Category «इतर»

शरीराला जोडलेला आत्मा

मे ९९ च्या अंकातील दि.य. देशपांड्यांच्या सुमारे पाच पानी लेखावर जुलै ९९ च्या अंकात अनिलकुमार भाट्यांचे नऊ पानी उत्तर आहे; संतप्त आणि विस्तृत उत्तर आहे.
१) भाट्यांना दियदेंचे आत्म्याबाबतचे विवेचन पटत नाही. पण भाटे कशाला आत्मा म्हणतात हेही समजत नाही. ते फक्त सांगतात की “माझ्या ‘मी’ पणाच्या सर्व (कल्पनांचा) माझ्या आत्म्याशी काही संबंध नाही”. मग आत्मा आहे कशाशी संबंधित? असे काहीतरी मानवी व्यवहाराचे अंग असणारच, की ज्याच्या वर्णनासाठी ‘आत्मा’ हा शब्द घडवावा लागला आहे. आणि त्याचा माझ्याशी संबंध हवाच-जर आत्मा माझा असेल तर.

पुढे वाचा

प्रचंड गोंधळ भाट्यांचाच

जुलै १९९९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आ. सु. च्या अंकात अमेरिकानिवासी श्री. अनिलकुमार भाटे नावाच्या एका वाचकाची प्रतिक्रिया वाचनात आली. प्रा. देशपांडे ह्यांनी आपल्या लेखातून आत्मा, पुनर्जन्म, कर्मसिद्धान्त अशा भारतीय आस्तिक दर्शनशास्त्रातील संकल्पनांचे खंडन केले आहे. त्या संकल्पनांचे मंडन करण्यासाठी भाटे ह्यांनी जो काय तर्कशास्त्राचा अभ्यास केला असेल किंवा हेगेल, हुसेर्ल, हायडेगर. या हकाराच्या वाराखडीतील युरोपी विद्वानांच्या नावाची जंत्री पाठ केली असेल ते सारे निरर्थक ठरतात. प्रा. देशपांड्यांचा विचार भारतीय दर्शनशास्त्राशी संबंधित आहे. तो नास्तिक दर्शनाशी जिव्हाळ्याचे नाते सांगणारा आहे. त्याच्या खंडनार्थ श्री.

पुढे वाचा

आत्म्याचा अनुभव सार्विक नाही

आजचा सुधारक च्या जुलै १९९९ च्या अंकात “दि. य. देशपांडे ह्यांचा प्रचंड वैचारिक गोंधळ’ या शीर्षकाखाली श्री. अनिलकुमार भाटे यांचे विचार वाचण्यात आले. श्री. देशपांडे यांचा “वैचारिक गोंधळ” आणि त्यांचे “अज्ञान” श्री. भाटे यांनी उघड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. श्री. देशपांडे यांच्या “अज्ञानातून” वाचकाला ज्ञानाच्या वाटेवर आणण्याचा श्री. भाटे यांचा स्तुत्य प्रयत्न आहे. त्यांच्या ह्या प्रयत्नाने श्री. देशपांडे यांचे “अज्ञान” स्पष्ट झाले की नाही याबरोबरच वाचकांना कितपत “ज्ञानवोध” झाला हेसुद्धा लक्षात घेणे उपयुक्त ठरेल. श्री. भाटे यांच्या मतानुसार श्री. देशपांडे यांनी अनेक चुकीची विधाने केलेली आहेत.

पुढे वाचा

श्री. भाट्यांचे म्हणणे पटले नाही

श्री अनिलकुमार भाटे यांचा लेख,(आ. सु. जुलै १९९९) मला आवडला नाही व पटलाही नाही. श्री. दि. य. देशपांडे यांना तत्त्वज्ञानातले आणि अध्यात्मातले काही कळलेले नाही, आणि भाटे यांना खूप काही कळले आहे असे त्यांचे प्रतिपादन आहे. कर्मसिद्धान्तावद्दल भाटे यांनी असे म्हटले आहे:-कर्मसिद्धान्त हा निसर्गाचा मूलभूत नियम आहे. ईश्वर माना किंवा न माना, हा सिद्धान्त अवाधित असतो. या सिद्धान्ताचे implementation कोणत्या agency मार्फत होते या प्रश्नाचे उत्तर त्यांनी असे दिले आहे की, आपण स्वतःच हे काम करीत असतो. पूर्वीच्या अनेक जन्मांत केलेल्या कृतींचा व विचारांचा साठा आपल्यावरोवर वागवीत असतो, … वगैरे.

