वैज्ञानिक तत्त्वांबद्दल एक समज असतो, की ती सर्वच वैज्ञानिकांना मान्य असतात. ती ‘निर्विवाद’ असतात. हे आपल्याला स्वाभाविक, नैसर्गिक वाटते, कारण आपण ऐकलेले असते की विज्ञानाची एक कठोर, तर्ककर्कश शिस्त आहे. कोणतीही सुचलेली कल्पना वैज्ञानिकांना प्रयोगांमधून तपासावी लागते आणि अशा तपासातून ती कल्पना खरी ठरली तरच ती ‘वैज्ञानिक तत्त्व’ म्हणून मान्य होते. आता प्रयोग, तपास, खरे ठरणे, या क्रमाने ‘सिद्ध झालेल्या गोष्टीबद्दल वाद असेलच कसा?
गंमत म्हणजे ही विज्ञानाच्या निर्विवाद असण्याची बाब फार सामान्य पातळीवरच्या विज्ञानाबाबतच खरी आहे. पाणी किती तापमानाला उकळते, यावर प्रयोग करून ते तापमान कोणते, हे सिद्ध करणे तसे सोपे असते.
विषय «इतर»
पर्यटन-व्यवसायातील एक अपप्रवृत्ती : बालवेश्या
अलीकडे नवीन आर्थिक सुधारणांबाबत खूप चर्चा होत आहे. उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण व परकीय भांडवल गुंतवणूक ही या आर्थिक सुधारणांची मुख्य सूत्रे आहेत. भारताने हे नवे आर्थिक धोरण १९९१ पासून स्वीकारले आहे. भारताप्रमाणेच इतर ब-याच विकसनशील देशांत या धोरणाचा अवलंब केलेला आहे. त्यामुळे हे देश विकसित संपन्न देशांकडून जास्तीत जास्त भांडवल (जास्तीत जास्त परकीय चलन) कसे मिळवावे यांबाबत
आटोकाट प्रयत्न करीत आहेत. वस्तूंची निर्यात वाढवून परकीय चलन मिळविण्याचा रूढ मार्ग सगळे देशच वापरतात. पण गेल्या २५/३० वर्षांत पुष्कळ देशांनी आपले परकीय चलन वाढविण्यासाठी पर्यटन-व्यवसायाचा विकास व विस्तार करण्याचे धोरण ठेवले आहे पण ब-याच ठिकाणी पर्यटन विकासाच्या निमित्ताने बरीच लहान मुले (विशेषत: मुली) राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात आणून ती भाड्याने देणे किंवा विकणे असे लांच्छनास्पद प्रकार घडत आहेत.
रोजगार हमी योजना (रोहयो)
रोजगार हमी योजना सुरू झाल्याला जवळ-जवळ पंचवीस वर्षे होऊन गेली. त्यामुळे ह्याबाबत पुनर्विचार करणे फार महत्त्वाचे झाले आहे. रोहयोचे महत्त्व जाणूनच जगभर ह्या योजनेचे मूल्यमापन झाले व त्यात काही दोष असले तर ते काढून टाकून ही योजना राबवावी असा एक सूर होता. अर्थात बदलत्या राजकीय परिस्थितीत कोठल्याही विधायक कार्याची उपेक्षा होते आहे त्यात रोहयोचीही झाली आहे असे वाटल्यास आश्चर्याचे कारण नाही. कोठला कार्यक्रम आजच्या परिस्थितीत जोमाने उभा राहू शकेल ? परंतु गरिबी हटविणे व ग्रामीण लोकांचा लोंढा नागरी भागात जाऊन अनागोंदी न माजु देणे ह्या दोनही गोष्टींसाठी रोहयोचा उपयोग करवून घेणे शक्य होते.
