विषय «इतर»

आम्ही आणि ‘ते’! (भाग १)

खिलारे नानावटींनी निर्माण केलेला वाद संपुष्टात आला असे वाटत असतानाच मिलिंद देशमुख ह्यांचे पत्र आले. (पत्र पुढे येत आहे.) त्या पत्राच्या निमित्ताने आजचा सुधारकची जातिवादासंबंधीची भूमिका अधिक स्पष्ट होईल असे वाटले आणि जातिवाद म्हणजे फक्त ब्राह्मणब्राह्मणेतर वाद नाही हेही एकदा निःसंदिग्धपणे सांगता येईल असे मनात आले. त्याशिवाय संपत्ती कशी निर्माण होते, तिचा लाभ काही गटांनाच का होतो, तिचे सर्वत्र सारखे वाटप आजपर्यंत का होऊ शकलेले नाही, भविष्यात तसे व्हावे म्हणून काय करावे लागेल, ह्या प्रश्नांची चर्चा त्या पत्राच्या प्रकाशनातून सुरू करता येईल असे वाटले.|

पुढे वाचा

कच्च्या आहाराचा अनुभव

मनुष्य संवयीचा गुलाम असतो आणि संवयीच्या बाहेरचे काही करायचे झाले की ते जिवावर येते. आम्हीं सुमारे एक वर्षांपूर्वी ‘आधुनिक आहारशास्त्र नांवाचे पुस्तक लिहिले. अर्थात् ते अनेक वर्षांच्या अभ्यासावर आधारलेले आहे आणि कच्च्या आहाराचे महत्त्व आम्हास तात्त्विक दृष्ट्या पटल्यामुळेच त्या पुस्तकांत कच्च्या आहारावर विशेष भर दिलेला आहे. वास्तविक व्हिटॅमीनसंबंधी आधुनिक शोधांनंतर अशा आहाराचे महत्त्व सर्वांसच पटावे, कारण कच्च्या आहारांत व्हिटॅमीन पूर्णत्वाने सांपडतात आणि शिजवलेल्या अन्नांत त्यांचे प्रमाण वरेच कमी होते हे निर्विवाद आहे. ही गोष्ट अनेक प्रकारच्या प्रयोगांनी सिद्धही झालेली आहे. उदाहरणार्थ उंदरांच्या पिल्लांना अंड्यातील पिवळा भाग कच्चा खाऊ घातल्याने त्यांचे वजन ६० दिवसांत शेंकडा १४० नी वाढले, व त्याच वयाच्या इतर कांही पिल्लांस तोच पिवळा भाग शिजवून घातला, तेव्हा त्यांचे वजन फक्त शेकडा ७६ नी वाढले असे आढळले.

पुढे वाचा

महर्षी ते गौरी

मंगला आठलेकर यांनी स्त्री-स्वातंत्र्याची वाटचाल दाखविणारे ‘महर्षी ते गौरी’ हे पुस्तक लिहिले आहे. प्रस्तावनेतील पहिलेच वाक्य, “महर्षी कर्त्यांचं सारं घराणं स्त्रियांच्या उन्नतीसाठी काम करणारं!” असे आहे. यावरून लेखनाचा शिथिलपणा, लक्षात यावा. धोंडो केशव कर्वे यांनी स्त्री-शिक्षणाचे मोठेच काम केले. त्यांचा मोठा मुलगा रघुनाथ धोंडो कर्वे यांनी विवेकवादाचा प्रसार आणि संततिनियमनाचा प्रचारच नव्हे तर प्रत्यक्ष कामही केले. त्या अर्थाने ते दोघे समाजसेवक आहेत. र. धों. चे दुसरे बंधू दिनकर धोंडो कर्वे आणि त्यांच्या पत्नी इरावती कर्वे यांचे स्त्रियांच्या उन्नतीचे काम प्रसिद्ध नाही.

