्या भविष्यकालीन अंमलबजावणीमध्ये आपण योग्य ती सुधारणा केली नाही तर या कार्यक्रमामध्ये आज जे मरगळलेले वातावरण तयार झाले आहे ते दूर होणार नाही.

पुढे वाचा

हे प्रभो विभो, अगाध किति तव करणी!

(१) धरणीकंपासारख्या प्रसंगीही महात्मा गांधीसारखे वकील ईश्वराचा चांगुलपणा सिद्ध करू पाहतात. त्याहून ताण युक्तिवाद एका कॅथॉलिक धर्मगुरूने केला. तो असा-कॅनडामधील माँट्रील शहरी एकदा एका सिनेमागृहाला आग लागली. तो खेळ मुद्दाम शाळेतील लहान मुलांसाठी होता. त्या आगीत सुमारे शंभर मुले जळून मेली. ती रोमन कॅथॉलिक पंथाच्या फ्रेंच लोकांची होती ईश्वराच्या दयाळूपणाचा हा विचित्र प्रकार ईश्वराला कमीपणा आणणारा होता. पण धर्मगुरू वस्ताद होते. त्यांनी असे पुकारले की शहरात पाप वाढल्यामुळे ईश्वराने लोकांना शिक्षा करण्याकरिता असा सूड घेतला. एकाने याहीपेक्षा जास्त कुशलतेने ईश्वराच्या दयाळू पणाचा खुलासा केला की, स्वर्गात देवदूत कमी झाले होते आणि ईश्वराला आणखी देवदूतांची गरज होती.

पुढे वाचा

थॉमस जेफर्सनचे वंशज

क्रोमोसोमवरच्या डि.एन.ए.ची चाचणी करून वंशावळ ठरवता येते हे सिद्ध झाले तेव्हा काही वादग्रस्त, रहस्यमय व सामाजिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे प्रश्न सुटतील असा संभव निर्माण झाला.

अश्या चाचणीने, “थॉमस जेफर्सन व सॅली हेमिंग्स ही त्यांची गुलाम स्त्री (स्लेव्ह) यांना मूल झाले होते काय” ह्या वादग्रस्त प्रश्नाला आता उत्तर मिळाले.
जेफर्सन हे जिवंत होते तेव्हाच त्यांच्या लैंगिक संबंधांबद्दल टीकेला सुरवात झाली होती. जेम्स् कॅलेंडर या बातमीदाराने, “थॉमस जेफर्सन ह्यांचे स्वतःच्या स्लेव्हशी संबंध आहेत” अशी वार्ता प्रसिद्ध केली होती.

अनेक इतिहासकारांनी त्यानंतर या विषयावर उलटसुलट मत नोंदविणारी पुस्तके लिहिली.

पुढे वाचा

विवेकाची गोठी

संपादक, आजचा सुधारक, यांस
स. न. वि. वि. मी मूळचा पुण्याचा आहे. त्या काळात अनेक विद्वानांची भाषणे सहजगत्या ऐकावयास मिळाली. त्या वेळेचे विद्वान अटीतटीने वाद करीत.
आपल्याला कोणी मारील” अशी भीती त्यांना वाटत नसे. माझा पिंड अशा वातावरणांत तयार झाला.
आज विद्वान एकमेकांना खूप संभाळून घेतात. त्यामुळे सामान्य वाचकांना संभ्रम पडतो नक्की काय? निर्जीव वस्तूला नमस्कार करणे कितपत योग्यं आहे? आगरकर व टिळक ह्यांत कोणाची भूमिका जास्त योग्य? गोडसेवद्दलचे नाटक दाखवावे का? अरुण गवळी व वाळ ठाकरे ह्यांत फरक कोणता?
पूर्वीचे विद्वान खाजगी प्रश्नांना उत्तरे देत.

पुढे वाचा

सुखाचा दर्जा केवळ मानीव (?)

