सर्वसाधारणपणे “धर्मनिरपेक्षता” म्हणजे राज्यसत्ता व धर्मसत्ता यांचा काडी-मोड. तसेच वैयक्तिक पातळीवर धर्मनिरपेक्षता म्हणजे नोकरी, धंदा, शैक्षणिक प्रवेश, प्रवास, इ. ‘न-धार्मिक’ क्रियांत धर्म विचारात न घेता वागणूक देणे वा घेणे.
“सर्वधर्मसमभाव” हे मात्र मोठेच गौडबंगाल आहे. धार्मिक बाबतींत सर्व धर्म समानच असतात, त्यामुळे एकाने दुस-याला शिकवण्याचा शहाणपणा करू नये, असे काहीसे त्याचे रूप आहे. “आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम्”, हे हिंदूंना तसे नवीन नाही. त्यामुळे विविध देवदेवतांची पूजा करण्यातील विरोधाभास दूर होतो. मात्र इतर धर्मांत नमस्कारच नसल्याने तो केशवास कसा पोचतो, किंवा पोचतो का, हे अस्पष्टच राहते.
विषय «इतर»
मनाचा जो व्यापार चालतो तो सारा इंग्रजी भाषेत
इंग्लिश भाषेचे सामान्य ज्ञान तर आतांशा बहुधा प्रत्येक मनुष्यास जरूर झालें आहे. दिवसेंदिवस तर तींत निपुण होणे हा जीवनाचाच एक उपाय होऊ पहात आहे. चोहोंकडे प्रतिष्ठा मिरविण्याचे तर यासारखे सध्यां दुसरें साधनच नाहीं. तेव्हा तिचा जो हल्ली फैलावा झाला आहे, व होत चालला आहे, त्यापुढे वर सांगितलेल्या भाषांची गोष्ट काय बोलावी? इंग्लिश लोक आपल्या उत्कृष्ट भाषेचा साया भूमंडळावर प्रसार होत चालला आहे याचा अतिशयित गर्व वहातात, व तो त्यांचा गर्व यथार्थ आहे. आमच्या नुसत्या हिंदुस्थानांतच पाहिले तर आमच्या तरुण विद्वानांस तिने इतके वेडावून टाकले आहे की, त्यांस आपल्या आईबापांशी, बायकांशीं, बहिणीशीं, चाकरांशीं सुद्धां शुद्ध व सरळ बोलण्याची मारामार पडते!
धर्म आणि श्रद्धा
धर्मचिकित्सा करणा-या विद्वानांचे, ढोबळ मानाने, दोन वर्ग आहेत. एक वर्ग आहे – धर्म मानणा-या आस्तिकांचा, तर दुसरा आहे-धर्म न मानणा-या नास्तिकांचा. आस्तिक धर्मचिकित्सक हे सिद्ध करू पाहतो की धर्म ही अत्यंत कल्याणकर (किंबहुना, एकमेव कल्याणकर) बाब आहे. उलट, नास्तिक धर्मचिकित्सक हे दाखवू पाहतो की धर्म ही अत्यंत घातक आणि मानवाला सर्वस्वी अशोभनीय बाब आहे. धर्मचिकित्सकांच्या या दोन वर्षांनी काढलेले धर्मासंबंधीचे निष्कर्ष भिन्न (किंबहुना, एकमेकांविरुद्ध) असले, तरी त्या दोहोंमध्ये एका बाबतीत मतैक्य असल्याचे आढळते. नास्तिक आणि आस्तिक या दोन्ही प्रकारचे बहुतेक धर्मचिकित्सक असे मानतात की धर्माचा आधार श्रद्धा हा आहे.
नसलेल्या परमेश्वराशी भांडण
आजचा सुधारकचा मी नियमित वाचक आहे. निखळ विवेकवादाचा पुरस्कार करणारे हे मासिक विचारी वाचकांच्या पसंतीस उतरावे यात तिळमात्र शंका नाही.
