एक होता कारसेवक ही अभिजित देशपांडे यांनी सांगितलेली त्यांच्यातील कारसेवकाची कहाणी आहे. ६ डिसेंबर १९९२ च्या उन्मादी कारसेवेत अभिमानपूर्वक सहभागी होऊन मशीद पाडणारा हा कारसेवक ज्यावेळी अयोध्येहून परतला, त्यावेळी पेटलेला देश पाहून पुरता हादरला, नि तेथून सुरू झाला त्याचा अजूनही न संपलेला वैचारिक प्रवास. आपण ज्यासाठी अयोध्येला गेलो होतो, ते हेच होते का ? यातून आपल्याला किंवा कुणालाही काय मिळाले? हेच का ते रामराज्य ? या उन्मादाने देशाचे भले होणार म्हणतात ते कसे ? असे प्रश्न या विशीच्या युवकाला पडले.
ह्याची वृत्ती मुळातच चिकित्सक “धर्माची तपासणी” करणारी म्हणून तर सडेतोड युक्तिवादाने जानवे कधीच खुंटीला टांगून ठेवलेले.
विषय «इतर»
अज्ञाताचे दार
मला शंका, अनिश्चितता, अज्ञान सहन करत जगता येते. एखादी गोष्ट माहीत नसताना जगणे हे चुकीच्या उत्तरांसोबत जगण्यापेक्षा जास्त रंजक आहे. ही एक बाब मान्य करा आपण प्रगती करत असतानाच खात्री नसणेही सोबत येईल; पर्याय सुचण्याच्या, शोधण्याच्या संधीही येतील, (मग) आपण आजचे तथ्य, आजचे ज्ञान, आजचे केवल सत्य, यांबाबत फार उत्साही असणार नाही, प्रगती साधायला अज्ञाताचे दार किलकिलेच असायला हवे.
[भौतिकीचा तज्ज्ञ, नोबेल पुरस्कार विजेता रिचर्ड पी. फाइनमन, द सायन्स ऑफ गुड अँड ईव्हिल (The Science of Good and Evil, Michael Shermer, Henry Holt & Co.,
गावगाडा २००६ (भाग-२)
[सध्याच्या खेडेगावांमधील सामाजिक स्थितीवर गांवगाडा-२००६ या नावाने काही लेख प्रकाशित करण्याची इच्छा आम्ही गेल्या अंकात नोंदली. अनिल (पाटील) सुर्डीकर यांच्या लेखाचा एक भागही गेल्या अंकात प्रकाशित झाला. हा लेखाचा पुढील भाग दिवाळीनंतर येते कार्तिकी एकादशी, पंढरपूरची वारी. एकूण चार मोठ्या एकादश्या आषाढी, कार्तिकी, माही व चैत्री. त्यांपैकी जास्त मोठ्या आषाढी व कार्तिकी. हा इकडचा भाग विदर्भ-मराठवाडा ते पंढरपूर अशा मार्गावर येत असल्याने बहुतेक प्रत्येक गावात पंढरपूरला जाणारी कोणत्यातरी भागातील पालखी जाताना अथवा येताना ठेपतच असते. त्या दिवशी गावात गडबड असते.
आपल्याला पंढरपूरला जाता येत नाही पण निदान पंढरपूरची वारी करणाऱ्यांचे सत्कार करून त्यांचे तरी दर्शन घ्यावे, अशी भावना असते.
मूल्यव्यवस्थेचा विकास
आमच्या मूल्यव्यवस्थेत मान्य व हव्याशा बदलांना जर विकास म्हटले, तर आम्ही विकासाचे केवळ विकास म्हणून विरोधक नाही. आमचा विकासाबाबतचा दृष्टिकोन श्रम-सघन, बेकारी उत्पन्न न करणाऱ्या तंत्रज्ञानांना महत्त्व देतो. अशी तंत्रज्ञाने संसाधनांच्या वापरात उपजीविकेच्या संधी उत्पन्न करतील. आम्ही नैसर्गिक संसाधने नष्ट किंवा प्रदूषित न करणाऱ्या तंत्रज्ञानाच्या पक्षाचे आहोत. आजच्या ग्रामीण समाजांच्या साध्या, उपभोगवादी नसलेल्या जीवनशैलीत ही संसाधने सुरक्षित आहेत. तंत्रज्ञानाची निवड अपरिहार्यपणे जीवनशैली व जीवनमानाच्या विकासाच्या दृष्टिकोनाशी निगडित असते.
