भारतात व बाहेरही हिंदूंची लग्ने मुख्यतः त्यांच्याच जातींमध्ये होतात. एखाददुसरे लग्न विजातीय झाले तरी त्यात अस्पृश्याचा समावेश क्वचितच असतो. अशा बेटी-व्यवहारामुळे जातिसंस्था व अस्पृश्यता जिवन्त आहे. असे विवाह सामाजिक समतेस पोषक नाहीत. भारतीय संविधानाने सामाजिक समतेचा पुरस्कार केला व अस्पृश्यता कायद्याने नष्ट केली, त्यामुळे पूर्वी मोगलाईत, पेशवाईत व नंतर इंग्रजी राजवटीत स्पृश्य हिंदूना जे अस्पृश्य फुकट गुलाम म्हणून मिळत होते ते मिळण्याचे थांबले व जन्मानेच ब्राह्मण, क्षत्रियांना मिळालेला उच्च जातीचा मान व सामाजिक प्रतिष्ठा यांना धक्का बसला. हा तोटा भरून काढण्याकरिता देशाची राज्यघटनाच बदलवून चातुर्वर्ण्य, जातिव्यवस्था व मुख्यतः अस्पृश्यता परत कायद्याने आणण्याची हुक्की वरिष्ठ वर्गाच्या काही थोड्या लोकांना येते.
विषय «इतर»
सर्वंकष सेक्युलॅरिझम आणि भारतातील स्थिती
सेक्युलॅरिझमसाठी दिल्या गेलेल्या लढ्यात फ्रान्समध्ये १९०५ साली पारित झालेला चर्च व शासन यांच्या विभक्तीकरणाचा कायदा ही एक महत्त्वाची घटना होती. जुलै २००५ मध्ये पॅरिसमध्ये भरलेल्या जागतिक मानवतावादी संमेलनात (१६ वे संमेलन) या कायद्याच्या शताब्दीनिमित्त धर्म व शासन यांचे विभक्तीकरण हे मुख्य सूत्र मानले गेले. मला संमेलनभर विभक्तीवर फारच भर दिला गेला असे वाटले. गेल्या शतकांतील घडामोडी पाहत विभक्तीच्या संकल्पनेची पुनर्तपासणी व्हायला हवी असे वाटले. अनेक सेक्युलरिस्ट धर्म आणि राज्यशासन यांच्यामध्ये अभेद्य भिंत उभारण्याची भाषा करतात. अशा भिंतीने धर्माची राज्यव्यवहारातली ढवळाढवळ थांबेल, आणि हे इष्टच आहे, पण भिंतीने राज्य शासनालाही धर्मात हस्तक्षेप करता येणार नाही.
रोगराईचा दहशतवाद
अगदी ११ सप्टेंबर २००१ लाही त्या दिवशीच्या अमानुष दहशतवादाने जेवढी माणसे मेली त्यापेक्षा जास्त एड्सने मेली. इतर सामान्य दिवशी तर एड्स आणि तसल्या रोगांनी मरणारे संख्येने बरेच जास्त असतात. ह्या रोगांना अवरोध करता येतो, रोग्यांना दुरुस्त करता येते आणि रोगांचे व्यवस्थापन करता येते. या तथ्यांमुळे दहशतवादाच्या विकारीपणाचे, विखारीपणाचे अवमूल्यन होत नाही, किंवा दहशतवादाला थोपवायची गरजही कमी होत नाही. पण ही तथ्ये हे अधोरेखित करतात की थांबवता येणारी पण थांबवली जात नसलेली रोगराई जास्त महत्त्वाची आहे.
[टाईम साप्ताहिकाने प्रिन्सिपल व्हॉईसेस नावाचा जगापुढील आह्वानांवर चर्चा घडवण्याचा आंतरराष्ट्रीय प्रकल्प हाती घेतला आहे.
उपयोगितावाद (१): जॉन स्टुअर्ट मिल्
[२००६ हे जॉन स्टुअर्ट मिल्चे द्विशताब्दी वर्ष आहे. आजचा सुधारक चे संस्थापक संपादक दि.य. देशपांडे यांनी मिलच्या णीळश्रळीरीळरपळी चे केलेले भाषांतर या लेखमालेतून देत आहोत. विवेकवादाच्या मांडणीत मिल्चे स्थान व त्याचा आगरकरांवरील प्रभाव सर्वश्रुत आहे.]
