विषय «इतर»

न्यायाधीश आणि अंधश्रद्धा

सर्वोच्च न्यायालयाचे आपल्या घटनेत विशेष स्थान आहे. आजकाल ज्या घटना घडत आहेत त्यामुळे तर त्या न्यायालयाबद्दलचा नागरिकांचा आदर अनेकपटींनी वाढला आहे व अपेक्षाही वाढल्या आहेत.
अशा वेळी या न्यायालयाचे पद भूषविणारे एक न्यायाधीश के. रामस्वामी यांनी नुकत्याच दिलेल्या एका निकालातील विधाने आश्चर्यजनक आहेत.
भूमिसंपादनाचे हे प्रकरण शिरडीच्या साईबाबा संस्थानचे. या संस्थानाला शिरडीचे साईबाबा मंदिर व द्वारकामाई मंदिर यांना जोडणार्या. रस्त्याकरिता बाजीराव कोते यांची जमीन व घर पाहिजे होते. खाजगी वाटाघाटी यशस्वी न झाल्यामुळे शासनाकरवी सार्वजनिक उपयोगाकरिता मालमत्ता संपादन करण्याची कारवाई सुरू झाली.

पुढे वाचा

हिंदुत्व -प्रा. आचार्यांच्या प्रश्नांना उत्तरे

‘हिंदुत्व एक अन्वेषण’ या लेखासंबंधी आजच्या सुधारकात, प्रश्न करणाच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध झाल्या आहेत. प्रा. आचार्यांनी ऐतिहासिक विधानांच्या सत्यासत्यतेसंबंधी प्रश्न उपस्थित केले आहेत. श्री. रिसबुडांनी या विषयाच्या अनुषंगाने आपली वैचारिक प्रतिक्रिया मांडलेली आहे. या दोन्ही विचारवंतांच्या प्रतिक्रिया मननीय आहेत. हिंदुत्वासंबंधी आमच्या विधानांना या विद्वानांचा फारसा आक्षेप असलेला दिसत नाही. तरीपण या विचारवंतांनी लेखनातील ज्या नेमक्या त्रुटी दाखविल्या आहेत त्या भरून काढण्यापूर्वी या लेखामागे असणारी आमची मनोभूमिका प्रदर्शित करणे आवश्यक वाटते. हिंदुत्व ही संकल्पना विशिष्ट गटापुरती का होईना रूढ झालेली आहे. ती नाकारण्यात अर्थ नाही.

पुढे वाचा

अंताजीची बखर’ : एक ऐतिहासिक कादंबरी,वेगळ्या दृष्टिकोणातून

अंताजीची बखर ही बखरीचा घाट दिलेली कादंबरी अर्थात् ही ऐतिहासिक कादंबरी आहे. तिच्यात खरा इतिहास आहेच, पण थोड्या वेगळ्या दृष्टिकोणातून पाहिलेला आहे. ही आगळी दृष्टी हेच या कादंबरीचे मुख्य वैशिष्ट्य. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे इतिहास मराठ्यांचाच पण प्रकाशझोत वेगळ्या क्षेत्रावर टाकला आहे. कादंबरीच्या अर्पणपत्रिकेचा उपयोग एखादा पताकास्थानासारखा करून लेखकाने आपल्या दृष्टिकोणाचा परिचय करून दिला आहे.
अर्पण पत्रिका म्हणते :
‘सर्वश्री रणजित देसाई, ना. सं. इनामदार, वासुदेव बेलवलकर, गो. नी. दांडेकर, ब. मो. पुरंदरे, वि. ना. हडप, नाथमाधव….. आणि हो…. जॉर्ज मॅकडॉनल्ड फ्रेञ्जर यांस हे लिखाण सादर, सप्रेम अर्पण’
१.

पुढे वाचा

हा मानवजातीचा इतिहास नव्हे!

