विषय «इतर»

आ. सु. चे स्वरूप सुधारण्याबद्दल

स्पष्ट विचार, नेमके शब्द, आपुलकी आणि सूक्ष्म विनोदबुद्धी यांचा परिचय देणारी एक प्रतिक्रिया.
पुण्याचा वाचक मेळावा आपल्या खुसखुशीत अहवालातून कळला. उपस्थितांची नावे वाचून विचारवंताचे अग्रणी कोणकोण आहेत ते कळले. आणि समाधान वाटले की, जाहिरात न करता, अंदाजपत्रकी कौशल्य न वापरता आजचा सुधारक एवढा मेळावा करू शकतो. जाहिरातीच्या आवश्यकतेबद्दल बोलणाऱ्यांना ही गोष्ट पुरेसे उत्तर नाही का? अन्वर भाई आणि ताहेरभाईची नावे वाचून विशेष आनंद झाला. का ते पुन्हा केव्हातरी सांगेन.
पुष्कळ हितचिंतकांना वाटते की हे मासिक अधिक आकर्षक दिसावे .. मला त्यांना विचारावेसे वाटते की ते स्वतः या मासिकाकडे आकृष्ट झाले ते कशामुळे?

पुढे वाचा

लोकशाहीची तीन पथ्ये

लोकशाहीला शाबूत ठेवण्यासाठी आपण काय केले पाहिजे? आपण फक्त सनदशीर मार्गांचाच अवलंब केला पाहिजे. कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह हे मार्ग आपण वर्ज केले पाहिजे. सनदशीर मार्गांचा अवलंब करणे आपल्या स्वाधीन नव्हते तेव्हा असनदशीर मार्गांचा अवलंब करणे योग्य होते. म्हणजे बेबंदशाहीची उगमस्थाने होत.. असनदशीर मार्ग
दुसरी गोष्ट ही की, जॉन स्टुअर्ट मिल याने दिलेला जो भयसूचक संदेश आहे तो पाळणे. ज्यांनी आयुष्यभर मायभूमीची सेवा केलेली आहे अशा थोर व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे यात काही चूक नाही. परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालासुद्धा मर्यादा आहेत.

पुढे वाचा

प्रवाही कुटुंब (१) ई. आर्मी यांच्या फ्रेंच लेखावरून

“धर्म फेकून देतां येईल, नीति नेहमीच बदलत असते आणि कायदेहि बदलतां येतात. मनुष्यजातीच्या सुखाकरता हें सर्व बदलण्यास काय हरकत आहे?” आपल्या नीतिकल्पनांना धक्के देणारी ही विचार- सरणी. (व्यक्ति) ‘स्वातंत्र्या’ चा अर्थ इतका त्याच्या तर्कपूत मर्यादे पर्यंत ताणणे आपल्याला झेपेल ?
वाचकांनी प्रतिक्रिया दयाव्या. नाव गुप्त ठेवता येईल. मात्र कायदेशीर गरज म्हणून आमच्या दफ्तरी नाव-पत्ता आवश्यक आहे.
सवानऊ वाजेपर्यंत तुमची पत्नी तुम्हाला स्वर्गीय देवता भासत होती. जणू काय तुमचें पृथ्वीवरील आयुष्य सह्य व्हावें म्हणून ईश्वराने तिला मुद्दाम स्वर्गांतून तुमच्याकडे पाठवली होती. सर्वांगसुंदर अशी ही सगुणखनि तेथपर्यंत तुम्हाला अवर्णनीय आनंद देत होती.

पुढे वाचा

पत्रव्यवहार

तुम्हाला तुमच्या निवडीचे सल्लागार नेमता यावेत म्हणून माझा सल्लागार मंडळाचा राजीनामा मी या पत्राद्वारे देत आहे. गैरसमज नसावा ही विनंती.
मासिकावर एकसुरीपणाचा आरोप आहे. धर्म व श्रद्धा याविरोधी लिखाणच मुख्यत्वे केले जाते असा आक्षेप आहे. तशी टीका करण्याऐवजी मी अन्य विषयांकडेही मासिकाचे सुकाणू जास्त सशक्तपणे वळण्यासाठी मदत करू इच्छितो.
समाजाची मनोधारणा व चालचलणूक जर चांगली व्हावी ही आजचा सुधारकची इच्छा आहे तर माझ्या मते भौतिकता व नैतिकता यांचा आग्रही पाठपुरावा आपण केला पाहिजे.
भौतिकता :
शिवाजीचा समकालीन न्यूटन, गॅलिलिओ. आधीचा कोपर्निकस वगैरेंनी विज्ञानाला जी प्रतिष्ठा मिळवून दिली ती आपण आपल्याकडे अजूनही देऊ शकलेलो नाही.

