आजच्या घडीला सायकलचा इतिहास व महत्त्व सांगण्याचे कारण म्हणजे कारचा वाढता खप, पेट्रोल-डिझेलच्या वाढत जाणाऱ्या किमती, त्यामुळे वाढत जाणारे प्रदूषण व वाहनांच्या गर्दीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या. १९ व्या शतकातील ऊर्जा समस्येवर घोड्याच्या शक्तीऐवजी मानवी शक्तीचा वापर करणाऱ्या सायकलचा शोध लागला तसे आज खनिज तेलाच्या समस्येवर पर्यायी ऊर्जा म्हणून बायो-डिझेल व हायड्रोजन यांचा वापर करता येईल का याची चाचपणी प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. परंतु हे मोठ्या प्रमाणावर केव्हा शक्य होईल हे सांगता येत नाही. अमेरिकेतील अॅमरी लव्हिन्स हा मनुष्य गेली ३० वर्षे तेलाबद्दल व त्याच्या वापराबद्दलच्या कार्यक्षमता वाढवण्याबाबत विवेचन करीत आहे.
विषय «इतर»
लेखनाच्या अराजकासंबंधाने (३)
माझ्या शुद्धलेखनविषयक प्रतिपादनास विरोध करणारी ३-४ पत्रे आली आहेत आणि २ लेख अन्यत्र प्रकाशित झाले आहेत. त्यांचा येथे परामर्श घेण्याचा प्रयत्न करतो. या सर्व पत्रलेखकांचा आणि माझा मतभेद मुख्यतः एकाच ठिकाणी आहे. त्यांना उच्चाराप्रमाणे लेखन पाहिजे आणि मला त्याची गरज वाटत नाही. लेखन हे कधीच उच्चाराप्रमाणे नसते. ते वाचकांना पूर्वपरिचित असलेल्या उच्चाराची आठवण करून देणारे असतें ही एक गोष्ट ; आणि लेखनापासून अर्थबोध होण्यासाठी त्याचा उच्चार मनांतदेखील करण्याची गरज नाही, तसा उच्चार करून पाहण्यांत वाचकाचा कालापव्यय होतो; आणि आपल्याला जरी तशा संवयी लागलेल्या असल्या तरी त्या संवयी प्रयत्नपूर्वक मोडायला हव्या ही दुसरी गोष्ट.
वर्तमानकाळ आणि भूतकाळ
एखादी प्रतिमा एखाद्या कलाकृतीत कशी सादर केली जाते यातून पाहणाऱ्यांच्या कलाक्षेत्राबद्दलच्या अनेक समजुती घडत असतात. सौंदर्य, सत्य, ‘विलक्षण’ कलाकार, संस्कृती, आकार (रूप), सामाजिक स्थिती, अभिरुची अशांबाबतच्या समजुती प्रतिमांच्या आधारे घडतात. जुन्या कलाकृती आज पाहणाऱ्यांच्या समजुती कलाकृती घडतानाच्या समजुतींपेक्षा वेगळ्या झालेल्या असतात. पूर्वीचे जग कसे होते याबद्दलच्या आजच्या समजुती भूतकाळाला स्पष्ट करण्याऐवजी ‘गूढ’ करतात.
आपल्याकडे पाहणाऱ्याला आपण नेमके दिसावे अशा रूपात भूतकाळ पाहणाऱ्याची वाट पाहत बसलेला नसतो. इतिहास हा नेहमीच वर्तमानकाळ आणि भूतकाळ यांच्या संबंधाच्या रूपात असतो. आजची भीती, आजच्या आस्था नेहमीच भूतकाळाला धूसर करत असतात.
भारताचे जलभविष्य
एखाद्या अर्थव्यवस्थेचे मूल्यमापन करणार कसे? जी.एन.पी. ठोकळ राष्ट्रीय उत्पादन, दरडोई उत्पन्न या आकड्यांवरून ? की सामान्य माणसांच्या परिस्थितीवरून? ठोकळ राष्ट्रीय उत्पादन पाहून देशातील माणसांची स्थिती लक्षात येत नही. देशातील माणसांच्या विकासाचा निर्देशांक महत्त्वाचा आहे. शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, जळण, पर्यावरण यांचा विचार करून विख्यात अर्थवेत्ते डॉ. मेहबूब उल हक यांनी मनुष्य विकास निर्देशांक तयार केला. त्याच धर्तीवर जलदारिद्र्य निर्देशांक ही संकल्पना मांडली जात आहे. उपलब्ध जलसंपदा, पाण्यापर्यंत पोच, पाणी खरेदी करण्याची क्षमता, पाणीवापराची कार्यक्षमता आणि पर्यावरण या पाच निकषांवरून भागाचा जलनिर्देशांक ठरविला जातो.
