महाराष्ट्रातल्या एकूण सर्व रहिवाशापैकी २०% लोक सोडले तर बाकीचे ८०% लोक कोणत्या ना कोणत्या निमित्ताने शासकीय मदतीला कमीअधिक प्रमाणात पात्र ठरत असावे.
जे मदतीला पात्र ठरत नाहीत त्यांच्यापैकी अर्धे म्हणजे एकूण लोकसंख्येच्या अंदाजे १०% लोक असे साहाय्य घेणे नामुष्कीचे वाटून त्यासाठी जात बदलणार नाहीत अशी आशा आहे. म्हणजे दाखला मागण्यातल्या, मिळविण्यातल्या अडचणी पार करून जास्तीत जास्त १०% लोक त्या सवलतींसाठी लायक नसताना सवलती मागतील असा अंदाज करता येतो.
आपल्याला ह्या जातींच्या गुंत्यातून बाहेर पडावयाचे असेल तर त्यासाठी दोन उपाय आम्हाला सुचतात.
विषय «इतर»
खेड्यांतली शाळा कशी असावी?
खेड्यांतला मुख्य धंदा शेतकी. तेव्हां कुणबी हा खेड्यांतला प्रधान घटक आणि कुणब्यासाठी इतर हे नाते लक्षात आणून खेड्यापाड्यांनी शाळा काढल्या पाहिजेत. शेतकामाच्या हंगामास धरून शाळेचे तास व सुट्या असाव्यात. शेतकाम नसेल अशा दिवसांत शाळा दुवक्त असावी, ते बेताचे असेल त्या वेळी एकवक्त आणि त्याचा भर असेल त्यावेळी विद्यार्थी शिकविलेलें न बोळवतील इतक्या बेताने म्हणजे सुमारे एक दोन तास शाळा भरावी. शाळेत शारीरिक बळवृद्धीला महत्त्व दिले पाहिजे; आणि अभ्यासक्रम इतकाच असावा कीं, शिकणाराला बाजारांत अडचण पडू नये, सावकाराशीं तोंड देतां यावे आणि आपल्या धंद्याचे ज्ञान वाढवतां यावे; पाहिलेली व ऐकलेली वस्तु व हकीगत मजकूर जुळवून सांगतां व लिहितां येणे, उजळणी, देशी चालीची कोष्टके, (ज्याला परदेशी कोष्टकांचे कारण पडेल तीं तो जरूरीप्रमाणे पुढे शिकेल.)
अमेरिकेतील शिक्षकसंघ: सामर्थ्य आणि संघर्ष
आज अमेरिकेत शिक्षकांच्या हक्कांसाठी झगडणारे व शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्नशील असलेले नॅशनल एज्युकेशनल असोसिएशन (एन्.ई.ए.) व अमेरिकन फेडरेशन ऑफ टीचर्स (ए.एफ.टी.) असे दोन संघ आहेत. गेल्या ३० वर्षांपासून ह्या दोन संघटना कुत्र्या-मांजरांसारख्या उघडपणे मांडत आहेत. दरवर्षी ह्या संघटनांचे प्रतिनिधी आपल्या वार्षिक संमेलनात एक संघटनेच्या मागणीचा प्रस्तावही मांडतात. पण दोन्ही संघटनांचे प्रतिनिधी तो बहुमतांनी फेटाळून लावतात. हा तमाशा अनेक वर्षांपासून अमेरिकन जनतेला फुकटात पाहावयास मिळतो. ह्या वर्षी जुलै महिन्यात दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींनी बहुमताने एकीकरणाचा ठराव पुन्हा एकदा बहुमतांनी नामंजूर केला.
ह्या दोन्ही संघटनांची सभासद-संख्या जवळजवळ ३० लाख आहे.
