“पुरुष अजूनी भूतकाळात राहात आहेत म्हणून पा चात्त्य कुटुंबव्यवस्था खिळखिळी होत आहे’ असे विधान माझ्या लेखात आहे (जाने. २००२). त्याला आशा ब्रह्म यांच्या लेखातल्या विधानांना जोडून भ. पां. पाटणकर यांनी एक (? विनोदी) निष्कर्ष काढला आहे “स्त्रिया (? उपय) नैतिक मूल्यांच्या मागे लागल्या आहेत.’ पा चात्त्य स्त्रिया ज्या मूल्यांचा पुरस्कार करत आहेत त्यांची थोडक्यात यादी लिहिते.
पती व पत्नी दोघेही नोकऱ्या करत असताना (अ) दोघांनी घरकामाची व मुलांची समान प्रमाणात जबाबदारी घ्यावी. (ब) पतीच्या करिअरएवढेच पत्नीच्या करिअरला महत्त्व असावे (क) दोघांच्या नातेवाईकांना सम प्रमाणात घरात स्थान मिळावे.
विषय «इतर»
स्वभाव–विभाव (पुस्तक-परीक्षण, ले. आनंद नाडकर्णी)
माणूस जसा वागतो तसा तो का वागतो, ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नातूनच मानवी वर्तन (आणि प्राणि-वर्तनसुद्धा) समजून घेण्याच्या शास्त्राचा, म्हणजेच मानसशास्त्राचा जन्म झाला आहे.
मानवी मन हे आजही माणसाला पडलेले कोडे आहे व ते सोडविण्याचे अनेक मार्ग व पद्धती मानसशास्त्रज्ञांनी शोधून काढलेल्या आहेत.
आजही मानसशास्त्र का निवडले असा प्रश्न जर विद्यार्थ्याला विचारला तर त्याचे स्वाभाविक उत्तर ‘समोरच्या व्यक्तीचे वर्तन/मन समजून घेता यावे’ म्हणून असे असते. आणखी विचार करून उत्तर द्या असे म्हटले तर चांगले जगता यावे म्हणून असे उत्तर मिळते. ‘चांगले जगणे’ म्हणजे काय, हे स्वतःला समजून घेता आले, इतरांना समजून घेता आले, एकमेकांशी व्यवहार करताना एकमेकांना समजून घेता आले तरच शक्य आहे असेही त्यांना मनापासून वाटते व ह्याचा मार्ग मानसशास्त्राच्या अभ्यासाने मिळेल असे त्यांचे उत्तर असते.
उत्क्रांती: परोपजीवींनी दुस्साहसी बनवलेल्या घुशी
[EVOLUTION : Parasites make Scaredy-rats foolhardy या Science या प्रतिष्ठित नियतकालिकाच्या २८ जुलाय २००० च्या अंकातील कार्ल झिमरच्या लेखाचे हे भाषांतर. झिमरचे ‘Parasite Rex’ (राजा परोपजीवी) हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.ट
‘एक्स–फाईल्स’ हा अधिसामान्य (paranormal) घटनांवर आधारित कार्यक्रम लोकप्रिय व्हायच्या बऱ्याच आधी रॉबर्ट हाईनलाईनने परग्रहांवरून आलेले परोपजीवी माणसांची मने बदलू शकण्याबाबत विज्ञान कथा लिहिली होती. त्याच्या १९५५ सालच्या ‘द पपेट मास्टर्ज’ या कादंबरीत अळ्यांसारखे परोपजीवी माणसांच्या कण्यांना चिकटून आपला वंश वाढवणाऱ्या क्रिया करायला माणसांना भाग पाडतात. हाईनलाईन कट्टर कम्युनिस्ट विरोधक होता, आणि त्याच्या कादंबरीच्या हेतूत हे लाल-विरोधाचे अंग जीवशास्त्रापेक्षा जास्त होते.
