विषय «इतर»

मन में है विश्वास..

डॉ. विश्वास कानडे ‘आजचा सुधारक’च्या उत्पादकांपैकी एक होते. गेल्या जानेवारीच्या 29 तारखेला ते अनंतात विलीन झाले. त्यांचे ‘देहावसान’ झाले म्हणावे की नुसते ‘निवर्तले’ असे म्हणावे असा क्षणभर मला प्रश्न पडला होता. तसे पाहिले तर ‘दिवंगत’ किंवा त्याहीपेक्षा ‘कैलासवासी’ हा शब्द त्यांच्या निर्वाणला समर्पक झाला असता. कानडे भाषाशिल्पाचे चिकित्सक उपासक होते. ते नुसते कुशल पाथरवट – पथुरिया नव्हते, शिल्पी – शब्दशिल्पी होते. त्यांचे मन शब्दलोभी, शिक्षण शब्दानुशासन जाणणारे आणि वळण जपणारे होते. एक शब्द जरी सम्यक जाणला, सम्यक योजला तरी इह- परलोकी कामधेनू ठरतो असे मानणारी एक भारतीय परंपरा त्यांना आपली वाटे.

पुढे वाचा

बौद्ध धर्माविरुद्ध बंड, मनुस्मृती व जातिसंस्था

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1916 साली न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात एक शोधनिबंध वाचून हिंदुसमाजातील सतीची चाल, पुनर्विवाहबंदी व बालविवाह ह्या प्रथा जातिव्यवस्था बळकट करण्यास्तव उत्पन्न केल्या गेल्या असे विचार मांडले होते. याचा उल्लेख कुमुदिनी दांडेकरांनी त्यांच्या सतीची चाल बालविवाह, या (आ.सु., जुलै 2003), या लेखात केला. जातिभेदामुळे भारतीय समाज पोखरून गेला, लोकांत एकीची भावना राहिली नाही व त्यामुळे बाहेरील शत्रूंनी त्यांचा नेहमीच पराभव केला, या परिस्थितीची जाणीव महाराष्ट्रात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, इतर पुढाऱ्यांपेक्षा जास्त करून, त्यास खरी धार लावली.

सतीची चाल, पुनर्विवाहबंदी व बालविवाह ही पापे (!)

पुढे वाचा

आजचे विज्ञान व अध्यात्म – दुसरी बाजू

‘आजचा सुधारक’ (जाने-फ्रेबु 2004) मधील श्री. वि. शं. ठकार यांचा वरील विषयावरील लेख बराच चिंतनीय पण विवाद्य वाटला. त्या विषयाची दुसरी बाजू सांगण्याचा हा प्रयत्न.

दोन भिन्न ज्ञानशाखा :- ज्ञानाचा शोध कसा चालतो ते प्रथम पहावयास हवे ज्ञाता (जाणणारा), ज्ञेय (जे जाणावयाचे ते, जाणावयाचा विषय) व ज्ञान ही त्रिपुटी सर्वपरिचित आहे. माणसाच्या ज्ञानार्जनातच त्याचे अज्ञान उघडे पडते आणि शेवटी माणसाला आपल्या ज्ञानापेक्षा अज्ञानाची खात्री पटते. हा एक विरोधाभास आहे. ज्ञानाचा शोध दोन दिशांनी चालतो. ज्यावेळी ज्ञेयाला प्राधान्य देऊन ज्ञानाचा शोध चालतो, त्यावेळी विज्ञानाची प्रचंड वाढ होते व जडवादी (विज्ञानवादी) दर्शनाला महत्त्व येते.

पुढे वाचा

सारे काही समतेसाठीच

परस्परावलंबन आणि नव्या पद्धतीचे अर्थकारण ह्या विषयीच्या मी लिहीत असलेल्या लेखांची सुरुवात अंदाजे दोनअडीच वर्षापूर्वी झाली. ही लेखमाला लांबत चालली आहे आणि ती तुटकपणे प्रकाशित झाल्याने तिच्यातील संगती राखणे अत्यंत अवघड झाले आहे. त्यामुळे ह्या एका लेखानंतर ही लेखमाला थांबवावी आणि ह्या विषयावर एक मुद्देसूद आणि बांधेसूद पुस्तक लिहून तयार करावे, असा विचार माझ्या मनात दृढमूल होऊ लागला.

