कृत्रिमप्रज्ञा – दुधारी शस्त्र

कृत्रिमप्रज्ञा या विषयावर काही तज्ज्ञ विचारवंतांनी धोक्याची सूचना दिली आहे. जसजशी कृत्रिमप्रज्ञा प्रगत होत जाईल तसतशी मानवी मेंदूची अधोगती होईल. प्रज्ञा या मूळ विषयाचा गाभा माहिती नसलेली पिढी केवळ संगणकाच्या सहाय्याने कामे करू लागतील. संपूर्ण समाज कृत्रिमप्रज्ञेच्या ताब्यात जाईल. कोरोनाच्या धोक्यापेक्षा किंवा अणूयुद्धाच्या धोक्यापेक्षा गंभीर परिस्थिती निर्माण होईल. मेंदूचा ताबा कृत्रिमप्रज्ञेच्या ताब्यात जाईल. OpenAI ही कृत्रिमप्रज्ञेवर संशोधन करणारी संस्था आहे. ChatGPT आणि DALLE/2 अश्या कंपन्यांसोबत आता मायक्रोसॉफ्ट कंपनी जोडली गेली आहे. रोबोटिक्स प्रणालीने तंत्रज्ञान जेवढे विकसित केले त्यामुळे अमर्याद बेकारांचे लोंढे तयार झाले ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही.

पुढे वाचा

कृत्रिमप्रज्ञा! वरदान की आपत्ती!!

या विश्वात मनुष्य हा सर्वांत हुशार किंवा बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातो. मानवाच्या उत्पत्तीपासून आजवरचा त्याने केलेला प्रवास व विकास हा स्तिमीत करणारा आहे. जगण्याच्या दुर्दम्य आत्मविश्वासाच्या बळावर मानवाने अनेकविध शोध लावले. काही समाजाच्या दृष्टीने हितकारक तर काही अत्यंत हानिकारक व विध्वंसक. भूतकाळात लावलेल्या अनेक शोधांच्या आधारावर नवे तंत्रज्ञान बेतलेले आहे. वर्तमानकाळातही अधिकाधिक संशोधन करून नवनवीन शोध लावण्याचा माणसाचा ध्यास अजूनही कमी झालेला नाही. भविष्यातील पिढीच्या कल्याणासाठी आजची त्याची मेहनत, त्याची तपस्या खरोखरच कौतुकास्पद म्हणावी अशी आहे. अणूंचा शोध लागल्यावर अनेक वर्षांनंतर जर कोणता महत्त्वाचा शोध लागला असेल तर तो संगणकाचा शोध.

पुढे वाचा

लिव्-इन विथ AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स

२०२२ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबर पासून AI च्या चर्चा रंगल्यात. चॅटजीपीटीमुळे सर्वांचे लक्ष जणू या एका बिंदूपाशी येऊन थांबले आणि आपण सर्वांनी कळत नकळत या कृत्रिमप्रज्ञेला डेट करायला सुरुवात केली आणि आता साधारण ७-८ महिन्यांनी हे नाते या टप्प्यावर आले आहे की ‘लिव्-इन’मध्ये राहून पाहूयात जरा. 

कारण कृत्रिमप्रज्ञा हा आपल्या आयुष्यातला होऊ घातलेला नवीन जोडीदार आहे यात शंका नाही. पण संसार थाटायच्या आधी जोडीदाराला समजून घेणे गरजेचे आहे.

तर २०२२ च्या किती आधीपासून आपण कृत्रिमप्रज्ञा हे तंत्रज्ञान वापरत आहोत? मग ते गूगलने पुरवलेले नकाशे असूदेत नाहीतर ऑनलाइन चॅट-बॉट्स असूदेत किंवा टायपिंग करताना स्वतःहून दुरुस्त होऊन येणारे शब्द असूदेत.

पुढे वाचा

काळ बदलत आहे…!

अलीकडे माणसं होतायेत निकामी

भेसूर चेहरे अडकताहेत

तंत्रज्ञानाच्या महाकाय जाळ्यात…

गतिमान होणाऱ्या काळात

धर्मांधतेच्या वाळवंटात पाय रुतून पडलेत..

ऑक्सिजन झालाय गढूळ!

हवेतील समानतेचा ओलावा होतोय जहरी..