पुढे वाचा

मालकी हक्क आणि गुलामगिरी

व्यक्तिस्वातंत्र्यामुळे दुस-याला इजा होतां नये, हे जर सगळेच कबूत करतात, तर मतभेद कां व्हावा? मतभेद येथेच होतो की दुसरयाचे हक्क काय आणि त्यांचे नुकसान झाले असे केव्हा म्हणायचे? सनातनी आपल्या भावना दुखावल्याचं ढोंग करतात, पण त्यांच्या भावना कोणी दुखावतां नये असा हक्क त्यांना कोठून आला? त्यांच्या वागणुकीने आमच्या भावना दुखावतात, म्हणून काय आम्ही त्यांना शिक्षा करावी असे थोडेच म्हणतों? ते आपल्या समजुतीप्रमाणे वागतात, त्यांना विचार करता येत नाही, वागोत बिचारे. प्रत्येक व्यक्तीचे हक्क काय हे एकदा ठरलें म्हणजे स्वातंत्र्याच्या मर्यादा समंजस लोकांच्या दृष्टीने आपोआपच ठरल्या.

पुढे वाचा

जातिव्यवस्था आणि नीरद चौधरी

एवढ्यातच, निधन झालेल्या सुप्रसिद्ध लेखक व इतिहासकार नीरद सी. चौधरी यांच्या “दि कॉन्टिनन्ट ऑफ सर्सी” या ग्रंथाबद्दल मला एक कुतूहल वाटते.
संदर्भ आहे, हिंदूंच्या जातिव्यवस्थेचा. हा मुद्दा चावून चोथा झालेला आहे, हे मान्य आहे. पण त्याचे महत्त्व वा अस्तित्व अजूनही कायम असल्याने, त्यावर पुन्हापुन्हा बोलले-लिहिले जाते. नव्या सहस्रकाच्या उदयाला जेमतेम एक वर्ष बाकी आहे. सा-या जगाचे स्वरूप इंटरनेटसारख्या साधनांनी बदलून गेले आहे. पण हिंदू लोक अद्यापही कालबाह्य झालेली जातिव्यवस्था मानतात आणि आपली मानसिकता बदलायला तयार नाहीत, हे सत्य आहे. त्यातच, नीरद चौधरीसारख्यांनी जातिव्यवस्थेची केलेली भलावण वाचून माझ्यासारख्या जिज्ञासू पण अल्पवुद्धी माणसाला गोंधळल्यासारखे होते.

पुढे वाचा

एकविसावे शतक : बायोगॅस तंत्रज्ञानासमोरील आव्हाने

आपल्या देशामध्ये वायोगॅस तंत्रज्ञानाच्या मोठ्या प्रमाणावरील प्रसारकार्याला साधारणपणे २० वर्षांचा इतिहास आहे. या २० वर्षांमध्ये एकीकडे बायोगॅस तंत्रज्ञानाने, ग्रामीण भागामध्ये विकेंद्रित व पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून योग्य, अशा पद्धतीने ऊर्जेची व खताची समस्या सोडविण्यामध्ये एक नवा आशावाद जागविला असला, तरी दुसरीकडे गावोगावी उभारलेल्या बायोगॅस-संयंत्रापैकी अनेक संयंत्रे बंद असल्यामुळे त्या त्या ठिकाणी गावकऱ्यांमध्ये तंत्रज्ञानासंबंधी उदासीनता आली आहे व काही ठिकाणी “बायोगॅस संयंत्रे चालू शकत नाहीत, हे तंत्रज्ञान कुचकामी आहे” अशा प्रकारचा नकारात्मक दृष्टिकोन तयार झाला आहे. या वीस वर्षांच्या इतिहासामधून आपण धडा शिकलो नाही व तंत्रज्ञानाच्या भविष्यकालीन अंमलबजावणीमध्ये आपण योग्य ती सुधारणा केली नाही तर या कार्यक्रमामध्ये आज जे मरगळलेले वातावरण तयार झाले आहे ते दूर होणार नाही.

पुढे वाचा

हे प्रभो विभो, अगाध किति तव करणी!