पण मला खटकणारी एक गोष्ट म्हणजे ऊठसूठ परमेश्वराची कुरापत काढण्याची थोडीही संधी हे मासिक वाया जाऊ देत नाही.
“अध्यात्म:” एक प्रचंड गोंधळ’ हा मे, ९९ च्या अंकातील लेख हा त्याच पठडीतला म्हणावा लागेल.
माझ्याही मनात त्याने गोंधळ होतो. त्याची कारणे अशी –
१. नसलेल्या परमेश्वराची चर्चा कशाला करायची? त्याला महत्त्व देऊन ‘तो नाही’ हे सिद्ध करायला ‘आजचा सुधारक’ मधील बहुमूल्य पाने का खर्चायची?
चर्चा – पंतप्रधान कोणी व्हावे?
संपादक, आजचा सुधारक यांस,
जून ९९ च्या अंक वाचला. यावेळी नेहमीची तर्कसंगती व विचारांची सुसूत्रता त्यात जाणवली नाही. म्हणून त्याविषयी काही विचार मांडीत आहे.
१) भारतातील सुशिक्षित व अशिक्षित असे दोन्ही प्रकारचे मतदार लोकशाही प्रक्रियेस कसे अयोग्य आहेत यावर दोन परिच्छेद लिहिल्यावर पुढे एके ठिकाणी आपण म्हणता की पंतप्रधान कोणी व्हावे हा जनतेचा प्रश्न नसून जो पक्ष निवडून येईल त्याची ती डोकेदुखी आहे. निवडून आलेला पक्ष हा मतदारांनीच निवडून दिलेला असतो. तेव्हा अशा “अयोग्य” (म्हणजेच आपल्या म्हणण्याप्रमाणे अप्रबुद्ध) मतदारांनी निवडलेल्या पक्षाने सर्व देशावर एखादी व्यक्ती पंदप्रधान म्हणून लादावी हे योग्य कसे?
विवेकवाद म्हणजेच आप्तवाक्यप्रामाण्यनिषेध?
संपादक, आजचा सुधारक यांस,
मी आपले सर्व अंक पुरेसे काळजीपूर्वक वाचतो. प्रतिक्रियाही निर्माण होतात. त्यांची तपशीलवार मांडणी करण्यापेक्षा काही निष्कर्प फक्त नोदवीत आहे.
१. आपल्या वहुताश लेखकांचा त्यांच्या मनावद्दलचा शागही आत्मावश्वास अजव वाटतो. विश्वातील संपूर्ण व अंतिम सत्य आपणास समजले आहे असा अविर्भाव त्यात मला दिसतो.
२. जुलै ९९ च्या संपादकीयांतील पान १०० परिच्छेद – २ चा शेवट व पान १०१ परिच्छेद १ चा शेवट यांत ‘अन्याय दूर करण्याचा’ व ‘वास्तव बदलण्याचा तुमचा संकल्प हा फारच महत्त्वाकांक्षी वाटतो. आपले ग्राहक / वाचक यांची संख्या २५०० ते ३००० च्या पुढे नसावी.
सर्वांना शुद्धलेखनाचे प्रशिक्षण हवे
संपादक, आजचा सुधारक यांस,
आपल्या अनावृत पत्रात आपण उपस्थित केलेले सर्वच मुद्दे महत्त्वाचे व विचारांना चालना देणारे आहेत. त्या सर्वांचा समग्र विचार करून ऐकमत्य साधणे नितांत आवश्यक झाले आहे. ही प्रक्रिया लवकर व्हावयास हवी. उशीर झाल्यास मराठीची अवस्था आणखी दयनीय होईल आणि मग तिच्यात चैतन्य आणणे आणखी कठीण होईल, असे आपल्याप्रमाणे मलाही वाटत आले आहे. आपल्या अनेक वर्षांच्या व्यावसायिक अनुभवामुळे आपण लिखित मराठीचे दुखणे बरोबर हेरले आहे. समग्र महाराष्ट्रात आणि अन्यत्र प्रमाण मराठीची जाण वाढणे याची आज नितान्त
आवश्यकता आहे.