पुढे वाचा

म. गांधींचे उपोषण व हिंदुत्ववादी

आजचा सुधारकच्या जानेवारी २००० च्या अंकात श्री. वि. ग. कानिटकर आणि श्री. माधव रिसबूड यांची म. गांधींच्या शेवटच्या उपोषणाबाबतची पत्रे वाचली. त्यांच्या मते म. गांधींचे हे उपोषण भारताने पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यावेत यासाठीच होते. याबाबतची वस्तुस्थिती ध्यानात यावी म्हणून लिहीत आहे.
देश भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये विभाजित झाल्यानंतर भारतातील मालमत्तेचेही वाटप झाले. भारतातील शस्त्रास्त्रे व दारूगोळा निर्माण करणारे कारखाने भारतातच राहावेत आणि त्याबदली पाकिस्तानला ७० कोटी रुपये द्यावेत असा करार झाला. त्यांतील १५ कोटी रुपयांचा हप्ता पाकिस्तानला देण्यात आला होता.

पुढे वाचा

गोमांसभक्षण: एक ऐतिहासिक वास्तविकता

डिसेंबर १९९९ आ. सु.च्या अंकात मित्रवर्य डॉ. भाऊ लोखंडे यांचा ब्राह्मणांचे गोमांसभक्षण या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेला लेख वाचला. लेखावरील प्रतिक्रिया वाचनात आल्या. लेखकाच्या हेतूविषयी त्यांत चर्चा आहे. पण ऋग्वेदकाली ब्राह्मण गोमांस खात नसत असे विधान या प्रतिक्रियावाद्यांनी केलेले नाही. याचा अर्थ असा की भाऊंचा पूर्वपक्ष त्यांना मान्य असावा. उत्तरपक्ष करण्यासाठी त्यांनी ऋग्वेदाचे सांस्कृतिक अध्ययन केले नसावे. डॉ. लोखंडे ह्यांनी संशोधनात्मक लेखात ऋग्वेद ते भवभूती (सातवे शतक) या कालखंडील मांसभक्षणाचा पुरस्कार करणारी वचने दिलेली आहेत. सोमेश्वराच्या मानसोल्लास (१२ वे शतक) या संस्कृत ग्रंथात महाराष्ट्रात प्रचारात असणा-या मांसभोजनात डुकराच्या मांसापासून किती प्रकारचे पदार्थ बनतात त्याची पाकक्रिया सांगितली आहे (तिसरा उल्लास) या अशा लेखामुळे कर्मठांचा दुर्वास होऊ शकतो.

पुढे वाचा

सॉक्रेटीस: सत्यप्रेमी की स्वार्थप्रेमी?

सॉक्रेटीसचे स्थान पौर्वात्य अन् पाश्चात्त्य संस्कृतीत ध्रुवाच्या तान्यासारखे अढळ होऊन बसले आहे. माझे अमेरिकन शिक्षक त्याच्या कार्याची मुक्त कंठाने प्रशंसा करून त्यानेच जनकल्याणासाठी तत्त्वज्ञान स्वर्गातून पृथ्वीवर आणले असे मोठ्या अभिमानाने ठासून सांगत. त्यावेळी मला नेहमी आम्हाला शिकविणा-यांना अशा शिक्षकांचा तत्त्वज्ञानाचा अभ्यास किती एकांगी असतो ह्याची चांगली कल्पना येई. मी एकदा चर्चेच्या वेळी म्हणालो, “सर, प्लेटोच्या पुस्तकांतील साक्रेटीसने आत्म्याच्या अमरत्वाबाबतची व पुनर्जन्माबाबतची केलेली चर्चा माझ्यासारख्या भारतीय विद्यार्थ्याला नवीन अशी वाटत नाही. ह्याची सांगोपांग चर्चा आमच्या उपनिषदांत व गीतेत मी वाचली आहे. त्यामुळेच सुप्रसिद्ध अमेरिकन तत्त्वज्ञ एमर्सन हा उपनिषदांची जगातल्या उत्तम वाङ्मयात गणना करीत असे.”

