विषय «नास्तिक्य»

देव, अनिवार्यता आणि मानवी अपेक्षा

२० डिसेंबर २०२५ ला लल्लनटॉपवर देवाच्या अस्तित्वावर एक सार्वजनिक वादविवाद झाला. जावेद अख्तर आणि मुफ्ती शमैल नदवी ह्यांच्यातील दोन तास चाललेला हा संवाद बऱ्यापैकी संयत आणि आजच्या काळात दुर्मीळ असा होता. विशेषतः भारतात अशा विषयांवरील चर्चा बहुतेकवेळा गोंगाटात संपतात. इथे मात्र दोन्ही बाजूंनी दिलेल्या वेळांत मुद्दे मांडले, आणि शेवटच्या भागात प्रेक्षकांनी शांतपणे प्रश्न विचारले.

तरीही हा वाद ऐकताना सतत वाटत होते की दोघेही वक्ते प्रत्यक्षात दोन वेगवेगळ्या स्तरांवर बोलत होते. मुफ्ती शमैल नदवी देवाच्या अस्तित्वाकडे ‘कारण’ (reason), ‘अनिवार्यता’, ‘कार्यकारणभाव’ (causation) अशा संकल्पनांच्या आधारे तात्त्विक दृष्टिकोनातून पाहत होते.

पुढे वाचा

तर्क, श्रद्धा आणि निखळ संवादाचे उदाहरण

जावेद अख्तर आणि मुफ्ती शमैल नदवी ह्यांच्यात देवाच्या अस्तित्वाबाबत झालेली चर्चा एका धर्मसमूहातील व्यक्तीशी एक विवेकवादी, बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक व्यक्ती किती निखळ, सभ्य आणि तर्काधिष्ठित संवाद साधू शकते, ह्याचे उत्तम उदाहरण ठरते.

हा कार्यक्रम आयोजित करणारे, त्याचे मॉडरेटर सौरभ द्विवेदी, कार्यक्रमात सहभागी झालेले मुफ्ती शमैल नदवी, तसेच उपस्थित आमंत्रित वर्ग — ह्या सर्वांचेच अभिनंदन करायला हवे.

जावेद अख्तर आणि मुफ्ती शमैल नदवी ह्यांनी चर्चेचे स्वरूप निखळ आणि संयत ठेवले होते. प्रश्न तर्काचा होता, श्रद्धेचा होता, आणि धर्मव्यवस्थेशी निगडित आस्थेचाही होता. तरीही, त्याला गंभीर किंवा आक्रस्ताळे स्वरूप येऊ न देता चर्चा पुढे नेण्यात आली.

पुढे वाचा

ब्राइट्स सोसायटीतर्फे आयोजित नास्तिक परिषद – २०२५

सेवाग्राम, वर्धा येथे १४ ते १६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान ब्राइट्स सोसायटीने नास्तिक परिषद आयोजित केली होती. ह्या तीन दिवसीय निवासी परिषदेत देशभरातून सुमारे ३०० जण सहभागी झाले होते. परिषदेत सहभागी झालेल्यांपैकी काहींच्या प्रतिक्रिया प्रकाशित करीत आहोत 

ब्राइट सोसायटीविषयी

समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी, समाज व बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक ह्यांच्यात सुसंवाद निर्माण करण्यासाठी, तसेच कला, विज्ञान–तंत्रज्ञान, उद्योग, समाजसेवा, राजकारण, आदि विविध क्षेत्रांतील नास्तिकांचे योगदान गौरविण्यासाठी ब्राइट्स सोसायटी २०१४ पासून प्रयत्नरत आहे. ब्राइट्स सोसायटीने नास्तिक्य विषयावर चित्रस्पर्धा व चित्रप्रदर्शनी भरवली, तसेच बुद्धिप्रामाण्य, तर्कशीलता ह्या विषयांवरील तीन पुस्तकेही प्रकाशित केलेली आहेत.

