Why is some Jat teenager in Meerut reading Jane Austen ? Why does a place like Meerut have a course in English at all ? Only because the Prem Kishens of the country need a place where they can teach rubbish?
– English, August Upamanyu Chatterjee
भारतात इंग्रजीचे स्थान काय असावे यासंबंधी आजवर बरेच लिहून झाले आहे. बरीच उलट-सुलट चर्चाही झाली आहे. तेव्हा परत या विषयाकडे कोणी का वळावे असा प्रश्न मनात स्वाभाविकच उभा राहू शकतो. त्याचे समाधानकारक उत्तर देणे कठीण आहे.
विषय «इतर»
वृत्त आणि विवेक
एन्.टी. रामाराव यांचे लग्न ही मोठीच खबर आहे. राष्ट्रीय आघाडी आणि तेलगू देसम् या राजकीय पक्षांचे अध्यक्ष, आंध्राचे माजी मुख्यमंत्री असे हे बडे प्रस्थ आणि मुख्य म्हणजे त्यांचे (जवळपास ‘अवघे पाऊणशे वयमानं’. असे असताना त्यांनी ३६ वर्षाच्या घटस्फोटिता लक्ष्मी शिवपार्वती या आपल्या चरित्र – लेखिकेशी दुसरे लग्न केले आहे. सदान्कदा भगवे कपडे परिधान करून स्वामी विवेकानंदांची मधून मधून आठवण द्यायला ते विसरत नसत. या प्रौढा- वृद्धविवाहाने त्यांची प्रतिमा आणि निवडणुकीच्या मोसमात मते खेचण्याचे सामर्थ्य यावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि याची त्यांना जाणीव नसेल असे कोण म्हणेल ?
पत्रव्यवहार
संपादक,आजचा सुधारक यांस स.न.वि.वि. आपल्या मासिकाच्या ऑगस्ट १९९३ च्या अंकात श्री. शांतिलाल मुथ्था ह्यांचा ‘समाजातील मुलींची घटती संख्या: कारणमीमांसा व उपाययोजना’ ह्या शीर्षकाचा लेख व त्यावरील श्री. दिवाकर मोहनी ह्यांचे भाष्य वाचावयास मिळाले. श्री. मुथ्था ह्यांची चिंता सार्थ आहे व त्यांनी केलेली कारणमीमांसा व सुचविलेली उपाययोजनाही बुद्धीला पटणारी आहे. पण श्री. मोहनींनी ह्या संदर्भात व्यक्त केलेले विचार मात्र तर्कसंगत वाटले नाहीत.
मूळ प्रश्नाचा विचार करणे व त्यावर उपाय कोणते करावेत ह्याचा शोध घेणे सोडून, श्री. मोहनी ‘पुरुषांकडून स्त्रियांची होणारी छेडखानी’ ह्या विषयाकडे वळले आहेत.
नागपूरपासून दूर – मागे, मागे
सध्याची पंचायत समिती, ‘राष्ट्रीय विस्तार योजना’ या दुर्बोध नावाने जन्माला आली. चारपाच वर्षांत तिचेच ‘सामूहिक विकास योजना’ असे नामांतर झाले. आणि तिला सध्याचे नामरूप येऊनही आता तीस वर्षे उलटली आहेत. या विकास योजनेत मी उमेदीची सहासात वर्षे घालवलेली. मधूनच जुने सोबती भेटतात. कुणी मोठ्या पदापर्यंत पोचलेले असतात. असेच एकदा जोशी भेटले. मी उत्सुकतेने विचारले, ‘खेड्यांचे चित्र आता पार पालटले असेल नाही ?’ माझा आशावाद पाहून म्हणाले, ‘मेड इन इंडिया वाचली का ? आपल्या अकोल्याच्या पुरुषोत्तम बोरकरची ती कादंबरी वाचा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील.’
पत्रव्यवहार
श्री. संपादक, आजचा सुधारक, यांना स.न. वि मुस्लिम समाजाचे मन वळवण्यासाठी म. गांधींनी अनुसरलेला मार्गच आजही आवश्यक आहे अशी श्री. पळशीकरांची श्रद्धा आहे. ऑगस्ट १९९३ अंक, पृष्ठ १३७ वर त्यांनी काहीशा डौलाने प्रश्न विचारला आहे की, “सनातन धर्माच्या कोणत्या तत्त्वानुसार मुस्लिम समाजाचे मन वळवण्याचे कोणते प्रयत्न झाले, त्या प्रयत्नांना अपयश का आले, व अपयशाची जबाबदारी सर्वस्वी मुस्लिम समाजावर कशी ?” या त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मी देत नाही, पण एक अवतरण देतो. नोव्हेंबर – डिसेंबर १९९२ अंक, पृष्ठ २६९, शेवटचा परिच्छेद यात श्री.
तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ७)
निगामी व्यवस्था (Deductive Systems)
इ.स. पूर्वी चौथ्या शतकात यूक्लिड या ग्रीक गणितज्ञाने भूमितीची मांडणी निगामी व्यवस्थेच्या रूपात केल्यापासून शास्त्रीय ज्ञानाच्या जगतात निगामी व्यवस्था हा ज्ञानाचा आदर्श मानला गेला आहे आणि तेव्हापासून तत्त्वज्ञ आणि वैज्ञानिक दोघांचीही आपल्या विषयाची मांडणी निगामी व्यवस्थेत करण्याची धडपड सुरू आहे. Deduction किंवा निगमन म्हणजे काय हे आपण स्थूलरूपाने पाहिले आहे. निगामी अनुमान म्हणजे असे अनुमान की ज्याची साधके (म्हणजे साधक विधाने किंवा premises) सत्य असल्यास त्याचा निष्कर्प असत्य असू शकत नाही. निगमन हा सत्यतासंरक्षक अनुमानप्रकार आहे; म्हणजे त्यात साधकांची सत्यता निष्कर्षापर्यंत सुरक्षितपणे पोचविली जाते.
