एकोणिसाव्या शतकाने तीन गोरी, दाढीवाली माणसे घडविली. त्यांना कोणी द्रष्टे म्हणतात, तर कोणी राक्षस म्हणतात. हे आहेत डार्विन, मार्क्स आणि फ्रॉईड. यांपैकी फ्रॉईड भारताच्या बौद्धिक जीवनात कुठेच दिसत नाही. त्याचे विचार माणसाचे मन आणि अंतर्मन यांबाबत होते; आणि यासाठी भारतात स्थानिक गुरु आहेत. त्यामुळे फ्रॉईडचा येथील परिणाम नगण्य असणे हे सहज समजण्यासारखे आहे. मार्क्स मात्र भारतात खूपच प्रभावशाली ठरला आहे. त्याच्या नावाचा पक्ष दोन राज्यांमध्ये सत्तेवर आहे. भारतीय समाज आणि राजकारणाचा विचार करताना मार्क्सबाबा नेहमीच आसपास असतो. अनेक पिढ्यांचे विचारवंत मार्क्सला भारतीय गुरुपरंपरेत बसवायला धडपडत आहेत.
विषय «इतर»
सारे काही जीनदत्त?
पाश्चात्त्य देशांत सतरा-अठराव्या शतकात घडलेल्या राज्यक्रांत्या समता प्रस्थापित करण्यासाठी होत्या, असे त्यांची घोषवाक्ये सांगतात. पण या क्रांत्यांमधून आकार घडलेल्या सर्व समाजांमध्ये काही व्यक्तींचा सत्ता-संपत्तीतील वाटा इतरांपेक्षा खूप जास्त आहे, हे सतत दिसत असते. या विरोधाभासातून उद्भवलेले सामाजिक क्लेश गेली दोनशे वर्षे पाश्चात्त्य देशांमध्ये जाणवत आहेत, विशेषतः उत्तर अमेरिका खंडाच्या राजकीय इतिहासाचा मोठा भाग या अंतर्विरोधाच्या निरसनाभोवती केंद्रित आहे.
याबाबत दोन शक्यता सुचतात – एक अशी, की प्रचंड विषमता हा आपल्या राजकीय – सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे, आणि क्रांत्यांची घोषवाक्ये केवळ जन्माधिष्ठित सत्ता हटवून संपत्त्यधिष्ठित सत्ता प्रस्थापित करण्यापुरतीच होती.
मनुस्मृतीच्या दावणीला डार्विन-मेंडेल!
[आनुवंशिक गुणसंच आणि परिस्थितीमुळे येणाऱ्या मर्यादा यांच्या परस्परपरिणामांमधून सजीव सृष्टी घडत जाते, ही डार्विनच्या नैसर्गिक निवडीमागची मर्मदृष्टी (insight). तिला बळ पुरवले मेंडेलला सापडलेल्या आनुवंशिकतेच्या यंत्रणेने. या यंत्रणेचा गाभा म्हणजे आनुवंशिक गुण रेणूंच्या, जीनसंचांच्या रूपात व्यक्तींकडून त्यांच्या संततीकडे जातात.
नैसर्गिक निवड अखेर असे गुणसंच निवडते. यात त्या गुणसंचांची व्यक्तींमधून होणारी अभिव्यक्ती (expression) महत्त्वाची असते. आणि निवड दिसून येते ती जीवजातीच्या वैशिष्ट्यांमधून.
इथे निवडले गेलेले गुण चांगले न मानता केवळ बदलत्या परिस्थितीच्या सध्याच्या टप्याशी अनुरूप मानणे, ही झाली वैज्ञानिक शिस्त. ती शिस्त विसरली गेली, की आहे तेच चांगले असा भाव उपजतो.
