क) पैशाचे साध्यमूल्य
साधारणतः पैशाचे साधनमूल्य म्हणून असलेले महत्त्व सर्वच जण स्वीकारतात. तथापि एकदा पैसा मिळविण्यास सुरुवात केली की, त्याचे एक विलक्षण असे आकर्षण निर्माण होते. आणि साधनमूल्य विसरून त्याला साध्याचे स्थान येते. पैसा हेच साध्य ठरल्यावर तो किती व कसा मिळवायचा याला मर्यादा राहत नाहीत. यामुळेच ज्यांच्याकडे मुबलक पैसा आहे असे लोकही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा अवलंब करीत असताना दिसतात. म्हणून मंत्री, ज्येष्ठ सनदी अधिकारी यांच्या स्तरावर भ्रष्टाचाराचे प्रमाण प्रचंड प्रमाणावर वाढल्याचे आपणास दिसून येते. ड) आर्थिक आवश्यकता या उच्चवर्गाबरोबरच कनिष्ठ वर्गातही छोट्यामोठ्या स्वरूपात होणारा भ्रष्टाचार आपणास दिसून येतो.
विषय «इतर»
काही सूचना
प्रशासनाने पारदर्शक असणे हे काही नोकरशहांच्या दृष्टीने घातकच असते. लोकाभिमुख प्रशासनात लोक हा शब्द नागरिक या अर्थाने वापरला गेला आहे. लोकशाहीची ‘लोकांनी लोकांसाठी चालवलेले लोकांचेच राज्य’ ही व्याख्या अतिशय बाळबोध आहे. नागरिक होण्यासाठी या देशात जन्म घेणे एवढेच पुरेसे आहे. त्या भांडवलावर आपण नागरिकांचे हक्क मिळवू शकतो. सर्वोच्च-न्यायालयानेसुद्धा नागरिकांचे हक्क व कर्तव्ये यांची सांगड घालताना कर्तव्यांत कसूर झाली तरी हक्कावर बाधा येत नाही असेच सांगितले आहे. बहुसंख्य लोकांना हक्क हे माहीतच नाहीत. ती त्यांना सवलतच वाटते. कर्तव्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही.
सलाम व्हिएतनाम
कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, ललित लेख, अनुभवकथन इतिहास यांपैकी कशातच न मोडणारे असे हे पुस्तक आहे. श्री. ज.रा आपटे यांनी व्हिएतनाममध्ये न जाता अमेरिकेतील प्रकाशित साहित्यावर, अप्रकाशित माहितीवर व अनेक व्यक्तींशी प्रत्यक्ष चर्चा करून, संशोधनपर पुस्तक लिहिले. संशोधनपर लेख संबंधित व्यक्तीच वाचतात, कारण इतरांना त्या नीरस वाटतात, परंतु हे पुस्तक तसे वाटत नाही.
मुखपृष्ठापासून ते परिशिष्टांपर्यंत छपाईचे कार्य सुंदर व सुबक केले आहे. भाषा सोपी, प्रवाही, अर्थपूर्ण आणि लक्षवेधक आहे. परंतु पुस्तकातील संदर्भ, राजकीय नेतृत्व, भौगोलिक स्थिती, अमेरिकेतील साम्यवादी विरोधक, दुसऱ्या महायुद्धामुळे झालेली हानी गोंधळलेला आणि अतार्किक दृष्टिकोन, जनमताचा विशेषतः युवावर्गाचा आक्रोश, यासंबंधी फारशी माहिती नाही.
पोटासाठी
पैसे, जमीन आणि पाणी कमी असतात तेव्हा हिंसेच्या शक्यता वाढतात.
जानेवारी १९९८ मध्ये ‘ह्यूमन राइट्स वॉच, आशिया’ या स्वयंसेवी संस्थेच्या सिड्नी जोन्सने आर्थिक नाराजीचे वांशिक आणि धार्मिक असंतोषात रूपांतर होईल, असे भाकीत केले होते. त्याचे निरीक्षण असे होते की आधीच्या अठरा महिन्यांत पश्चिम इंडोनेशियात चिनी मालकीच्या दुकानांइतकेच गरीब मुस्लिमांचे चर्चवरील हल्ले वाढले होते. पूर्व इंडोनेशियात ख्रिस्ती वस्ती जास्त आहे, तिथे मुस्लिम व्यापाऱ्यांवरील हल्ले वाढले होते.
