“… प्रत्येक देशांत त्या देशाच्या उच्च संस्कृतीची वाहक अशी जी अॅरिस्टॉक्रसी पाहिजे, तशी तयार होण्यास त्या समाजामध्ये स्त्री-पुरुषसंबंध देखील खुला पाहिजे. कारण ज्या समाजांत हा खुला संबंध असतो तो समाज अधिक आकर्षक होतो आणि त्यामुळे त्या समाजांत शिरावे अशी इतरांस इच्छा उत्पन्न होते. “अॅरिस्टाक्रसी’ होऊ इच्छिणा-या समाजाने केवळ लखोटबंद राहून उपयोगी नाहीं तर इतरांना आपणांत समाविष्ट होण्याची संधि दिली पाहिजे आणि आपल्या वर्गात समाविष्ट होण्याची इतरांची इच्छा जिवंत ठेविली पाहिजे. ब्राह्मणांत शिरावे अशी ब्राह्मणेतरांची इच्छा असल्यास त्यांस संधि द्यावी. ब्राह्मण समाज अधिकाधिक आकर्षक करावा व त्या समाजामध्ये इतर जातींतील चांगल्या व्यक्तींना येण्यास संधि मिळावी.
विषय «इतर»
श्री. श्याम कुलकर्णी ह्यांच्या पत्राच्या निमित्ताने निसर्गावर विजय मिळविणे हा विज्ञानाचा हेतु नाही
आमचे मित्र श्री. श्याम कुलकर्णी ह्यांचे अनेक दिवसांनतर एक पत्र आले आहे. ते शब्दशः खाली देत आहोत. त्यांच्या पत्राच्या निमित्ताने विवेकवादाच्या काही पैलूंवर पुन्हा
आणि थोडा अधिक स्पष्ट प्रकाश आम्हाला टाकता येईल अशी आशा आहे.]
नियति नव्हे तर दैवगती
‘पुन्हा एकदा नियतिवाद’ या सप्टेंबर १९९८ च्या ‘आजचा सुधारक’ मधील लेखात नियति हा शब्द अयोग्य आहे असे लेखकाचे मत असल्यास त्यास दैवगती हा शब्द वापरता येईल परंतु विश्वातील सर्व घटना नियमबद्ध आहेत असेही म्हणता येत नाही. विज्ञान हे पूर्णपणे नियमबद्ध आहे असे आपण समजतो तरी सर्व वैज्ञानिक सिद्धान्त आदर्श अटी पूर्ण झाल्यासच सिद्ध होतात व त्या आदर्श अटी पूर्ण करणे बरेच वेळा अशक्य कोटीतील असते.
पृथ्वीचा कॅन्सर
जमीन, हवा, पाणी या जड पदार्थांसह व विविध प्राणी, वनस्पती, एकपेशीय जीव, यांसह, आपली पृथ्वी हाच एक सजीव पदार्थ आहे ही कल्पना किंवा उपमा आता सर्वमान्य ठरत आहे. या पृथ्वीवरील सर्वच सजीव व निर्जीव घटक एकमेकांवर अवलंबून असतात, एकमेकांवर परिणाम करतात हे आता कोठे आपल्याला समजू लागले आहे. सजीव सृष्टीच्या आगमनापूर्वी पृथ्वीच्या वातावरणात प्राणवायु अजिबात नव्हता, व कबनडायॉक्साइड भरपूर होता. सजीव वनस्पतींनी सूर्यप्रकाश व क्लोरोफिल यांच्या साहाय्याने त्यातील ब-याचशा कार्बनडायॉक्साइडचे रूपांतर प्राणवायू व कार्बन ह्यांमध्ये करून टाकले व वातावरणात प्राणवायूचे प्रमाण जवळपास एकपंचमांश इतके झाले.
एक सर्वेक्षण
औद्योगिकीकरण, तंत्रज्ञानाची प्रगती, भांडवली अर्थव्यवस्थेचा रेटा यांमुळे उत्पादनांच्या साधनांचे ध्रुवीकरण झाले असून या आर्थिक चक्रात माणसे अधिकाधिक गुरफटत आहेत, त्यांची कुटुंबे भरडली जात आहेत असे मानून त्याच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसांचे जीवनमान कसे आहे, जगण्याची पद्धत कशी आहे, हे शोधण्याचा प्रयत्न चिं. मो. पंडित यांनी केला आहे.