चोम्स्कींचा भाषाविचार
आधुनिक भाषाशास्त्राच्या इतिहासात नोम चोम्स्कीचे स्थान अद्वितीय आहे. सन १९५७ मध्ये प्रकाशित झालेल्या त्याच्या सिन्टॅक्टिक स्ट्रक्चर्स या पुस्तकापासून भाषा-विज्ञानात एका अफलातून क्रांतीची सुरुवात झाली. चोम्स्कीच्या विचारांचा, तत्त्वांचा आणि संकल्पनांचा भाषा-विज्ञानावरच नव्हे तर इतरही अनेक ज्ञानशाखांवर जबरदस्त प्रभाव पडला आहे. चोम्स्कीप्रणीत या क्रांतीच्या पूर्वीही आणि नंतरही असंख्य प्रवाह भाषाशास्त्रात आहेत. परंतु आज भाषाशास्त्रातील विभिन्न प्रवाह चोम्स्कीच्या मांडणीच्या अनुषंगाने आपापली भूमिका मांडत असतात यातच त्याच्या सिद्धान्तांचे महत्त्व दडलले आहे. आपल्या भाषाविषयक संशोधनातून चोम्स्कीने मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, संगणकीय भाषाभ्यास ह्या क्षेत्रांमध्ये मूलभूत योगदान दिले आहेच, पण त्याचबरोबर असंख्य सोपे लेख लिहून, शेकडो भाषणे व चर्चासत्रे घडवून भाषाशास्त्र हा विषय रंजक व लोकप्रिय करण्यास मदत केली आहे.
संमतीचे उत्पादन: प्रसारमाध्यमांचे राजकीय अर्थशास्त्र (उत्तरार्ध)
[मागील अंकात या लेखाच्या पूर्वार्धात हर्मन व चोम्स्की ह्यांनी मांडलेल्या प्रचाराच्या प्रारूपातील पहिल्या चार चाळण्यांचे वर्णन केले होते. (१) आकार, मालकी आणि नफाकेन्द्री माध्यमे, (२) जाहिरात, (३) प्रसारमाध्यमांच्या बातम्यांचे स्रोत आणि (४) झोड आणि अंमलदार, अशा या चार चाळण्या. आता पुढे….]
कम्युनिझम-विरोध : एक नियंत्रक यंत्रणा
शेवटचे गाळणे आहे ते कम्युनिझमविरोधाच्या तत्त्वज्ञानाचे. संपत्तिवानांना कम्युनिझम हा निर्वाणीचा शत्रू वाटत राहिला आहे, कारण तो त्यांच्या वर्गीय स्थानाला व उच्च प्रतिष्ठेला धक्का देणारा असतो. सोविएत, क्यूबन व चिनी क्रांत्या पाश्चात्त्य अभिजनांना संकट ठरल्या आहेत.
झोपडपट्ट्या व नागरीकरण
नागरीकरणाची जी व्याख्या आहे तीप्रमाणे जेव्हा मनुष्यवस्ती पाच हजारांपेक्षा जास्त असते व पाऊणपेक्षा जास्त पुरुष बिनशेतीधंद्यात काम करतात तेव्हा त्या वस्तीला नगर (Town) म्हणतात. उरलेल्या वस्तीला ग्रामीण वस्ती म्हणतात. जेव्हा ग्रामीण वस्ती लोकसंख्येमुळे व व्यवसायांमुळे नागरी बनते त्या घटनेला नागरीकरण म्हणतात. ह्या घटनेमागे नगरांमध्ये बिनशेतकी व्यवसायाची वाढ असते. हे नागरीकरण वाढत जाऊन लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारते व राहणी गुणात्मकदृष्ट्याही उच्च दर्जाची होते. ह्या गुणात्मक वाढीत शिक्षणाचा दर्जा उंचावणे, संगीत-कलांची वाढ होणे, इतरही अनेक कौशल्यांची वाढ होणे, या गोष्टी अपेक्षित असतात. अशी नगरे मोठमोठी होत जाऊन एक लाखापेक्षाही जास्त वस्तीची होतात तेव्हा त्यांना शहरे (Cities) म्हणतात.