मेधा पाटकरांची रॉबर्ट जेन्सेन यांनी घेतलेली मुलाखत मॉन्फकीरा (Monfakira) या कोलकात्याहून निघणाऱ्या नियतकालिकाने त्याच्या मे-जून २००६ च्या अंकात प्रकाशित (जुलै ७-१३, २००६) केली.
गावगाडा २००६ (भाग-१)
[त्रिंबक नारायण आत्रे यांचे गांवगाडा हे पुस्तक गेल्या शतकाच्या सुरुवातीच्या ग्रामीण महाराष्ट्राच्या समाजजीवनाचे उत्कृष्ट चित्र रेखाटते. प्रथम प्रकाशन १९१५ साली झालेले हे पुस्तक आजही उपलब्ध आहे. (‘वरदा’, पुणे, १९८९). मधल्या काळात पुस्तकातील अनेक शब्द सामान्य वाचकांना अनोळखी झाले असतील, या भावनेतून रा.वि. मराठे यांनी ‘गांवगाडा’चा शब्दकोश लिहून प्रकाशित केला. (मंजिरी मराठे, मुंबई, १९९०). पुस्तकाला पन्नास वर्षे होत असताना प्रसिद्ध अर्थशास्त्री वि.म.दांडेकर आणि शेतकरी म.भा.जगताप यांनी गावरहाटी या नावाने आत्र्यांच्या पुस्तकाला समांतर असे, पण किस्से-कहाण्यांच्या रूपातले पुस्तक घडवले (ह.वि.मोटे, मुंबई, १९६३). मूळ गांवगाडा इंग्रजीत ढहश तळश्रश्ररसश उसी या नावाने भाषांतरित झाल्याचेही स्मरते.
आपल्या अस्तित्वाचे गूढ (The mystery of our being – Max Plank )
विज्ञानाचे एक यश म्हणजे चमत्कारांविषयी मानवी श्रद्धेला मर्यादा निर्माण होणे, असे आपण सहजच गृहीत धरतो. पण असे काही घडल्याचे दिसत नाही. गूढ शक्तींच्या क्षमतेवर विश्वास असणे हे आजच्या काळातही आहेच. गूढविद्या आणि अध्यात्माच्या अनेकानेक प्रकारांची लोकप्रियता पाहिली की हे दिसून येते. विज्ञानातून निघणारे निष्कर्ष अगदी कुतूहलशून्य असणाऱ्या सामान्य व्यक्तीच्या नजरेतूनही सुटणे अशक्य आहे. तरीही शिक्षित व अशिक्षित माणसे, अनेकदा, त्यांच्या जीवनातल्या सामान्य प्रश्नावर प्रकाश पडावा म्हणून गूढ व धूसर प्रदेशात शिरतात. एखादा म्हणेल, की अशा प्रश्नासाठी मी तरी विज्ञानाचाच आधार घेईन.
फायनल ड्राफ्ट
मी मांसकांची ग्रंथतात्पर्यनिर्णयपद्धती वर्गात शिकवली नि त्याच दिवशी फायनल ड्राफ्ट नाटक पाहिले. कदाचित त्यामुळे मीमांसकांनी दिलेल्या सात कसोट्यांच्या आधारे नाटकाचे मूल्यमापन करण्याचा मोह झाला. उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, अर्थवाद, उपपत्ती व फल ह्या सात कसोट्या ग्रंथांचे तात्पर्य ठरविण्यासाठी वापरता येतात. ग्रंथांप्रमाणेच एखाद्या नाटकाचे तात्पर्य ठरविण्यासाठीही त्यांचा वापर करता येईल. सुरूवात (उपक्रम) व शेवट (उपसंहार) यांचा येथे प्राधान्याने विचार करावयास हवा.