दि ग्रेट इंडियन मिडल-क्लास : लेखक : पवन वर्मा (१)
भारतातील मध्यम-वर्गाचा हा संशोधनपूर्वक अभ्यास पवन वर्मानी अतिशय प्रभावीपणे आणि आश्चर्यकारक पोटतिडकेने सादर केला आहे. इतिहासाचे आणि कायद्याचे पदवीधर असलेले वर्मा भारतीय विदेशसेवेत एक अधिकारी आहेत. राष्ट्रपतींचे प्रेस सेक्रेटरी म्हणून आणि इतर अनेक जबाबदारीच्या अधिकारपदांवर त्यांनी काम केले आहे आणि सध्या ते विदेश कार्यालयाचे अधिकृत प्रतिनिधी, प्रवक्ते (spokesman) आहेत.
ह्या आधीची वर्माची पुस्तके वेगळ्या प्रकारची आहेत. उदा. Krishna: The Playful Divine; Ghalib: The Man, the Times; Mansions at Dusk – The Havelis of old Delhi (with Raghu Rai) वगैरे. ह्या पुस्तकांवरून त्यांचा उर्दू काव्याचा, पौराणिक वाङ्मयाचा आणि इतिहासाचा अभ्यास लक्षात येतो.
नीती आणि समाज
अनेक व्यक्ती एकत्र राहतात तेव्हा समाज तयार होतो. व्यक्तींचे समूहात राहणे सुखकर व्हावे, समाज-जीवन सुरळीत चालावे व समाजाची प्रगत व्हावी यासाठी व्यक्तींनी आपल्या वर्तनावर काही बंधने घालून घेणे आवश्यक असते. किंवा दुस-या शब्दांत, समाजाने, व्यक्तीने कसे वागावे यासाठी, काही मार्गदर्शक नियम घालून द्यावे लागतात व ते नियम पाळले जातील यासाठी प्रयत्न करावा लागतो.
बहुतेक सर्व मानवी समाजांमध्ये आजतागायत ‘धर्म’ मार्गदर्शक नियम घालून देत असे. पण त्यातील अनेक त्रुटी लक्षात आल्यामुळे आता बहुतेक विचारी व्यक्ती धर्माची जागा ‘नीती’ ने घ्यावी असे मानू व बोलू लागल्या आहेत.
करा आणि शिका
बहुतेक शाळांमध्ये विज्ञान हा विषय फक्त व्याख्यानांच्या रूपात शिकविला जातो. शिक्षकांनी व्याख्यान द्यावे आणि मुलांनी ते ऐकावे हीच पद्धत वापरली जाते. प्रयोगातून विज्ञान क्वचितच शिकविले जाते. आणि ज्या थोड्या शाळांत प्रयोग केले जातात तेही फक्त शिक्षकाने तीस चाळीस (किंवा जास्तच) मुलांना एकदा करून दाखवायचे आणि सर्वांनी ते पाहायचे असा प्रकार असतो. विद्यार्थ्यांना स्वतः प्रयोग करून पहाता येत नाहीत. वर्गातील विद्यार्थी संख्या, विज्ञान-तासिकेत असणारा वेळ, वर्षातील सुट्यांची संख्या हे सर्व पाहता उत्साही शिक्षकालाही फारसे वेगळे करता येत असेल असे वाटत नाही. अशा नीरस पद्धतीमुळे मुलांमध्ये विज्ञानाविषयी गोडी निर्माण होणे कठीणच.
पेशवाईअखेरची खानदेशातील जनस्थिति
अगदी साध्या गोष्टीतसुद्धा खरे काय आहे, हे लोकांच्या तोंडून काढून घेण्यास यातायात पडते. लौकर दाद मिळविण्याच्या आशेने ते नेहमी राईचा पर्वत करितात. लांचलुचपती व एकमेकांशी अन्यायाचे वर्तन ह्यांचे प्रमाण इतके वाढले होते की ते सांगू गेल्यास कोणी खरेसुद्धा मानणार नाही. धाकटे घराण्यात अवश्य तितकी धूर्तता आणि रोकड मात्र पाहिजे, की त्याने वडील घराण्याच्या तोंडाला पाने पुसून त्याची मालमत्ता सरकारांतून आपल्याकडे ओढलीच समजा. ह्यामुळे जिकडे-तिकडे गृहकलहाचा वणवा पेटून सरकारी दसरांतसुद्धा बनावट दस्तैवज घुसले, आणि अस्सल खरे दस्तैवज मिळविण्यासाठी मारामारी व ठोकाठोकी माजून राहिली.
