विषय «इतर»

जीव आणि जाणीवः उत्क्रांतिवादी दृष्टिकोन

स्वीकारलेल्या मर्यादा वैज्ञानिक दृष्टीने जीव (life) आणि जाणीव (consciousness) या संकल्पनांकडे पाहणाऱ्यांपैकी अनेकांना, विशेषतः जीवशास्त्रज्ञांना पटणारा दृष्टिकोन इथे मांडलेला आहे. काहीजणांना तो मर्यादित, सीमित वाटू शकतो. त्यामुळे त्या दृष्टिकोनाने स्वीकारलेली काही गृहीतके (assumptions) सुरुवातीला स्पष्ट करू.

१) ज्या भावना, विचार, श्रद्धा एखाद्याच व्यक्तीपुरत्या, किंवा मूठभरच व्यक्तींपुरत्या आहेत आणि ज्या ते इतरांना सांगू शकत नाहीत, त्या या चर्चेपुरत्या बाद केल्या आहेत. कधीकधी एखादी सुटी बाब उद्बोधक ठरू शकते, हे इथे नाकारले जात नाही आहे. पूर्णतः व्यक्तिनिष्ठ माहिती इतरांना शंकास्पद वाटू शकते, म्हणून ती वगळण्याचा सावधपणा दाखवला आहे, इतकेच.

पुढे वाचा

सारे ठरीव? का सारे घडीव ?

एक शिक्षक होता. त्याचा मुलगा दुसऱ्याच गावातील एका दुसऱ्या शाळेत शिकत होता. त्या मुलाचा दहावीच्या परीक्षेत बोर्डात नंबर आला. शिक्षकाचा ऊर अभिमानाने भरून आला. त्याच्या मनात आले, “शेवटी माझाच मुलगा आहे हा. बुद्धीचा आनुवंशिक वारसा मिळाल्यामुळेच हे यश मिळवणे त्याला शक्य झाले.’ संध्याकाळी त्याचा एक विद्यार्थी पेढे द्यायला आला. त्याचाही बोर्डात नंबर आला होता. शिक्षकाचा ऊर पुन्हा अभिमानाने भरून आला. त्याच्या मनात आले, “शेवटी मीच शिकविले त्याला. ही मुले म्हणजे मातीचे गोळे असतात. आकार द्यावा तशी घडवता येतात.

‘ या शिक्षकाच्या जागी तुम्ही-आम्ही कोणीही असतो, तरी असेच विचार मनात आल्यावाचून राहिले नसते.

पुढे वाचा

डार्विन आणि शेती

जागतिक इतिहासात – विशेषतः युरोपच्या संदर्भात – एकोणिसावे शतक हे एका मोठ्या मन्वंतराचे आणि सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रांत दूरगामी परिणाम घडवून आणणारे राहिले आहे. वैज्ञानिक प्रगती, औद्योगिक क्रांतीचा प्रसार, भांडवलशाहीचा पगडा व लोकशाहीचा उद्गम ही या कालखंडाची वैशिष्ट्ये होत.

एकोणविसाव्या शतकातील विज्ञानाचा जेवढा व्यापक परिणाम समाजजीवनावर झाला, तेवढा याआधीच्या काळात झाला नव्हता. या काळात विज्ञान सर्वव्यापी झाले. सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनामध्ये असा कोणताही प्रश्न नाही की जो विज्ञानाने सोडविता येणार नाही, असा समज पसरला. विज्ञानावरील या आगळ्यावेगळ्या भक्तिभावामुळे त्या काळातील विज्ञानाला एक विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली.

