विषय «इतर»

खैरलांजीः मला जे आढळले

खैरलांजी येथे २९ सप्टेंबर रोजी झालेले भीषण हत्याकांड व त्यानंतर उसळलेल्या हिंसक आंदोलनाबाबत जनतेसमोर खरी माहिती आली नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. पोलिसांनी वेळीच प्रतिबंधक कारवाई केली असती तर कदाचित ती मानवतेला काळिमा फासणारी घटना टळली असती. स्वार्थी राजकारण करणाऱ्यांनी जनतेसमोर वस्तुस्थिती मांडली असती तर हिंसक आंदोलने झाली नसती. हिंसक आंदोलनांत भरकटलेल्या युवकांचे होणारे नुकसान बघून राहवले नाही म्हणून मी स्वतः वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी खैरलांजीला भेट दिली, माहिती घेतली, विचारपूस केली. सामाजिक हिताच्या दृष्टीने जनतेसमोर सत्य मांडणे माझे कर्तव्य समजतो.
खैरलांजी हत्याकांड घडण्याचे प्रमुख कारण जातीय, सामाजिक व आर्थिक व्यवस्था व कायद्याची मुळीच भीती नसणे हे आहे.

पुढे वाचा

Uncertain Science…. Uncertain World

विज्ञान म्हणजे अत्यंत वेगळे, बंदिस्त, एकाकी आप्लया जीवनव्यवहाराशी संबंध नसलेले असे काही तरी आहे असे अनेकांना वाटत आले आहे. यालाच मी आह्वान देत आहे. आपण विज्ञानयुगात राहत आहोत. तरीसुद्धा ज्ञान हे काही मूठभर लोकांच्या हातातील व त्यांच्या मालकीची मालमत्ता असे वाटत असल्यास ते अत्यंत चुकीचे आहे. विज्ञान हे आपल्या दैनंदिन जीवनाचा, व्यवहाराचा एक अविभाज्य अंग आहे. त्याला आपण वेगळे ठेऊ शकत नाही, तोडू शकत नाही. आपल्या अनुभवविश्वातील प्रत्येक अनभवाला का. कसे व केव्हा असे विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरच विज्ञान आहे.’
रॅचेल कार्सन
(Uncertain Science….

पुढे वाचा

ठिकऱ्याः बदलती जातिव्यवस्था

प्रस्तावना
एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर भारत अस्वस्थ आहे. राजकारण्यांचा वर्ग छिन्नभिन्न झालेला आहे. गेल्या तीन लोकसभांमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहमत नव्हते, आणि तेरावी लोकसभाही तशीच असेल. पन्नास वर्षांच्या स्वातंत्र्यानंतर जगातील सर्वांत जास्त गरीब लोक भारतात आहेत. मध्यमवर्ग अशाश्वतीने व इतर अडचणींनी ग्रस्त आहे. समाजवस्त्र फाटते आहे. कुटुंबसंस्था विरते आहे. गुंडगिरी, टोळीयुद्धे, देहविक्रय, एड्स, बकाली, सारे वाढते आहे. सर्व वैचारिका (ideologies) निस्तेज होऊन आपली सम्यकदृष्टी गमावत आहेत. प्रागतिक अवसरवाद; तात्कालिक, लहान गटांपुरत्याच कृती, या दूरदृष्टीवर मात करत आहेत. लोक तुच्छतावादाच्या (cynicism) आहारी जाऊन कोणताच पर्याय विश्वसनीय नाही, असे मानू लागले आहेत.

पुढे वाचा

ज्ञान

पृथ्वीवर ज्ञानाशिवाय अशी दुसरी कोणतीही वस्तु नाही, की जिचा कंटाळा न येतां, किंवा जिच्यापासून शरीरास किंवा मनास कोणतीही व्याधि न जडतां, जिच्या योगानें वृत्ति आमरण आनंदमय राहू शकेल. जे पुरुष ज्ञानसंपादनांत निमग्न झालेले असतात, त्यांसच या अमोलिक सुखाचा निरंतर लाभ होतो.
विश्वाच्या विशाल स्वरूपाच्या विचारांत जो गढून गेला व ज्याला ही पृथ्वी एखाद्या क्षुल्लक वारुळाप्रमाणे दिसू लागली, त्याला तीवरील कांहीं मुंग्यांस दुसऱ्यांपेक्षां दाणे अधिक सांपडले, किंवा काहींस मुळीच न सांपडल्यामुळे रिकामें फिरावे लागले, म्हणून खेद होणार आहे काय ? इराणची बादशाही पादाक्रांत करून डरायसाच्या सिंहासनावर पाय ठेवतांना वीरशिरोमणी अलेग्झान्डरास जो आनंद झाला असेल, त्यापेक्षां अखिलपरमाण्वंतर्गत गुरुत्वाकर्षणधर्म शोधून काढतांना न्यूटनास कमी आनंद झाला असेल, असे आम्हांस वाटत नाही!

