विषय «इतर»

अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळींचा वेध

भाग तीनः कार्यकर्ते : व्यक्ती व संघटना
१९६७ ते १९८० दरम्यान आर्थिक, राजकीय घडामोडींना वेग आला होता. तरुणांची आंदोलने होत होती. नक्षलवादी चळवळीचा उगम, बिहार व गुजरातमधील आंदोलने याच काळातली. महाराष्ट्रात अशा अस्वस्थतेबरोबर, तरुण दलितांची चळवळ दलित पँथर, सामाजिक बदलाची चळवळ युक्रांद यांचे वारे वाहत होते. १९७४ मध्ये वरळीत दलित-सवर्ण दंगा झाला, यापुढे काहीच महिन्यांत दलित युवकांनी मराठवाड्यात सरकारी यंत्रणेविरुद्ध मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. विविध पुरोगामी चळवळी यावेळी कार्यरत होत्या. ज्यांतील काही नावे पुढीलप्रमाणे : रॉयिस्ट, राष्ट्र सेवा दल, सर्वोदयी, सत्यशोधक समाज, आंबेडकरांचे अनुयायी, भूमिसेना, ग्रामस्वराज्य समिती, मागोवा, शहादा तळोदा गट, छात्र युवा संघर्ष वाहिनी, यूथ ऑर्गनायझेशन, क्रांतिकारी महिला संघटना.

पुढे वाचा

जोतीराव फुले यांचे अंधश्रद्धा-निर्मूलन कार्य

जोतीराव फुले यांनी विश्वमानवाच्या मुक्तीसाठी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या दोन निष्ठावंत अग्रणींच्या आयुष्यातील दोन प्रसंग प्रारंभीच नमूद केल्यास अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यात त्या चळवळीने संपादन केलेल्या यशाचा प्रत्यय येऊ शकेल. पहिला प्रसंग ना. भास्करराव जाधवांच्या आयुष्यातला आहे. वेदोक्त प्रकरणी दुखावलेल्या शाहू महाराजांनी जेव्हा क्षात्र जगद्गुरूची प्रतिष्ठापना केली तेव्हा भास्कररावांनी त्या कल्पनेस विरोध केला होता. एवढेच नव्हे तर महाराजांसह सर्व श्रेष्ठींनी क्षात्रजगद्गुरूंना अभिवादन केले तेव्हा, आपण सत्यशोधक असल्यामुळे कोणत्याही धर्मपीठापुढे नतमस्तक होणे आपल्या विचारांत बसत नाही हे त्यांनी स्पष्ट सांगितले होते. सत्यशोधकी विचार केवळ ब्राह्मणी जगद्गुरूंनाच नकार देत नसून संपूर्ण पुरोहितशाही आणि जन्मनिष्ठ विषमतेवर आधारित वर्णव्यवस्था यांनाच नाकारतो.

पुढे वाचा

गाडगे महाराजांचे अंधश्रद्धा निर्मूलन कार्य

गाडगे महाराजांना संत का म्हटले गेले हेच कोडे आहे. रूढार्थाने आपण ज्यांना संत म्हणतो, त्या संतांसारखी एखादीही कृती गाडगेबाबांनी केली नाही. आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या माणसाला आपण ‘बाबा’ म्हणतो या अर्थाने खेडुतांनी, गोरगरिबांनी त्यांना बाबा म्हटले आणि ते त्यांनी सहर्ष स्वीकारले असावे. पण महाराज ? हे काय प्रकरण आहे? कुणी आपल्या सोयीसाठी त्यांना महाराज बनविले ? कारण त्यांनी स्वतःच अनेक वेळा सांगितले आहे ‘मी कोनाचा गुरु नाही अन् माझे कोनी शिष्यई नाहीत-‘ आपल्या भोवतीच्या सामाजिक दुःस्थितीचे अवलोकन करीत, त्यातून मार्ग शोधीत गाडगेबाबांचे लोकोत्तर आणि इहवादी तत्त्वज्ञान आकारले आहे, हे कुणी लक्षातच घेत नाही.