पण ज्या देशांमध्ये अशी हिंसा भेडसावते आहे तिथले पोलीस मानवी हक्कांबद्दल फारसे जागरूक नाहीत. याच देशांमध्ये कामगारांच्या हक्कांकडेही फारसे लक्ष दिले जात नाही.
विवेकवाद – भाग ४
गेल्या दोन लेखांकांत आपण पाहिले की ईश्वरास्तित्वसाधक कोणताही युक्तिवाद निर्णायक नाही. त्यांपैकी काही निराधार गोष्टी गृहीत धरून त्यावर आधारलेले आहेत, तर काहींत स्वच्छ व्याघात आहे असे आपल्याला आढळून आले. पण एक युक्तिवाद अजून तपासायचा राहिला आहे, आणि त्यावर ईश्वरवाद्यांची बरीच भिस्त आहे. हा युक्तिवाद म्हणजे ईश्वराचा साक्षात्कार होतो या दाव्यावर आधारलेला. त्याकडे आता वळू.
या लेखमालेच्या पहिल्या लेखांकात असे म्हटले होते की कोणत्याही विधानावर विश्वास ठेवायचा (किंवा ते स्वीकारायचे) तर तो त्या विधानाच्या पुराव्यावर आणि त्या क्षेत्रातील तज्ज्ञांना प्रमाण मानावे. यावर साक्षात्कारवादी चटकन् म्हणेल की ‘म्हणजे तुम्ही आप्तवचन मानता तर!
चिरतरुण जातिव्यवस्था
इंग्रजी शिकलेल्या उच्चभ्रू वर्गातील एखाद्यासमोर ‘जात’ या शब्दाचा उच्चार केला तरी तो अस्वस्थ होईल. रागाने लालबुंद होईल. पूर्वग्रहदूषित म्हणून हिणवेल व तुम्हाला चक्क वेड्यात काढेल. त्याच्या मते ‘ते’ जातपात मानत नाहीत. कधी कुणाची जात विचारत नाहीत, जातीवर आधारित व्यवहार करत नाहीत वा कुठलेही निर्णय घेत नाहीत, अशांना आपण फक्त एकच प्रश्न विचाराः ‘तुमचे लग्न जातीतच झाले आहे ना ?’ उत्तर बहुधा ‘होय’ असेल व त्याला पुष्टी म्हणून ‘आयुष्यात फक्त एकदाच मी लग्नाच्या वेळी जात पाळली होती’, असे गर्वाने सांगतील. परंतु ही एकच गोष्ट जातिव्यवस्थेला जिवंत ठेवत आहे, तिला चिरतारुण्य व अमरत्व बहाल करत आहे, याची कदाचित त्यांना कल्पना नसेल.
आधुनिकोत्तरवाद, हिंदू राष्ट्रवाद व वैदिक विज्ञान (३)
पाश्चात्त्य देशांनी इतरांचे शोषण करण्यासाठी विज्ञानाचा गैरवापर केला. ‘नेटिव्हां’ना कमी लेखणे विज्ञानाच्या मदतीने घडले. परकी परंपरांच्या सत्तेला आव्हान देण्यासाठी प्रबोधन-काळातल्यासारखा विज्ञानाचा वापर केला. हे सर्व नाकारता येत नाही. पण हे नोंदण्यामुळे, यावर टीका करण्यामुळे आधुनिकोत्तर विचारवंत धर्माधिष्ठित ‘उजव्या’ विचारवंतांचे सहकारी, दोस्त होत नाहीत. पण आधुनिकोत्तर विचारवंत विज्ञानाच्या राजकीय गैरवापरावरील टीका करून थांबत नाहीत. ते वस्तुनिष्ठ ज्ञानाची कल्पना हेच एक मिथक आहे, आणि हे मिथक सत्ताधारी पाश्चात्त्यांनी मतलबीपणे ‘सत्य’ म्हणून इतरांवर लादले आहे, असे म्हणतात. ते विज्ञानाचे पाश्चात्त्य साम्राज्यवादाशी असलेले संबंध दाखवून थांबत नाहीत.