पुढे वाचा

भारतात डार्विन

एकोणिसाव्या शतकाने तीन गोरी, दाढीवाली माणसे घडविली. त्यांना कोणी द्रष्टे म्हणतात, तर कोणी राक्षस म्हणतात. हे आहेत डार्विन, मार्क्स आणि फ्रॉईड. यांपैकी फ्रॉईड भारताच्या बौद्धिक जीवनात कुठेच दिसत नाही. त्याचे विचार माणसाचे मन आणि अंतर्मन यांबाबत होते; आणि यासाठी भारतात स्थानिक गुरु आहेत. त्यामुळे फ्रॉईडचा येथील परिणाम नगण्य असणे हे सहज समजण्यासारखे आहे. मार्क्स मात्र भारतात खूपच प्रभावशाली ठरला आहे. त्याच्या नावाचा पक्ष दोन राज्यांमध्ये सत्तेवर आहे. भारतीय समाज आणि राजकारणाचा विचार करताना मार्क्सबाबा नेहमीच आसपास असतो. अनेक पिढ्यांचे विचारवंत मार्क्सला भारतीय गुरुपरंपरेत बसवायला धडपडत आहेत.

पुढे वाचा

“धक्कातत्त्व”: पुस्तक-परिचय

एखाद्या राजवटीत जाणता अजाणता झालेल्या जुलमांसाठी व अन्यायांसाठी त्या राजवटीमागच्या विचारधारेला जबाबदार धरणे योग्य की अयोग्य? बरे, सर्वच राजवटी, त्यांमागच्या विचारधारा, वगैरेंची आर्थिक अंगे महत्त्वाची असतात. कौटिल्याच्या राज्य कसे चालवावे याबाबतच्या ग्रंथाचे नाव अर्थशास्त्र असे आहे. अॅडम स्मिथच्या पुस्तकाचे नाव द वेल्थ ऑफ नेशन्स आहे. मार्क्सच्या पुस्तकाचे नाव भांडवल असे आहे. गोखले इन्स्टिट्यूटच्या नावात पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स आहे. सगळीकडे जाणवते हे, की राजवटी आणि त्यांच्या अर्थव्यवहाराच्या नीती, यांना सुटे करणे शक्य नाही.

पण राजवटींच्या आर्थिक-राजकीय विचारधारा आणि राजवटींमधले अन्याय यांची सांगड घालताना माणसे भेदभाव करतात.

पुढे वाचा

‘मी’ आणि ‘माझे

विवेकी स्वार्थ हा कार्लचा धर्म आहे. तो मुक्त बाजारपेठेच्या वेदीवर पूजा करतो. फ्रॉईड जसे सर्व काही सुरत (Sex) आहे, असे मानायचा, तसे कार्ल सर्व सामाजिक व्यवहार, मग ते कितीही व्यामिश्र असोत, सोडवायला त्यांवर किंमतीचे लेबल लावतो, नागरी गृहसमस्या, शिक्षण. स्पर्धा आणि नफ्याची आशाच सर्व प्रश्न सोडवू शकते. मोठी थिअरी आहे, ही. सर्वांना प्रवाहातून त्यांचे त्यांचे बादलीभर पाणी घेण्यासाठी झगडू द्या, आणि त्या पाण्याचा हवा तो वापर करू द्या. काहीजण त्या पाण्यापासून वाफ बनवतील, काही पाणी पितील, काही आंघोळ करतील. उद्योजकता फोफावेल आणि लोक सुखी होतील.

पुढे वाचा

ई!

२६ फेब्रुवारी ‘०९ च्या लोकसत्ता मध्ये प्रशांत मोरे यांचा मराठी मासिकांची ग्लोबल स्पेस! हा लेख आहे. त्याचा मुख्य भाग असा.
निरनिराळी प्रसारमाध्यमे वरकरणी एकमेकांना मारक ठरत असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात ती परस्परपूरक असतात. माध्यमांचे हे “एकमेका साह्य करू’ धोरण सध्याच्या बदलत्या काळात काहीशा मागे पडलेल्या मराठी भाषेतील मासिक स्वरूपात प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांना अनुकूल ठरल्याचे दिसत आहे. पुणेस्थित साची वेबनेट प्रा. लि. या कंपनीने ‘मायईमॅगझिन्स डॉट कॉम’ नावाचे संकेतस्थळ इंटरनेटच्या महाजालात मराठी मासिकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. यानिमित्ताने माध्यमांच्या कोलाहलात कसेबसे तग धरून राहिलेल्या मराठी मासिकांना चक्क ग्लोबल स्पेस मिळाली आहे.