पुढे वाचा

आगरकरांच्या विद्याभूमीत आजचा सुधारक

अकोल्याला आगरकरांची दोन स्मारके, एक तिथले जिल्हापरिषद आगरकर हायस्कूल आणि दुसरे मनुताई कन्या शाळा. सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी आगरकरांनी ज्या सरकारी हायस्कुलात विद्या घेतली त्याला आता सरकारने त्यांचे नाव दिले आहे. मनुताई कन्याशाळेची कहाणी वेगळी आहे. आगरकरांनी अकोल्याला भागवतमामांच्याकडे राहून विद्या केली. त्यांपैकी अनंतराव भागवतांची मुलगी मनुताई चार वर्षे नाममात्र वैवाहिक जीवनाचे कुंकू लावून बालविधवा झालेल्या. आगरकरांच्या प्रेरणेने पुण्याला मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेऊन अकोल्याला त्यांनी प्रौढ स्त्रियांसाठी मोफत शिक्षण देणारे वर्ग काढले. पुढे ह्या वर्गांना लेडिज होम क्लास असे नाव देण्यात आले. तेथील शिक्षिका फुकट शिकवीत.

पुढे वाचा

प्रजोत्पत्तीचा परवाना

अमेरिकेतील ‘सेंट्रल मिचिगन कॉलेज’ चे एक अधिकारी आणि मानसशास्त्रज्ञ डॉ. ट्राउट म्हणतात की ‘आईबापांना प्रजोत्पत्तीकरता परवाना लागेल’ असा कायदा पुढेमागे झाल्याशिवाय राहणार नाही. अन्नाच्या दृष्टीने जगाची लोकसंख्या कमाल मर्यादेपर्यंत वाढली म्हणजे पुढे अशी खबरदारी घ्यावी लागेल की फक्त सुप्रजाजननाच्या दृष्टीने योग्य आईबापांसच मुले व्हावीं. अर्थात् विवाहाची परवानगी सर्वांना असावी, पण सर्वांनाच मुले होऊ द्यावी असा याचा अर्थ नव्हे. आनुवंशिक दोषांमुळे कितीतरी मुलांच्या आयुष्याचा नाश होतो, इतकेच नव्हे तर यामुळे एकंदर समाजाला निकृष्ट दशा येते. याला प्रतिबंधक उपाय एवढाच की परवान्याशिवाय कोणाला मुले होऊ देऊ नयेत आणि असा परवाना फक्त मनाने व शरीराने सुदृढ लोकांनाच मिळावा.

पुढे वाचा

प्रिय वाचक

प्रिय वाचक,
आजचा सुधारक गेली दहा वर्षे आपल्या मगदुराप्रमाणे पुरोगामी विचारांचा प्रसार-पुरस्कार करीत आहे. हा पुरोगामी विचार काय आहे नि काय नाही याचा थोडा ऊहापोह करू या. पुरोगामी – म्हणजे पुढे जाणारा. नुसता परिवर्तनशील नाही.
पण पुढे म्हणजे कुठे? ‘पुढे’ ही सापेक्ष कल्पना आहे. विवाद्य आहे. दिशा सापेक्ष. म्हणून आम्हाला अपेक्षित दिशा कोणती आहे, कोणती नाही याचा खुलासा केला पाहिजे.
आमची दिशा आहे मानवधर्माची, समतेची, न्याय्य व्यवस्थेची, व्यक्तिस्वायत्ततेची. याला आम्ही विवेकवाद म्हणतो. दिशा मानवधर्माची म्हणून आम्हाला विशिष्ट समूहाच्या धर्माच्या बंधनापलीकडे जाणे ही पुढची दिशा वाटते.

पुढे वाचा