त्यासाठी त्यांनी एक सर्वेक्षण करावयाचे ठरवले असून त्यासाठीची प्रश्नावली खाली देण्यात आली आहे. वाचकांनी सर्वेक्षणाची ही प्रश्नावली भरून चिं. मो. पंडित यांना पाठवावी ही विनंती. – सं.
दुस-या महायुद्धानंतर जगभर स्वातंत्र्याची आणि समाजवादी लोकशाहीची एक लाटच आली.
पाळणाघरे, अपप्रवृत्ती कशी?
आजचा सुधारकच्या डिसेंबर ९८ च्या अंकात (९:९, २७६-२७८), पाळणाघरांची वाढ : एक अपप्रवृत्ती’ हा स्फुट लेख प्रसिद्ध झाला असून, त्यामध्ये याच विषयावर सप्टेंबर १९९८ च्या अंकातील स्फुट लेखावरील वाचकांच्या प्रतिक्रियांना संपादकांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्या ताज्या स्फुटात कोणताही नवा मुद्दा अथवा विचार आलेला नाही. या विषयावरील संपादकांची भूमिका अवास्तव, असंतुलित व काहीशी दुराग्रही आहे असे खेदाने म्हणावे लागते. या विषयावरील चालू चर्चेत आम्ही खालील मुद्दे मांडू इच्छितो.
(१) महागाई फार झाली आहे, हा या वर्षीचा नैमित्तिक अपवाद वगळता, म्हणणे खरे नाही.
स्फुट लेख- हजाराची नोट
‘काही वर्षांपूर्वीपर्यंत चालू असलेल्या मध्यंतरी बंद केलेल्या हजाराच्या नोटा पुन्हा सुरू करण्यात आल्या’ अशी बातमी अलिकडेच वाचली. हे काम फार पूर्वीच व्हायला हवे होते. दुसरे महायुद्ध सुरू असताना त्यावेळच्या सरकारला गरज वाटल्यावरून एक रुपयाच्या नोटा प्रसृत करण्यात आल्या आणि चलनवाढीला ख-या अर्थाने सुरुवात झाली. पहिले महायुद्ध सुरू झाले त्यावेळी बाजारातून कवड्या, गंडे, टोल्या यांचे उच्चाटन झाले आणि दुस-या महायुद्धानंतर चांदीची नाणी चलनातून हद्दपार झाली.
खाजगी मालकी जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत पैशांची गरज पडणारच. पैशाचे स्वरूप मात्र बदलत जाणार आणि धातूच्या नाण्यांच्या ऐवजी किंवा नोटांच्या ऐवजी नुसताच आकडा या खात्यावरून त्या खात्यात हिंडणार.
नागवणुकीचे धार्मिक तंत्र
गुलामगिरी, पुरोहितशाही, वसाहती, साम्राज्यशाही व भांडवलशाही हे ऐतिहासिक अनुक्रमाप्रमाणे मानवांनी मानवांच्या केलेल्या नागवणुकीचे चार प्रकार इतिहासास ओळखीचे आहेत. यांत गुलामगिरी व वसाहती साम्राज्यशाही निदान प्रथमावस्थेत तरी पाशवी बळावरच आधारलेल्या असतात. लोकशाही जन्मास येण्याच्यापूर्वीच भांडवलशाही अस्तित्वात आल्याकारणाने, भांडवलशाही व शासनसत्ता या दोघांची प्रेरकशक्ती एकाच वर्गात एकवटली होती असे चित्र कालपरवापर्यंत नजरेस पडत असे. इतरांच्या मानाने पुरोहिती नागवणुकीच्या तंत्राची वाटचाल जरा निराळी आहे. धर्म आणि पुरोहित या संस्थांचा उगम प्राचीन मानवाला अदृष्ट शक्तीबद्दल वाटणारे भय आणि पूज्यबुद्धी ह्यांत असतो. यामुळे जी नागवणूक इतर क्षेत्रांत बहुतांशी पाशवी शिरजोरीवर चालत असते ती धार्मिक क्षेत्रात मानसिक शिरजोरीवरच पुरोहितवर्गास साधावी लागते.
