विषय «इतर»

खरी पूजा

जर ह्या विश्वातील अद्ययावत वस्तुजाताच्या मुळाशी त्यांना धारण करणारी, चालन करणारी, किंवा जिच्या क्रमविकासाचे ते परिणाम होत आले आहेत अशी जी शक्ति आहे तिला देव म्हणावयाचे असेल तर त्या देवाने हे सारे विश्व, मनुष्यास त्याचा मध्यबिंदु कल्पून केवळ मनुष्याच्या सुखसोयीसाठीच निर्मिले ही भावना अगदी भाबडी, खुळी, आणि खोटी आहे.
काही झाले तरी मनुष्य हा ह्या विश्वाच्या देवाच्या खिसगणतीतही नाही. जशी कीडा, मुंगी, माशी, तसाच ह्या अनादि-अनंत कालाच्या असंख्य उलाढालीतील हा मनुष्यही एक.
विश्वाच्या देवाशी, वाटच्या भिकारड्याने सम्राटाशी जोडू पाहावा तसा कोणताही बादरायण संबंध जोडण्याची लालची हाव मनुष्याने आमूलाग्र सोडून द्यावी.

पुढे वाचा

चर्चा

– डॉ. वसंत चिपळोणकर
आजचा सुधारक हे वैचारिक मासिक चालवून आपण महाराष्ट्रात प्रबोधनाचे जे कार्य करीत आहात त्याबद्दल आपले अभिनंदन. ‘चुकीच्या वर्तनासाठी जातीला जवाबदार धरण्यात येऊ नये’ हा विचार किंवा ‘गेली हजार वर्षे दलितांवर स्त्रियांवर सातत्याने अन्याय होत आला आहे. हे विधान बरोबर वाटले. मी यात भर घालून म्हणेन या धर्ममार्तंडांनी हिंदूंच्या आचारावर अनेक कालबाह्य विघातक नैतिक निबंध घालून हिंदुमनुष्याची अन्यायाला प्रतिकार करण्याची शक्तीच कामकुवत केली. जागतिक विचारांशी त्याचा संपर्क तोडून हिंदुसमाजाची प्रगती थांबविली त्याचे एक दुर्बल, कर्तृत्वहीन लाचार व्यक्तींनी भरपूर अशा समाजात रूपांतरण केले.

पुढे वाचा

इंग्रजीला पर्याय नाही

इंग्रजीविरुद्धचा गहजब तसा नवीन नाही. भाषाभिमान्यांनी अनेकदा विविध माध्यमांतून इंग्रजीच्या वाढत्या प्रभावाबाबत चिंता व्यक्त केलेली आहे. मातृभाषेतूनच सर्व शिक्षण द्यावे-घ्यावे ही कल्पना तत्त्वतः मलाही मान्य आहेच. परंतु सद्यः परिस्थितीत हा आग्रह धरणे म्हणजे आपण होऊन स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कु-हाड मारण्यासारखे आहे. तिसरे सहस्रक उगवते आहे. कोणी कितीही नाही म्हटले तरी जागतिकीक र ण (ग्लोबलायझेशन) अटळ आहे . इंटरनेटमुळे तर संदेश दळणवळण-आर्थिक व वाणिज्य व्यवहार या क्षेत्रांतील सर्व पारंपारिक व्यवस्था मोडीत निघाल्या आहेत. अशा वेळी केवळ स्वदेश स्वभाषा ह्यांसारख्या उदात्त, भव्य परंतु अमूर्त आणि प्रसंगी अव्यावहारिक भावनांच्या भरवशावर पुढे जायला नकार देणे फारसे हितकर वाटत नाही.