श्री. भ. पां. पाटणकर, डॉ. चिं. मो. पंडित, श्री. मधुकर देशपांडे, आणि श्री. फाळके ह्या मंडळींनी ही माझी लेखमाला साक्षेपाने वाचली. आणि त्यांचे माझ्याशी असलेले मतैक्य आणि मतांतर नोंदवले ह्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे.

पुढे वाचा

पाण्याचे व्यवस्थापन आणि कायदेकानू (भाग १)

पाऊस आकाशातून पडतो. केव्हाही, कुठेही, कितीही पडतो. लोकांना वाटते पावसाचे पाणी फुकट मिळते. पाऊस आपल्या अंगणात आणि शिवारातच फक्त पडत नाही. रानावनात, डोंगर दऱ्यात . . . सर्वत्र पडतो. हे पाणी धरून ठेवावे लागते. वाहून न्यावे लागते, आयात-निर्यात करावे लागते, स्वच्छ ठेवावे लागते, पुढील पाऊसकाळ येईपर्यंत पुरवावे लागते, म्हणून पाण्याचे व्यवस्थापन करावे लागते. त्यासाठी लागणारे व्यवस्थापक, अभियंते, धरणे, कालवे, नळ, जलशुद्धीकरणाच्या सोयी, पंप, डिझेल, वीज या गोष्टी फुकट मिळत नाहीत. हा एक पूर्वनियोजित प्रचंड खटाटोप असतो, म्हणून ही व्यवस्थापनयंत्रणा उभी करावी लागते.

पुढे वाचा

आकलनातील अडथळा

आपल्याकडे थोर व्यक्तींना देवपण देण्याची खोड आहे. यामुळे त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाला खरीखुरी बाधा जरी येणार नसली तरी आपल्या आकलनाला निश्चितच येते. त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाकडे आपण नेमकेपणाने पाहू शकत नाही. देवच म्हटल्यावर काय हो? तो काहीही करू शकतो. तो श्रेष्ठच असतो. त्याला वेगळ्या कष्टांची काही जरूरच नसते. दुसरे अशा ‘देवांच्या’ कर्तृत्वातून आपण कोणतीही प्रेरणा खऱ्या अर्थाने घेऊ शकत नाही. तो देव आहे, आपण मात्र माणूस. आपले हात लहानसे असतात. परिस्थिती बदलण्याचे सामर्थ्य त्यांत कुठून असणार — अशी एक सबब आपसूक तयार होते.

पुढे वाचा

विज्ञान ही काय चीज आहे? (उत्तरार्ध)

थॉमस कून यांचा वैज्ञानिक क्रांतींची संरचना (The Structure of Scientific Revolutions) हा ग्रंथ 1962 साली प्रसिद्ध झाला. त्यानंतरच्या चाळीस वर्षांत या ग्रंथावर जगात हजारो शोधनिबंध लिहिले गेले असतील. या ग्रंथामुळे विज्ञानाकडे बघण्याच्या एकूणच दृष्टिकोनात क्रांती घडून आली. विज्ञान म्हणजे काय हा विचार करताना कूनपूर्व आणि कूनोत्तर असे दोन कालखंड पडतात. अर्थात ते अगदी काटेकोर कालगणनेनुसार नव्हेत. कारण इ.स. १९६२ नंतरही कूनपूर्व कालखंडातील दृष्टिकोनाचा पाठपुरावा करणारे अनेक तत्त्वज्ञ आढळतात. किंबहुना कून यांच्या प्रबंधाने सुरू झालेली चर्चा अजूनही संपलेली नाही. एवढे मात्र खरे की १९६२ नंतर ज्याला कूनीय वा कूनोत्तर दृष्टिकोन म्हणता येईल तो रुजत गेला आणि सध्याचा विज्ञानाच्या अभ्यासाचा प्रचलित, अधिकृत, वर्चस्वी दृष्टिकोन तोच आहे.

