विषय «इतर»

एकोणिसाव्या शतकातील भारतीय स्त्रीशिक्षणाचा औपचारिक आरंभ

स्त्रियांना शिक्षणाचा शताकनुशतके नाकारला गेलेला जन्मसिद्ध हक्क त्यांना नुकताच प्राप्त होऊ लागला आहे. स्त्रीशिक्षण हा शब्द आणि संकल्पना एकोणिसाव्या शतकारंभी औपचारिकदृष्ट्या रूढ झाली. पाश्चात्त्य वाङ्मय आणि संस्कृतीच्या परिशीलनाने एकोणिसाव्या शतकातील विचारवंतांनी स्त्रीशिक्षणाच्या प्रयत्नांना सुरुवात केली. स्त्रीशिक्षणाच्या अभावातच स्त्रीजीवनातील गुलामगिरीची बीजे रुजली असल्याची जाणीव या विचारवंतांत हळूहळू दृढ होत गेली. भंग्याची मुलगी राष्ट्राध्यक्ष व्हावी असे महात्मा गांधींनी त्यामुळेच म्हटले होते. एका स्त्रीच्या शिकण्याने सारे कुटुंब सुशिक्षित बनते; आणि कुटुंब हा समाजजीवनाचा पाया स्त्रीशिक्षणाच्या अभावी रोवला जाणार नाही अशा विचारांची खूणगाठ तत्कालीन विचारवंतांनी निश्चित केली.

पुढे वाचा

सत्य

सत्याचे आह्वान, बुद्धीचे विधान
सत्याचे स्वरूप, दमणूक.
सत्य काडीमोड, सत्यप्रतिशोध
सत्य तो आनंद, परावलंबी.
सत्य प्राणिमात्र, सत्य सर्व गात्र
गात्रांचे नवल, सत्यशोध.
आभास सत्य, विश्वास सत्य,
अश्रद्ध सत्य, ऐहिकाचे.
सत्य पंचतत्त्व, सत्य गुणसूत्र
सत्य अणुस्फोट, पृथ्वीवरी.
सत्य गरजवंत, सत्य प्रज्ञावंत
सत्य अदलाबदल, दोघांचीही.
सत्य जीवशास्त्र, सत्य गर्भज्ञान
सत्य संगतीच्या, निर्जीवाचे.
सत्य आसवांत, सत्य विचारात
सत्याची कायम, हालचाल.
सत्यविलासात, सत्य संन्यासात
सत्याचे पाय, फरपटते.
सत्य लिंग फक्त, सत्य योनीमात्र
सत्याचा ओरखडा, एकमेकां.
सत्य भूक जोर, सत्य पचन थोर
सत्याचे आतडे, लांबवर.
कातडे सत्य, बचाव सत्य,
सत्य मांसगोळा, भौतिकाचा.

पुढे वाचा

हिंदूच्या देवळांची उत्पत्ती

हिंदूच्या देवळांची उत्पत्ती
इसवी सनाच्या दुसऱ्या व तिसऱ्या शतकापर्यंत हिंदुजनांत व हिंदुस्थानात देवळे घुसलेली नव्हती. आत्मवर्चस्वाभिमानी भटांच्या भिक्षुकशाहीने नवमतवादी बौद्धधर्माचा पाडाव करून भटी वर्चस्वस्थापनेसाठी महाभारताच्या व रामायणाच्या जुन्या आवृत्त्या मनसोक्त घालघुसडीच्या फोडणीने फुगविल्या आणि मनुस्मृतीला जन्म दिला. मात्र त्या काळच्या कोणत्याही वाङ्मयात देव आणि देवळे आढळून येत नाहीत. नाही म्हणायला, बौद्धधर्मी अशोक सम्राटाच्या आमदनीपासून बौद्ध भिक्षूच्या योगक्षेमासाठी आणि स्वाध्यायासाठी ठिकठिकाणी मोठमोठे विहार, लेणी, गुहा, संघ, मंदिरे ही अस्तित्वात आलेली होती. पुढे पुढे या संघमंदिरांत महात्मा बुद्धाच्या मूर्ती स्थापन करून त्यांच्या पूजाअर्चा बौद्धाच्या हीनयान पंथाने सुरू केल्या.

