सदाचरणी होण्यास व सदाचरणी राहण्यास त्यांस सदाचरणाची किंमत कळली पाहिजे, ती किंमत कळण्यास त्यांची सापेक्ष बुद्धि जागृत झाली पाहिजे, व तसे होण्यास त्यांस सुशिक्षण दिले पाहिजे. लहान मुलांस खोटे बोलणे वगैरे पापांपासून दूर ठेवण्यास छडीचाच केवळ उपयोग नको आहे. पाप केल्यास शरीरदंड होतो येवढेच ज्ञान ज्यास मिळाले आहे तो सदैव पापपराङ्मुख राहील, असे मुळीच नाही. शिक्षा होण्याचा संभव गेला की, तो पाप करण्यास सोडणार नाही. सदाचरण व असत्प्रतिकार यांविषयीं तात्त्विक ज्ञान मनुष्यमात्रास झाल्यावाचून दोहोंचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम पूर्णपणे कळून येणे शक्य नाही, व जोपर्यंत हे परिणाम कल्लले नाहीत तोपर्यंत मनुष्यास सदा-चरणाची खरी योग्यता, व असत्पथावलंबनाची स्वपरवंचक प्रवृत्ति ही कधीहि कळणार नाहीत.
विषय «इतर»
परिसंवाद निसर्ग आणि मानव – १
श्रीमती मेधा पाटकर गेल्या आठवड्यामध्ये पुण्यास आल्या असता स्नेहसदनात भरलेल्या सभेत त्यांनी जी भूमिका मांडली तिचे माझ्या मते दोन स्थूल विभाग पाडता येतील. पहिला भाग म्हणजे त्यांनी नर्मदा घाटीतील धरणात बुडणार असणाऱ्या ग्रामीण जनतेला जागे करून एक जबरदस्त संघटन उभे केलेले आहे, त्याच्या केंद्रस्थानी असणाऱ्या नर्मदा प्रकल्पाच्या अनावश्यकतेचा, त्याच्या सिद्धीसाठी चाललेल्या अमानुष सरकारी दडपशाहीचा आणि त्या प्रकल्पामुळे अपरिहार्यपणे होणाऱ्या निसर्गविध्वंसाचा प्रश्न.
नर्मदा प्रकल्पाची योजना आखताना शासनाने (गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र ही राज्य शासने व केंद्रशासन या सर्वांनी) जी हरत-हेची माहिती जमा करावयास हवी होती तशी ती मिळवण्याचे कष्ट न घेता सगळी आखणी मनमानीपणाने केलेली आहे, हा मेधा आणि तिचे सहकारी यांनी घेतलेला मूलभूत आक्षेप.
परिसंवाद निसर्ग आणि मानव – २
साधनाच्या (१८ जुलै) अंकातील ‘निसर्ग आणि मानव या आपल्या लेखात श्री. नानासाहेब गोरे यांनी म्हटले आहे, आदिम क्षणापासून या चालू घटकेपर्यंत निसर्ग होता तसाच राहिला आहे : लहरी, निर्हेतुक.’ त्यांनी मानवाचे आणि निसर्गाचे स्वर पूर्वीच्या काळी कधी तरी खरोखर जुळले होते का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. लेखाच्या अखेरीस ‘स्वस्थितिमग्न निसर्ग व विज्ञानधर पुरुषार्थी मानव यांच्या संयोगाची गोष्ट केली आहे.
निसर्ग कसा आहे याचे वर्णन करते वेळी विश्व, पृथ्वी व पृथ्वीवरील सजीव सृष्टी या व्यवस्था आहेत आणि त्यांना एक इतिहास आहे, या दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.
परिसंवाद निसर्ग आणि मानव-३: श्री. वसंत पळशीकरांना उत्तर
(हा लेख आजचा सुधारक नोव्हेंबर-डिसेंबर – ९२ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.)
परिसंवाद निसर्ग आणि मानव: एक अनिवार्य समग्रता – ४ प्रा. दि.य. देशपांडे यांच्या लेखाच्या निमित्ताने
प्रा. दि. य. देशपांडे यांचा साधनेतील (१४ नोव्हें. १९९२) टिपणवजा लेख वाचून मनात आलेले काही विचार म्हणा, काही शंका आणि प्रश्न म्हणा मी येथे व्यक्त करू इच्छितो. प्रा. दि. य. देशपांडे यांच्या लेखाला एक दुहेरी पाश्वभूमी आहे. एक म्हणजे मा. नानासाहेब गोरे यांचा साधनेतील (१८ जुलै ९२) लेख आणि दुसरी म्हणजे त्या लेखावरील मा. श्री. वसंत पळशीकर (साधना २९ ऑगस्ट ९२) यांची प्रतिक्रिया. माझ्या प्रस्तुत । लेखनालाही ही पाश्वभूमी अंशतः असणे स्वाभाविकच आहे. तथापि, श्री. गोरे काय किंवा श्री. पळशीकर काय, यांच्या विचारांचे खंडन अगर मंडन करावे या हेतूने मी हे लिहिलेले नाही.