पुन्हा एकदा नियतिवाद
‘नियति’ म्हणजे केव्हा काय घडणार आहे हे पूर्वीपासूनच ठरलेले आहे असे प्रतिपादणारे मत. हे मत ज्याला Determinism म्हणतात त्यासारखे आहे असे वाटते, पण ते त्याहून वेगळे आहे. नियति म्हणजे जिला इंग्रजीत ‘Fate’ हे नाव आहे ती गोष्ट. नियतिवाद म्हणजे fatalism, या मतानुसार केव्हाही काय घडणार आहे ते पूर्ण तपशिलासह अनादि काळापासून पूर्वनिश्चित आहे. नियतीचे दुसरे नाव आहे भवितव्यता.
या मताहून Determinism भिन्न आहे. त्याला नियतिवाद या नावाऐवजी नियमबद्धतावाद हे नाव अधिक अन्वर्थक होईल. आपल्या सबंध जगाचे मार्गक्रमण अनेक नियमांनी बद्ध असे असून ते सर्व नियम शेवटी कारणाच्या नियमातून उद्भवले आहेत असे
आपण सामान्यपणे मानतो.
‘ग्लोबलायझेशन’वर उतारा
(१) स्वराज्याचा शोध
कोणत्याही प्रकारची राजेशाही, हुकूमशाही किंवा एकाधिकारशाही नको ही गोष्ट जवळपास सर्वमान्य आहे. लोकप्रतिनिधींच्या संसदीय लोकशाही राज्यव्यवस्थेकडून खूप अपेक्षा बाळगल्या गेल्या, पण अनुभवाअंती भ्रमनिरास होत आहे. आजपासून सुमारे ९० वर्षापूर्वीच ज्याला हे स्पष्टपणे उमगले होते असा एक द्रष्टा माणूस आम्हाला १९०९ साली लिहिलेल्या हिंद-स्वराज्य या छोट्याशा पुस्तिकेतून इशारा देत होता, पण आम्ही त्यालाच वेडा ठरविले. त्याने व अनेक हुतात्म्यांनी ताणलेल्या स्वातंत्र्यांदोलनाच्या कातडीवर संसदीय लोकशाहीच्या शहाणपणाचे नगारे आम्ही बडवीत बसलो व फसलो.
हिंद-स्वराज्य मध्ये ‘इंग्लंडची स्थिती’ या शीर्षकाचे एक प्रकरण आहे.
… आजचा जर्मनी
[आ. सु. च्या ऑगस्ट ९८ च्या अंकात एका जर्मन विचारवंताने स्वतःच्या देशबांधवांना कसे खडसावले त्याचे वर्णन आहे. डेव्हिड हॅल्बरस्टॅम या अमेरिकन वार्ताहर-साहित्यिकाच्या “द नेक्स्ट सेंचुरी” (विल्यम मॉरो, १९९१) या ग्रंथातील जर्मनीसंबंधी एक उतारा या देशाबाबत आणखीही काही माहिती पुरवतो त्याचा हा अनुवाद. संदर्भ आहे, ‘सोविएत युनियनच्या फुटीनंतरचे जग’.]
या सगळ्या बदलांचा, सोविएत युनियन फुटल्याने निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा जर कोणत्या देशाला मिळायचाच असेल, तर तो जर्मनीला मिळेल. इतरांप्रमाणे मलाही वाटते की जर्मनांची शिस्त, त्यांची आर्थिक ‘ऊर्जा’, त्यांच्या अर्थव्यवहाराचे अग्रक्रम, या सा-यांमुळे ते शक्तीची आणि गतिमानतेची नवी उंची गाठतील.