पुढे वाचा

मानवी अस्तित्व (७)

माणसात ‘स्वत्व’ (self) असे काही असते का?

आपण जेव्हा झोपतो तेव्हा ती नाहीशी होते. जागे होतो तेव्हा परत आपोआप आलेली असते. काही वेळा स्वप्नात येते. काही वेळा स्वप्नच गायब झालेले असतात. हे शरीर माझेच आहे व मीच त्याचे नियंत्रण करत आहे याची जाणीव देणारे असे काही तरी आपल्यात असावे. त्यामुळे आपण आपली वेगळी ओळख पटवून देत असतो. हीच ओळख आयुष्यभर आपली सोबत करते; काही वेळा अनुभवांच्या आठवणीतून व काही वेळा भविष्यात डोकावून. हे सर्व एखाद्या गाठोड्यासारखे वाटते. तेच कदाचित आपल्यातील ‘स्व’ची जाणीव असू शकेल.

पुढे वाचा

आत्मा आणि पुनर्जन्म : सत्य की कपोलकल्पित? (भाग-२)

बहिर्गमन ही काय भानगड आहे?
गर्भनलिकेमध्ये जेव्हा वडिलांकडून आलेले पुंबीज आणि आईकडून आलेले स्त्रीबीज (Ovum) यांचा संयोग होतो तेव्हा आत्मा त्यात प्रवेश करतो आणि माणसाच्या मृत्यूच्या वेळी तो बाहेर पडतो अशी कल्पना आहे. ही कल्पना शास्त्राद्वारे चुकीची सिद्ध करण्याचा हा प्रयत्न:
1) एका वीर्यामध्ये (साधारण पाव चमचा) सहा ते बारा दशलक्ष शुक्राणू असतात. वीर्यपतनाच्या वेळी साधारण 3-4 घनसेंमी वीर्य पडते म्हणजे एका समागमाच्या वेळी दोन ते तीन कोटी इतके शुक्राणू मातेच्या योनिमार्गात सोडले जातात. त्यांतील फक्त एक शुक्राणू स्त्रीबीज फलित करतो.

पुढे वाचा

नास्तिकाची जडणघडण

कोवळे, शेंदरी कवडसे आधी आले. त्या लोभस उन्हात कवडेही ‘जगायला’ उतरले. त्यांना दाणे हवे होते आणि पाणी तर लागणारच होते. आम्ही त्यांच्या दाण्यापाण्याची सोय करू, करतोच, पण आम्हाला महागाई कणाकणाने फस्त करते आहे. त्याचे काय? येस्-फेस् करत, फेसबुकवर खिदळत, गुण उधळत जवान लोक सोन्यासारखा दिवस वाया घालवतानाही दिसतात. त्यांचे कुठे वनराईकडे लक्ष आहे? राईत देव नसेल, तर तिचे रक्षण कोण करेल? देव आहे असे मानावे तर अनाचाराचे अनार थुई थुई करतानाच दिसतात. आसपास त्या चटकचांदण्याच चमकते तुषार उडवत असतात. सणाचा धूरही विषारीच आहे.

पुढे वाचा

हतबलतेची जागतिक व्यापकता

सध्या सर्वत्र चीनचा बोलबाला आहे. संशोधने, आर्थिक क्षमता, नागरी व्यवस्था अशा अनेक संदर्भातून पाहता चीन आघाडीवर आहे. अमेरिकेच्या तर नाकी दम चीनने आणलेला आहे. चीनमध्ये बंडखोरी स्वागतार्ह तर मानली जात नाही, उलट बेमालूमपणे कापून काढली जाते. ऑलिंपिकमध्ये चीनला मिळणाऱ्या यशामागे खेळाडूंकडून उत्कृष्ट उतारा पदरात पडावा यासाठी त्यांचा लहानपणापासून अक्षरशः छळ केला जातो. याबद्दलच्या बातम्या आपण वाचलेल्या असतील.
शिक्षणव्यवस्थेतल्या भ्रष्टाचारातही चीन आपल्याप्रमाणेच आघाडीवर आहे. चांगल्या शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून तिथे स्वयंस्फूर्त देणग्या घ्याव्याच लागतात. या देणग्या फक्त प्रवेशासाठीच नाही तर हुशार मुलांच्या तुकडीत जाण्यासाठी इतकेच नाही तर वर्गात फळ्यासमोरच्या पहिल्या-दुसऱ्या रांगेतल्या बाकावर जागा मिळण्यासाठीही असतात.