परिसंवाद निसर्ग आणि मानव -५
दि. य. देशपांडे यांना उत्तर – उत्तरार्ध वसंत पळशीकर (या लेखाचा पूर्वार्ध आजचा सुधारकमार्च ९३ या अंकात आला आहे.)
६ डेव्हिड बोम (Bohm) या भौतिकी वैज्ञानिकांचे एक विधान पुढीलप्रमाणे आहे: ‘We have seen that each world-view holds within itself its own basic notions of order. What is order ? How we do presuppose that there is some kind of order – so a general and explicit definition of order is not actually possible’. बोम हे भौतिकीमधील विभिन्न word-views बद्दल बोलत आहेत.
परिसंवाद निसर्ग आणि मानव -६
निसर्गामधल्या उत्क्रांतीचा आजमितीला शेवटचा टप्पा म्हणजे मानव; त्यास्तव तो देखील निसर्गाचा एक घटकच मानावा लागेल. मानव विरुद्ध निसर्गामधील इतर घटक ही लढाई आदिमानवाच्या काळापासून चालू आहे. निसर्गामधल्या इतर घटकांमध्ये देखील लढाई चालू असते. उदा. हिंस्र पशू इतरांना खातात. पण ही लढाई मर्यादित स्वरूपाची असते. परंतु मानवाची लढाई उग्रस्वरूपी झाली आहे, याची कारणे म्हणजे मानवाचा बुद्धिविकास, त्याचे कार्यकौशल्य, विज्ञानाने उपलब्ध करून दिलेली अनेक साधने आणि लोकसंख्येची अफाट वाढ ही होत. या सर्वांचा परिणाम म्हणून मानव निसर्गातल्या इतर सर्व घटकांचे आपल्या सुखसोयीसाठी शोषण करीत आहे.
स्त्री असुरक्षित आहे
हिंदू समाजात स्त्रीरक्षण – पुरुषाच्या कामवासनेपासून स्वसंरक्षण- हा महत्त्वाचा उद्योग स्त्रीला पुरातन काळापासून असावा, कारण त्या वासनेला संयम शिकविण्याचे प्रयत्न हिंदू संस्कृतीने केलेले नाहीत. ब्रह्मचर्याचा, तपस्येचा बडिवार करीत, वेश्याव्यवसाय हाच कुळधर्म असणाच्या कळवंत, नायक इत्यादी जाती हिंदू धर्माने निर्माण केल्या, इतकेच नव्हे तर कुळवंतांच्या पोरी देवदासींच्या स्वरूपात मंदिरामधून पोचविल्या व देवद्वाराचाही कुंटणखाना बनवून टाकला. घरच्या स्त्रियांवर देवादिकही पापी दृष्टी ठेवीत, असे आपली पुराणे सांगतात. कामसूत्रात कुलीन स्त्रीला वश करण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत. बहुपत्नीकत्व होतेच, पण त्या स्त्रियांचे भरणपोषणही न करता चैन करण्याचा मार्ग बंगालच्या ‘कुलीन भूदेवांनी शोधून काढला.
तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ३)
विधानांचे समर्थन तत्त्वज्ञानाच्या दोन प्रमुख कार्यापैकी पहिले कार्य म्हणजे विधानांचे समर्थन करण्याच्या प्रक्रियेची चिकित्सा. आपल्यासमोर येणार्याक कोणत्याही विधानाविषयी ते खरे आहे कशावरून?’ हा पहिला प्रश्न आपल्या मनात उद्भवतो. या प्रश्नाचे उत्तर देणे म्हणजे त्या विधानाचे समर्थन करणे.
एखाद्या विधानाचे समर्थन द्यायचे म्हणजे ते अन्य एका किंवा अनेक विधानांवरून अपरिहार्यपणे निष्पन्न होते असे दाखविणे. ती अन्य विधाने जर आपल्याला मान्य असतील आणि त्यावरून पहिले विधान निष्कर्ष म्हणून अपरिहार्यपणे निष्पन्न होते हेही आपल्याला मान्य असेल, तर ते विधान सिद्ध झाले असे आपण म्हणतो.
चर्चा- विवेकवादी नीतीविचाराचे शिथिल समर्थन
प्रा. दि. य. देशपांडे यांनी आजचा सुधारकच्या सप्टेंबर आणि आक्टोबर १९९२ च्या अंकांतून क्रमशः विवेकवादातील नीतिविचाराच्या त्यांच्या मांडणीवर घेतलेल्या आक्षेपांची उत्तरे देण्याची बरीच खटपट केली आहे. त्या उत्तरांवरून विवेकवादाच्या नावाने पर चात्त्य विचारांनी भारलेल्या भारतीय विद्वानांनी भारतीय नीतिविचारांना उपहसत जे तर्क कौशल्य दाखविण्याची धडपड चालविली आहे, ते मुळात किती कच्चे, अपुरे आणि भ्रामक आहे याची साक्ष पटते. एक गोष्ट प्रथम नमूद करतो की प्रा. दि. य. देशपांडे यांची त्यांनी केलेल्या नीतिविचारांच्या मांडणीचा प्रस्तुत लेखकाने आपल्या मूळ लेखात जो संक्षेप दिला आहे त्याबद्दल कोणतीही तक्रार नाही.