ग्राम-नागरी संबंध आणि विकासाची परस्परावलंबी प्रक्रिया (भाग २)
या लेखाच्या पहिल्या भागात ग्रामीण-नागरी प्रक्रियेमधील लोकांचे स्थलांतर आणि मालांची देवाण-घेवाण यांची चर्चा केली होती. या ‘उपयोगी’ मालाच्या आणि/सक्षम, कष्टकरी लोकांच्या स्थलांतर प्रक्रियेला जोडूनच इतर काही महत्त्वाची देवाणघेवाण ग्राम-नागरी विभागांमध्ये होत असते. त्यांचा विचार या भागात केला आहे. ७) निरुपयोगी गोष्टींचे प्रवाह (Flows of wastes):
नागरी क्षेत्रांचे, विशेषतः मध्यम आणि मोठ्या आकाराच्या शहरांचे परिणाम केवळ त्यांच्या ‘सीमांकित’, नागरी भूक्षेत्रापुरते कधीच मर्यादित नसतात. त्यांचे पर्यावरणविषयक परिणाम तर पुष्कळ मोठ्या भौगोलिक क्षेत्रावर होत असतात. ‘नगरांचे पर्यावरण ठसे’ (Ecological footprints) हे आजूबाजूच्या ग्रामीण समजल्या जाणाऱ्या प्रदेशांवरही पडत असतात.
नागरी-जैविक विविधता (भाग २)
नागरीकरणामुळे जैविक वैविध्यावर होणारे आघात आणि ते रोखण्यासाठी आवश्यक असणारे संवर्धन धोरण
५. जैवविविधता जपणाऱ्या ‘नव्या’ नगरांचे नियोजन:
५.१. वस्ती, खेडे, गाव, नगर, महानगर, मोठे नागरी प्रदेश अशी मानवी वस्त्यांची एक श्रेणी असते. कधीकधी एखाद्या ठिकाणी अचानकपणे नवे नगर वसविण्याचे ठरते. त्यामागे काही सामाजिक-राजकीय कारणे असतात. वेगाने नगरनिर्माण करण्याच्या धडपडीमध्ये नियोजन करायला पुरेसा वेळही दिला जात नाही. साध्या नागरी सेवांचा विचार पुरेशा प्रमाणात होत नाही तेथे पर्यावरणाचा विचार तर दूरच राहतो. असे असले तरी स्थानिक जैवविविधता नष्ट होणे हे अपरिहार्यच असते असे मात्र नाही.
व्यक्तिविशिष्ट रसायनांचा मेळ
अंशतः विश्लेषणः पद्मजाचा अनुभव दुर्मिळ आहे खरा, पण त्याला गूढ किंवा अमानवी मानायचे कारण नाही. उपलब्ध शास्त्रीय ज्ञान वापरून त्याचे स्पष्टीकरण इथे थोडक्यात देता येईल.
माणसासकट सर्व प्राण्यांना काही व्यक्तिविशिष्ट रसायने अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म प्रमाणात उपलब्ध असली तरी त्यांची तीव्र जाणीव होऊ शकते. याची अगदी ठळक आणि व्यवहारातली उदाहरणे म्हणजे केवळ वासावरून काही तासांपूर्वी पळालेल्या गुन्हेगाराचा, पुरून टाकलेल्या बळीचाही माग काढू शकणारे कुत्रे, मादीच्या वासाने दोन-तीन किलोमीटर्सपर्यंत तिला शोधत जाणारे भुंगे, औषधाच्या प्रत्येक गोळीत औषधाचे अगदी थोडेच रेणू असतील-नसतील तरी लागू पडणारी होमियोपॅथिक औषधे आणि एखाद्या विशिष्ट पदार्थाची (हिंग, लसूण, शेंगदाणे, अंडी, विशिष्ट प्रकारचे गवत, ऑईल पेन्ट, इ.)