माझी जगदीश बारोटियांशी ओळख नव्हती, पण ओळख करून घ्यायची इच्छा होती. मला शत्रू मानणारा भेटावा; तो मला शत्रू का मानतो, स्वतःपेक्षा वेगळ्यांना शत्रू का मानतो, हे समजून घ्यायची इच्छा होती. सन २००० मध्ये ‘हिंदू युनिटी’ नावाच्या एका वेबसाईटवर हिंदू भारताच्या शत्रूची एक यादी झळकली आणि त्यात माझे नाव होते. नवजागृत, डाव्यांना विरोध करणाऱ्या, जहाल राष्ट्रवादी अशा त्या गटांना माझ्यासारख्या ‘गद्दार’ हिंदूंबद्दल खास द्वेष होता.
त्याच सुमाराला न्यूयॉर्क टाईम्स मध्ये एक बातमी आली की मुस्लिमांविरुद्ध हिंसेला आवाहन केल्यामुळे एका हिंदू वेबसाईटला सेवा पुरवणे तिच्या ‘सर्व्हर’ने थांबवले.
विषय «इतर»
डॉ. लागू-एक ‘लमाण’?
‘लमाण’ नुकतेच प्रसिद्ध झाले. रूढार्थाने ज्याला आत्मचरित्र म्हटले जाते, तसे प्रस्तुत ग्रंथाचे स्वरूप नसून ‘मनोगता’त म्हटल्याप्रमाणे त्यांच्या एकूण नाट्यप्रवासाचा तो धावता आढावा आहे. आपले खाजगी जीवन चित्रित करण्यात लेखकाला स्वारस्य नाही. साडेतीनशेहून अधिक पृष्ठसंख्या असलेल्या ह्या पुस्तकात कौटुंबिक उल्लेख अपवादात्मकच आहेत. नाट्यक्षेत्राशी संबंधित व्यावसायिक जीवन शब्दबद्ध करण्यासाठी, सुहृदांच्या आग्रहानुसार ‘लमाण’ची निर्मिती झाली आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या जडणघडणीत किंवा व्यक्तिमत्त्व समृद्ध होण्यासाठी ज्यांचा हातभार लागला, त्यांच्याविषयीच्या आठवणींनी पुस्तकाची सुरुवात होते. आई-वडिलांपासून निघून भालबा केळकर, प्रा. दीक्षित, वसंत कानेटकर, इंदिरा संत, पु.शि. रेगे, जी.ए.
भ्रष्टाचार: कारणे व उपाय (भाग ३)
भ्रष्टाचार निर्मूलनाचे उपाय
आतापर्यंत आपण भ्रष्टाचाराची विशिष्ट कारणे, स्वरूप व परिणाम यांच्याविषयी विचार केले. त्यावरून भ्रष्टाचाराचे निर्मूलन ही आजच्या समाजापुढील सर्वांत मोठी समस्या असल्याचे आपणास जाणवते. सदर समस्या सोडविणे हे समाजाच्या भवितव्याच्या दृष्टीने अपरिहार्य आहे, हेही आपणास पटण्यासारखे आहे. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कोणते उपाय योजावेत, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. भ्रष्टाचाराचे स्वरूप गुंतागुंतीचे असल्याने व त्याची कारणेही सामाजिक, आर्थिक, नैतिक अशी अनेकविध असल्याने त्यावरील उपायांचा विचार विवेकावर आधारित असणे आवश्यक आहे. उपायांचा विचार करताना भ्रष्टाचाराची कारणे समोर ठेवल्यानेच त्याचे सम्यक् आकलन आपणास होऊ शकेल.
“तलाक’ स्त्रियांना का देता येऊ नये?
सुमारे पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट. माझ्या बालपणी एक घटना माझ्या मनावर कोरली गेली. आम्ही वाड्यात राहत होतो. आमच्या घरी काही नातेवाईक मंडळी मुक्कामाला आलेली होती. खरे तर त्यांचा काश्मीरदर्शनासाठी जाण्याचा बेत होता. त्या निमित्ताने घरून रवाना होण्याआधीचा वेळ सत्कारणी लावण्यासाठी कॅरम खेळण्याची टूम निघाली.
