विषय «इतर»

एका आमंत्रणपत्रिकेचा पंचनामा

ही आमंत्रणपत्रिका एका मखमलीसारख्या कापडाच्या वीतभर लांब लिफाफ्यात होती. लिफाफा बंद राहण्यासाठी ‘व्हेल्क्रो’चे तुकडे लावले होते, व लिफाफा गोंडे लावलेल्या सोनेरी गोफाने बांधलेला होता. आतमध्ये एका सात इंच लाव नक्षीदार लाकडी दांडीला पाच इंच रुंद व पंधरा इंच लांब सॅटिन-रेशीम जातीचा कापडी पट जोडलेला होता. त्याची गुंडाळी करून तिला एका सोनेरी गोफाने बांधले होते. या गोफात एक कार्ड ओवले होते, ज्याच्या एका बाजूवर पत्रिका पाठवणाच्या कुटुंबाचे नाव व पत्ता छापलेला होता. दुस-या बाजूला आमंत्रितांची नावे लिहिण्यासाठी जागा होती.
पटाच्या वरच्या भागात गणपतीचे चित्र व दोहो बाजूस ‘प्रसन्न झालेल्या कुलदैवतांची नावे होती.

पुढे वाचा

हे प्रभो विभो, अगाध किति तव करणी!- ब्रह्मदेवाचा दिवस

धर्मग्रंथांचा विज्ञानाशी मेळ घालताना सनातन लोक तारेवरची कसरत कशी करतात याचे उदाहरण. ईश्वराने ६ दिवसांत जग निर्माण केले आणि सातव्या दिवशी विश्रांती घेतली असे बायबलात सांगितले आहे. आणि अशा प्रकारे विश्व ३ हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात आले असेही ते म्हणते. आता शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीचे वय कोट्यवधी वर्षांचे आहे. ते मानले पाहिजे. पण मग बायबल मधील विसंगती दिसेल आणि त्याचे माहात्म्य कमी होईल. म्हणून १९०९ साली एक ख्रिस्ती तज्ज्ञांची समिती बसवण्यात आली. त्यांनी निकाल दिला की ‘दिवस’ या शब्दाचा नेहमीचा अर्थ म्हणजे ‘२४ तास’ असा न घेता ‘दिवस’ म्हणजे ‘अनिश्चित काळ’ असा घ्यावा.

पुढे वाचा

विवेकाच्या गोठी

१९९९ च्या निवडणुका झाल्या, आणि आता त्याबाबत चर्चा चालू आहे. या निवडणुका वारंवार घ्याव्या लागतात आणि त्यामुळे राष्ट्राच्या जनतेवर खर्चाचा बोजा टाकला जातो असे म्हटले जाते.
परंतु भारताचे एकूण उत्पन्न दीड लाख कोट रुपये आहे व त्यापैकी फक्त एकहजार कोट निवडणुकीवर खर्च होतो. यापेक्षा कितीतरी अधिक खर्च मंत्र्यांच्या राहणीसाठी, मोटारीसाठी, विमानासाठी आणि अनेक पुढा-यांच्या सुरक्षा-व्यवस्थेसाठी खर्च होतो. तसेच, अणुबॉम्बसाठी पंधराहजार कोट खर्च केले आणि पाकिस्तान घाबरले नाहीच!
या निवडणुकीच्या काळात पंधरा दिवस अनेक तरुण बेकारांना रोजीरोटी मिळते आणि त्यांचे हे दिवस आनंदात जातात.