डार्विनचा उत्क्रांतिवाद व मार्क्सवाद’
चार्ल्स डार्विन याचा ऑरिजिन ऑफ स्पीशीज हा ग्रंथ १८५९ साली प्रसिद्ध झाला. जीवनावर सखोल भाष्य करणारी अनेक पुस्तके त्याकाळीही प्रसिद्ध होऊ लागली होती. अजून माध्यमक्रांती झाली नव्हती. शिक्षण सार्वत्रिक वा सामुदायिक झाले नव्हते. युरोपमध्येही साक्षरतेचा प्रसार होऊ लागला असला तरी तो बहुशः अक्षरओळखीपुरताच मर्यादित होता. वाचनसंस्कृती अभिजनवर्गापुरतीच मर्यादित होती. गहन विचारांचा प्रसार व प्रभाव अर्थातच सीमित होता. (सार्वत्रिक शिक्षणाचा प्रसार १८७० नंतर सुरू झाला. १८५० मध्ये निदान ३०% वर व ४५% वधू इंग्लंडमध्ये लग्नाच्या नोंदणीवहीत सह्या करू शकत नव्हत्या. १८५० पूर्वी ही परिस्थिती अधिकच वाईट होती.
संधिकाळातील घालमेल
इंग्रजी वाययाचा अभ्यास करताना त्या वाययाची आवश्यक पार्श्वभूमी म्हणून इंग्लंडच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासाचे काही कालखंड वाचले होते. ते वाचत असताना सगळ्यांत ज्या गोष्टींनी प्रभावित केले ती होती नोंदींची उपलब्धता. तथ्ये, घटना, घटनांवरच्या अनेक टीकाटिप्पणी काळाच्या ओघात नाहीशा होऊनही एवढ्या प्रमाणात शिल्लक राहिल्या ह्याचे आश्चर्य वाटल्याचे आजही आठवते. चर्चच्या रजिस्टरमधील जन्म, मृत्यू, विवाह ह्या अटळपणे होणाऱ्या नोंदी वगळल्या तरी पत्रव्यवहार, डायऱ्या, संस्थांच्या व्यवहारांची रेकॉर्डबुक्स, कवी, नाटककार, कादंबरीकार वगैरेंच्या कलाकृती, वृत्तपत्रांतील बातम्या ह्या सगळ्यांमधून उमटलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा पाहताना फार मजा आली.
१९९६ च्या आसपास पॅन्डिमोनियम नावाचे हम्फ्री जेनिंग्ज ह्या सिनेमा आणि नाटकाशी प्रामुख्याने संबंधित असलेल्या लेखकाचे पुस्तक वाचनात आले.
“धक्कातत्त्व”: पुस्तक-परिचय
एखाद्या राजवटीत जाणता अजाणता झालेल्या जुलमांसाठी व अन्यायांसाठी त्या राजवटीमागच्या विचारधारेला जबाबदार धरणे योग्य की अयोग्य? बरे, सर्वच राजवटी, त्यांमागच्या विचारधारा, वगैरेंची आर्थिक अंगे महत्त्वाची असतात. कौटिल्याच्या राज्य कसे चालवावे याबाबतच्या ग्रंथाचे नाव अर्थशास्त्र असे आहे. अॅडम स्मिथच्या पुस्तकाचे नाव द वेल्थ ऑफ नेशन्स आहे. मार्क्सच्या पुस्तकाचे नाव भांडवल असे आहे. गोखले इन्स्टिट्यूटच्या नावात पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स आहे. सगळीकडे जाणवते हे, की राजवटी आणि त्यांच्या अर्थव्यवहाराच्या नीती, यांना सुटे करणे शक्य नाही.
पण राजवटींच्या आर्थिक-राजकीय विचारधारा आणि राजवटींमधले अन्याय यांची सांगड घालताना माणसे भेदभाव करतात.
विनाशकाले विपरीत ‘धर्म’
अलिकडेच तीन आंतरराष्ट्रीय परिषदा झाल्या. एक मुंबईत, दुसरी ढाका येथे आणि तिसरी ब्रुसेल्सला. तीनही ठिकाणी चर्चासत्रांचा मुख्य विषय होता – धर्म आणि दहशतवाद. धर्म हा हिंसेची वा हत्याकांडाची प्रेरणा कशी होऊ शकतो? गांधीजींची हत्या करणारा नथुराम कोणत्याही व्यक्तिगत स्वार्थाने प्रेरित झालेला नव्हता, तर प्रखर हिंदुत्वाने भारलेला होता. इंदिरा गांधींना ठार मारणारे शीख सुरक्षा गार्ड्स हेही धर्मभावनेने झपाटलेले होते. फाळणीच्यावेळी झालेला लक्षावधी लोकांच्या हिंसेचा आगडोंब, दक्षिण आणि उत्तर आयर्लंडमधील कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट ख्रिश्चनांमधील १०० वर्षे चालू राहिलेला हिंसाचार, इस्रायल आणि पॅलेस्टिन यांच्यात आजही चालू असलेले घनघोर युद्ध या सर्वांमागे धर्म हीच उदात्त प्रेरणा आहे.