पुढे वाचा

सुधारकाचे जाहीर पत्रक

ज्यांना हिंदुस्थानचा इतिहास यत्किंचित् अवगत असेल, त्यांना येथे इंग्रजांचा अंमल कायम होण्यापूर्वी आमची स्थिती कशी होती, व तो झाल्यापासून तींत किती बदल झाला आहे आणि पुढे किती होण्यासारखा आहे, हे स्वल्प विचाराअंती समजण्यासारखें आहे. मोंगलांच्या तीन-चारशे वर्षांच्या, किंवा मराठ्यांच्या दीडदोनशे वर्षांच्या अमलांत ज्या राज्यविषयक, समाजविषयक, नीतिविषयक व शास्त्रविषयक विचारांचा लोकांत आविर्भाव झाला नाही, ते विचार इंग्रज लोकांचे राज्य सर्वत्र स्थापित झाल्यापासून पुरती शंभर वर्षे झाली नाहीत तोंच चोहोकडे पसरून जाऊन, हिंदुस्थानच्या स्थितिस्थापकताप्रिय लोकांस एक प्रकारची अज्ञातपूर्व अशी जागृतावस्था झाल्यासारखी दिसत आहे, व आजमितीस हिचा अनुभव येथील लोकसंख्येच्या मानाने तिच्या अगदी स्वल्प अंशास होत आहे, हे जरी खरे आहे, तरी थोड्या वर्षांत, विद्याप्रसाराचा क्रम प्रस्तुतप्रमाणे अव्याहत चालल्यास, हा अनुभव बहुतेक लोकांस होऊं लागेल हे उघड आहे.

पुढे वाचा

सुधारक काढण्याचा हेतु

पर्वत, नद्या, सरोवरें, झाडे, पाणी, राने, समुद्रकिनारे, हवा, खाणी, फुले व जनावरें ज्यांत स्पष्टपणे दाखविली आहेत असा एक, व ज्यांत पारधी व पारधीची हत्यारे, शेतकरी व शेतकीची अवजारे, बाजार व त्यांतील कोट्यवधि कृत्रिम जिन्नस, न्यायसभा व त्यांत येणारे शेंकडों लोक, राजसभा व त्यांत बसणारे-उठणारे सचिव, मंत्री वगैरे प्रमुख पुरुष, भव्य मंदिरे व उत्तम देवालये, बागा व शेतें, झोपड्या व गोठे, अनेक पदवीचे व अनेक धंदे करणारे पुरुष व स्त्रिया आणि त्यांची अर्भकें, ही ज्यांत व्यवस्थित रीतीनें काढिली आहेत असा एक, मिळून प्रत्येक खंडांतील ठळक देशाचे दोन दोन चित्रपट तयार करवून ते पुढे ठेवले, आणि त्यांकडे निःपक्षपातबुद्धीने काही वेळ पहात बसले, तर विचारी पुरुषांच्या मनावर काय परिणाम होतील बरें ?

पुढे वाचा

अध्यात्मवादी टिळक व भौतिकवादी आगरकर

[एक ऑगस्ट ही लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी. १८५६ मध्ये जन्मलेल्या दोन माणसांच्या विचारांचा ठसा महाराष्ट्राच्या पुढच्या सबंध सामाजिक इतिहासावर उमटलेला आहे. ज्या दोन भिन्न दिशांना समाजाला घेऊन जाण्याचा प्रयत्न या समाजातल्या शक्ती करत आल्या आहेत व आजही करत आहेत, त्या दिशा या दोघांच्या विचारांत सूचित झालेल्या होत्या. आणि या दोन दिशांमागे होती दोन जीवनविषयक तत्त्वज्ञाने : अध्यात्मवाद आणि भौतिकवाद. आजसुद्धा सामाजिक विचार, सौंदर्यशास्त्र इ. सर्व आघाड्यांवर भौतिकवादाला अध्यात्मवादाविरुद्धची लढाई नेटाने लढवावी लागत आहे, लागणार आहे. त्या दृष्टीने हा लेख मननीय ठरावा. नवभारत च्या ऑगस्ट १९५६ च्या अंकावरून काहीसा संक्षिप्त करून तो तात्पर्य च्या १९८२ च्या अंकात प्रसिद्ध केला होता.