पुढे वाचा

ईश्वर विनाकारण घोटाळ्यात पडायला नको

ईश्वराला अक्कल शिकवणारे लोकच प्रार्थना करीत असतात. पावसाकरतां प्रार्थना करणा-या लोकांची चेष्टा करण्याकरतां विन्स्टन चर्चिल यांनी एकदां वर्तमानपत्रांत एक पत्र प्रसिद्ध केले होते. त्यांत त्यांनी अशी शिफारस केली होती की, पावसाला व पिकांना सर्वांत सोयीचा वेळ कोणता हे ठरवण्याकरतां एक कमिटी नेमावी आणि त्यांनी निर्णय दिल्यानंतर त्याला धरून अमुक दिवशीं अमुक इतका पाऊस पाडण्याविषयी ईश्वराला सार्वजनिक प्रार्थना करावी, कारण प्रत्येकाने वेगवेगळ्या दिवशी प्रार्थना केल्याने ईश्वर विनाकारण घोटाळ्यांत पडण्याचा संभव आहे. अर्थात् युद्धांत दोन्ही बाजूच्या लोकांनी आपणास विजय मिळावा अशी प्रार्थना केल्यामुळे ईश्वर नेहमीच घोटाळ्यांत पडतो, पण पिकांचे बाबतीत कदाचित् एका देशांतल्या लोकांचे तरी कमिटीचे द्वारें एकमत होण्याचा संभव आहे, तेव्हा वेगवेगळ्या देशांत तसतसा पाऊस पाडून त्यांचे समाधान करणे शक्य आहे.

पुढे वाचा

मालकी हक्क आणि गुलामगिरी

व्यक्तिस्वातंत्र्यामुळे दुस-याला इजा होतां नये, हे जर सगळेच कबूत करतात, तर मतभेद कां व्हावा? मतभेद येथेच होतो की दुसरयाचे हक्क काय आणि त्यांचे नुकसान झाले असे केव्हा म्हणायचे? सनातनी आपल्या भावना दुखावल्याचं ढोंग करतात, पण त्यांच्या भावना कोणी दुखावतां नये असा हक्क त्यांना कोठून आला? त्यांच्या वागणुकीने आमच्या भावना दुखावतात, म्हणून काय आम्ही त्यांना शिक्षा करावी असे थोडेच म्हणतों? ते आपल्या समजुतीप्रमाणे वागतात, त्यांना विचार करता येत नाही, वागोत बिचारे. प्रत्येक व्यक्तीचे हक्क काय हे एकदा ठरलें म्हणजे स्वातंत्र्याच्या मर्यादा समंजस लोकांच्या दृष्टीने आपोआपच ठरल्या.

पुढे वाचा

प्रिय वाचक

१. वैचारिक लिखाणाची दाद घेऊन प्रतिक्रिया देणे हे काम कठीण आहे. म्हणून कोणी केले की आनंद होतो. मग तो प्रतिवाद पुरेसा तर्कशुद्ध का नसेना. या दृष्टीने अमेरिकेतील दोन वाचकांचा मी आभारी आहे. विवेकवादी विचारसरणी व जीवनपद्धती – ही आमची मुलाखत कॅनडातून प्रसिद्ध होणा-या ‘एकता’या त्रैमासिकाच्या जुलैच्या अंकात आली. तिची दखल ऑक्टोबर ‘९९ च्या ‘एकता’त दोन लेखकांनी घेतली. त्या आक्षेपांना थोडक्यात उत्तरे या अंकात दिली आहेत. ‘एकता’तील आक्षेपकांचे लेख विस्तारभयास्तव देता आले नाहीत.
२. कच्च्या आहाराचा प्रयोग हा र. धों. कर्वे यांचा लेख पुनर्मुद्रित करीत आहोत.

पुढे वाचा

विवेकवादाला हरकत – दोन प्रतिक्रिया

१. उत्तर अमेरिकेत कॅनडामधून ‘एकता’ नावाचे एक मराठी त्रैमासिक प्रसिद्ध होते. त्याच्या जुलै ‘९९ च्या अंकात आमची एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. श्रीराम गोवंडे या न्यूजर्सीमधील आमच्या मित्राने ती घेतली होती. (आजचा सुधारकच्या ऑक्टोबरच्या अंकात नंतर ती पुनर्मुद्रित केली आहे) ‘विवेकवादी विचारसरणी व जीवनपद्धती’ या नावाने. एकताच्या ऑक्टोबर ‘९९ च्या अंकात आम्ही मांडलेल्या काही मुद्द्यांवरून दोन प्रतिक्रिया आल्या आहेत. त्या कनेक्टिकट येथील आमचे मित्र श्री. सुनील देशमुख आणि मॅसॅच्युझेट्सच्या डॉ. ललिता गंडभीर यांनी आमच्याकडे पाठवल्या. त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे. त्यांपैकी एक ‘धर्म का हवा?’