मराठीच्या अनेक प्रादेशिक बोलीही महाराप्ट्रात विखुरल्या आहेत.
भांडण शब्दप्रामाण्याशी
मागच्या महिन्याच्या अंकामध्ये तीन मोठमोठे लेख आम्ही प्रसिद्ध केले. त्यांतील शेवटचा जो लेख होता-अनिलकुमार भाटे ह्यांचा तो आम्ही प्रकाशित करावयाला नको होता असे सांगणारी अनेक पत्रे आली तसेच दूरभाषदेखील आमच्याकडे आले. तो लेख का छापला त्याची कारणे आधी आणि नंतर त्या लेखासंबंधी.
श्री. भाट्यांच्या पत्रांत सतत आरोप होत होता की त्यांची वाजू आम्ही दडवून ठेवतो. प्रतिपक्षाला आम्ही आपले मत मांडू देत नाही; आम्ही एकाच पक्षाचा प्रचार करतो. त्यांची एकामागून एक अशी तीन पत्रे आली. आम्ही त्यांचे तिसरे पत्र प्रसिद्ध केले नाही.
अकादमीय विद्वज्जन आणि युटोपिया
विसाव्या शतकातील सर्वांत दूरगामी परिणाम घडवणारी वौद्धिक क्रांती घडली मात्र संथ, शांत गावांमध्ये. केंब्रिज, कोपनहेगन, म्युनिक, पॅरिस, गॉटिंगेन, अशी ही, गावे. गॉटिंगेन हे गाव हे भौतिकीतज्ज्ञांचे खरे केंद्र. गावाचा आत्मा म्हणजे तिथले प्राचीन जॉर्जिया ऑगस्टा विद्यापीठ. इतर गावांना त्यांच्या नरवीरांचा, त्यांच्या पदकांचा गर्व असायचा. गॉटिंगेनकरांना विद्यापीठातल्या विद्यार्थांच्या आणि अध्यापकांच्या पदव्यांचा आणि जगभरातल्या वैज्ञानिक संघटनांच्या सभासदत्वाचा गर्व वाटायचा. १९२० साली रात्री घरी परतणा-या विद्यार्थ्यांनी ‘करमणूक’ जास्त झाल्याने केलेला दंगा गावक-यांच्या सवयीचा होता – तसेच याच विद्यार्थ्यांनी वौद्धिक उत्तेजनेतून रात्री उशीरापर्यंत रस्त्यामध्ये उभे राहून चर्चा करणेही सवयीचे होते.
चर्चा
भांडवलाचे वास्तव स्वरूप
(आजचा सुधारक – जून १९९९)
– श्री. वि. खांदेवाले
आपण वरील स्फुटात भांडवलाची नवी व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. त्यासंबंधी माझी प्रतिक्रिया नोंदवीत आहे. ज्या ओघात आपण विचार मांडले त्यांना क्रमांक देऊन टिप्पणी करीत आहे.
१. उत्पादनासाठी भांडवल, श्रम, भूमी आणि कच्चा माल लागतो असे आपण म्हटले. परंतु कच्चा माल हा कृषि-उत्पादनांच्या (अन्नधान्ये, तेलविया, ज्यूट, ऊस, कापूस इत्यादी आणि खनिज पदार्थ, जंगलांपासून मिळणारी उत्पादने इत्यादींच्या) स्वरूपात निसर्गापासून (मूलतः) विनामूल्य मिळतो म्हणून त्याचा समावेश भूमी ह्या घटकात केला जातो. त्यामुळे भूमी व कच्चा माल हे आपण समजता त्याप्रमाणे वेगळे घटक मानले जात नाहीत.