पुढे वाचा

आजचा चार्वाक

चार्वाकाविषयी आजच्या अनेक माणसांना विशेष आकर्षण का वाटते? ह्याचे सरळ उत्तर असे की तो निखळपणे जडवादी होता. ‘निखळपणे ’ असे म्हणायचे कारण असे की इतर काही भारतीय दर्शनेही जडवादाकडे झुकणारी आहेत. उदाहरणार्थ, वैशेषिक दर्शन. जे काही आहे ते सर्व परमाणूंचे बनलेले आहे, असे ते मानते, असे स्थूलमानाने म्हणता येईल. पण प्रारंभी जरी ते ईश्वर मानीत नव्हते असे समजायला जागा आहे, तरी पुढे त्याने ईश्वराला सामावून घेतले. शिवाय ते कर्मसिद्धांतही स्वीकारते. म्हणजे व्यक्तींच्या कर्मानुसार त्यांना सुखदुःखरूप फळे भोगावी लागतात असे ते मानते.

पुढे वाचा

कोऽहं!

आस्तिक्य किंवा नास्तिक्याविषयी विचार करताना एकंदर माझ्या असे लक्षात येते की एखाद्या व्यक्तीचे नास्तिक असणे हे आस्तिकांना तर खटकतेच, पण नास्तिकांना तिच्या नास्तिकपणाच्या खरेपणाविषयी येताजाता टिका करणे, त्याहून जास्त आवडते. 

‘नास्तिक म्हणवते आणि हिच्याकडे देवघर आहे’

‘नास्तिक म्हणवते आणि ही दररोज दारात रांगोळी काढते’ 

‘नास्तिक म्हणवते आणि ही दिवाळीला दिवे लावते’ 

‘नास्तिक म्हणवते आणि ही सणासुदीला झेंडूच्या माळांनी घर सजवते’ 

ह्या आणि अशा टीका सतत एका प्रकारचे नास्तिक दुसऱ्या प्रकारच्या नास्तिकांवर करत असतात. 

मला वाटते मूळात ‘नास्तिक’ ह्या शब्दाचा अर्थ त्यांना कळलेला नसतो. 

पुढे वाचा

नास्तिक्य, विवेक आणि मानवतावाद

विवेक-मानवता : विवेक आणि मानवतावादावर लिहताना प्रथम विनय म्हणजे काय, ह्याचा अभ्यास करावा लागेल. आपल्या विचारांचा अहंकार न बाळगता समाजभान राखून इतरांचा आदर करणे गरजेचे असते. विनम्रता तुमच्या वर्तनात सहजगत्या आलेली असावी. चांगले संबंध निर्माण करणे, सद्भावनांना प्रेरित करणे, इतरांची मते सर्वंकषपणे विचारात घेणे आणि व्यक्त होताना किंवा प्रतिक्रिया देताना सांवादिक राहाणे हाच विवेकशील वर्तनाचा पाया असतो. तुम्ही धार्मिक, नास्तिक किंवा पुरोगामी कोणीही असा, तुम्ही तुमच्या विचारांचे वाहक असता.

मानवतावाद : मानवतावादावर लिहिताना दया, सहानुभूती ह्या मूल्यांचा आपण वापर करीत असतो; पण सहिष्णुता आणि वैचारिक मूल्यांचा आदरभाव असे प्राथमिक विचार मानववादाचा पाया असतो.

पुढे वाचा

सांगली नास्तिक परिषद – का? व कशासाठी? 

