विषय «इतर»

चर्चा -भक्ती हे मुल्य आहे काय?

आजचा सुधारकच्या डिसेंबर ९४ अंकात प्रसिद्ध झालेल्या “भक्ती हे मुल्य आहे काय?” या माझ्या लेखावर प्रा. बा. वि. ठोसर यांनी लिहिलेले एक चर्चात्मक टिपण याच अंकात अन्यत्र छापले आहे. हे टिपण लिहिल्याबद्दल मी प्रा. ठोसरांचा अतिशय आभारी आहे. कोणत्याही विषयातील सत्य त्याच्या साधकबाधक चर्चेशिवाय हाती लागत नाही ही गोष्ट प्रसिद्ध आहे. म्हणून प्रा. ठोसरांच्या लेखाचे मी मनःपूर्वक स्वागत करतो.
आपल्या लेखात प्रा. ठोसरांनी प्रथम कार्ल पॉपर या थोर तत्त्वज्ञाचे सार्थ (किंवा अर्थपूर्ण – meaningful) विधान आणि वैज्ञानिक विधान यासंबंधीचे मत उद्धृत केले आहे.

पुढे वाचा

चर्चा – खरी स्त्रीमुक्ती कशात आहे?

दिवाकर मोहनी ह्यांच्या लेखामधली स्त्री ही “स्वतःची लैंगिक स्वातंत्र्याच्या बाबतीत स्वामिनी’ ही कल्पना भारतीय स्त्रीपुरुषांना समजणेच (माझ्या अनुभवाप्रमाणे) अशक्य आहे. भारतीयांच्या दृष्टिकोणाप्रमाणे स्त्रीचा पतिव्यतिरिक्त पुरुषाशी संबंध आला की ती वेश्या नसली तरी वेश्येसारखीच होते. लैंगिक स्वातंत्र्य व स्वैराचार ह्यातला फरक समजणे भारतीयांना (एवढेच नव्हे तर आशियातल्या अनेक समाजांना) कठीण जाते. अमेरिकेत स्त्रियांना लैंगिक स्वातंत्र्य आहे, म्हणून त्या “लूज’ आहेत, असे अनेक भारतीय म्हणतात.
“वेश्या परतंत्र आहे. तिला नकार देण्याचा अधिकार नाही” हा मुद्दा मात्र मला मान्य नाही. वेश्येलाही नकार देण्याचा अधिकार आहे व तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी समागम केल्यास तो बलात्कार होतो.

पुढे वाचा

संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ! आक्षेपकांचा परामर्श

आजच्या सुधारकच्या मे व जून १९९४ च्या अंकात ‘संदर्भ न पाहता लावले जाणारे अर्थ या शीर्षकाने ‘धारणाद्धर्म इत्याहुः’, ‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति आणि ‘रक्षण की राखण’ या विषयांचा ऊहापोह करण्यात आला होता. या तीनही विषयांची चर्चा आजच्या सुधारकमधून यापूर्वी श्रीमान् संपादकांसहित इतरांनी वरचेवर सदैव एकपक्षीय केलेली होती. ती अधिक समग्र व्हावी म्हणून या विषयाची संदर्भसहित दुसरी बाजू पूर्वोक्त लेखात मांडली आहे. त्या विषयी प्रा. सुनीती देव (जून ९४), श्री मधुकर देशपांडे, श्री. प्रमोद सहस्रबुद्धे आणि श्री. दिवाकर मोहनी (जुलै ९४), श्री. मा.

