फलज्योतिषाचे दोन प्रकार आहेत. पहिल्या प्रकारच्या फलज्योतिषातले ग्रह सुबुद्ध असतात व त्यांना फलज्योतिषाचे नियम ठाऊक असतात. दुसऱ्या प्रकारच्या फलज्योतिषाला आकाशातल्या ग्रहांची गरज नसते. ग्रहांची नावे तेवढी त्यात वापरलेली असतात! माझे हे विधान वाचकांना चमत्कारिक वाटेल, पण ते अक्षरशः खरे आहे हे मी सिद्ध करणार आहे.
वादापुरती मान्य अशी गृहीतके
(१) ग्रहांचे फलज्योतिषीय प्रभाव पृथ्वीच्या संपूर्ण पृष्ठभागावर सतत पडत असतात. ग्रहांचे प्रकाश-किरण मात्र फक्त अर्ध्या भागावरच पडत असतात हे लक्षात ठेवावे. (२) प्रत्येक ग्रहाच्या प्रभावात १२ घटक समाविष्ट असतात. (३) प्रत्येक घटक कुंडलीतल्या एकेका स्थानाशी निगडित असतो, व (४) कुंडलीच्या स्थानाचे फल त्या घटकामुळे मिळते.