समाजवादी स्मृती
भाबडे अर्थशास्त्रः
१)मे २००५ चा आजचा सुधारक गिरणी विशेषांक म्हणून निघाला आहे. यातील काही भागाबद्दल “संघटित क्षेत्रातील १२-१५ टक्के श्रमिक सोडल्यास इतरांना कामावरून काढल्यास नुकसानभरपाई मिळत नाही. दुसरीकडे भारतीय अर्थव्यवस्था ६.५ ते ७ % दरम्यान विकासदर नोंदवून मुक्तपणे व लक्षणीय प्रमाणात जागतिक पातळीचे अब्जाधीश निर्माण करीत आहे. म्हणजे निर्माण होणारी सम्पत्ती कोणत्या दिशेने वाहत आहे हे स्पष्ट होते.” (पृष्ठ ६२)
२) “संघटित मजुरांना नुकसानभरपाई मिळाली” या वाक्याने असे सूचित केले आहे की सर्वच मजुरांनी संघटित होणे हा मजुरांची स्थिति सुधारण्याचा उपाय आहे.
सोशलिझम इज डेड, लाँग लिव्ह सोशलिझम्
आजच्या सुधारक च्या मे २००५ चा अंक गिरणी विशेषांक म्हणून प्रसिद्ध झाला. त्यात अहमदाबाद येथील ज्या कापड गिरण्या बंद झाल्या व त्यात काम करणाऱ्या मजुरांची दैना झाली त्याचे चित्रण इंग्रजीत थीज्ञळपस ळप हिश चळश्रश्र छे चीश ह्या शीर्षकाखालील पुस्तकात प्रा. यान ब्रेमन व छायाचित्रकार पार्थिव शहा ह्या दोघांनी केले. त्या पुस्तकाचा मराठी (सैल) अनुवाद, त्यावर प्रा. स.ह. देशपांडे, श्रीमती नीरा आडारकर, अधिवक्ता एस्.डी.ठाकूर, स्मिता गुप्ता ह्यांच्या टिप्पणी व प्रस्तुत लेखकाची ‘प्रस्तावना’ असा तो अंक होता. त्यावर अभ्यासक श्री. नी. र. व-हाडपांडे ह्यांनी आपली प्रतिक्रिया पाठविली आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद.
विवेकवाद-भाग ९(अ) : नीतिविचार धर्मविचाराहून निराळा (प्रथम प्रकाशन डिसेंबर १९९० – जानेवारी १९९१ अंक १.९-१०, लेखक: दि. य. देशपांडे)
नवा सुधारक च्या ऑक्टोबर अंकाच्या मुखपृष्ठावर छापलेल्या आगरकरांच्या उताऱ्याचे शीर्षक आहे, ‘नीतिविचार धर्मविचाराहून निराळा’. या विषयावर स्पष्टीकरणात्मक असे काही लिहावयाचा आज विचार आहे.
आजपर्यंत ‘विवेकवाद’ या शीर्षकाचे जे आठ लेख प्रसिद्ध झाले आहेत त्यांसंबंधाने काही चमत्कारिक विचारणा आमच्याकडे केल्या गेल्या आहेत. एक वाचक म्हणाले की तुमच्या विवेकवादात भावनांना काहीच स्थान नाही काय ? तुमच्या लेखांवरून आमचा असा समज झाला आहे की तुम्हाला फक्त तर्ककर्कश गोष्टीच मान्य दिसतात. तुमच्या व्यवस्थेत भावनेला काहीच स्थान दिसत नाही. दुसरे एक वाचक म्हणाले की तुम्ही धर्मांवर असे तुटून पडला आहात की तुमच्या विवेकवादात केवळ सुखप्राप्तीलाच तेवढे स्थान आहे.