साहित्याचा एकाकी/एकटा आवाज
मी आता आपल्यासमोर जे काही मांडणार आहे ते एका टीकाकाराच्या किंवा व्यावसायिक समीक्षकाच्या दृष्टिकोणातून नव्हे वा एखाद्या अॅकॅडेमिक प्रोफेसरच्या दृष्टिकोणातूनही नव्हे. तो आहे एका लेखनकर्मीचा दृष्टिकोण, ज्याच्यासाठी साहित्य हे गेली चाळीस-पन्नास वर्षे एक आसऱ्याचे ठिकाण, निवारा-आणि दुःख आणि वेदनांच्या क्षणी परमशांती आणि सांत्वना देणारा असा एक चिरतन स्रोत राहिलेले आहे.
फॉकनरने कुठेतरी असे म्हटलेले आहे की ज्या माणसांना आयुष्य जगता येते ती ते जगतात, आणि ज्यांना ते जमत नाही अशी माणसे आयुष्याविषयी लिहितात. मी या दुसऱ्या वर्गात मोडणारा आहे. खरे तर प्रत्येक कलावंत हा कमी अधिक प्रमाणात त्या प्रागैतिहासिक आदिम कलावंतासारखाच असतो, जो लाखो वर्षांपूर्वीच्या त्या काळात, इतरांबरोबर शिकारीला न जाता मागे गुहेत थांबायचा; इतरांच्या जगण्याचे तो निरीक्षण करायचा.
पुरुषांच्या नावे एक खुले पत्र
प्रिय सद्गृहस्थहो, आमच्याविषयी व आमच्या उद्दिष्टांविषयी आपण आपल्या मनात काही गैरसमज बाळगून आहात, असे आमच्या निदर्शनास आले आहे. आपण सर्व एकत्र येऊन एक अधिक संतुलित समाज बनविण्याच्या कामात या गैरसमजुती व काही तद्दन खोट्या गोष्टींमुळे अडथळा निर्माण होतो. आपल्या मनातील हे अपसमज-गैरसमज दूर करावे अशी आमची मनापासून इच्छा आहे. कृपया तसे करण्याची संधी आम्हाला द्यावी.
१. तुमचे लिंगच्छेद करण्याचा आमचा अजिबात इरादा नाही.
२. (स्त्री व पुरुषांच्या) भूमिकांची अदलाबदल करणे हे आमचे ध्येय नाही. हजारो वर्षे आम्ही ज्या तुरुंगात खितपत पडलो त्यात तुम्हाला बंदिस्त करून ठेवणे हे आमचे उद्दिष्ट नाही.
‘मी’ आणि ‘माझे
विवेकी स्वार्थ हा कार्लचा धर्म आहे. तो मुक्त बाजारपेठेच्या वेदीवर पूजा करतो. फ्रॉईड जसे सर्व काही सुरत (Sex) आहे, असे मानायचा, तसे कार्ल सर्व सामाजिक व्यवहार, मग ते कितीही व्यामिश्र असोत, सोडवायला त्यांवर किंमतीचे लेबल लावतो, नागरी गृहसमस्या, शिक्षण. स्पर्धा आणि नफ्याची आशाच सर्व प्रश्न सोडवू शकते. मोठी थिअरी आहे, ही. सर्वांना प्रवाहातून त्यांचे त्यांचे बादलीभर पाणी घेण्यासाठी झगडू द्या, आणि त्या पाण्याचा हवा तो वापर करू द्या. काहीजण त्या पाण्यापासून वाफ बनवतील, काही पाणी पितील, काही आंघोळ करतील. उद्योजकता फोफावेल आणि लोक सुखी होतील.