विवेकवाद्याच्या नजरेतून आध्यात्मिक शिक्षण
भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासूनच ते शिक्षणपद्धतीत किंवा त्याच्या आशयात फरक करणार अशी चिह्न दिसत होती. उत्तर प्रदेशात कल्याणसिंग यांच्या सरकारने त्या दिशेने काही पावले पूर्वी टाकली होती. शिक्षणविषयक धोरण ठरविणे हे कोणत्याही एका पक्षाचे कामच नव्हे. राजकीय पक्षांचा अधिकार ज्यावर चालणार नाही अशा एखाद्या स्वायत्त मंडळाकडे हा विषय सोपविण्यात आला पाहिजे. राज्य कोणत्याही पक्षाचे असो, शिक्षणाच्या धोरणात बदल करून चालणार नाही असे देशाने ठरविले पाहिजे. नाहीतर दहा-पंधरा दिवसांसाठी एखाद्या पक्षाचे सरकार येणार आणि ते धोरण बदलणार ! भाषेतील व्याकरणाचे नियम जसे पुन्हा पुन्हा बदलता येत नाहीत, त्याप्रमाणे शिक्षणाचे धोरणसुद्धा राज्यकर्त्या पक्षाच्या लहरीवर सोडता येत नाही.
ऐसी कळवळ्याची जाती विरोध असुनी कायम भक्ती
यदुनाथ थत्ते यांचे कुमारसाहित्य मी पौगंडावस्थेत वाचले. त्या वयात प्रभाव टाकणारया साने गुरुजी, खांडेकर यांचे साहित्य आवडावे असा तो काळ होता. याच परिवारातले यदुनाथ थत्ते हे नाव त्यांच्या लेखनामुळे लक्षात राहिले. त्या काळी मी कुमार साहित्य-चळवळीत भाग घेत होतो; राष्ट्रीय वृत्तीच्या कुमार लेखकांच्या चळवळीकडे माझा ओढा होता. त्यामुळे त्याच प्रकारचे साहित्य अधिक वाचले जायचे. यदुनाथजींचे नाव माझ्या लक्षात राहिले ते याच संदर्भात. विशेषतः त्यांचे ‘‘पुढे व्हा’ हे पुस्तक त्या वयात मला फार परिणामकारक वाटले. त्या वयातील कुमारांना या पुस्तकाने उमलत्या अवस्थेतच त्यांच्या आयुष्याचे प्रयोजन मिळवून दिले.
दि ग्रेट इंडियन मिडल-क्लास : लेखक : पवन वर्मा (३)
ह्यानंतरच्या भागात वर्मा नैतिकतेच्या अभावामुळे निर्माण झालेल्या सामाजिक तणावाचा मागोवा घेतात. नक्षलवादी चळवळीचा उदय आणि अस्त, जयप्रकाश नारायणांची नवनिर्माण चळवळ, १९७४ चा इंदिरा गांधींनी चिरडून टाकलेला देशव्यापी रेल्वे-संप आणि लगेच पोखरणला केलेली भूमिगत अणुचाचणी आणि सरतेशेवटी आणीबाणी. ह्या सर्व घटनांमधून वर्मा मध्यमवर्गाच्या मनोवृत्तीचे फार चांगले विवरण करतात.
ह्या मनोवृत्तीला ख-या अर्थाने धक्का बसला १९९० मध्ये जेव्हा व्ही.पी. सिंग ह्यांनी मंडल कमिशनच्या अहवालाची अंमलबजावणी करण्याची योजना जाहीर केली. या घटनेमुळे एक आर्थिक-सामाजिक प्रक्रिया वेगाने पूर्णत्वाला पोचण्याची शक्यता निर्माण झाली.. वर्मा म्हणतात, हरित क्रांतीमुळे आणि टेनन्सी कायद्यांमुळे सुस्थितीत आलेले ग्रामीण भागातील कनिष्ठ जातीपैकी काही वर्ग मध्यमवर्गाजवळच्या केकवर हक्क सांगू लागले.