अलीकडे नवीन आर्थिक सुधारणांबाबत खूप चर्चा होत आहे. उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण व परकीय भांडवल गुंतवणूक ही या आर्थिक सुधारणांची मुख्य सूत्रे आहेत. भारताने हे नवे आर्थिक धोरण १९९१ पासून स्वीकारले आहे. भारताप्रमाणेच इतर ब-याच विकसनशील देशांत या धोरणाचा अवलंब केलेला आहे. त्यामुळे हे देश विकसित संपन्न देशांकडून जास्तीत जास्त भांडवल (जास्तीत जास्त परकीय चलन) कसे मिळवावे यांबाबत
आटोकाट प्रयत्न करीत आहेत. वस्तूंची निर्यात वाढवून परकीय चलन मिळविण्याचा रूढ मार्ग सगळे देशच वापरतात. पण गेल्या २५/३० वर्षांत पुष्कळ देशांनी आपले परकीय चलन वाढविण्यासाठी पर्यटन-व्यवसायाचा विकास व विस्तार करण्याचे धोरण ठेवले आहे पण ब-याच ठिकाणी पर्यटन विकासाच्या निमित्ताने बरीच लहान मुले (विशेषत: मुली) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात आणून ती भाड्याने देणे किंवा विकणे असे लांच्छनास्पद प्रकार घडत आहेत.
विषय «इतर»
स्वप्न
“मी मनोराज्यात ज्या स्थितीची इच्छा करीत होते ती मला प्रत्यक्षात प्राप्त झाली. बहुरूप्याची अनेक रूपे धारण करून त्यात जी जी कामे मी केली तसे आपल्या राज्यात नियम केले –
१. सुरतेच्या लोकांना अन्न-वस्त्र-व्यापारासाठी नियम केले.
२. हत्यारांचा कायदा रद्द केला. वारली-कोळी-भिल्ल यांना हत्यारे बक्षिसे म्हणून दिली. गुरांना आधार म्हणून गोशाळा बांधल्या. मुलांसाठी रमणीय गृहे व शाळा बांधल्या. मुलांना वयाच्या चार वर्षांपासून शिक्षण-स्वच्छता शिकवली. अभ्यासक्रमात फेरफार केले. (मुले म्हणजे मुलगे व मुली दोन्ही समजावयाचे).
३. सगळे चालू कर बंद केले. सोन्याचे नाणे चालू केले.
समाजस्वास्थ्य
‘…. असेच एक विद्वान ‘मन्वंतर’ मासिकात देशभक्तीच्या गोष्टी लिहीत असतात आणि बूटपाटलूण पाहिली की त्यांच्या पायाची तिडीक पुस्तकाला जाते. का ? कारण बूटपाटलूण हा राज्यकर्त्यांचा वेश आहे. पण त्यांच्या एक साधी गोष्ट लक्षात येत नाही, की देशभक्ती वेशावर अवलंबत नाही. हा त्यांचा न्यूनगंड आहे. शिवाजीच्या गोष्टी सांगताना त्यांच्या हे लक्षात राहत नाही की शिवाजीनेही राज्यकर्त्यांचाच वेश उचलला होता, असे त्याच्या चित्रावरून दिसते. तेव्हा राज्यकत्र्याचा वेश घेण्यात त्याला काही कमीपणा वाटत होता असे दिसत नाही. आणि स्वतंत्र राष्ट्रातले लोक देखील परक्या रीतिभाती उचलीत नाहीत असे थोडेच आहे ?
बरट्रॅंड रसेल, जॉन एकल्स आणि अतीत
या टिपणाचा उद्देश प्रा. रसेल आणि प्रा. एकल्स या सुविख्यात, स्वतःच्या क्षेत्रात उच्च दचि वैज्ञानिक म्हणून मान्यता पावलेल्या दोन तत्त्वचिंतकांचे अतीताविषयी (transcendence) काय विचार होते हे समजून घेण्याचा आहे.