‘कांही विशिष्ट प्रकारच्या शरीरसुखांना लोक उच्च कां मानतात आणि इतर प्रकारांना नीच कां मानतात . . . . संगीताने होणारा आनंद उच्च प्रकारचा मानण्याची पद्धत आहे, पण एखादा आवडीचा पदार्थ खातांना होणारा आनंद कमी दर्जाचा मानतात. असे कां? सुख शरीराच्या एका विशिष्ट भागाला होते असे मानले, किंवा सर्व प्रकारच्या संवेदनांचे स्थान मेंदूतच आहे असे मानले, तरी या दोन प्रकारांत किंवा इतर प्रकारांत उच्चनीच भाव कां असावा? शरीरसुखासंबंधी आणखी विचार केला तर त्यांत पुष्कळच गंमती दिसतात. वेळीं अवेळीं उपास करणे हा धर्मबाजीत एक विशेष सद्गुण समजतात आणि गांधींनी तर जरा कोठे खुट झाले की उपास करायची फॅशनच पाडली आहे.

पुढे वाचा

सर्वधर्मसमभाव म्हणजे घाबरगुंडी!

सर्वसाधारणपणे “धर्मनिरपेक्षता” म्हणजे राज्यसत्ता व धर्मसत्ता यांचा काडी-मोड. तसेच वैयक्तिक पातळीवर धर्मनिरपेक्षता म्हणजे नोकरी, धंदा, शैक्षणिक प्रवेश, प्रवास, इ. ‘न-धार्मिक’ क्रियांत धर्म विचारात न घेता वागणूक देणे वा घेणे.
“सर्वधर्मसमभाव” हे मात्र मोठेच गौडबंगाल आहे. धार्मिक बाबतींत सर्व धर्म समानच असतात, त्यामुळे एकाने दुस-याला शिकवण्याचा शहाणपणा करू नये, असे काहीसे त्याचे रूप आहे. “आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम्”, हे हिंदूंना तसे नवीन नाही. त्यामुळे विविध देवदेवतांची पूजा करण्यातील विरोधाभास दूर होतो. मात्र इतर धर्मांत नमस्कारच नसल्याने तो केशवास कसा पोचतो, किंवा पोचतो का, हे अस्पष्टच राहते.

पुढे वाचा

स्त्री-पुरुष (१९९९ मॉडेल)

आधी ताज्या वैद्यकीय संशोधनाचा आढावा घेऊ –
(क) स्त्रियांची प्रतिरक्षा-व्यवस्था (Immune System) पुरुषांच्या तशाच व्यवस्थेपेक्षा बरीच जास्त प्रमाणात नियंत्रित असते. शरीरात ‘घुसणाच्या बाहेरच्या जीवाणूंशी स्त्रियांची शरीरे जास्त जोमाने लढतात, तर पुरुषांच्या बाबतीत हा प्रतिसाद (तुलनेने) सौम्य असतो. गर्भारपणात मात्र स्त्रियांची प्रतिरक्षा-व्यवस्था बरीच मंदावते, पण बाळंतपण होताच ती पुन्हा पूर्ववत होते. प्रतिरक्षेच्या कार्यक्षमतेतील या चढउतारांचा संबंध स्त्रियांना जास्त प्रमाणात सतावणा-या ल्यूपस (Lupus), संधिवात ‘व मल्टिपल स्क्लेरॉसिस वगैरे आजारांशी लावला गेला आहे. या सर्व आजारांमध्ये शरीरांची प्रतिरक्षा-यंत्रणा शरीराच्याच उपांगांशी झगडू लागते!
(ख) सरासरीने पाहता पुरुषांना ज्या वयात हृदयविकाराचा पहिला झटका येतो, त्यापेक्षा स्त्रियांना असे झटके दहा वर्षे उशीराने येतात – पण झटक्याच्या वेळी वयस्क असल्याने स्त्रिया अशा झटक्यांमुळे दगावण्याचे प्रमाण पुरुषांच्या प्रमाणापेक्षा जास्त असते.

पुढे वाचा