पुढे वाचा

बाबासाहेब आंबेडकर व अंधश्रद्धा निर्मूलन

डॉ. आंबेडकरांच्या अंधश्रद्धानिर्मूलन कार्याचा वेध घेताना त्यांच्या धर्मचिकित्सेचा आणि धर्मांतर चळवळीचा मागोवा घेणे अपरिहार्य ठरते. महाराष्ट्रात अंधश्रद्धानिर्मूलन चळवळीची व्याप्ती प्रामुख्याने बुवाबाजी, चमत्काराचा दावा करणारे स्वामी, साक्षात्कारी असल्याचा प्रचार करणारे महाराज, झपाटणे, भानामती, वशीकरण विद्या, पुनर्जन्म, भावातीत ध्यान इ.च्या संदर्भातील प्रबोधनाची आहे. या सर्व अंधश्रद्धांची मुळे धर्माच्या तात्त्विक वा व्यावहारिक स्वरूपात आहेत. अंधश्रद्धानिर्मूलनाचा कार्यकर्ता मर्यादित उद्दिष्टाने व्यवहारातील उघड व बोचक अंधश्रद्धेच्या विरोधात कृती करीत असतो तर धर्मसुधारक आणि धर्मपरिवर्तक अंधश्रद्धांचे शक्तिसामर्थ्य असलेल्या ईश्वरवाद, आत्मवाद, अवतारवाद, पुनर्जन्मवाद, कर्मवाद या अध्यात्मवादी प्रवृत्तींची मूलगामी चिकित्सा करीत असतो.

पुढे वाचा

भाग चारः सर्वेक्षण श्रद्धांचे सर्वेक्षण

सध्या खूप मोठ्या प्रमाणात लोक श्रद्धाळू झाले आहेत असे म्हणणारे विवेकी, तर लोकांना कसची चाड राहिली नाही असे म्हणणारे धार्मिक आपल्याला भेटत असतात. ही त्यांची मते दिखाऊ श्रद्धा वा अश्रद्धा जाणवल्यावर प्रगट होत असतात. म्हणजे अमक्या मेळ्याला काही लाख माणसे जमली, मोठा अपघात झाला त्यात सर्व यात्रेकरू होते, असे काहीसे ऐकू आले की विवेकी माणसांना समाजातील वाढत्या श्रद्धेची ओळख पटते. तर सणासुदीला सुट्टी घेऊन भ्रमण करणारे पाहिले; लग्न-श्राद्ध-मुंजीतील धार्मिक व्यवहारातील ढिलेपणा पाहिला की धार्मिकांना नेमकी त्याविरुद्ध जाण येते. नेमके काय घडते हे पाहण्यासाठी आजकाल सर्वेक्षणाचा उपयोग केला जातो.

पुढे वाचा

भाग एकः संकल्पनात्मक श्रद्धा प्रमाण आहे काय?

ज्ञान म्हणजे वस्तुस्थितीविषयी यथार्थ माहिती. ‘ज्ञान’ या शब्दाचा हा एकमेव अर्थ नाही. कारण संज्ञा किंवा जाणीव या अर्थानेही या शब्दाचा उपयोग होतो. या अर्थी कोणतीही जाणीव ज्ञानच आहे. त्यामुळे ज्ञानाचे दोन प्रकार आहेत, यथार्थ आणि अयथार्थ, किंवा सत्य आणि मिथ्या ज्ञान असेही म्हणतात. पण या लेखात ‘ज्ञान’ हा शब्द सत्य ज्ञान या अर्थानेच वापरला आहे.
ज्ञानप्राप्तीची अनेक साधने आहेत. त्यांना प्रमाणे म्हणतात. उदा. ज्ञानेंद्रिये ही एक प्रकारची प्रमाणेच आहेत. कारण त्यांनी आपल्या शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या संवेद्य गुणांचे ज्ञान होते.