पुढे वाचा

स्फुट लेख

हिंदु कोण
१. हिंदुधर्माचे कोणतेही एक पुस्तक, एक देव, समान संस्कार, धार्मिक विधी असे काहीच नसल्यामुळे हिंदु कोण हा प्रश्न निर्माण होतो. आणि हा एक तांत्रिक प्रश्न आहे. हिंदूची सर्वमान्य व्याख्या नसल्यामुळे भारतशासनाने हिंदूंसाठी केलेले कायदे ज्याला लागतात तो हिंदु अशी भारतात सध्या परिस्थिती आहे. ईशान्येकडे अरुणाचल, मेघालय, मिझोराम, मणीपूरपासून नैर्ऋत्येकडे लक्षद्वीपापर्यंत आणि वायव्येतील राजस्थानपासून आग्नेयेकडील अंदमान, निकोवारपर्यंत भारत पसरला आहे. ह्या इतक्या विस्तृत प्रदेशात राहणा-या ज्यांच्या निष्ठा एका पुस्तकावर (वायबल/कुराण, वेद/गुरुग्रंथ साहेव इ.) वर नाहीत अशा लोकांच्या देवता समान नाहीत, त्यांच्या भापा सारख्या नाहीत इतकेच नव्हे तर पौराणिक कथादेखील समान नाहीत, त्यामुळे त्यांना एकत्र बांधणारे सूत्रच नाही.

पुढे वाचा

श्रद्धा

संस्कृत तथा प्राकृत भाषेमध्ये श्रद्धा ह्या शब्दाचा सर्वत्र उपयोग केला जातो. परंतु ह्याचा निश्चित अर्थ दिसत नाही. जो काही मिळतो त्याचा हा असा प्रकार आहेः ‘श्रद्धा = गुरुपु शास्त्रेषु निरतिशयः विश्वासः शास्त्राचार्योपदिष्टऽथै अननुभूतेऽपि एवमेव एतदितिविश्वासः, एवं विश्वासः- वंचकत्वाभावसंभावना.’ हे विवरण समाधानकारक नाही. वचन विश्वासानुयायी आहे. …..
“विश्वास हा अनुभव व अनुमान या दोहोंचा परिणाम आहे. अनुभवाला परीक्षण (बुद्धि व शक्ति) अनुमानाला विवेक (बुद्धि) लागते. अनुभवाचे निरीक्षणपूर्वक परीक्षण पाहिजे व अनुमानाला पूर्वानुभव मदतीला घ्यावा लागतो. या दोन गोष्टींशी व्यस्त प्रमाणात विश्वास उत्पन्न होतो.

पुढे वाचा

सर्वच त्या वातावरणाचे कैदी

… अॅबे दुब्वाने* म्हैसूर व दक्षिण भारत यांवरील आपली नजर काढून जवळच उत्तरेकडे जर ती लावली असती तर त्याच्या ज्ञानात जास्त भर पडली असती. व्यक्तीप्रमाणे एखादा समाजदेखील आपल्या जीवनप्रवासात पुष्कळ वेळा आगंतुक कारणाने देखील वाट चुकून आडमार्गास लागतो. एकदा आडमार्गास लागला म्हणजे कालांतराने त्या समाजाभोवती त्या परिस्थितीस अनुरूप असे पारंपरिक मानसिक वातावरण अस्तित्वात येते. मग वैयक्तिक व सामाजिक जवाबदारी यांचा भेद लयास जाऊन सर्वच त्या वातावरणाचे कैदी होऊन वसतात याचा पुरावा महाराष्ट्राच्या इतिहासात चांगलाच प्रत्ययास येतो. एका युगपुरुषाच्या नेतृत्वामुळे मराठी समाजात एकोपा व स्वातंत्र्य यांचे अननुभूत वारे खेळू लागले.

