विषय «इतर»

लढाया नको म्हणून आया ठार करताहेत मुलांना

दोन जमातींमध्ये सतत होणाऱ्या लढाया थांबवण्यासाठी पापुआ न्यू गयानातील आदिवासी भागातील आयांना अत्यंत क्रूर निर्णय घ्यावा लागत आहे. या लढाया थांबवण्यासाठी गेल्या १० वर्षांत जन्माला आलेल्या सर्व मुलांना मारून टाकण्याचा निर्णय या माता घेत असल्याचे इथल्या दोन महिलांनी एका स्थानिक वृत्तपत्राला सांगितले. गेली २० वर्षं पापुआ न्यू गयानातील ईस्टर्न हायलॅण्डस् या भागात सततच्या लढायांनी हे लोक त्रस्त आहेत.
रोना ल्यूक आणि किपीयोना बेलास या दोन महिलांनी एका शांततेसाठी भरवलेल्या बैठकीत ही माहिती दिली. या लढाया संपवण्यासाठी इथल्या मातांना अक्षरशः मनावर दगड ठेवून हा निर्णय घ्यावा लागला आहे.

पुढे वाचा

‘प्रायोजित’ अहवालाचा पंचनामा

विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसंदर्भात नरेंद्र जाधवांचा अहवाल वादग्रस्त ठरला आहे. जाधव ‘सरकारी तज्ज्ञ’ आणि पी. साईनाथ व इतर हे वास्तवाचे वेगळे चित्र रेखाटणारे, यांच्यात हा वाद आहे.
नोम चोम्स्कीने नोंदले आहे की कोणत्याही घटनेबाबत ‘भरवशाची’ माहिती देणारे तज्ज्ञ प्रस्थापितांपैकीच असण्याने वार्तांकनाचा तटस्थपणा हरवतो, व ते संमतीचे उत्पादन (आसु १६.४, १६.५, जुलै व ऑगस्ट २००५) होऊन बसते. या पातळीवरही जाधव अपुरे पडत आहेत हे ठसवणारी श्रीनिवास खांदेवाले यांची पुस्तिका जाधव समितीची अशास्त्रीयता (लोकवायय, डिसें. ‘०८) संक्षिप्त रूपात आसु च्या वाचकांपुढे ठेवत आहोत.
एक विशेष विनंती-हा लेख जाधवांचा भंडाफोड म्हणून न वाचता शेतीबाबतच्या समस्या, त्याही व हाडः सोन्याची कुन्हाड या क्षेत्रातील, असे समजून वाचावा – सं.]

पुढे वाचा

एक क्रान्तीः दोन वाद (भाग ३)

[एक क्रान्तीः दोन वाद च्या पहिल्या भागात औद्योगिक क्रान्तीसोबत घडत गेलेल्या भांडवली-उत्पादनव्यवस्थेच्या सुरुवातीच्या रूपाची ओळख आपण करून घेतली. दुसऱ्या भागात आपण इंग्लंडच्या लोकसंख्येवर व कायद्यांवर झालेले परिणाम तपासले. सोबतच आदिम समाजवादी विचार, मार्क्सचे विचार व अमेरिकेतील व्यवस्थापित भांडवलवाद तपासले. आता त्यापुढे-]
क्यूबा
१८९५ साली क्यूबा स्पेनपासून स्वतंत्र झाला. लोकशाही व्यवस्थेत वारंवार सेनेचा हस्तक्षेप, हा क्यूबाचा स्थायीभाव झाला, आजच्या पाकिस्तानसारखा. १९४० साली सेनाप्रमुख फुल्जेंशिओ बातिस्ता राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडला गेला. १९५२ साली निवडणूक हरल्यावर सेनाप्रमुख या नात्याने बातिस्ताने सत्ता काबीज केली. यात अमेरिकेने त्याची पाठराखण केली.