धर्म व राजकारण: फारकतीचे उद्दिष्ट स्पष्ट हवे
धर्म आणि राजकारण यांची फारकत झाली पाहिजे, असे आपण गेली ४०-४५ वर्षे बोलत आलो आहोत. तरीही अशी फारकत आपण करू शकलेलो नाही. लोकसभेत नुकत्याच मांडण्यात आलेल्या विधेयकाने एका अर्थी आपण हीच वस्तुस्थिती मान्य केली आहे. या विधेयकाच्या निमित्ताने या विषयाची पुन्हा चर्चा सुरू झाली असली, तरी धार्मिक वृत्ती-प्रवृत्तींशी तडजोडी आणि मतांचे राजकारण करण्याची धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांची व त्यांच्या नेत्यांची जुनी परंपरा अजूनही अस्तित्वात आहे. त्याबरोबरच धर्माधिष्ठित समाजव्यवस्थेचे समर्थन करण्याची तथाकथित पुरोगामी विचारवंतांची प्रवृत्तीही अजून शाबूत असल्यामुळे, धर्म आणि राजकारण यांच्या फारकतीचा घोळ संपेल, असे वाटत नाही.
धारणाद्धर्म इत्याहुः।
आजचा सुधारक च्या ऑगस्ट १९९३ च्या अंकात उपरोक्त विषयावरील माझ्या आधीच्या लेखांवर टीका करणारा श्री वसंत पळशीकर यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यांनी आधीच्या सर्व अंकांतील तत्संबंधीचे सर्व लेख सलगपणे वाचून काढले; परंतु त्यांत त्यांना आक्षेप घेण्यासारखे बहुधा काही न आढळल्यामुळे वेगळ्या दिशेने मुद्दयाला भिडायला हवे असे त्यांनी ठरवून हा लेख लिहिलेला दिसतो.
. त्यांचा लेख वाचल्यानंतर मला असे दिसून आले की धर्मविषयक माझ्या प्रतिपादनाला त्यांची हरकत नाही; परंतु त्याबद्दलच्या तपशिलाचा आग्रह धरून ‘तत्त्व मान्य, तपशील अमान्य’ अशी व्यूहरचना करून माझ्या प्रतिपादनाला उखडून लावावयाचा प्रयत्न करावयाचा, असे हे त्यांचे वेगळ्या दिशेने मुद्दयाला भिडणे होय.
शास्त्रीयतेची प्रतिष्ठा फलज्योतिषाला मिळणे अशक्य आहे
सुधारकच्या वाचकवर्गापैकी कुणीही फलज्योतिपावर विश्वास ठेवणारे असतील असे मला वाटत नाही. माझ्या या लेखाचा हेतू कुणाचा भ्रमनिरास करण्याचा नाही. माझा हेतू असा आहे की फलज्योतिषात ज्या अंगभूत (built-in) अंतर्विसंगती आहेत त्यांची ओळख वाचकांना व्हावी.
फलज्योतिपावर आमचा विश्वास नाही ‘ असे म्हणणाऱ्यांना जर असा प्रश्न विचारला की, तुमचा विश्वास का नाही त्याची कारणे सांगाल का, तर अनेक प्रकारची उत्तरे ऐकायला मिळतील. त्यातली कित्येक उत्तरे गैरलागू असतात, कित्येक उत्तरे उथळ असतात, आणि काही तर अगदी चुकीची असतात. फलज्योतिषावरची लोकांची अंधश्रद्धा दूर व्हावी या हेतूने केलेल्या प्रचारात जर असे सदोप युक्तिवाद केलेले असले तर त्या प्रचाराचा परिणाम उलटाच होतो.
श्रुति-प्रामाण्य
श्रुति-प्रामाण्य
आपले पूर्वज अशा काही ऋषिमुनींनी जीव आणि जगताच्या बाबतीत–’हे कसे ? हेच सत्य, हीच चरमवाणी’ असे लिहून ठेवले आहे. यांना तुम्ही वाटल्यास वेद उपनिषद म्हणा, अथवा तपश्चर्येने समजून घेतलेल्या गोष्टी म्हणा किंवा देवांनीच हे सर्व कानात सांगितले असे म्हणा; मला मात्र एक संशय आहे. हे विश्व, ही चराचर सृष्टी यांच्याबाबतीत अल्पस्वरूप वाचनाने मी काही ज्ञान मिळविले आहे. जीवनाने या यात्रेला केव्हा आरंभ केला, ही जीवनयात्रा कुठे चालली आहे, प्रवासाला आरंभ केल्यावर बऱ्याच काळपर्यंत वाटेतील स्टेशनावर गाडीत चढणाऱ्या उतारूप्रमाणे माणूस नावाचा प्राणी आत प्रवेश करून काही वेळ बसून उतरूनही जातो, पण जीवनाचा प्रवास तर अजून पुढेच जात असतो.