ब्राईट्स सोसायटीतर्फे गेली १० वर्षे आपण अनेक उपक्रम राबवतो आहोत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून समाजाचे शैक्षणिक प्रबोधन करणे, बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिकांमध्ये साहचर्य, सुसंवाद निर्माण करणे, त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे इत्यादी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी ब्राईट्स सोसायटीची स्थापना करण्यात आली. २०१४ पासून ब्राईट्स सोसायटीने सभा, नास्तिक संमेलने, भाषणे, चर्चासत्रे आणि चर्चा आयोजित केल्या आहेत. या उपक्रमांना उत्तम प्रतिसाद मिळतो. निमंत्रित वक्त्यांमध्ये समाजातील प्रभावशाली व्यक्तिमत्वे, शिक्षणतज्ज्ञ, कलाकार, लेखक, संपादक, स्तंभलेखक, कायदेतज्ज्ञ, राजकारणी, अभ्यासक, शास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते इत्यादिंचा समावेश होतो. ब्राईट्स सोसायटीने मराठीत एक पुस्तकही प्रकाशित केलेले आहे.

पुढे वाचा

कुचंबणा होत असेल तर त्यातून बाहेर काढणे हे उद्दिष्ट

आपल्या ब्राईट्स संस्थेच्या उद्दिष्टांचा जो छापील, कायदेशीर असा एक कागद माझ्याकडे आहे, त्याच्यात साधारण दहा बारा उद्दिष्टं लिहिलेली आहेत. त्यातलं एक मुख्य उद्दिष्ट आहे की, आपण ज्या समाजात राहतो तिथे काहीतरी लोकशिक्षण आपण केलं पाहिजे. २०१३ साली डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून झाला त्यावेळेला विचारांची जी एक घुसळण झाली त्या घुसळणीतून ब्राईट्स संस्थेची स्थापना झाली. आज त्याला दहा वर्षं झाली. त्यावेळी एक उद्दिष्ट असंही होतं की, कुठल्याही नास्तिक माणसाला मी “नास्तिक” आहे याची लाज न बाळगता सांगता आलं पाहिजे. 

खूप वर्षांपूर्वी मी एक सर्व्हे घेतला होता.

पुढे वाचा

धर्मनिरपेक्ष नहीं, हमें धर्मविहिन बनना है

मेरी सबसे जो अच्छी पहचान करवानी है, वो फिल्म में ही हुई है। फिल्म वालों को मुझसे शायद कुछ दुश्मनी है, इसलिए वो लोग हमेशा फिल्मों में मेरी पोल-खोल करते रहते हैं। Gandhi my father नाम की एक फिल्म आयी थी, जो मेरे दोस्त फिरोज अब्बास खान ने बनाई थी। बापू और उनके बड़े बेटे हरिलाल के बीच में जो संघर्ष हुआ था उसपर वो फिल्म बनी थी। उसके एक सीन में अक्षय खन्ना जिसने हरिलाल का पात्र निभाया था, वो दारू के नशे में धूत रात को अपने मोहल्ले में पहुँचता है। जिन्दगी भर सब लोगों की फटकारे पड़ती रहने के कारण वो उब चुका होता है और उस सीन में वो बहुत डिस्टर्ब्ड होकर, एक्साइट होकर रात के अंधेरे में शोर मचाता है। एक डाइलोग उसमें लिखा था, “हां, मैं गांधी की बिगडी हुई संतान हूं।” फिरोज अब्बास खान ने रिलीज के पहले मुझे बुलाया की, “आकर देख लो ये फिल्म ठीक लगती है या नहीं?”

पुढे वाचा

मैं और मेरी नास्तिकता

मैँ बहुत आभारी हूं कि आप लोगों ने मुझे यहां, इस जलसे में बुलाया. यहां आकर मुझे बहुत खुशी है कि इतने अंधेरे में भी लोग दीये जलाये हुए हैं.  और गम इस बात का है कि २१वीं सदी में नास्तिकता पर चर्चा हो रही है. एक ऐसा विषय जिसका फैसला १८वीं सदी में ही हो जाना चाहिए था. सच्ची बात तो यह है कि नास्तिकता तो ऐसी होनी चाहिए थी, जैसे ऑक्सीजन. हम सांस लेते हैं, तो सोचते थोड़े हैं कि हम सांस में ऑक्सीजन ले रहे हैं.

पुढे वाचा