पुढे वाचा

श्रद्धा आणि अंधश्रद्धा

अंधश्रद्धा-निर्मूलनाच्या चळवळीमध्ये सगळी चळवळ या विषयाभोवती फिरत असते. आणि ज्या काही शिव्या आणि ओव्या आम्हांला चळवळीमध्ये मिळत असतात, त्याचा याच विषयाशी संबंध असतो. काही जणांना असे वाटते, आमचे काम अयोग्य आहे, अनिष्ट आहे, अरास्त आहे. काही जणांना असे वाटते की, हे काम झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने आपला देश २१ व्या शतकात पदार्पण करणार नाही. आणि काहीजणांना असे वाटते की, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली आम्ही देव, धर्म, परंपरा बुडवत आहोत. ते म्हणतात, ‘अंधश्रद्धा म्हणजे काय ? अंधश्रद्धा म्हणजे श्रद्धेच्या निखाऱ्यावरची राख. राख उडवून लावली की आतला निखारा पुन्हा पूर्वीसारखा तेजस्वी होतो.

पुढे वाचा

अंधश्रद्धाः काही संकल्पना

आपण अंधश्रद्ध आहोत हे जवळपास कोणीच पटकन म्हणणार नाही. जरा खोलवर विचार केल्यावर कदाचित एक दोन बाबी मान्य केल्या जातील पण त्या तेवढ्याच. सर्वसाधारण अंधश्रद्धा म्हणजे दुसऱ्या कुणाची विचित्र समजूत असे म्हटले तर फारसे वावगे ठरू नये. या सापेक्ष व्याख्येचा एक फायदा म्हणजे अंधश्रद्धेविरुद्ध सर्वांचे एकमत होऊ शकते! कारण दुसऱ्यांची अंधश्रद्धा दूर करणे हे प्रत्येकाचे स्वाभाविक कर्तव्य असते.
अंधश्रद्धा शब्द उच्चारला की साहजिकपणे मंत्र-तंत्र, शकुन-अपशकुन, फलज्योतिष्य, नवससायास, व्रतवैकल्ये अशा गोष्टी डोळ्यांसमोर येतात. या सर्वांना अंधश्रद्धा न म्हणता चिपळूणकरांनी ‘लोकभ्रम’ असा शब्दप्रयोग केला.

पुढे वाचा

भाग दोनः विवरणात्मक मंत्र, मांत्रिक व चमत्कारः

[प्रा. मच्छिन्द्र मुंडे (जन्म १९५८) अंधश्रद्धा-निर्मूलनाचे काम करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. दोन हजाराच्या आसपास व्याख्याने, प्रात्यक्षिके, सहा पुस्तकांचे लेखन, भोंदूबाबांची हातचलाखी ओळखण्यात हातखंडा व त्यामुळे पर्दाफाश करणे, भरपूर संघटनात्मक कार्य अशी त्यांची थोडक्यात ओळख आहे.] तुम्ही विवेकी कसे बनलात?
माझे लहानपण खेड्यात व घरच्या वारकरी वातावरणात गेले. डोंबिवलीजवळचे आगासन हे माझे गाव. माझ्या गावात सातवीपर्यंत शाळा होती. हायस्कूल डोंबिवलीत आणि नंतरचे शिक्षण मुंबईत झाले. मी सातवीत असताना (१९७२ साली) आमच्या गावच्या शाळेत संपतराव कदम गुरुजी हे विवेकी विचाराचे शिक्षक तेथे बदलून आले.

पुढे वाचा

भविष्यकथन

भविष्याची चिंता मानवाला प्राचीन काळापासून सतावत आली आहे. त्यावर मात करण्यासाठी काळाच्या ओघात भविष्यकथनाच्या विविध पद्धतींनी आकार घेतला. या सर्वांचा उगम पुराणकाळात झाल्याचे दिसून येते. सर्वस्वी निसर्गावर अवलंबून असणारा आदिमानव जसजसा निसर्गबदलांशी परिचित होऊ लागला तसतसा निसर्गाच्या अफाट सामर्थ्यात स्वतःला जुळवून घेण्यास शिकला. हे शिकत असताना निसर्गाच्या वर्तमान स्थितीतून अथवा बदलातून भविष्यातील सृष्टी आकार घेत असते हे त्याला समजू लागले. झाड फुलांनी बहरलं की काही दिवसांत झाडाला गोड फळे लागतात. मुंगीसारखे कीटक पृष्ठभागावर दिसू लागले की थोड्याच दिवसांत पाऊस येतो. विशिष्ट प्राणी दिसेनासे झाले की उन्हाळा सुरू होतो.

पुढे वाचा