पुढे वाचा

एक क्रान्तीः दोन वाद (भाग ५)

[एक क्रान्तीः दोन वाद च्या पहिल्या भागात औद्योगिक क्रान्तीसोबत घडत गेलेल्या भांडवली उत्पादनव्यवस्थेच्या सुरुवातीच्या रूपाची ओळख आपण करून घेतली. दुसऱ्या भागात आपण इंग्लंडच्या लोकसंख्येवर व कायद्यांवर झालेले परिणाम तपासले. सोबतच आदिम समाजवादी विचार, मार्क्सचे विचार व अमेरिकेतील व्यवस्थापित भांडवलवाद तपासले. तिसऱ्या भागात आपण क्यूबा व स्वीडन या दोन देशांमधील समाजवादाच्या आवृत्त्या तपासल्या. गंमत म्हणजे स्वीडन हे चांगला समाजवाद व चांगला भांडवलवाद या दोन्हींचे उदाहरण मानले जाते! यानंतर आपण काही देशांचा इतिहास तपासून पुढे पुनर्बाजारीकरणाचे प्रयत्न व त्यानंतरचे प्रश्न पाहिले. आपण जवळजवळ आजपर्यंत आलो आहोत !

पुढे वाचा

पवित्रतेची बदलती व्याख्या

प्रभाकर नानावटी नवीन संस्कृती
आर्थिक व्यवहारांचे व माहिती-संवाद तंत्रज्ञानाचे सार्वत्रिकीकरण होत असलेल्या या कालखंडात सर्वस्वी वेगळी वाटणारी संस्कृती मूळ धरू पाहत आहे. ही नवीन संस्कृती मानवी हिताची असेल किंवा नसेलही. आता अस्तित्वात असलेल्या संस्कृतीच्या उलथापालथींची अनेक कारणे असू शकतील. पृथ्वीतलावरील प्रत्येकाला हवामानबदलाचा फटका बसत आहे. आपल्यातील सर्वांना पेट्रोलियम पदार्थ संपून जाण्याच्या भीतीने त्रस्त केले आहे. ऊर्जास्रोतांची कमतरता/अभाव या भीतीमुळे आपल्या सर्वांनाच आर्थिक अरिष्टांना सामोरे जावे लागेल की काय अशी धास्ती वाटत आहे. हीच धास्ती पाण्यासाठी, अन्नासाठी, ऊर्जास्रोतांसाठी ठिकठिकाणी युद्ध पेटवत आहे.

पुढे वाचा

विनाशकाले विपरीत ‘धर्म’

अलिकडेच तीन आंतरराष्ट्रीय परिषदा झाल्या. एक मुंबईत, दुसरी ढाका येथे आणि तिसरी ब्रुसेल्सला. तीनही ठिकाणी चर्चासत्रांचा मुख्य विषय होता – धर्म आणि दहशतवाद. धर्म हा हिंसेची वा हत्याकांडाची प्रेरणा कशी होऊ शकतो? गांधीजींची हत्या करणारा नथुराम कोणत्याही व्यक्तिगत स्वार्थाने प्रेरित झालेला नव्हता, तर प्रखर हिंदुत्वाने भारलेला होता. इंदिरा गांधींना ठार मारणारे शीख सुरक्षा गार्ड्स हेही धर्मभावनेने झपाटलेले होते. फाळणीच्यावेळी झालेला लक्षावधी लोकांच्या हिंसेचा आगडोंब, दक्षिण आणि उत्तर आयर्लंडमधील कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट ख्रिश्चनांमधील १०० वर्षे चालू राहिलेला हिंसाचार, इस्रायल आणि पॅलेस्टिन यांच्यात आजही चालू असलेले घनघोर युद्ध या सर्वांमागे धर्म हीच उदात्त प्रेरणा आहे.

पुढे वाचा