पुढे वाचा

डार्विनच्या शोधाची एकशेपन्नास वर्षे

येत्या जून-जुलैच्या सुमारास वरील विषयावर विशेषांक काढायची योजना आहे. त्यासाठी नियोजित अतिथि-संपादक, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ ह्यांनी घडवलेले पत्र सोबत देत आहोत. हे पत्र अनेक तज्ज्ञांना तर पाठवले जात आहेच, परंतु आसु च्या लेखकांपैकी कोणास लिहिण्याची इच्छा असल्यास त्यांनी अतिथि-संपादकांशी संपर्क साधावा या हेतूने हे पत्र देत आहोत. संपर्काचा पत्ताः रवींद्र रु. पं., ८ आदर्शनगर, शिरपूर ४२५ ४०१.
ईमेल-rpravindra@rediffmail.com;
भ्रमणध्वनी ९७६४६ ४२४३४, ९८६९० ८७८८३
आजचा सुधारक हे विवेकवादी चिंतनाला वाहिलेले व मुक्त-सर्वंकष विचारविमर्शाचे व्यासपीठ बनू पाहणारे मराठी मासिक आहे. वर्षातील किमान एक अंक एखाद्या विशिष्ट विषयावर सखोल चर्चा घडवून आणणारा विशेषांक असावा असा आमचा प्रयत्न असतो.

पुढे वाचा

संघटित भावना आणि नगरसंस्कृती (Collective Emotion and Urban Culture)

मुंबईमध्ये मराठी विरुद्ध बिगरमराठी आंदोलने होणे हे तसे नवीन नाही. राजकीय लाभासाठी काही तरी भावनात्मक निमित्त शोधण्याचे प्रयत्न राजकारणी करीत असतात आणि मुंबईसारखे महानगर ही त्यासाठी सुपीक भूमी असते. सर्व जगातील महानगरी समाजांमध्ये स्थानिक आणि भाषिक अस्मिता दिसतात आणि त्यांचा हिंसक उद्रेक काही ना काही निमित्ताने होत असतो. वैयक्तिक भावनांप्रमाणेच अनियंत्रित संघटित भावनांचा असा सामाजिक उद्रेक मानवी बुद्धीची कवाडे बंद करतो. तसे झाले की त्याचा राजकीय लाभ मतलबी राजकारण्यांना सहजपणे उठवता येतो. मुंबईमध्ये अशी चळवळ जोर धरत असतानाच नोव्हेंबर महिन्याच्या २६ तारखेला मुंबईवर दहशतवाद्यांचा हल्ला हा भारताला हादरा देणारा ठरला.

पुढे वाचा

‘आधुनिकतावादी’ या संज्ञेत प्रस्तुत लेखकास काय अभिप्रेत आहे? (नवपार्थहृद्गत ह्या पुस्तकामधील प्रास्ताविक विभागः चार)

खरे तर नवपार्थाने आत्मसात् केलेला आधुनिकतावाद, ही गोष्ट, ज्या भावनांनी तो गीतासंहितेला अनुसाद/प्रतिसाद देतो, त्या भावनांच्या अभिव्यक्तीतून वाचकांना जाणवल्याखेरीज राहणार नाही. किंबहुना हृद्गत-वाचनाच्या अनुभवातून आधुनिकतावादही उमगणे हे जास्त समृद्ध करणारे आहे. अगोदरच कोरडी व्याख्या देण्याने काहीसा रसभंगच पत्करावा लागेल. ज्या वाचकांना संज्ञेपेक्षा भाव जवळचा वाटतो त्यांनी खालील मजकूर आत्ता टाळून हृद्गतवाचनानंतर तो वाचण्यात त्यांना लाभ आहे.
परंतु लेखकास, त्याने काय करायला घेतले आहे याबाबत पारदर्शक राहण्याचे, कर्तव्यही बजावायला हवेच. म्हणूनच उपशीर्षकापासून वापरलेल्या ‘आधुनिकतावाद’ या संज्ञेची सूत्रमय, संक्षिप्त व पारिभाषिक संज्ञांनी संपृक्त अशी रूपरेषा येथे देत आहे.