हा लेख वाचण्यासाठी पार्श्वभूमि म्हणून रसेल यांच्या चरित्राचा संक्षिप्त आलेख लक्षात घेणे योग्य होईल. त्यांचे जीवन १८७२ ते १९७० या काळातले म्हणजे १९ व्या शतकाच्या शेवटापासून तो जवळजवळ २० व्या शतकाच्या अखेरीपर्यंत. इतक्या दीर्घकाळात जगातील अनेक महत्त्वपूर्ण घटना त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाच्या क्षेत्रात आल्या. त्यात पहिले जागतिक महायुद्ध आणि विज्ञानातील भरीव, लक्षणीय प्रगती या मुख्य घटना.
माध्यमिक शिक्षणसंस्थांपुढील आह्वान
माध्यमिक शिक्षणक्षेत्रात शिकवणीवर्गाचे वाढते प्रस्थ याविषयी बरीच उलटसुलट चर्चा प्रसारमाध्यमांतून होत असते. सामान्य पालकवर्गास आपल्या पाल्यास शिकवणी लावणे हे एक अप्रिय परंतु आवश्यक कर्तव्य वाटू लागले आहे. मोठ्या महानगरांपासून तर अगदी तालुक्याच्या गावांपर्यंत सर्वत्रच शाळांबरोबरच लहानमोठे शिकवणी वर्गही उत्तम व्यवसाय करीत आहेत. पूर्वी, म्हणजे ३०-४० वर्षांपूर्वी काही मोजकेच सुखवस्तु पालक आपल्या मुलांना शाळेतील नाणावलेल्या शिक्षकांच्या घरी शिकण्यासाठी पाठवीत असत. त्यामध्ये परीक्षेत अधिक गुण मिळावेत या ऐवजी विद्यार्थ्याचा विषय पक्का व्हावा हीच अपेक्षा महत्त्वाची असे. परंतु हे साधे, सरळ समीकरण गेल्या अर्धशतकात पार बदलून गेले असून, आता केवळ परीक्षेत अधिक गुण मिळावेत याच एकमेव उद्देशाने शिकवणी लावली जाते, कारण बोर्डाच्या
परीक्षेत उत्तम गुण मिळविल्याखेरीज आयुष्यातील उत्कर्ष शक्य होत नाही.
रक्तदान व एडस् ह्यांविषयी शासकीय धोरण
रक्तदात्यांना त्यांच्या रक्त-तपासणीत दोष सापडल्यास तसे कळवावे की नाही याबद्दल वृत्तपत्रांत सध्या चर्चा चालू आहे. त्याबद्दल निर्णय घेण्यापूर्वी या प्रश्नाची व्याप्ती समजून घेतली पाहिजे. नमुन्यादाखल कोल्हापूर शहराचा विचार करू. कोल्हापूर शहरामध्ये गेल्या वर्षी २५,००० जणांनी स्वेच्छेने (त्याबद्दल आर्थिक मोबदला न घेता) रक्तदान केले. त्यापैकी ५% म्हणजे १२५० जणांचे रक्त एडस् व्हायरस युक्त, १०% म्हणजे २५०० जणांचे रक्त हिपॅटायटिस बी (एक प्रकारच्या काविळीने युक्त) व १% म्हणजे २५० जणांचे रक्त व्हीडीआरएल पॉझिटिव्ह म्हणजे गुप्तरोग युक्त निघाले. काही जणांच्या रक्तात दोन किंवा तीनही दोष निघाले पण या ४००० व्यक्तीपैकी एकालाही, “तुला असा रोग आहे व तू उपचार करून घे, किंवा तुझ्यापासून इतरांना हा आजार होऊ नये यासाठी काळजी घे” असे सांगितले जात नाही.
कायदे कशासाठी? (श्रीमती प्रतिभा रानडे ह्यांच्या पत्राच्या निमित्ताने)
श्रीमती प्रतिभा रानडे ह्यांनी माझ्या लेखांच्या उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात ‘कायदे करावयाचे ते समाजातील कमकुवत, अन्याय सोसाव्या लागणा-यांचे हितसंबंध जपण्यासाठीच असे म्हटले आहे त्याच्याशी कोणीही सहमत होईल. ज्या समाजाची सर्वांगीण आणि निकोप वाढ झालेली नाही तेथे बळी तो कान पिळी अशी स्थिती दिसते. कायद्याचे राज्य निर्माण करणे म्हणजे अन्याय करणा-यांना आवर घालणे, हे मान्यच आहे.