पुढे वाचा

पत्रसंवाद

विनायक श्रीकृष्ण महाजन, अर्थ, मु.पो.कुडावळे, ता. दापोली, जि.रत्नागिरी-415712
आजचा सुधारकच्या ऑक्टो. 2012 च्या अंकामधील ‘कोरडवाहू शेतकऱ्यांच्या आजच हलाखीच्या स्थितीवर उपाय’ हा दिवाकर मोहनी यांचा लेख वाचला. या विषयावर चर्चा व्हावी अशी अपेक्षा त्यानी सुरुवातीसच व्यक्त केली आहे. चर्चेमध्ये सहभाग म्हणून काही गोष्टी लिहीत आहे. सर्वसमावेशक विकास असा धोशा लावणाऱ्या अर्थतज्ज्ञ पंतप्रधानांच्या काळात काय घडते आहे हे आपण सर्वजण पहात आहोत. अनुभवत आहोत.
आपला देश हा कृषिप्रधान आहे. इंग्रजांच्या राजवटीत देशाचे काय झाले यापेक्षा स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काय घडत आहे हे पहाणे औचित्याचे. आपण स्वतंत्र झालो तेव्हा देशाच्या एकूण उत्पन्नात 50% वाटा शेतीचा होता.

पुढे वाचा

सरंजामशाहीकडून भांडवलशाहीकडे

सरंजामशाहीकडून भांडवलशाहीकडे
आधुनिक भांडवलशाहीचा जन्म झाला आणि आधुनिक औद्योगिकीकरण उदयास आले, त्यावेळी, ज्यांना पाश्चात्त्य संस्कृतीचे प्रतिनिधी म्हणता येईल, असे काही विचारवंत निर्माण झाले. त्यांनी व्यक्तीच्या पराक्रमावर सरकारचे कसलेही बंधन असू नये, असे प्रतिपादन करण्यास सुरुवात केली. ‘प्रायव्हेट एन्टरप्राईजेस’ (खासगी उद्योगा)मुळे सर्वांनाच संधी मिळते. प्रत्येकाने आपापले हित पाहावे, म्हणजे सर्वांचेच हित साधेल, व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित राहील, ‘ग्रेटेस्ट गुड ऑफ दि ग्रेटेस्ट नंबर’ (जास्तीत जास्त लोकांचे हित) याच मार्गाने साधू शकेल, अशा प्रकारचे त्यांचे तत्त्वज्ञान होते.
सरंजामशाहीच्या जमान्यात सर्वसामान्य व्यक्तीला फारच थोडे स्वातंत्र्य असे.

पुढे वाचा

मानवी अस्तित्व (६)

माझ्यात जाणीव आली कुठून?

आपण कालकुपीत बसून आपला जन्म होण्यापूर्वीच्या काळात जायचे ठरविल्यास आपण त्यावेळी कुठे होतो, हे सांगता येईल का? पुन्हा एकदा कालकुपीत बसून आपल्या मृत्यूनंतरच्या भविष्काळातील फेरफटका मारण्याचे ठरविल्यास आपण कुठे आहोत, हे तरी सांगता येईल का? स्पष्ट सांगायचे तर आपण कुठेही नाही. एके दिवशी आपल्या तुटपुंज्या आयुष्याची काही कारण नसताना सुरुवात होते व विनाकारण समाप्तही होते. किती गुंतागुंत व गोंधळ? फक्त आयुष्याचा विचार करण्यासाठी जाणीव नावाची चीज असल्यामुळे असले भंपक प्रश्न आपल्याला सुचत असावेत, असेही वाटण्याची शक्यता आहे.

पुढे वाचा