माझे वडील कॅरम खेळत असत. तेव्हा पाहण्यांपैकी वयस्काबरोबर, प्रतिस्पर्धी भिडू म्हणून माझ्या वडिलांना बोलावले गेले. खेळ सुरू होण्याआधी पाहुणे मंडळींनी कॅरम खेळण्याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या नियमांसारखे अनेक नियम सांगितले. माझ्या वडिलांनी ते सर्व ऐकून आणि समजून घेतले. मग पाहुण्यांनी माझ्या वडिलांना पृच्छा केली की, तुमचे काही नियम असल्यास सांगा.
बदलते समाज, उर्फ सोशल डायनॅमिक्स
पृथ्वीवर विखुरलेल्या मानवी समाजांचा शास्त्रीय अभ्यास शक्य आहे या विश्वासातून समाजशास्त्र निर्माण झाले. अस्तित्वात असलेल्या समाजांचे तपशीलवार निरीक्षण व असित्वात नसलेल्या समाजांचा इतिहास, असा विषय उपलब्ध होऊ शकतो. इ.स. पूर्व ३००० ते इ.स. २००० असा सुमारे ५००० वर्षांचा काळ इतिहासाचा काळ समजता येईल, कारण त्याबाबतची वस्तुनिष्ठ दृष्टीने टिपून ठेवलेली वर्णने मिळू शकतात. त्या आधीच्या काळात झालेल्या घडामोडी भूस्तरशास्त्र (जिऑलाजी) व पुरामानववंशशास्त्र (पॅलिओअॅन्थ्रॉपॉलाजी) यांचा विषय होतात.
भौतिकशास्त्रात स्टॅटिक्स व डायनॅमिक्स असे दोन भाग आहेत, त्याचप्रमाणे समाजांची स्थिती व त्यांची गति अभ्यासणारे दोन भाग पडू शकतात.
विवेकवाद – भाग ५ (प्रथम प्रकाशन ऑगस्ट १९९० अंक १.५, लेखक – दि. य. देशपांडे)
या लेखमालेच्या पहिल्या लेखांकात आपण कशावर विश्वास ठेवावा ? असा प्रश्न आपण विचारला होता, आणि त्याचे उत्तर अर्थात् सत्य विधानांवर असे एका वाक्यात दिले होते. परंतु यावर एक आक्षेप असा घेतला जाऊ शकेल की सत्य विधानावर विश्वास ठेवावा हे उत्तर पूर्णपणे बरोबर नाही. सत्यावर विश्वास ठेवणे नेहमीच इष्ट असेल असे नाही. कित्येकदा सत्यदर्शन अनिष्टही असू शकते. उदा. एखाद्या मनुष्याला जर गंभीर आजार झाला असेल तर पुष्कळदा रोग्याला डॉक्टर ते सांगत नाही. रोगी कदाचित मानसिक धक्क्याने आणि निराशेने हातपाय गाळील, आणि रोगाला प्रतिकार करण्याची त्याची शक्तीच नाहीशी होऊ शकेल.
अमेरिकेला ‘घरचा आहेर’
बिोलिंग फॉर कोलंबाइन या वृत्तपटादावारे त्याने अमेरिकेच्या शस्त्रनियंत्रण कायद्यातील त्रुटी दाखवून गिल्या. स्टुपिड व्हाईट मेन आणि एडन्साईज धिस या पुस्तकांद्वारे अमेरिकेच्या धोरणांमधला वंशवाद आणि कामगारविरोध उघडा पाडला. फॅरनहाइट ९-११ या वृत्तपटातून अमेरिकेच्या इराकबाबतच्या धोरणातील खोटारडेपणा ‘बाहेर’ काढला. हा आहे मायकेल मूर, अमेरिकेतील ‘बुशबाबा’चा आणि रिपब्लिकन स्थितीवादीवृत्तीचा सर्वात उपरोधिक आणि निर्भिड टीकाकार. काही अंशी तो ‘गावरान नोम चोम्स्की’ आहे!