खिळे मोळे
काही जणांना महाराष्ट्रातल्या आणीबाणीचा काळ ‘मिश्र वरदाना’ सारखा वाटतो. अनेक जुने मुद्दे गांभीर्याने घेऊन, धाडसी धोरणे लागू करून सोडवले गेले. सामान्य काळात यांपैकी काही मुद्दे लोकांना आवडले नसते. मात्र यातल्या अनेक गोष्टी आणीबाणीनंतर गळून पडल्या.
एक सततची मागणी होती, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची. मुख्यमंत्र्यांनी तिला दाद दिली नाही. पुढे ८८-८९ मध्ये शरद पवारांनी काही रकमेपर्यंतची कर्जे माफ केली आणि व्याजाचे दर कमी केले. ह्या लोकानुनयी निर्णयाने शेतकऱ्यांना मिळणारा संस्थात्मक अर्थसहाय्याचा झरा आटला.
__ आपल्याकडे सार्वजनिक सुट्ट्यांची संख्या अगदी लज्जास्पद आहे. सुट्ट्या आणि रजांची वार्षिक बेरीज १७२ दिवस आहे.
युनिकॉर्न
(उंबेर्तो इको ह्या इटालियन लेखकाच्या द नेम ऑफ द रोज ह्या पुस्तकातील हा उतारा. पुस्तक वरकरणी गुन्हा तपासाच्या कादंबरीसारखे आहे. चौदाव्या शतकात एक ‘धर्मगुरू व त्याचा एक शिष्य एका मठात पोचतात आणि तिथे घडणाऱ्या एका खुनांच्या मालिकेचे रहस्य उलगडतात. धर्मगुरू विल्यम हा रॉजर बेकनचा शिष्य, आणि बेकन हा काही लोकांच्या मते ‘पहिला’ वैज्ञानिक, आणि स्फोटक दारूचा संशोधक. युरोपच्या ‘अंधाऱ्या युगातली’ ही कथा.
युनिकॉर्न हा काल्पनिक प्राणी आहे. श्रद्धा (फेथ), आशा (होप) आणि औदार्य (चॅरिटी) ही ख्रिस्ती धर्मशास्त्रातली गुणांची त्रयी आहे.)
आड्सो : पण मग युनिकॉर्न खोटा आहे का?
खादी: श्री. वेले ह्यांच्या पत्राच्या निमित्ताने
श्री. दामोदर वेले ह्यांचे मे अंकातले पत्र वाचले. त्यांनी Mass Production च्या जमान्यांत खादी काळ बाह्य झाली आहे असे माझे मत म्हणून मांडले आहे. त्याबाबतीत मला त्यांचे लक्ष त्याच अंकातल्या ५०-५१ या पानवरील मजकुराकडे वेधावयाचे आहे. त्यांत मी असे म्हणतो की, आपले प्रश्न औद्योगिक क्रान्ती व तज्जन्य Mass Production मुळे निर्माण झाले नाहीत. ते आपल्याला यंत्रयुगाला सामोरे जाता आलेले नाही म्हणून निर्माण झाले आहेत.
यंत्रयुग मानवेतिहासांत फार पूर्वीच आलेले आहे. आणि लोकसंख्या मुळीच वाढली नाही तरी, मानवी बुद्धीच्या आटोक्यात नवीन उत्पादनपद्धती येऊ लागल्या तेव्हापासून हा फरक पडला आहे.
विशेष जोड अंक
आजचा सुधारकचा यापुढील अंक हा ‘शिक्षणामागील हेतू’ या विषयावरील विशेष जोड अंक असेल. सुमारे ऐंशी पानांचा हा अंक जुलै-ऑगस्टचा अंक म्हणून प्रकाशित होईल.
या अंकासाठी अभ्यागत संपादक म्हणून संजीवनी कुलकर्णी आम्हाला लाभल्या आहेत. होमिओपॅथीचे शिक्षण घेतलेल्या संजीवनींचा त्रोटक परिचय असा —-
१९८७ मध्ये त्यांनी सतर्क व सजग पालकत्वासाठी ‘पालकनीती’ हे मासिक सुरू केले आणि आजवर त्याचे संपादन त्या करत आहेत.