पुस्तक-परिचय : एकविसाव्या शतकाची तयारी (भाग १)
Preparing for the Twentyirst Century हे पॉल केनेडी या अमेरिकेतील येल विद्यापीठातील इतिहासाच्या प्राध्यापकाचे अतिशय लक्षणीय आणि महत्त्वाचे पुस्तक १९९३ साली प्रकाशित झाले. त्यात एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मानवजातीपुढे कोणत्या समस्या वाढून ठेवल्या आहेत, कोणती भयस्थाने आणि कोणती आशास्थाने तिच्यापुढे उभी राहणार आहेत, यांचे अत्यंत विचारप्रवर्तक आणि समर्थ विवेचन लेखकाने केले आहे. लेखक अतिशय विद्वान असून आपल्या विषयात निष्णात आहे. पुस्तकातील विषयाशी संबद्ध शेकडो ग्रंथ, जन्ममृत्यूची कोष्टके, जगात होत असलेले संपत्तीचे उत्पादन आणि तिचा उपभोग याविषयीचे तक्ते (charts) पुस्तकात सर्वत्र विखुरलेले आहेत.
समाजस्वास्थ्य
‘…. असेच एक विद्वान ‘मन्वंतर’ मासिकात देशभक्तीच्या गोष्टी लिहीत असतात आणि बूटपाटलूण पाहिली की त्यांच्या पायाची तिडीक पुस्तकाला जाते. का ? कारण बूटपाटलूण हा राज्यकर्त्यांचा वेश आहे. पण त्यांच्या एक साधी गोष्ट लक्षात येत नाही, की देशभक्ती वेशावर अवलंबत नाही. हा त्यांचा न्यूनगंड आहे. शिवाजीच्या गोष्टी सांगताना त्यांच्या हे लक्षात राहत नाही की शिवाजीनेही राज्यकर्त्यांचाच वेश उचलला होता, असे त्याच्या चित्रावरून दिसते. तेव्हा राज्यकत्र्याचा वेश घेण्यात त्याला काही कमीपणा वाटत होता असे दिसत नाही. आणि स्वतंत्र राष्ट्रातले लोक देखील परक्या रीतिभाती उचलीत नाहीत असे थोडेच आहे ?
बरट्रॅंड रसेल, जॉन एकल्स आणि अतीत
या टिपणाचा उद्देश प्रा. रसेल आणि प्रा. एकल्स या सुविख्यात, स्वतःच्या क्षेत्रात उच्च दचि वैज्ञानिक म्हणून मान्यता पावलेल्या दोन तत्त्वचिंतकांचे अतीताविषयी (transcendence) काय विचार होते हे समजून घेण्याचा आहे.
हा लेख वाचण्यासाठी पार्श्वभूमि म्हणून रसेल यांच्या चरित्राचा संक्षिप्त आलेख लक्षात घेणे योग्य होईल. त्यांचे जीवन १८७२ ते १९७० या काळातले म्हणजे १९ व्या शतकाच्या शेवटापासून तो जवळजवळ २० व्या शतकाच्या अखेरीपर्यंत. इतक्या दीर्घकाळात जगातील अनेक महत्त्वपूर्ण घटना त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवाच्या क्षेत्रात आल्या. त्यात पहिले जागतिक महायुद्ध आणि विज्ञानातील भरीव, लक्षणीय प्रगती या मुख्य घटना.
माध्यमिक शिक्षणसंस्थांपुढील आह्वान
माध्यमिक शिक्षणक्षेत्रात शिकवणीवर्गाचे वाढते प्रस्थ याविषयी बरीच उलटसुलट चर्चा प्रसारमाध्यमांतून होत असते. सामान्य पालकवर्गास आपल्या पाल्यास शिकवणी लावणे हे एक अप्रिय परंतु आवश्यक कर्तव्य वाटू लागले आहे. मोठ्या महानगरांपासून तर अगदी तालुक्याच्या गावांपर्यंत सर्वत्रच शाळांबरोबरच लहानमोठे शिकवणी वर्गही उत्तम व्यवसाय करीत आहेत. पूर्वी, म्हणजे ३०-४० वर्षांपूर्वी काही मोजकेच सुखवस्तु पालक आपल्या मुलांना शाळेतील नाणावलेल्या शिक्षकांच्या घरी शिकण्यासाठी पाठवीत असत. त्यामध्ये परीक्षेत अधिक गुण मिळावेत या ऐवजी विद्यार्थ्याचा विषय पक्का व्हावा हीच अपेक्षा महत्त्वाची असे. परंतु हे साधे, सरळ समीकरण गेल्या अर्धशतकात पार बदलून गेले असून, आता केवळ परीक्षेत अधिक गुण मिळावेत याच एकमेव उद्देशाने शिकवणी लावली जाते, कारण बोर्डाच्या
परीक्षेत उत्तम गुण मिळविल्याखेरीज आयुष्यातील उत्कर्ष शक्य होत नाही.