(१) धरणीकंपासारख्या प्रसंगीही महात्मा गांधीसारखे वकील ईश्वराचा चांगुलपणा सिद्ध करू पाहतात. त्याहून ताण युक्तिवाद एका कॅथॉलिक धर्मगुरूने केला. तो असा-कॅनडामधील माँट्रील शहरी एकदा एका सिनेमागृहाला आग लागली. तो खेळ मुद्दाम शाळेतील लहान मुलांसाठी होता. त्या आगीत सुमारे शंभर मुले जळून मेली. ती रोमन कॅथॉलिक पंथाच्या फ्रेंच लोकांची होती ईश्वराच्या दयाळूपणाचा हा विचित्र प्रकार ईश्वराला कमीपणा आणणारा होता. पण धर्मगुरू वस्ताद होते. त्यांनी असे पुकारले की शहरात पाप वाढल्यामुळे ईश्वराने लोकांना शिक्षा करण्याकरिता असा सूड घेतला. एकाने याहीपेक्षा जास्त कुशलतेने ईश्वराच्या दयाळू पणाचा खुलासा केला की, स्वर्गात देवदूत कमी झाले होते आणि ईश्वराला आणखी देवदूतांची गरज होती.

पुढे वाचा

थॉमस जेफर्सनचे वंशज

क्रोमोसोमवरच्या डि.एन.ए.ची चाचणी करून वंशावळ ठरवता येते हे सिद्ध झाले तेव्हा काही वादग्रस्त, रहस्यमय व सामाजिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे प्रश्न सुटतील असा संभव निर्माण झाला.

अश्या चाचणीने, “थॉमस जेफर्सन व सॅली हेमिंग्स ही त्यांची गुलाम स्त्री (स्लेव्ह) यांना मूल झाले होते काय” ह्या वादग्रस्त प्रश्नाला आता उत्तर मिळाले.
जेफर्सन हे जिवंत होते तेव्हाच त्यांच्या लैंगिक संबंधांबद्दल टीकेला सुरवात झाली होती. जेम्स् कॅलेंडर या बातमीदाराने, “थॉमस जेफर्सन ह्यांचे स्वतःच्या स्लेव्हशी संबंध आहेत” अशी वार्ता प्रसिद्ध केली होती.

अनेक इतिहासकारांनी त्यानंतर या विषयावर उलटसुलट मत नोंदविणारी पुस्तके लिहिली.

पुढे वाचा

विवेकाची गोठी

संपादक, आजचा सुधारक, यांस
स. न. वि. वि. मी मूळचा पुण्याचा आहे. त्या काळात अनेक विद्वानांची भाषणे सहजगत्या ऐकावयास मिळाली. त्या वेळेचे विद्वान अटीतटीने वाद करीत.
आपल्याला कोणी मारील” अशी भीती त्यांना वाटत नसे. माझा पिंड अशा वातावरणांत तयार झाला.
आज विद्वान एकमेकांना खूप संभाळून घेतात. त्यामुळे सामान्य वाचकांना संभ्रम पडतो नक्की काय? निर्जीव वस्तूला नमस्कार करणे कितपत योग्यं आहे? आगरकर व टिळक ह्यांत कोणाची भूमिका जास्त योग्य? गोडसेवद्दलचे नाटक दाखवावे का? अरुण गवळी व वाळ ठाकरे ह्यांत फरक कोणता?
पूर्वीचे विद्वान खाजगी प्रश्नांना उत्तरे देत.

पुढे वाचा

सुखाचा दर्जा केवळ मानीव (?)

‘कांही विशिष्ट प्रकारच्या शरीरसुखांना लोक उच्च कां मानतात आणि इतर प्रकारांना नीच कां मानतात . . . . संगीताने होणारा आनंद उच्च प्रकारचा मानण्याची पद्धत आहे, पण एखादा आवडीचा पदार्थ खातांना होणारा आनंद कमी दर्जाचा मानतात. असे कां? सुख शरीराच्या एका विशिष्ट भागाला होते असे मानले, किंवा सर्व प्रकारच्या संवेदनांचे स्थान मेंदूतच आहे असे मानले, तरी या दोन प्रकारांत किंवा इतर प्रकारांत उच्चनीच भाव कां असावा? शरीरसुखासंबंधी आणखी विचार केला तर त्यांत पुष्कळच गंमती दिसतात. वेळीं अवेळीं उपास करणे हा धर्मबाजीत एक विशेष सद्गुण समजतात आणि गांधींनी तर जरा कोठे खुट झाले की उपास करायची फॅशनच पाडली आहे.

पुढे वाचा