विषय «इतर»

ईश्वरावरील श्रद्धा आवश्यक?

आम्हाला नांदेडचे श्री सुभंत रहाटे यांचे पुढे दिलेले पत्र आले आहे.
प्रा. दि. य. देशपांडे
देव असो वा नसो, देवावर विश्वास ही कित्येकांची मानसिक गरज असते. आपल्या दुःखाचे व काळजीचे ओझे देवाच्या डोक्यावर टाकले की आपला भार हलका होतो. देवावर श्रद्धा असणारा माणूस ऐहिक अडचणींनी खचून जात नाही. मानसिक ताण कमी करण्यापुरते देवाचे अस्तित्व कबूल करणे आवश्यक बनते, अशी एक मांडणी केली जाते. या मांडणीत ग्राह्यांश नाही का? विवेकवाद्यांचे या प्रतिपादनाला काय उत्तर आहे?
सुभंत रहाटे
रोहिणी सदन, कैलासनगर
वर उल्लेखिलेले मत फार मोठ्या प्रमाणावर व्यक्त केले जाते.

पुढे वाचा

अतीतवाद, विवेकवाद व विज्ञान

मे १९९४ च्या आजचा सुधारक च्या अंकात प्रा. मे. पुं. रेगे यांनी सातारा येथील संमेलनात केलेल्या अध्यक्षीय भाषणाच्या संदर्भात प्रा. दि. य. देशपांडे यांचा “अतीत व विवेकवाद” हा व प्रा. प्र. ब. कुळकर्णी यांचा “प्रा. रेग्यांची अतीतवादी मीमांसा’ हे दोन विचारप्रवर्तक लेख आले आहेत. यात प्रा. कुळकर्णी यांनी विज्ञानाविषयी बरीच स्पष्ट विधाने केली आहेत. प्रा. देशपांडे यांचा लेख वाचताना शीघ्र संदर्भ म्हणून उपयोगी पडावा हा प्रा. कुळकर्णी यांच्या लेखाचा उद्देश आहे. प्रा. रेग्यांचे संपूर्ण भाषण व वरील दोन लेख वाचल्यानंतर वैज्ञानिक दृष्टिकोनातून आलेले काही विचार मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

पुढे वाचा

पर्यावरणवादाचा अन्वयार्थ

(१)
मानव-निसर्ग संबंधाच्या अभ्यासाचा इतिहास जुना असला तरी पर्यावरणवादाचा विकास ही अलीकडच्या काळातील घटना आहे. निसर्गातील काही घटकांचे माहात्म्य मानवाने बर्यावच आधीपासून जाणले होते. निसर्गातील विविध घटकांची त्याच्या सुखकर जीवनासाठी आवश्यकता त्याला समाजजीवनाच्या सुरुवातीपासूनच प्राथमिक स्वरूपात का होईना ज्ञात होती. असे असले तरी या संबंधाच्या आणि या अभ्यासाच्या मुळाशी एकीकडे मानव व दुसरीकडे उरलेला निसर्ग असा मानवसापेक्ष दृष्टिकोन होता. सुरुवातीला निसर्गातील उर्वरित घटकांच्या तुलनेत माणसाचे अस्तित्व नगण्यच होते. मानवासकट सर्वघटकांची एक व्यवस्था म्हणजे पर्यावरण ही मानवनिरपेक्ष संकल्पना अलीकडली आहे.
ह्या संकल्पनेचा विकास अपरिहार्यपणे आधुनिक वैज्ञानिक प्रगतीशी निगडित आहे.

