[२००६ हे जॉन स्टुअर्ट मिल्चे द्विशताब्दी वर्ष आहे. आजचा सुधारक चे संस्थापक संपादक दि.य. देशपांडे यांनी मिलच्या णीळश्रळीरीळरपळी चे केलेले भाषांतर या लेखमालेतून देत आहोत. विवेकवादाच्या मांडणीत मिल्चे स्थान व त्याचा आगरकरांवरील प्रभाव सर्वश्रुत आहे.]
प्रकरण १: सामान्य आलोचने
मानवी ज्ञानाची वर्तमान अवस्था अपेक्षेहून इतकी भिन्न असावी किंवा अतिमहत्त्वाच्या विषयांतील विचार इतका रेंगाळावा यांतील सर्वांत सूचक गोष्ट म्हणजे युक्त आणि अयुक्त यांच्या निकषासंबंधीच्या वादाचा निर्णय करण्याच्या बाबतीत झालेली अत्यल्प प्रगती ही होय. जीवनाचे सर्वोच्च साध्य कोणते, किंवा नीतीचे मूलाधार काय आहेत हा प्रश्न तत्त्वज्ञानाच्या उत्पत्तीपासून तात्त्विक विचारांतील प्रमुख प्रश्न मानला गेला असून त्याला उत्तर देण्यात अतिशय बुद्धिमान लोक गढून गेले आहेत; एवढेच नव्हे तर त्यामुळे त्यांच्यात अनेक तट पडले असून त्यांचा परस्परांशी तीव्र संघर्ष चालू आहे.