पुढे वाचा

ईश्वर, धर्म आणि अंधश्रद्धा

आगरकरांच्या अज्ञेयवादी भूमिकेतून ईश्वरावरील श्रद्धा अप्रमाणितच असते – असिद्धचअसते. आगरकर हे समाजसुधारक असल्याने समाजामध्ये प्रचलित असलेल्या अनिष्ट रूढी, परंपरा यांच्यावर त्यांनी सातत्याने प्रहार केले. सती, बालविवाह, बळी देण्याची प्रथा, शिमगा यांपासून तो स्त्रियांचे पोषाख, मृतासंबंधीचे विधि इत्यादि विषयांवर त्यांनी लिखाण केले. सर्वसाधारणपणे समाजासंबंधीचे विधि इत्यादि विषयांवर त्यांनी लिखाण केले. सर्वसाधारणपणे प्रचलित असणार्याे रूढी, पंरपरा, चालीरीती, सणवार हे धर्मसंकल्पनेशी निगडित असल्याने व धर्म सर्वसामान्यपणे ईश्वरनिष्ठ, ईश्वरवादी असल्याने तात्त्विकदृष्ट्या किंवा ‘इंद्राय तक्षकाय स्वाहा’ या नात्याने अ-धार्मिक निरीश्वरवादाची भलावण समाजसुधारकांकडून केली जाते. परिणामतः समाजसुधारणा ही ईश्वर आणि धर्म या विरोधी असलेले तत्त्वयुद्ध आहे असे समाजसुधारक आणि धार्मिक मानतात.

पुढे वाचा

देव कसा आहे?

‘एथिओपियन लोक म्हणतात की आमचे देव बसक्या नाकाचे आणि काळ्या रंगाचे आहेत, तर श्रेसचे लोक म्हणतात की आमच्या देवांचे डोळे निळे आहेत आणि त्यांचे केस लाल आहेत. आणि जर गुरे, घोडे किंवा सिंह यांना मनुष्यासारखे हात असते, त्यांना चित्रे काढता आली असती, आणि मूर्ती कोरता आल्या असत्या, तर घोड्यांनी आपले देव घोड्यांसारखे आणि गुरांनी गुरांसारखे चितारले असते, आणि प्रत्येक पशूने आपल्या देवाच्या शरीरांना आपापल्या शरीराचा आकार दिला असता.’
(इ. पू. ५००)

बंडखोर पंडिता (भाग १)

पंडिता रमाबाईंच्या कार्याची ओळख आजचा सुधारकच्या वाचकांना करून देण्याचा विचार तसा लांबणीवरच पडत गेला. मध्यंतरीच्या एका घटनेने ते काम आणखी रेंगाळले.आजचा सुधारकच्या सल्लागार मंडळावरील एका विदुषीने धर्मांतर केले. ही गोष्ट सुधारकाला खटकली. समाजसुधारणेसाठी धर्माचे माध्यम आवश्यक समजणे ही गोष्ट त्याच्या धोरणात बसत नाही तर मग धर्मांतर करून ख्रिस्ती झालेल्या रमाबाई सुधारक कशा? आणि आंबेडकर, गांधी यांना तरी तुम्ही सुधारक समजता की नाही? त्यांची धर्मनिष्ठा तर जगजाहीर आहे. अशी बरीच भवति न भवति (मनाशी) केली. शेवटी निष्कर्ष निघाला तो असा:
आजचा सुधारकला स्वतःचे धोरण ठरविण्याचा अधिकार आहे.

पुढे वाचा

सी. पी. स्नो ह्यांच्या दोन संस्कृती” ह्या पुस्तकाच्यानिमित्ताने (उत्तरार्ध)

गेल्या वीस वर्षांतील ‘नवीन भौतिकीमुळे भौतिक शास्त्राच्या पारंपारिक कल्पनेतही महत्त्वाचे बदल घडून आले आहेत. ह्या बदलांचे वर्णन कॉलिनी पुढील शब्दांत करतो,क्वाँटम भौतिकी” “आणि “केआस थिअरी” सारख्या नवीन कल्पनांनी द्रव्याच्या (matter) गुणधर्माचे जुने जडवादी (mechanistic) रूप – जे न्यूटनपासून प्रचलित होते – टाकून द्यायला भाग पाडले आहे. शिवाय सैद्धांतिक भौतिकी (Theoretical Physics), खगोलशास्त्र (Astronomy) आणि विश्वरचनाशास्त्र (Cosmology) ह्यांसारख्या विषयांमधील क्रांतिकारक प्रगतीमुळे अनुभवजन्य निरीक्षणातून, अचूक निगमनाने नियंत्रित अनुमान काढण्याची जुनी वैज्ञानिक विचारपद्धतीही सदोष असल्याचे लक्षात आले आहे. रूपक, समरूपता, अंतःस्फूर्ती ह्यासारखे मानव्यशास्त्रात वापरले जाणारे मानसिक व्यवहार विज्ञानातही उपयोगी पडतात हे जाणवल्यामुळे ह्या दोन ज्ञानशाखांमधील साधम्र्याची चर्चा सध्या जास्त महत्त्वाची ठरू पाहात आहे.