पुढे वाचा

गणिताचे समाजातील स्थान आणि कार्य (उत्तरार्ध)

गणिताचे महत्त्व किती याची जाणीव व्यापक समाजाला आहे का? गणित विषयात काम करणाऱ्याला समाज कशा प्रकारची वागणूक देतो? एकूण सर्वच विज्ञानक्षेत्र आणि खास करून गणित यांची चांगली कदर पाश्चात्त्य समाजाला निदान आधुनिक काळात तरी, असल्याचे दिसते. 19 व्या शतकाची सुरुवात होईपर्यंत केवळ गणितालाच वाहून घेतलेल्यांची संख्या फारच तुरळक होती. त्यानंतर मात्र गणितज्ज्ञांना, अगदी गणितासाठी गणित करणाऱ्यांनाही, पाश्चात्त्य समाजाने बऱ्यापैकी पाठिंबा दिल्याचे दिसते. अनेक विद्यापीठांची तसेच इतर विद्याकेंद्राची स्थापना, आणि काही गणितज्ज्ञांना तेथील राजेरजवाड्यांनी केलेले साहाय्य यावरून याची चांगली खात्री पटते. अर्थात काही अत्युत्कृष्ट व्यक्तींना जरूर तो पाठिंबा न मिळाल्याच्या घटना आहेत.

पुढे वाचा

लेखक परिचय

1. माधव गाडगीळ: तीस वर्ष इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगलोर, येथे संशोधन व अध्यापन. यापैकी तीन वर्ष सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेसचे प्रमुख. ‘पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर’ व इतर अनेक सरकारी, गैरसरकारी प्रकल्पांद्वारे सतत संशोधन. हार्वर्ड, स्टॅन्फर्ड व बर्कली येथे व्हिजिटिंग प्रोफेसर, पद्मश्री व अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार व सन्मान.
[190 शोधनिबंध, (रामचंद्र गुहांसोबत) ‘धिस फिशर्ड लँड’ व ‘इकॉलजी अँड इक्विटी, राव यांसोबत’ ‘नर्चरिंग बायोडायव्हर्सिटी,’ व ‘डायव्हर्सिटी : द कॉर्नरस्टोन ऑफ लाईफ’ आणि ‘इकॉलॉजिकल जर्नल’ ”]
2. हेमचंद्र प्रधान : प्राध्यापक व डीन, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, T.I.F.R.

पुढे वाचा

विज्ञान ही चीज काय आहे? (पूर्वार्ध)

आधुनिक जगात विज्ञानाविषयी आदराची, दराऱ्याची भावना आहे यात शंका नाही. मानवी ज्ञानाच्या कक्षा अणुरेणूंपासून विश्वाच्या उत्पत्तीपर्यंत, विविध क्षेत्रांत, विविध प्रकारे रुंदावण्याचे विज्ञानाचे यश वादातीत आहे. (या लेखाचे ते एक मुख्य गृहीतक ही आहे.) मानवाच्या भौतिक प्रगतीसाठी विज्ञानाची उपयुक्तता, विज्ञानाचे योगदानही सर्वमान्य आहे. विज्ञानाविषयीचा आदर व दरारा मात्र या योगदानातून, उपयुक्ततेतूनच आलेला आहे असे नाही, तर त्याच्यामागे विज्ञानाच्या कार्यपद्धतीत काहीतरी विशेष आहे, खास विश्वसनीय आहे अशी सार्वत्रिक समजूत आहे. प्रसारमाध्यमातील जाहिरातीत-सुद्धा “आमचे उत्पादन वैज्ञानिकरीत्या अधिक ‘शुभ्र’ अधिक ‘चमकदार’, अधिक ‘प्रभावी’, अधिक ‘गुणकारी’ आहे!”

पुढे वाचा