पुढे वाचा

वाचा – दिवाळी अंकांचा परामर्श

परामर्शासाठी दिवाळी अंक आलेले आणि आणलेले विपुल आहेत. आलेल्या अंकांची पोच स्वतंत्रपणे दिली आहे. निवडक साहित्याचा परामर्श घ्यायचा म्हटले तरी एक लेख पुरणार नाही. परामर्शाचा एक अंश म्हणून या लेखाकडे पाहावे.
दर्जेदार दिवाळी अंक देण्याची परंपरा ‘मौज’ने कायम राखली आहे. मुखपृष्ठ गेल्या पिढीतले विख्यात चित्रकार त्रिन्दाद यांनी केलेले दुर्मिळ पोर्टेट आहे. जोडीला त्याचे सुधाकर यादव-कृत रसग्रहण वाचले की आस्वादनात भर पडते. समाजातल्या समस्यांचा गंभीरपणे ऊहापोह करणारे तिन्ही लेख लक्षणीय आहेत. त्यात स. ह. देशपांडे आहेत.
हे तीनही लेख खूप माहितीपूर्ण आणि तरीही रोचक आहेत.

पुढे वाचा

एका आमंत्रणपत्रिकेचा पंचनामा

ही आमंत्रणपत्रिका एका मखमलीसारख्या कापडाच्या वीतभर लांब लिफाफ्यात होती. लिफाफा बंद राहण्यासाठी ‘व्हेल्क्रो’चे तुकडे लावले होते, व लिफाफा गोंडे लावलेल्या सोनेरी गोफाने बांधलेला होता. आतमध्ये एका सात इंच लाव नक्षीदार लाकडी दांडीला पाच इंच रुंद व पंधरा इंच लांब सॅटिन-रेशीम जातीचा कापडी पट जोडलेला होता. त्याची गुंडाळी करून तिला एका सोनेरी गोफाने बांधले होते. या गोफात एक कार्ड ओवले होते, ज्याच्या एका बाजूवर पत्रिका पाठवणाच्या कुटुंबाचे नाव व पत्ता छापलेला होता. दुस-या बाजूला आमंत्रितांची नावे लिहिण्यासाठी जागा होती.
पटाच्या वरच्या भागात गणपतीचे चित्र व दोहो बाजूस ‘प्रसन्न झालेल्या कुलदैवतांची नावे होती.

पुढे वाचा

हे प्रभो विभो, अगाध किति तव करणी!- ब्रह्मदेवाचा दिवस

धर्मग्रंथांचा विज्ञानाशी मेळ घालताना सनातन लोक तारेवरची कसरत कशी करतात याचे उदाहरण. ईश्वराने ६ दिवसांत जग निर्माण केले आणि सातव्या दिवशी विश्रांती घेतली असे बायबलात सांगितले आहे. आणि अशा प्रकारे विश्व ३ हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात आले असेही ते म्हणते. आता शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीचे वय कोट्यवधी वर्षांचे आहे. ते मानले पाहिजे. पण मग बायबल मधील विसंगती दिसेल आणि त्याचे माहात्म्य कमी होईल. म्हणून १९०९ साली एक ख्रिस्ती तज्ज्ञांची समिती बसवण्यात आली. त्यांनी निकाल दिला की ‘दिवस’ या शब्दाचा नेहमीचा अर्थ म्हणजे ‘२४ तास’ असा न घेता ‘दिवस’ म्हणजे ‘अनिश्चित काळ’ असा घ्यावा.

पुढे वाचा

विवेकाच्या गोठी

१९९९ च्या निवडणुका झाल्या, आणि आता त्याबाबत चर्चा चालू आहे. या निवडणुका वारंवार घ्याव्या लागतात आणि त्यामुळे राष्ट्राच्या जनतेवर खर्चाचा बोजा टाकला जातो असे म्हटले जाते.
परंतु भारताचे एकूण उत्पन्न दीड लाख कोट रुपये आहे व त्यापैकी फक्त एकहजार कोट निवडणुकीवर खर्च होतो. यापेक्षा कितीतरी अधिक खर्च मंत्र्यांच्या राहणीसाठी, मोटारीसाठी, विमानासाठी आणि अनेक पुढा-यांच्या सुरक्षा-व्यवस्थेसाठी खर्च होतो. तसेच, अणुबॉम्बसाठी पंधराहजार कोट खर्च केले आणि पाकिस्तान घाबरले नाहीच!
या निवडणुकीच्या काळात पंधरा दिवस अनेक तरुण बेकारांना रोजीरोटी मिळते आणि त्यांचे हे दिवस आनंदात जातात.