प्रकरण १: सामान्य आलोचने
मानवी ज्ञानाची वर्तमान अवस्था अपेक्षेहून इतकी भिन्न असावी किंवा अतिमहत्त्वाच्या विषयांतील विचार इतका रेंगाळावा यांतील सर्वांत सूचक गोष्ट म्हणजे युक्त आणि अयुक्त यांच्या निकषासंबंधीच्या वादाचा निर्णय करण्याच्या बाबतीत झालेली अत्यल्प प्रगती ही होय. जीवनाचे सर्वोच्च साध्य कोणते, किंवा नीतीचे मूलाधार काय आहेत हा प्रश्न तत्त्वज्ञानाच्या उत्पत्तीपासून तात्त्विक विचारांतील प्रमुख प्रश्न मानला गेला असून त्याला उत्तर देण्यात अतिशय बुद्धिमान लोक गढून गेले आहेत; एवढेच नव्हे तर त्यामुळे त्यांच्यात अनेक तट पडले असून त्यांचा परस्परांशी तीव्र संघर्ष चालू आहे.
“सीडी”
आजचा सुधारक चा जाने.-फेब्रु. ०४ (अंक १४.१०) हा आधुनिक विज्ञानाच्या स्वरूपावरचा विशेषांक होता. अभ्यागत संपादक होता चिंतामणी देशमुख, उर्फ ‘सीडी’. अंक वाचकांपर्यंत पोचताच मौज प्रकाशनगृहाचे श्री. पु. भागवत यांचा दूरध्वनी आला अंकाचे पुस्तक काढावे, आणि यात मौज मदत करेल! पुस्तक निघायच्या बेतात असताना सीडीचे २ डिसें. ०५ ला निधन झाले.
भागवतांचा निरोप सीडीला कळवल्यावरची त्याची प्रतिक्रिया मजेदार होती’चांगलं झालं असं समजायचं ना?” सीडी ‘डावा’, मार्क्सवादी, पण कर्मठही नव्हे आणि सहज ढळणारा लेचापेचाही नव्हे. त्याच्या विचारांचा पाया होता तो विज्ञानात. विज्ञानाची मूळ प्रेरणा माणसाच्या ऐहिक सुखाच्या ओढीतून येते, हे पूर्णपणे आत्मसात करून, त्याला सामाजिक भानाची जोड देऊन सीडी वाट चालत असे.
कापूस ‘कोंडी’
आफ्रिकेत कापूस पिकवणे सोपे नाही. पश्चिम आफ्रिकेतल्या माली या देशता दहा हेक्टरांपेक्षा कमी जमिनीवर शेती करणाऱ्या बाफिंग डायराला विचारा. सरकारी कंपनीने दिलेले बियाणे फारसे उत्पादन देत नाही. या वर्षीची बोंड-अळी पाचदा फवारणी करूनही हटली नाही. हवा बरी नव्हती. हाताने कापूस वेचावा लागला, भर उन्हाळ्यात. माकडांनी बोंडांमधल्या पाण्यासाठी बोंडे खाल्ली. पण डायरापुढची सगळ्यात मोठी समस्या आफ्रिकेत नाही ती आहे ५,००० मैल दूर.. अमेरिका (USA) आपल्या २५,००० कापूस पिकवणाऱ्यांना वर्षाला तीन अब्ज डॉलर्स सब्सिडी देते [रुपयांत, सरासरी शेतकऱ्याला चौपन्न लक्ष ! ] अमेरिकेत कापसाचा हमीभाव आहे, पाऊंडाला बहात्तर सेंट्स [ सुमारे रु.
नैतिक समजुती
गर्भपात, भ्रूणपेशी-संशोधन, लिंगनिदान, शाकाहार-मांसाहार, फुटन (क्लोनिंग) इत्यादींविषयी अनेक ‘समजुती’ पक्क्या समजुती आपणास आजूबाजूस दिसतात. आधुनिक जैववैद्यकातील फुटन आणि भ्रूणपेशी संशोधन (Stem Cell Research) हे सध्याचे दोन विषय जैववैद्यक आणि नैतिकता या विषयांचे कीस काढणारे ठरले आहेत. यांविषयी अनेक समजुतींची सरमिसळ समाजात आढळते.