रक्तदान व एडस् ह्यांविषयी शासकीय धोरण
रक्तदात्यांना त्यांच्या रक्त-तपासणीत दोष सापडल्यास तसे कळवावे की नाही याबद्दल वृत्तपत्रांत सध्या चर्चा चालू आहे. त्याबद्दल निर्णय घेण्यापूर्वी या प्रश्नाची व्याप्ती समजून घेतली पाहिजे. नमुन्यादाखल कोल्हापूर शहराचा विचार करू. कोल्हापूर शहरामध्ये गेल्या वर्षी २५,००० जणांनी स्वेच्छेने (त्याबद्दल आर्थिक मोबदला न घेता) रक्तदान केले. त्यापैकी ५% म्हणजे १२५० जणांचे रक्त एडस् व्हायरस युक्त, १०% म्हणजे २५०० जणांचे रक्त हिपॅटायटिस बी (एक प्रकारच्या काविळीने युक्त) व १% म्हणजे २५० जणांचे रक्त व्हीडीआरएल पॉझिटिव्ह म्हणजे गुप्तरोग युक्त निघाले. काही जणांच्या रक्तात दोन किंवा तीनही दोष निघाले पण या ४००० व्यक्तीपैकी एकालाही, “तुला असा रोग आहे व तू उपचार करून घे, किंवा तुझ्यापासून इतरांना हा आजार होऊ नये यासाठी काळजी घे” असे सांगितले जात नाही.
कायदे कशासाठी? (श्रीमती प्रतिभा रानडे ह्यांच्या पत्राच्या निमित्ताने)
श्रीमती प्रतिभा रानडे ह्यांनी माझ्या लेखांच्या उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात ‘कायदे करावयाचे ते समाजातील कमकुवत, अन्याय सोसाव्या लागणा-यांचे हितसंबंध जपण्यासाठीच असे म्हटले आहे त्याच्याशी कोणीही सहमत होईल. ज्या समाजाची सर्वांगीण आणि निकोप वाढ झालेली नाही तेथे बळी तो कान पिळी अशी स्थिती दिसते. कायद्याचे राज्य निर्माण करणे म्हणजे अन्याय करणा-यांना आवर घालणे, हे मान्यच आहे.
वरील वाक्याच्या अगोदर त्या जे म्हणतात त्याच्याशी मात्र मतभेद आहे. त्या म्हणतात, ‘…आपला समाज हा एका विशिष्ट पातळीपर्यंत सुसंस्कृत, बुद्धिमान, न्यायअन्यायाची चाड असलेला, स्वतःच्या स्वातंत्र्याची अपेक्षा ठेवतानाच दुस-याच्या स्वातंत्र्याचाही मान ठेवणारा वगैरे आहे असे (मोहनी) गृहीत धरीत आहेत असे दिसते.
ताहेरभाई पूनावालांचे अभीष्टचिंतन
… आज मी नास्तिक आहे. पूर्वी जच्या यात्रेला गेलो होतो. काबाच्या मशिदीत तेथल्या धर्मपंडिताने माझ्याकडून काही गोष्टी वदवून घेतल्या, त्यांत ‘मी स्त्रीकडे पाहणार नाही’ अशी एक शर्त होती. मी चक्रावलो. हे कसे शक्य आहे ? माझा श्रद्धेवरचा विश्वास डळमळला. पुढे नाथवानी कमिशनच्या स्वागतपत्रांवर मी सही केली. वृत्तपत्रांतून ते पत्रक प्रसिद्ध झाले. परिणाम काय झाला?
‘… माझ्या दुकानात शिरल्याबरोबर इमानी नोकरांनी सांगितले. सोमवारपासून आम्ही कामावर येणार नाही. बोहरा धर्मगुरू सय्यदनांच्या वतीने बहिष्काराचा फतवा निघाला आहे. जवळच्या नातेवाईकांनीही अगदी जन्मदात्री आई, भावंडे यांनीसुद्धा बहिष्कार सुरू केला.