वरील वाक्याच्या अगोदर त्या जे म्हणतात त्याच्याशी मात्र मतभेद आहे. त्या म्हणतात, ‘…आपला समाज हा एका विशिष्ट पातळीपर्यंत सुसंस्कृत, बुद्धिमान, न्यायअन्यायाची चाड असलेला, स्वतःच्या स्वातंत्र्याची अपेक्षा ठेवतानाच दुस-याच्या स्वातंत्र्याचाही मान ठेवणारा वगैरे आहे असे (मोहनी) गृहीत धरीत आहेत असे दिसते.
ताहेरभाई पूनावालांचे अभीष्टचिंतन
… आज मी नास्तिक आहे. पूर्वी जच्या यात्रेला गेलो होतो. काबाच्या मशिदीत तेथल्या धर्मपंडिताने माझ्याकडून काही गोष्टी वदवून घेतल्या, त्यांत ‘मी स्त्रीकडे पाहणार नाही’ अशी एक शर्त होती. मी चक्रावलो. हे कसे शक्य आहे ? माझा श्रद्धेवरचा विश्वास डळमळला. पुढे नाथवानी कमिशनच्या स्वागतपत्रांवर मी सही केली. वृत्तपत्रांतून ते पत्रक प्रसिद्ध झाले. परिणाम काय झाला?
‘… माझ्या दुकानात शिरल्याबरोबर इमानी नोकरांनी सांगितले. सोमवारपासून आम्ही कामावर येणार नाही. बोहरा धर्मगुरू सय्यदनांच्या वतीने बहिष्काराचा फतवा निघाला आहे. जवळच्या नातेवाईकांनीही अगदी जन्मदात्री आई, भावंडे यांनीसुद्धा बहिष्कार सुरू केला.
मागे वळून पाहता
आजचा सुधारकचा हा अंक आठव्या वर्षाचा शेवटचा अंक. या अंकाने आजचा सुधारकने आठ वर्षे पुरी केली आहेत. या आठ वर्षांत त्याने काय काय काम केले याकडे नजर टाकणे पुढील प्रवासाच्या दृष्टीने महत्त्वाचे होईल असे वाटते. म्हणून हे सिंहावलोकनआणि वाचकांशी हितगूज.
आठ वर्षांपूर्वी जेव्हा एप्रिल १९९० मध्ये आजचा सुधारक चा जन्म झाला तेव्हा त्याच्या अस्तित्वाच्या समर्थनासाठी काही गोष्टी नमूद केल्या होत्या. त्यावेळी आपले सामाजिक जीवन अतिशय असमाधानकारक अवस्थेत आहे असे आमच्या लक्षात आले होते. अनेक दुष्ट रूढी आणि प्रवृत्ती जीवनात अनिबंध्रपणे थैमान घालत होत्या.
जगावेगळं नातं ‘एकत्वाचं’
दूरवर बिहारमधील राजगीर परिसरातील पहाडांच्या पायथ्याशी पिलखी निवासात मिणमिणत्या दिव्यांनी दिवाळी प्रकाशली होती. सारा परिसर आनंदित होता.
प्रत्येक कुटुंब ही एक संस्था असते. तिच्यातील समाधान, प्रेम, जिव्हाळा, सुख, शांती हीच एक शक्ती बनते. त्याच शक्तीतून स्नेहाचा परिघ विस्तारत जातो. आणि मग व्यक्तिगत कुटुंबाचे विश्वकुटुंब बनते. सहजतेने समाजाशी वेगळेच स्नेहपूर्ण नाते जुळते.
असेच घडत गेले! आजपर्यंत… पण आता?माझी मैत्रीण उषा शरण सांगत होती.
‘आयुष्यात कधी-कधी अचानक अशा काही घटना घडतात की ज्यांचा अर्थ लावणं मानवी शक्तीच्या आवाक्यातलं राहत नाही.’
बिहारचे मेजर शरण व नागपूरची उषा मोहनी एकत्र का आले व आज अचानक का दुरावले, ह्याला उत्तर नाही.