पुढे वाचा

‘विवेक’ आणि ‘विवेकवाद यांचे अर्थ

‘विवेक (reason) आणि ‘विवेकवाद’ (ratinalism) हे शब्द संदिग्ध असल्यामुळे त्यांचे आपल्याला अभिप्रेत असलेले अर्थ सांगणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे शब्द व्यापक अर्थाने वापरले आहेत. त्यांनी एक बौद्धिक व्यापारच अभिप्रेत आहे असे नसून त्याखेरीज निरीक्षण आणि प्रयोग यांचाही त्यांच्या अर्थात अंतर्भाव आहे. हे लक्षात ठेवणे जरुर आहे कारण reason’ आणि ‘rationalism’ हे शब्द अनेकदा एका वेगळ्या आणि संकुचित अर्थाने वापरले जातात, आणि त्या अर्थी त्यांचा विरोध irrationalism’ (विवेकद्रोह) शी नसून अनुभववादाशी (empiricism) असतो. ते शब्द जेव्हा या अर्थाने वापरले जातात तेव्हा विवेकवाद निरीक्षण आणि प्रयोग यांच्याहून श्रेष्ठ आहे अशी प्रशंसा त्यातून व्यक्त होते.

पुढे वाचा

सी.पी. स्नो ह्यांच्या दोन संस्कृती :ह्या पुस्तकाच्या निमित्ताने

विद्यार्थी, शिक्षक, पालक अशा तिहेरी भूमिकेतून आजपर्यंत शिक्षणाशी जेव्हा संबंध आला तेव्हा ज्या अनेक गोष्टी जाणवल्या त्यातील एक महत्त्वाची म्हणजे विज्ञान आणिकला ह्या दोन शाखांमधील वाढत जाणारे अंतर. मी विद्यार्थीदशेत असताना हे अंतर फार नव्हते, स्पर्धाही जीवघेणी नव्हती. कलाशाखेतील विद्याथ्र्यांना विज्ञान-तंत्रज्ञान वगैरे शाखांमधील लोकांबद्दल आदर होता, पण स्वतःबद्दल न्यूनगंड नव्हता. पराभूतपणाची भावना तर अजिबात नव्हती. नंतरच्या दहा वर्षांत हे चित्र पाहता पाहता पालटून गेले. ह्या दोन ज्ञानशाखांमधले अंतर विस्मयकारक रीतीने वाढले होते. कोठेच प्रवेश न मिळालेले विद्यार्थी नाइलाजाने कलाशाखेत प्रवेश घेत होते.

पुढे वाचा

चर्चा -खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? (भाग ५)

स्त्रियांची मागणी असो की नसो, त्यांची इच्छा असो की नसो, त्यांची मुक्ती झाली पाहिजे, इतकेच नव्हे तर त्या मुक्तीचा एक अविभाज्य वा अपरिहार्य अंश म्हणून म्हणा, त्याचे आवश्यक अंग म्हणून म्हणा किंवा त्याचा एक अनिवार्य पैलू म्हणून म्हणा, त्यांना लैंगिक स्वातंत्र्य दिले पाहिजे ह्या निष्कर्षावर मी येऊन ठेपलो असल्याचे मी पूर्वीच्या लेखांकांमधून सांगितलेले आहे.
स्त्रियांची मुक्ती ही न्यायोचित बाब आहे. त्यात कोणी मागणी करण्याची गरजच नाही. गुलामगिरीची प्रथा अन्याय्य आहे. ही गोष्ट विचारान्ती पटल्यावरसुद्धा एखाद्या गुलामांच्या मालकाने त्याचे गुलाम तशी मागणी करीत नाहीत तोवर- त्यासाठी उठाव करीत नाहीत तोवर – त्यांच्यावरचा हक्क कायम ठेवावयाची व त्यांची पिळवणूक, त्यांची खरेदीविक्री चालू ठेवावयाची हे जितके व जसे गर्हणीय आहे तितके व तसेच स्त्रियांच्या तश्या मागणीची, त्यांच्या त्यासाठी केलेल्या आंदोलनाची वाट पाहणे आमच्यासाठी लांच्छनास्पद, निंदास्पद आहे असे माझे मत आहे.

पुढे वाचा