पुढे वाचा

सामाजिक कार्यकर्ता-परस्पर-संवाद

[आमचे मित्र श्री. तारक ,काटे ह्यांनी चार महिन्यांपूर्वी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीचा अहवाल आमच्याकडे पाठविला. अहवाल वाचल्यानंतर अशी कार्यकर्त्यांची बैठक घेण्याची प्रेरणा त्यांना कशी काय झाली असा प्रश्न आम्ही त्यांना विचारला. त्याला त्यांनी जे उत्तर दिले ते, आणि त्यांच्या बैठकीचा निष्कर्ष आजचा सुधारक च्या वाचकांसाठी पुढे देत आहोत. त्यांच्या निवेदनात काही व्यक्तिगत तपशील आलेला आहे पण त्यामुळे त्यांच्या कार्यकलापाचे यथायोग्य आकलन होण्यास साह्य होईल, त्याचप्रमाणे त्यांनी काढलेले निष्कर्प योग्य आहेत वा नाहीत याची चर्चा करण्यास मदत होऊ शकेल असे वाटल्यामुळे तो समग्र वृत्तान्त येथे प्रकाशित करीत आहोत.]

पुढे वाचा

विद्रोही विवेकवाद

दोन ईश्वरांतील विद्रोह हा माझा लेख एप्रिल ९९ च्या अंकात प्रकाशित करून त्यावर संपादकीय स्पष्टीकरणही दिल्यामुळे आजचा सुधारक विषयीचा माझ्यातील आदर दुणावला. परंतु आपले (व वाचकांचेही) गैरसमज झालेले दिसतात. माझे स्पष्टीकरण प्रकाशित करावे ही नम्र प्रार्थना.
जगात दोन प्रकारचे ईश्वर अजून जिवंत आहेत (१) मानवहित केंद्री (२) पुरोहित-ब्राह्मण-हित केंद्री ह्या माझ्या वाक्यातील लाक्षणिक अर्थ लक्षात घ्यावा. (१) मानवहित केंद्री : साधुसंतांनी मानलेला ईश्वर. मध्यस्थ-पुरोहित-ब्राह्मणांना डावलून संतांनी सरळ आपापल्या ईश्वराशी (विठ्ठल, राम, कृष्ण) संवाद साधण्याचा सत्याग्रह, विद्रोह मांडला होता. त्यांचा ईश्वरसुद्धा भक्तांना अभिप्रेत असलेल्या रूपात येऊन चंदन घासणे, दळण दळणे, ढोरे ओढणे, वगैरे अति सामान्यांची कामे करीत होता.

पुढे वाचा

दि. य. देशपांडे ह्यांचा प्रचंड वैचारिक गोंधळ

प्रा. दि. य. देशपांडे यांनी घातलेला प्रचंड वैचारिक गोंधळ व अध्यात्माला ‘गोंधळ’ ठरविण्याच्या अट्टाहासापायी केलेले स्वतःच्या अज्ञानाचे प्रदर्शन
प्रा. दि. य. देशपांडे यांनी आ. सु. च्या मे ९९ च्या अंकात लिहिलेला अध्यात्म : एक प्रचंड गोंधळ” हा लेख म्हणजे वैचारिक गोंधळाचा उत्कृष्ट नमुना आहे. हा संपूर्ण लेख अत्यंत तर्कदुष्ट पद्धतीने लिहिलेला असून इतकी तर्कदुष्ट विधाने देशपांड्यांसारखे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक कशी काय लिहू शकतात ही खरोखरच । आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. या लेखात अनेक चुकीच्या विधानांचीही रेलचेल आहे. काही उदाहरणे खाली देत आहे.

पुढे वाचा