फायनल ड्राफ्ट च्या सुरुवातीलाच जाणवतो, तो प्रचंड ताण. तब्बल एक तास निव्वळ वाट पाहण्यात गेला नि आता पुण्याला जाणे बोंबलले म्हणून अस्वस्थतेने धुमसणारे सर नि, एकंदरीतच, हबकून गेलेली विद्यार्थिनी.
शंका
जर हवा श्वास घेता येऊ नये इतकी घाणेरडी असेल, पाणी पिता येऊ नये इतके दूषित असेल, रस्ते गलिच्छ असतील, शाळा इतक्या वाईट असतील की तरुण लोक सुज्ञपणे त्यांच्यापासून दूर राहत असतील, कर चुकवून साठवलेल्या मूठभर डॉलर्ससाठी गुंड नागरिकांना लुबाडत असतील; तर मला थोडेसे अधिक डॉलर्स खर्चायला उपलब्ध असण्याच्या लाभाबद्दलच शंका वाटते.
[जॉन केनेथ गॅल्ब्रेथ (१९०९-२००६), अर्थशास्त्री, बहुप्रसव लेखक, अमेरिकेचे भारतातले माजी राजदूत टाईम १२ जून २००६ मध्ये उद्धृत.]
उपयोगितावाद (५): जॉन स्टुअर्ट मिल्
[२००६ हे जॉन स्टुअर्ट मिल्चे द्विशताब्दी वर्ष आहे. आजचा सुधारक चे संस्थापक संपादक दि.य. देशपांडे यांनी मिलच्या Utilitarianism चे केलेले भाषांतर या लेखमालेतून देत आहोत. विवेकवादाच्या मांडणीत मिल्चे स्थान व त्याचा आगरकरांवरील प्रभाव सर्वश्रुत आहे.]
प्रकरण ५: न्याय आणि उपयोगिता यांच्या संबंधाविषयी
विचारांच्या सर्वच युगात उपयोगिता किंवा सौख्य हा युक्तायुक्ताचा निकष आहे ह्या सिद्धान्ताला सर्वांत मोठा विरोध न्यायाच्या कल्पनेच्या आधाराने केला गेला आहे. त्या शब्दाने आपल्या मनात उद्भावित होणारी समर्थ भावना आणि स्वच्छ वाटणारी कल्पना ज्या त्वरेने आणि निश्चितपणे उद्भवते ती सहजप्रवृत्तीला समजेल अशी असते, आणि त्यामुळे बहुतेक विचारवंतांना ती निसर्गाचा अंगभूत भागच असल्याचे दिसते.
शेतकऱ्यांच्या आत्महत्याः डुर्खाइमच्या तत्त्वांनुसार विश्लेषण
जमिनीवरील वास्तवः
मराठेशाहीच्या व नंतरच्या (१८०३-१८५३) निजामशाही काळात अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये श्रमविभाजनाची आणि श्रममूल्याची बलुतेदारी पद्धत होती. ब्रिटिश राजवटीत जमिनींचे मालकी हक्क शेतकऱ्यांना देण्याची रयतवारी पद्धत अंमलात आली. सुरुवातीला करभार कमी होता, पण नंतर तो मोठ्या प्रमाणात वाढवला गेला. वसुलीसाठी मोठी नोकरशाही उभारली गेली. या पद्धतीत उच्चवर्णीय (ब्राह्मण, राजपूत) जातींनी मालकी हक्क प्रस्थापित केले. यात कुणब्यांचा वाटा सर्वाधिक होता. ‘खालच्या’ जाती कुळे बनून राहिल्या, तर अस्पृश्य (१५ ते २० टक्के लोक) भूमिहीन झाले. काही अस्पृश्यांना वतनी जमिनी होत्या, पण त्या भरड आणि हलक्या होत्या.