तर मायकेल मूरच्या ड्यूड, व्हेअर्स माय कंट्री या (वार्नर बुक्स २००३) पुस्तकातील हाऊ टु स्टॉप टेररिझम ? स्टॉप बीइंग टेररिस्ट्स!’, या प्रकरणाचा हा संक्षेप
आजी आणि भावी दहशतवादी हल्ले कसे थांबवावे यावरच्या माझ्या सोप्या आणि झटपट अभ्यासक्रमात तुमचे स्वागत!
‘अंतिम’ इतिहास
भावी पिढ्यांतील इतिहासकार ‘अंतिम’ इतिहासाची अपेक्षा ठेवणार नाहीत. त्यांचे संशोधनाचे काम वारंवार नवनव्या संशोधनाने मागे पडणार आहे, हे त्यांना अपेक्षितच असेल. त्यांना जाणीव असेल, की भूतकाळाचे ज्ञान आपल्यापर्यंत काही माणसांमार्फत, त्यांनी केलेल्या प्रक्रियांमधूनच येते. त्या ज्ञानात मूलभूत, व्यक्तिनिरपेक्ष, अपरिवर्तनीय असे काही मानता येत नाही.
काही उतावळे अभ्यासक तर अशा साशंक भूमिकेला येऊन पोचतील, की ऐतिहासिक ज्ञानाचे निष्कर्ष माणसे व दृष्टिकोन यांतूनच आपल्यापर्यंत येत असल्याने एक मांडणी व पर्यायी मांडणी यांतील कोणतीही मानायला हरकत नाही, कारण वस्तुनिष्ठ ऐतिहासिक सत्य असे काही नसतेच.
विवेक आणि अंतःप्रेरणा (Reason and Intuition)
Choose Life या पुस्तकाचे मलपृष्ठावरील अवतरण खालीलप्रमाणे : (टाइम साप्ताहिक, अमेरिका यांच्या अंकातून ): अर्नोल्ड टॉयन्बी यांचेवर टीका करणारे आहेतच. पण त्यांची गणना आइन्स्टाइन, श्वाइट्झर किंवा बरट्रांड रसेल, यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय संतांच्या मालिकेत होते. अनेकानेक विषयांवरील त्यांच्या मतांची चौकशी केली जात असे. डाइसाकु इकेडा त्यांच्या इतर ग्रंथांतून, व्याख्यानांतून आणि लेखांतून इकेडा यांनी ‘जागतिक अन्न बँक’, ‘संरक्षण खर्चात कपात’ व ‘आण्विक शस्त्रांचा त्याग’ याविषयी ऊहापोह केला आहे. त्यांचा सर्वाधिक ओढा मात्र मानवी समूहांतील युद्धविरोधी भावनांची वाढ या विषयांकडे आहे. इकेडा (इ) : अंतःप्रेरणा (Intuition) आणि विवेक (reason) एकमेकांस पूरक असतात.
भ्रष्टाचार : कारणे व उपाय (भाग २)
क) पैशाचे साध्यमूल्य
साधारणतः पैशाचे साधनमूल्य म्हणून असलेले महत्त्व सर्वच जण स्वीकारतात. तथापि एकदा पैसा मिळविण्यास सुरुवात केली की, त्याचे एक विलक्षण असे आकर्षण निर्माण होते. आणि साधनमूल्य विसरून त्याला साध्याचे स्थान येते. पैसा हेच साध्य ठरल्यावर तो किती व कसा मिळवायचा याला मर्यादा राहत नाहीत. यामुळेच ज्यांच्याकडे मुबलक पैसा आहे असे लोकही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा अवलंब करीत असताना दिसतात. म्हणून मंत्री, ज्येष्ठ सनदी अधिकारी यांच्या स्तरावर भ्रष्टाचाराचे प्रमाण प्रचंड प्रमाणावर वाढल्याचे आपणास दिसून येते. ड) आर्थिक आवश्यकता या उच्चवर्गाबरोबरच कनिष्ठ वर्गातही छोट्यामोठ्या स्वरूपात होणारा भ्रष्टाचार आपणास दिसून येतो.