या समजुतींना विज्ञान जसजसे आव्हान देत आहे तसतशा त्या काही ठिकाणी आणखीच घट्ट होताहेत. उदा. धार्मिक समजुती. आपण अनेक समजुती बाळगतो. ‘समजुती बाळगतो’ याचा अर्थ असा की धर्म मानणारा धर्माचे नियम, रूढी, आचार, विधी यांविषयींच्या समजुतींचा संच बाळगत असतो; वैज्ञानिक विज्ञानाचे नियम आणि वैज्ञानिक तत्त्वे ह्यांबाबत समजुतींचा संच बाळगतात; उपयुक्ततावादी सामाजिक निर्णयांच्या आणि निष्कर्षांच्या समजुतींचे संच बाळगतात.
न सुचलेले प्रश्न
शिक्षणाच्या प्रक्रियेत म्हणे दोन वेगवेगळ्या भूमिका वठवणाऱ्या गटांचा सहभाग असतोः शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञान देतात आणि विद्यार्थी शिक्षकांकडून ज्ञान घेतात. पण प्रत्यक्षात प्रत्येक खुल्या मनाच्या शिक्षकाला हेही जाणवते की विद्यार्थीही शिक्षकांना ज्ञान देतात. कधी हे ज्ञानदान शिक्षकाच्या भूमिकेच्या गृहीततत्त्वांना आह्वान देण्यातून घडते, तर कधी शिक्षकाला न सुचलेले प्रश्न विचारून.
मी विद्यार्थ्यांना ईस्टर आयलंडचे समाज कसे कोलमडले ते सांगितले. विद्यार्थ्यांना पडलेल्या प्रश्नाची व्यामिश्रता माझ्या तोपर्यंत ध्यानात आलीच नव्हती ज्या झाडांवर आपले अस्तित्व आवलंबून आहे ती सर्व झाडे कापून टाकण्याचा आत्मघातकी निर्णय एखादा समाज कसा घेऊ शकतो ?
विचारदर्शन आणि त्याचं जागतिकीभवन
जगभरचं होणं आणि जगभरचं करणं
‘विश्व’ म्हणजे सगळं काही. ‘जगत्’ म्हणजे माणसाचं विश्व, माणसाच्या हालचालींना, जगण्याला संदर्भ देणारं सगळं काही. ‘जागतिक’ म्हणजे जगभरचं. ‘जागतिकीभवन’ म्हणजे जागतिक होऊन जाणं, केवळ स्थानिक न राहणं. हे आपोआप जागतिक होणं असेल किंवा कुणी हेतुतः जागतिक केलेलं असेल. मानवजातीच्या इतिहासात अगोदरपासून संथपणे चालू असलेल्या ‘जागतिकीभवना’ ची अलीकडची मुद्दाम गतिमान केलेली अवस्था म्हणजे ‘जागतिकीकरण’.(जाता जाता सांगायचं म्हणजे ‘ग्लोबलायझेशन’साठी योजलेला हिंदी भाषेतील ‘वैश्विकीकरण’ शब्द तेवढा योग्य नाही. ‘भूमंडलीकरण’ त्यापेक्षा थोडा बरा एवढंच.)
जागतिकीभवन या अधिक दीर्घकालीन आणि अधिक व्यापक घडामोडीचा विचार करताना व्यापार आणि उद्योग यांच्या पलीकडे जाऊन माणसाच्या जगण्याच्या सगळ्याच बाजूंचा विचार करायला लागतो.
राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पनांचे भवितव्य (१)
गेलनर ह्यांनी राष्ट्रवाद हा औद्योगिकीकरणाच्या आणि भांडवलशाहीच्या आवश्यकतेतून जन्मल्याचे मांडले आहे. त्यामुळे राष्ट्रवाद ही आधुनिक संकल्पना आहे व तिचा जन्म औद्योगिकीकरणापासून झाला असा त्यांचा सिद्धान्त त्यांनी Nations & Nationalism ह्या १९८४ साली प्रसिद्ध झालेल्या प्रबंधात मांडला आहे. औद्योगिकीकरणाची परमसीमा गाठली आणि भांडवलशाही पूर्णपणे विकसित झाली तर राष्ट्र आणि राष्ट्रवाद ह्या संकल्पनावर काय परिणाम होतील हा त्यावेळी त्यांच्यापुढे संभाव्य (हायपोथेटिकल) प्रश्न होता.१ पण तंत्रज्ञानाच्या प्रगतीने आज जग अशा एका टप्प्यावर आहे की त्यांचा संभाव्य प्रश्न आज खराच आपल्यापुढे उभा आहे. राष्ट्राचे सार्वभौमत्त्व आणि राष्ट्राच्या सीमा हे दोन आधुनिक राष्ट्राचे निकष मानले जातात.