पुढे वाचा

पोपप्रणीत धर्मविस्तार

भारतात आणि भारताबाहेर ख्रिस्ती नसलेल्या हजारो लोकांना पायांनी जिवंत जाळले आहे. पोप नववा ग्रेगरी ह्यांनी इ. स. १२३१ मध्ये ख्रिस्ती नसलेल्या पाखंडी लोकांना शोधून त्यांच्यावर खटले भरण्यासाठी पेपल इन्क्विझिशनची (म्हणजे पोपप्रणीत धार्मिक न्यायसभेची) स्थापना केली. इ.स. १४७८ मध्ये पोप (चवथा) सिक्स्टस् ह्यांनी स्पॅनिश इन्क्विझिशनला अधिकृतपणे मान्यता दिली. ह्या स्पॅनिश इन्क्विझिशनने आपल्या कारकिर्दीत सुमारे चार लाख लोकांचा अमानुष छळ करून वध केला! आमच्या धर्मशास्त्राचा हजारो पानांचा अनेक खंडी इंग्रजी इतिहास लिहिणा-या भारतरत्न डॉ. पां. वा. काणे ह्यांनी हे लिहिले आहे! त्यांच्या धर्मशास्त्राच्या इतिहासाचा पहिला खंड १९३० साली निघाला व शेवटचा १९६२ साली!

पुढे वाचा

ब्राह्मणांचे गोमांसभक्षण

धार्मिक दृष्टीने गोहत्या हा विषय संवेदनशील असला तरी सत्यशोधन कोणालाही आक्षेपार्ह वाटू नये. वैदिकवाडमयाचे व प्राचीन संस्कृत, पालि-प्राकृत साहित्याचे जे विद्वान यांच्या संशोधनातून व खुद्द वेदांतून मूळ वचने देऊन प्रस्तुत निबंध सज्ज केला आहे.
रजनीकांत शास्त्री, साहित्य सरस्वती, विद्यानिधि –
(१) “ऋग्वेद के अध्ययनसे पता चलता है कि वैदिककाल में जौ और गेहूं खेतों की आज तत्कालीन हिन्दुओंके मुख्य खाद्य पदार्थ थे।… मांसभोजनभी उस कालमें बहुत प्रचलित था और आधुनिक हिन्दू जनता यह जानकर चौक उठेगी कि अन्य खाने योग्य पशुओंके मांस की तरह गोमांस भी खाद्य पदार्थों में सम्मिलित था”
(हिंदु जाति का उत्थान ओर पतन पृ.

पुढे वाचा

आम्ही आणि ‘ते’! (भाग १)

खिलारे नानावटींनी निर्माण केलेला वाद संपुष्टात आला असे वाटत असतानाच मिलिंद देशमुख ह्यांचे पत्र आले. (पत्र पुढे येत आहे.) त्या पत्राच्या निमित्ताने आजचा सुधारकची जातिवादासंबंधीची भूमिका अधिक स्पष्ट होईल असे वाटले आणि जातिवाद म्हणजे फक्त ब्राह्मणब्राह्मणेतर वाद नाही हेही एकदा निःसंदिग्धपणे सांगता येईल असे मनात आले. त्याशिवाय संपत्ती कशी निर्माण होते, तिचा लाभ काही गटांनाच का होतो, तिचे सर्वत्र सारखे वाटप आजपर्यंत का होऊ शकलेले नाही, भविष्यात तसे व्हावे म्हणून काय करावे लागेल, ह्या प्रश्नांची चर्चा त्या पत्राच्या प्रकाशनातून सुरू करता येईल असे वाटले.|

पुढे वाचा