पुढे वाचा

विस्तारणारी क्षितिजे

नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात नागपूरमध्ये दृश्यकलेचा एक अभूतपूर्व उत्सव साजरा केला गेला. “विस्तारणारी क्षितिजे’ नावाचे आधुनिक आणि समकालीन भारतीय दृश्यकलेचे एक प्रदर्शन त्या काळात नागपूरमध्ये भरले होते. ह्या प्रदर्शनाच्या निमित्ताने आणि जणुकाही त्याच्या स्वागतासाठी म्हणून नागपुरातील सिस्फा आर्ट गॅलरीने शहरातील लहान-मोठ्या आर्ट गॅलरीजमध्ये अनेक छोटी छोटी प्रदर्शने भरवली होती. आठवडाभर नागपुरातील चित्ररसिकांना कलेची एक मेजवानीच उपभोगायला मिळाली.
विस्तारणारी क्षितिजे’ हे प्रदर्शन प्रसिद्ध चित्रकार सुधीर पटवर्धन आणि बोधी आर्ट गॅलरी ह्यांच्या अथक प्रयत्नांतून आकारास आले. महानगरातच गोठल्या गेलेल्या समकालीन भारतीय दृश्यकलेची ओळख महाराष्ट्रातील इतर भागातील प्रेक्षकांनाही व्हावी ह्या हेतूने निवडक कलाकारांची चित्रे घेऊन आठ शहरांमध्ये हे प्रदर्शन त्यांनी फिरविले.

पुढे वाचा

सैनिक आणि सेनापती

सैनिक आणि सेनापती हे एकाच एककातले उपप्रकार असतात ड्ड एक मुळातला आणि दुसरा परिवर्तित रूपातला. पण त्यांचा सुटा विचार करता येतच नाही. एकेकटे पाहता त्यांना ना संदर्भ असतात ना उपयुक्तता. हे समाजातही असते ड्र सैनिक आणि त्याचा सेनापती हे समाजाचेच लहानसे चित्र असते. सैनिकाची क्षमता आणि अस्तित्वही सेनापतीवरच अवलंबून असते. सेनापतीच सैनिकाला त्याची ओळख व त्याचे स्थान देत असतो. चांगले सेनापती कमकुवत सैनिकांपासून चांगले सैनिक घडवताना दिसतात. दुसऱ्या दिशेने चांगले सैनिक कमकुवत सेनापतींनाही पुढे नेतात. सक्षम सेनापती नेहेमीच चांगले सैनिक घडवतात.

पुढे वाचा

अमेरिकेचे दहशतवादाविरुद्धचे ‘प्रत्युत्तर’ चुकीचे का होते

मूळ लेखक: पी. साईनाथ

मुंबईमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १८०हून अधिक लोक ठार झाल्यानंतर दहशतवादाला रोखण्यासाठी जे अनेक प्रकारचे युक्तिवाद केले जात आहेत, त्यांपैकी सर्वांत चुकीचा व घातक युक्तिवाद आहे तो असाः
अशा प्रकारच्या दहशतवादास कसे प्रत्युत्तर (response) द्यायचे याचे धडे अमेरिकेकडून भारताने घेतले पाहिजेत. “जरा अमेरिकेकडे पहा- सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेत एकही दहशतवादी हल्ला झाला का?”
अशा प्रकारचा युक्तिवाद अनेक जणांकडून ऐकायला मिळतो. थोडक्यात त्यांचे म्हणणे असे असते की त्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेच्या बुश प्रशासनाने जे उपाय केले त्यांमुळे पुन्हा दहशतवादी हल्ला करायचे धाडस कुणीही केलेले नाही.

पुढे वाचा

एका वैज्ञानिकाचा विवेकवाद

या संदर्भात फाईनमन या वैज्ञानिकाचे महत्त्वाचे वचन आठवणीतून उद्धृत करतो. “कुठल्याही वैज्ञानिक सिद्धान्ताच्या सत्यतेचा अंतिम निकष म्हणजे प्रत्यक्ष प्रायोगिक पडताळा. तुमचा सिद्धान्त कितीही तर्कसंगत व सुंदर असेल, पण जर त्याचे निष्कर्ष प्रायोगिक निरीक्षणांशी जुळत नसतील, तर तो सिद्धान्त चुकीचा आहे. मग तुमचे नाव काहीही असो, तुम्ही कितीही बुद्धिमान असा, तुम्हाला कितीही पारितोषिके मिळालेली असोत. तुमचा सिद्धान्त अनुभवांशी जुळत नसेल, तर तो निखळपणे असत्य आहे.’ केवळ विज्ञानातच नाही, तर कोणत्याही वास्तवाकडे बघताना ध्यानात ठेवावा, असा हा सावधगिरीचा इशारा आहे.
तत्त्वज्ञानाविषयी बोलायचे झाले, तर मी वेडेवाकडे वाचन बरेच केले.

पुढे वाचा