ज्याला लोक इतिहास समजतात तो म्हणजे ईजिप्त, बॅबिलोनिया, इराण, मॅसिडोनिया आणि रोम इत्यादींच्या साम्राज्यांपासून थेट आपल्या काळापर्यंतचा इतिहास. ते त्याला मानवाचा इतिहास म्हणतात, पण त्यांना अभिप्रेत असलेली गोष्ट. (जी ते शाळेत शिकतात) म्हणजे राजकीय शक्तींचा इतिहास होय.
मानवाचा इतिहास नाही; मानवी जीवनाच्या विविध अंगांचे अनेक इतिहास तेवढे आहेत. आणि त्यांच्यापैकी एक राजकीय शक्तींचा इतिहास आहे. त्यालाच जगाचा इतिहास असे भारदस्त नाव दिले जाते. पण हे मानवाच्या कोणत्याही शिष्ट संकल्पनेचा अधिक्षेप करणारे आहे असे माझे मत आहे. पैशाच्या अफरातफरींचा, दरवडेखोरीचा किंवा विषप्रयोगाचा इतिहास मानवजातीचा इतिहास मानण्यासारखे ते आहे.

पुढे वाचा

वास्तवे आणि मूल्ये

निसर्ग किंवा इतिहास कोणीही आपण काय करावे हे शिकवू शकत नाही. नैसर्गिक किंवा ऐतिहासिक वास्तवे (facts) यांपैकी कोणीही आपले निर्णय घेऊ शकत नाही. आपण कोणती साध्ये स्वीकारणार आहोत हे ती सांगू शकत नाहीत. निसर्गात किंवा इतिहासात हेतू आणि अर्थ आपण घालतो. मनुष्ये समान नाहीत; परंतु समान हक्कांकरिता झगडायचे आपण ठरवू शकतो. राज्यासारख्या मानवी संस्था विवेकी नसतात; परंतु आपण त्यांना विवेकी करण्याकरिता लढा करण्याचे ठरवू शकतो. आपण आणि आपली साधारण भाषा सामान्यपणे विवेकी नसून भावनिक असते; पण आपण थोडे अधिक विवेकी होण्याचे ठरवू शकतो, आणि आपली भाषा आपले रोमांचवादी शिक्षणतज्ञ म्हणतात त्याप्रमाणे ‘आत्माविष्काराकरिता नव्हे, तर विवेकी संज्ञापनाकरिता (communication) वापरण्याचे स्वतःला शिकवू शकतो.

पुढे वाचा

महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचा अभ्यास

महाराष्ट्रातील विद्यापीठांत आणि महाविद्यालयांत तत्त्वज्ञानाचे जे अध्ययनअध्यापन सध्या चालू आहे त्याचे स्वरूप काय आहे? आणि त्याची अवस्था काय आहे?
वाचक विचारतील, काय झालं आहे तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाला? आमची तर सर्व काही आलबेल आहे अशी कल्पना आहे. तत्त्वज्ञानाचे उद्बोधनवर्ग (refresher courses) नेमाने होताहेत आणि त्यात सर्व प्राध्यापक न चुकता हजेरी लावताहेत. वर्षातून दहा-पाच तरी पीएच.डी. बाहेर पडत आहेत. सेमिनार्स, वर्कशॉप्स, समरस्कूल्स इ. दरवर्षी होताहेत. एकूण चित्र तर फारच आशादायी दिसतंय.’ काही विचारतील की ‘तत्त्वज्ञानाचीच विशेष दखल घ्यायचे कारण काय? अन्य विषयांची जी स्थिती आहे तिच्याहून तत्त्वज्ञानाची वेगळी असण्याचे कारण काय?’

पुढे वाचा

धर्म आणि विवेक

दि. य. देशपांडे यांचा ‘धर्म, सुधारणा आणि विवेक (आ. सु., जानेवारी १९९६) हा लेख वाचून सुचलेले विचार पुढे मांडायचे आहेत.
दि. य. यांचे प्रतिपादन असे की ‘धर्म आणि ‘सुधारणा या शब्दांना एकत्र केल्याने ‘वदतो व्याघात होतो. कारण, ‘धर्म हा श्रद्धेवर म्हणजे पुराव्याशिवाय केलेल्या विधानांवर
आधारलेला असतो, उलट सुधारणा बुद्धीवर, विवेकावर आधारलेली असते, श्रद्धा आणि विवेक यांचा परस्पर विरोध असतो. ते म्हणतात, “मला मात्र धर्मसुधारणा ही कल्पनाच वन्ध्यापुत्र या कल्पनेसारखी दोन परस्परविरुद्ध कल्पनांच्या संयोगाने बनलेली संकल्पना वाटते.”
‘धर्मसुधारणा’ हा प्रकार तर्कतः अशक्य (वाटत) असला तरी तो प्रत्यक्षात अस्तित्वात आहेच.