पुढे वाचा

प्रा. दि. य. देशपाण्डे यांचे मराठीतील तत्त्वचिंतन

[प्रस्तुत निबंध महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या दापोली अधिवेशनात (ऑक्टो.२००६) वाचण्यात आला आहे.]
प्रा. दि. य. देशपांडे तत्त्वज्ञानाचे अध्यापक होते आणि आजन्म तत्त्वज्ञानाचेच निष्ठावंत अभ्यासक होते. त्यांची व्यक्तिगत अल्पशी ओळख अशीः
सुमारे साठ वर्षांपूर्वी, १९४० साली नागपूर विद्यापीठातून ते एम्.ए. झाले. पुढील दोन वर्षे १९४१ ते ४३ अमळनेर येथील Indian Institute of Philosophy येथे त्यांनी रिसर्च फेलो म्हणून काम केले. नंतर १९४४ पासून १९७५ पर्यंत एकतीस वर्षे तर्कशास्त्र व तत्त्वज्ञानाचे अध्यापन केले. यांतले पहिले वर्ष सांगलीला विलिंग्डन महाविद्यालयात. नंतर मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील सरकारी महाविद्यालयांत जबलपूर, नागपूर, अमरावती इ.

पुढे वाचा

गावगाडा २००६ (भाग ३)

दुष्काळी भाग, निरीक्षणे व चिंतन

खेड्यात राहणारी, विशेषतः दुष्काळी भागातील माणसे सभोवतालच्या परिस्थितीमुळे रुक्ष झालेली असतात असे आपल्याला अनेक गोष्टींतून प्रत्ययास येते. म्हणजे जेवण करणे, हा एक आवश्यक नैसर्गिक उपचार असतो. बाकी काही नाही. ज्यांना त्या क्रियेला ‘उदरभरण’ म्हणणेसुद्धा रुचत नाही त्यांना हे ऐकून आश्चर्य वाटेल. बऱ्याच वेळा खेडूत बंधू ‘तुकडा खाणे’ किंवा ‘तुकडा मोडणे’ म्हणतात; म्हणजे “चला पाव्हणं तुकडा खायला”, किंवा “झाला का तुकडा खाऊन ?” वगैरे.
दुष्काळी परिस्थिती व नदीकाठच्या काळ्या रानाची परिस्थिती खूप वेगळी असते. काळ्या जमिनीतील शेतकऱ्याला शेतीची खूप कमी काळजी असते असे म्हणतात.

पुढे वाचा

जपून टाक पाऊल

माणसांना आपली अपत्ये शारीरिक, बौद्धिक, मानसिक, सामाजिक वगैरे दृष्टीने आदर्शवत् व्हावीत, निरोगी राहावीत असे वाटते. सर्वच सजीवांची पिल्ले सभोवतालच्या परिस्थितीशी जुळते गुण असले तर जास्त जगतात व जनतात. माणसे यात हेतुपुरस्सर, जाणीवपूर्वक काही करण्याचे प्रयत्नही करतात, हे माणसांचे वैशिष्ट्य. मुळात हे केवळ सजीव रचनांनी परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे एक अंग आहे पूर्णपणे नैसर्गिक आणि अपेक्षित. यामुळेच काही वर्षांपूर्वी पुण्याच्या डॉ. हे.वि. सरदेसायांचे घरोघर ज्ञानेश्वर जन्मती (किंवा तसल्या) नावाचे पुस्तक खूप लोकप्रिय झाले. त्याच काळात डॉ. स्पॉकचे बेबी ॲण्ड चाइल्ड केअर हे पुस्तक खपाबाबत बायबलशी स्पर्धा करत होते.

पुढे वाचा