पुढे वाचा

ईश्वर विनाकारण घोटाळ्यात पडायला नको

ईश्वराला अक्कल शिकवणारे लोकच प्रार्थना करीत असतात. पावसाकरतां प्रार्थना करणा-या लोकांची चेष्टा करण्याकरतां विन्स्टन चर्चिल यांनी एकदां वर्तमानपत्रांत एक पत्र प्रसिद्ध केले होते. त्यांत त्यांनी अशी शिफारस केली होती की, पावसाला व पिकांना सर्वांत सोयीचा वेळ कोणता हे ठरवण्याकरतां एक कमिटी नेमावी आणि त्यांनी निर्णय दिल्यानंतर त्याला धरून अमुक दिवशीं अमुक इतका पाऊस पाडण्याविषयी ईश्वराला सार्वजनिक प्रार्थना करावी, कारण प्रत्येकाने वेगवेगळ्या दिवशी प्रार्थना केल्याने ईश्वर विनाकारण घोटाळ्यांत पडण्याचा संभव आहे. अर्थात् युद्धांत दोन्ही बाजूच्या लोकांनी आपणास विजय मिळावा अशी प्रार्थना केल्यामुळे ईश्वर नेहमीच घोटाळ्यांत पडतो, पण पिकांचे बाबतीत कदाचित् एका देशांतल्या लोकांचे तरी कमिटीचे द्वारें एकमत होण्याचा संभव आहे, तेव्हा वेगवेगळ्या देशांत तसतसा पाऊस पाडून त्यांचे समाधान करणे शक्य आहे.

पुढे वाचा

प्रिय वाचक

प्रिय वाचक,
१. ‘ब्राह्मणांचे गोमांस-भक्षण’ हा लेख छापून तुम्ही काय साधले? ब्राह्मण आता बदलले आहेत. बैदिक हिंदू आता पूर्वी होते तसे हिंसक राहिले नाहीत. समाजसुधारणा म्हणजे ऊठसूठ हिंदुधर्माला आणि ब्राह्मणांना झोडपणे असे तुम्ही समजता काय? ही एक प्रतिक्रिया.
२. पोपप्रणीत धर्मविस्तार ह्या लेखाचे प्रयोजन काय? उगाच धर्मा-धर्मात द्वेषबुद्धी जागृत करायची ही कुठली सुधारणा? ही दुसरी प्रतिक्रिया.
उत्तर इतकेच की, धर्माच्या नावावर मनुष्य किती वेडाचार करू शकतो हे दाखवावे. तो पूर्वी करत होता अन् आता नाही असेही नाही. अंधश्रद्धा निर्मूलनवार्तापत्राचा दिवाळी अंक (१९९९)पाहा.

पुढे वाचा

“पैसा” उत्पत्ती आणि उत्क्रांती

प्रत्येक मनुष्याला आपल्या कामाचा/वस्तूचा/वेळेचा मोबदला हवा असतो. हा मोबदला सोयिस्कर स्वरूपात, दीर्घकाळ टिकेल असा, भविष्यासाठीही राखून ठेवता येईल असा आणि त्याबदल्यात काही मिळवून देईल असा असावा. पूर्वी अशा त-हेची काही सोय नव्हती. लोक रोखठोक व्यवहारात वस्तूंच्या अदलाबदली करत. परंतु हे फारच जिकिरीचे असे. अशा प्रकारची स्थानिक पातळीवरची देवाणघेवाण म्हणजे व्यापार नव्हे.
तेव्हा मग व्यापा-यांनी, सावकारांनी हुंड्या, हवाला, वचनचिठ्या देण्यास सुरुवात केली. त्या त्या व्यक्तीची पत आणि विश्वासार्हता यांवर हा व्यवहार चाले. परदेशी व्यापाराच्या वेळी सावकार-श्रेष्ठी गायी, शेळ्या-मेंढ्या अशा वस्तू तारण म्हणून ठेवून घेत.

पुढे वाचा