पुढे वाचा

राष्ट्रवादाच्या उठावाची माहितीपूर्ण चिकित्सा

जगाच्या नव्या रचनेत राष्ट्रवादाचे स्थान काय राहील, हा प्रश्न सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांना वारंवार पडतो. विशेषतः दुसर्यार महायुद्धानंतर ही चर्चा सुरू झालीआणि इतिहासाच्या प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यानंतर या चर्चेने जोर धरलेला दिसून येतो. सुरुवातीला दळणवळणक्रांती आणि आर्थिक-सांस्कृतिक सहकार्य यामुळे राष्ट्रीय ।।। अस्मिता पुसट होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. ‘बहुराष्ट्रीय भांडवलशाहीमुळे राष्ट्रवादाचा अस्त होईल, असे काहींना वाटत होते, तर दुसर्या- बाजूला मार्क्सवादी तत्त्वज्ञानाच्या प्रभावाने ही प्रक्रिया लवकर घडून येईल, असे बरेच जण मानत होते. प्रत्यक्षात । काय घडते आहे? विविध देशांमधील परिस्थितीचा अभ्यास करणार्या- तज्ज्ञांचे निबंध संकलित करून डेव्हिड हुसॉन यांनी या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे.

पुढे वाचा

लैंगिक मुक्ती आणि स्वैराचार

स्त्रियांची लैंगिक मुक्ती व स्वैराचार यातला फरक भारतीय व आशियामधल्या (बहुतेक) स्त्रीपुरुषांना समजणे कठीण जाते याचा प्रत्यय परत श्री गलांडे यांच्या (नोव्हें. ९५) पत्रातून आला. म्हणून परत लैंगिक मुक्ती व स्वैराचार ह्यांच्या (माझ्या) व्याख्या लिहिते.
लैंगिक स्वातंत्र्य अथवा मुक्ती असणे म्हणजे शरीरसंबंधास हो किंवा नाही म्हणण्याची संपूर्ण समाजमान्य मुक्तता.
स्वैराचार म्हणजे असंख्य मित्रमैत्रिणींशी अल्प परिचयात शरीरसंबंध, मजा म्हणून one night stand व वेश्यागमन.
स्त्रियांची अत्यंत हानी त्यांच्या लैंगिक पावित्र्याला अवास्तव दिलेल्या महत्त्वामुळे झालेली आहे. म्हणून मला स्त्रियांची लैंगिक मुक्ती हवी आहे.

पुढे वाचा

समाजसुधारणा, पुनर्घटना आणि डॉ. केतकर

अमेरिकेस गेल्यानंतर आपण काय करावे याचे मनापुढे कोणतेच कल्पनाचित्र नव्हते’ असे म्हणणारे केतकर, तेथील विद्यार्जन आटोपताच,
जाई देशी, कार्यलागे स्वजनांच्या कल्याणा
असे कृतनिश्चय होऊन परतले होते. अमेरिका आणि इंग्लंडमधील वास्तव्यातज्ञानकोशाचा उपयोग त्यांनी पाहिला होता. तयार ज्ञान तत्काळ हाताशी असणे याचा फायदा इंग्रजी सुशिक्षितांस सहज मिळत होता. तसा ज्ञानकोश मराठीच असावा असे त्यांना वाटू लागले. एन्सायक्लोपीडिया ब्रिटॅनिका वरील अमेरिकन समाजाचे काही आक्षेप त्यांना पटले होते; त्यामुळे ज्ञानकोशात सर्व ज्ञानाचा संग्रह व्हायचा असला तरी तो संग्रह ज्ञानकोश ज्या समाजासाठी असेल त्याच्या गरजांप्रमाणे ठेवला पाहिजे असे त्यांनी ठरविले.

पुढे वाचा