पुढे वाचा

चर्चा- श्रीरामकृष्ण परमहंस आणि साक्षात्कार

जून ९४ च्या आजचा सुधारकमध्ये प्रसिद्ध झालेल्या माझ्या वरील विषयावरील लेखावर आक्षेप घेणारे श्री. न. ब. पाटील यांचे पत्र संपादकांनी माझ्या अवलोकनास पाठविले आहे. या पत्रातील सर्वच मजकूर अपेक्षित वळणावरच आहे. ज्यांची साक्षात्कारावर श्रद्धा आहे, त्यांच्यावर माझ्या विवेचनाचा काही परिणाम होईल अशी अपेक्षा मी केली नाही. कारण श्रद्धा ही मुळात पुराव्यावर आधारलेली नसते, त्यामुळे विरुद्ध पुराव्याने ती नष्ट होण्याचा संभव नसतो. श्री. पाटील यांच्या सात पानी पत्रात श्रीरामकृष्णांचे साक्षात्कारी समजले गेलेले वर्तन मिर्गीच्या व्याधिताचे होते हे त्यांच्याच आईबापांचे व डॉक्टरांचे निदान चूक होते असे दाखवणारी कोणतीच तथ्ये मांडली नाहीत.

पुढे वाचा

समान नागरी कायदा आणि शरीयत

न्यायमूर्ती हरिनाथ तिलहरी यांनी दि. १२ एप्रिल ९४ रोजी तलाकबाबत जो निकाल दिला त्याचे उलट सुलट पडसाद संपूर्ण मुस्लिम समाजात उमटत असून पूर्वीच्या शहाबानो प्रकरणाप्रमाणेच हे प्रकरणही गाजणार अशी चिन्हे दिसत आहेत. पुरोगामी विचारवंत श्री. असगरअली इंजीनीअर यांनी निकालाचे स्वागत केले असून सय्यद
शहाबुद्दीन व अन्य मुस्लिम विचारवंतांनी टीका केली आहे.
न्यायालयासमोर मूळ प्रश्न तलाकचा नसून जमिनीचा होता. जो प्रश्न मुळातच न्यायालयासमोर नाही त्यावर निकाल देण्याचा न्यायमूर्ती तिलहरी यांना अधिकार नाही; हा निकाल म्हणजे इस्लामी शरीयतला आव्हान आहे; मुस्लिम व्यक्तिगत कायद्यात हस्तक्षेपआहे, इत्यादि मते मुस्लिम विचारवंतांनी व्यक्त केली आहेत.

पुढे वाचा

चर्चा- साक्षात्कार आणि विवेकवाद

जून १९९४ च्या अंकातील डॉ. नी. र. व-हाडपांडे यांचा ‘श्रीरामकृष्ण परमहंस आणि साक्षात्कार’ हा लेख वाचला. रामकृष्णांच्या उपलब्ध माहितीवरून साक्षात्काराचे अस्तित्व सिद्ध होते काय, हा या लेखाचा विषय आहे. ते तसे सिद्ध होत नाही या निष्कर्षाप्रत लेखक आलेला आहे. या निष्कर्षाप्रत येण्यासाठी लेखकाने, नाटकातील शिवाची भूमिका करतानाचा रामकृष्णांचा भावावेश, वेषांतर करून एका घरंदाज कुटुंबातील अंतःपुरात त्यांचे जाणे, विवेकानंदांची व त्यांची भेट, रामकृष्णांना होणारी कालीची दर्शने, रामकृष्णांची इस्लामची व येशूची उपासना, मंदिरात प्रापंचिक गोष्टींचा विचार मनात आणल्याबद्दल राणी रासमणीला मारलेली थप्पड ह्या घटनांचा आधार घेतला आहे.