एन. जी. नारळकर फाऊंडेशनने सुरू केलेल्या ‘अक्षरनंदन’ या शाळेच्या व्यवस्थापनात त्या सक्रिय असून गणित, नागरिकत्वाचे शिक्षण आणि एकूण शिक्षणपद्धतीत त्यांना विशेष रस आहे.
धैर्य
तापलेल्या आणि धूळभरल्या डांबरी रस्त्यावर एका स्त्रीचा, गीताबेनचा, नग्नदेह पडला आहे. तिचे कपडे जवळच अस्ताव्यस्त पडले आहेत. अंतर्वस्त्रांपैकी एक वस्तू तिच्यापासून फुटाभरावर आहे, तर दुसरी तिच्या डाव्या हाताने जिवाच्या आकांताने धरली आहे. तिचा डावा हात आणि धड हे रक्ताळले आहेत. धडावर खोल जखमा आहेत. डाव्या मांडीवर रक्त आहे आणि घोट यावर एक पैंजण. प्लास्टिकच्या चपला शेजारी आहेत. चित्राच्या मध्यावर एक वेडावाकडा, लाल, द्वेषभरला विटेचा तुकडा आहे—-बहुधा तिच्या मारेकऱ्यांनी तिचा अंत घडवायला वापरलेला.
गीताबेन अमदाबादेत २५ मार्चला दिवसाढवळ्या मारली गेली, तिच्या घराशेजारील एका बस-थांब्याजवळ.
निवेदन
आजचा सुधारक ह्या आपल्या मासिकाने आता बारा वर्षे पूर्ण केली आहेत. त्याचे अंदाजे एक हजार वर्गणीदार आहेत. हिंदी द्वैमासिकाला दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच्या वर्गणीदारांची संख्या दीडशेच्या घरात आहे. आजचा सुधारकचे बारा वर्षे अविरत प्रकाशन केल्यामुळे मासिकाच्या आयुष्याचा एक टप्पा गाठला गेला आहे असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. असा टप्पा गाठल्याचे प्रतीक म्हणून आणि आपल्या संस्थापक संपादकांचे स्वास्थ्य तितकेसे बरे नाही म्हणून आपल्या मासिकांच्या प्रकाशनाची एक वेगळी व्यवस्था करण्याचे योजिले आहे. विवेकवादाला वाहिलेल्या ह्या दोनही मासिकांचे स्वामित्व आता एका अनौपचारिक विश्वस्तमंडळाकडे सोपवावयाचे आहे.
वैद्यकीय व्यवसाय
१० वैशिष्ट्ये —- इतर व्यवसायांपेक्षा वैद्यकीय व्यवसाय वेगळा आहे.
(१) मानवी शरीर हे बऱ्याच वेळा स्वतःची दुरुस्ती स्वतःच करणारे यंत्र आहे. सर्दी-पडसे-फ्ल्यू पासून क्षयरोग, विषमज्वर, हिवताप अशा रोगांपर्यंत बऱ्याच रोगांपासून शरीर आपले आपणच बरे होत असते—-बहुतेक वेळा. सण अज्ञानामुळे नक्की आपोआप बऱ्या होणाऱ्या रोगांसाठी देखील उपचारकाकडे जात असतो. त्यामुळे काहीही उपचार केले तरी सण बराच होतो—-इतकेच नाही तर उपचारकांनी चुकीचे उपचार केले तरी बहुतेक वेळा शरीर त्यावरही मात करून बरेच होते. त्यामुळे उपचारकाच्या ज्ञानाचा, कौशल्याचा व प्रामाणिकपणाचा कस लागतच नाही. त्यामुळेच शास्त्रीय व अशास्त्रीय (आयुर्वेद, होमिओपथी, नेचरोपथी, इलेक्ट्रोपथी, युनानी, बाराक्षार, सिद्ध, धनगरी, रेकी, ॲक्युपंक्चर वगैरे) उपचारांत, बुद्धिमान व मूर्ख, सर्वच प्रकारचे उपचारक व्यावसायिक यश मिळवतात.