पुढे वाचा

चर्चा- साक्षात्कार आणि विवेकवाद १

जून १९९४ च्या आजचा सुधारकमध्ये श्री. नी. र. व-हाडपांडे यांचा ‘श्रीरामकृष्ण परमहंस आणि साक्षात्कार’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यावर अनेक अंगांनी प्रतिक्रिया व्यक्त करणे आवश्यक आहे. एक मनोविकारतज्ज्ञ म्हणून त्यातील वैद्यकीय व मानसशास्त्रीय प्रतिपादनावर मत नमूद करावेसे वाटते. हे मत मांडताना श्रीरामकृष्णांबाबत श्री. व-हाडपांडे यांच्या लेखात दिलेली माहितीच मी विचारात घेत आहे. त्यांचे लिखाण त्यांचेच मुद्दे सिद्ध करण्यास अपुरे आणि सदोष वाटते.
मिर्गीच्या व्याधीमुळे होणारे भास
(१) श्री. वऱ्हा डपांडे यांच्या मते श्रीरामकृष्ण परमहंसाना होणारे देवीचे दर्शन व ‘भावानुभूती’ हा मिर्गीचाच प्रकार होता.

पुढे वाचा

इतर

जून १९९४ च्या आजचा सुधारकमध्ये श्री. नी. र. व-हाडपांडे यांचा ‘श्रीरामकृष्ण परमहंस आणि साक्षात्कार’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यावर अनेक अंगांनी प्रतिक्रिया व्यक्त करणे आवश्यक आहे. एक मनोविकारतज्ज्ञ म्हणून त्यातील वैद्यकीय व मानसशास्त्रीय प्रतिपादनावर मत नमूद करावेसे वाटते. हे मत मांडताना श्रीरामकृष्णांबाबत श्री. व-हाडपांडे यांच्या लेखात दिलेली माहितीच मी विचारात घेत आहे. त्यांचे लिखाण त्यांचेच मुद्दे सिद्ध करण्यास अपुरे आणि सदोष वाटते.
मिर्गीच्या व्याधीमुळे होणारे भास
(१) श्री. वऱ्हा डपांडे यांच्या मते श्रीरामकृष्ण परमहंसाना होणारे देवीचे दर्शन व ‘भावानुभूती’ हा मिर्गीचाच प्रकार होता.

पुढे वाचा

मनु घसरला आहेच

मनुस्मृतीवर टीका करणारी मंडळी मनुद्वेषाच्या विकृतीने पछाडलेली असल्यामुळे, मनूवर “सकारण व अकारण मनूला झोडपण्याचे पुरोगामी व्रत आचरीत असतात, असा आरोप श्री. जोशी यांनी केलेला आहे. या टीकाकारांना स्वतःला ग्रंथ समजण्याची क्षमता नसते असेही विधान ते करतात. (त्यांच्या लेखांतील शेवटचा परिच्छेद पाहावा.) मनूला “सकारण झोडपले तर त्याचा राग श्री जोशी यांना का यावा ते समजत नाही.“अकारण” झोडपले तर त्यांना राग यावा हे समजण्यासारखे आहे. मनूला अकारण झोडपण्यात येते असे श्री जोशी यांचे मत त्यांच्यासारख्या परंपराप्रिय लोकांचे आहे. परंपराप्रिय नसलेल्या लोकांना तसे वाटत नाही, आणि हेच वादाचे मूळ आहे.

पुढे वाचा

इतर

मे १९९४ च्या ‘आजचा सुधारक’च्या अंकात श्री. के. रा. जोशी यांचा संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ’ हा किंचित लेख प्रसिद्ध केला आहे. कदाचित जोशी यांनी मनू किंवा भृगू यांचे आडनाव जोशीच होतेअसा संदर्भ लावला तरी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
‘धारणाद्धर्म इत्याहुः’ या वचनाच्या संदर्भात जोशींना असेच म्हणायचे आहे की जे आचरण समाजधारणेची क्रिया करीत असेल तोच धर्म होय. असा धर्म याचा अर्थ होतो. पुढे जोशी म्हणतात ‘धारणाद्धर्म इत्याहुः’ ही धर्मसंस्थापक श्रीकृष्णांनी दिलेली व्याख्या लक्षात घेतली की धर्मचर्चा–सर्व समाजाला व्यापून असणार्याइ धर्मासंबंधीची चर्चा – ही प्राधान्याने ऐहिक सुस्थितीविषयी विचार करते हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट जाणवते.

पुढे वाचा