मेंदू झोपलेत, डोळे बंद आहेत

ही प्रतिकृती होऊन बसलीय शत्रू

सारं अगदी चिडीचूप

फक्त आदेश घेणे…पुढे जाणे…

हे हात पडलेत गळून

सौंदर्यमुद्रा होतेय अंधूक…. धूसर

गर्भबीजांवर होतंय अतिक्रमण

माणूस होतोय बेवारस दिवसेंदिवस 

हे तेच उगवलं जे पेरलं होतं

अती विकासाच्या नावातील भयंकर अंधार…

पायरीवर पाऊल टाकून स्तब्ध उभे राहा

गर्दीचा भाग बनून, रेंगाळत

पुढे सरका

नव्या युगात तुमचे स्वागत आहे

डोळे मिटवून माना हलवा

आता काळ बदलत आहे…!

पुढे वाचा

कृत्रिम बुद्धिमत्ता – फायदे आणि तोटे

कृत्रिम बुद्धिमत्तेचे फायदे तोटे बरेच चर्चिले गेले आहेत. त्यावर हा माझा दृष्टिकोन. 

आपण मानव किंवा सजीव प्राणी अनुभवांवरून शिकू शकतो पण यंत्रे तसे करू शकत नाहीत. आता यंत्रेही तसे करू लागलीत तर? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे जणू यंत्राने स्वतःच शिकणे.

ह्या क्षेत्रात जरी काही मोठे बदल, प्रगती हल्ली झाली असली तरी २१ व्या शतकाच्या मध्यापासून शास्त्रज्ञांनी यावर विचार करणे सुरू केले होते. १९४३ मध्ये मॅकलॉक आणि पिट्‌स या शास्त्रज्ञांनी बायलॉजिकल न्यूरल नेटवर्कची संकल्पना मांडली. अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ जॉन मॅकार्थी याने १९५५ मध्ये ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ ह्या शब्दांचा प्रथम वापर केला, त्याने एक प्रोग्रामिंग लँग्वेज LISP विकसित केली जी आजही कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी सगळ्यांत जास्त वापरली जाणारी भाषा आहे.

पुढे वाचा

विचार आणि आखूडदोषी बहुगुणीपणाची कसोटी : एक संक्षिप्त टिपण

मानव जसजसा प्रगत होत जातो तसतसा त्याचा विचारप्रवास/विचारप्रवाहसुद्धा प्रगत होत जाणे अगदी स्वाभाविक तथा क्रमप्राप्त असते. अशा विचार-प्रगती-प्रवासा/प्रवाहादरम्यान कोणत्याही विचारांना त्यांच्या ‘असण्या’तील ‘आखूडदोषी-बहुगुणीपणा’ची कसोटी पार पाडावी लागते. आखूड का असेनात, अंतर्निहित दोषांना पार करून व बहुगुणीपणाची लस टोचूनच विचारांच्या प्रवासा/प्रवाहात प्रगती संभव असते. विचारप्रवास व विचारप्रवाहातील ही कसोटी पार करू न शकणारे विचार कालबाह्य तथा मानवप्रगतीच्या दृष्टिकोनातून सर्वंकषविकासरोधी होऊ लागतात. अर्थातच अशा कालबाह्य व विकासरोधी विचारांना कवटाळून असलेल्या/असणाऱ्या साऱ्या (विचार)’पद्धती’ निसर्गसंमत/निसर्गाधारित/निसर्गानुकूल मानवविकासाला बाधकच नव्हे तर घातकही ठरू लागतात. असे असले तरी विज्ञानाधारित व निसर्गचक्राला, सुसंगत विचारांना प्राणशून्य करून अशा प्राणशून्य विचारांच्या शववाहकांची समाजातील संख्या व शक्तीसुद्धा नाकारून चालणार नाही. 

पुढे वाचा

आहे मनोहर तरी…

आजवर जी कामे मानवी बुद्धिमत्तेच्या वापराशिवाय शक्य नव्हती अशी कामे यंत्रांकरवी करून घेण्यासाठी उपयोगात येणाऱ्या प्रणालीस कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हणतात. यात मशीन लर्निंग, पॅटर्न रेकग्निशन, बिग डेटा, न्यूरल नेटवर्क्स, सेल्फ अल्गोरिदम इत्यादी तंत्रज्ञानाचा समावेश आहे. हे तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक संगणक वापरून आधुनिक काळातच संग्रहित प्रोग्रामद्वारे विकसित केले गेले असले तरी या संकल्पनेचा उगम पौराणिक कथांमध्ये तसेच विज्ञानकथांमध्ये आढळतो. 

कृत्रिम जीवन आणि स्वयंचलित यंत्रे तयार करण्याचे आकर्षण माणसाला पुराणकाळापासून असल्याचे दिसते. कृत्रिम जीवन म्हणजे जैविक प्रक्रियांचा अभ्यास करून तंत्रज्ञानाच्या आधारे त्यांचे एकीकरण (synthesis) आणि त्यांच्यासारखी पुनर्निर्मिती (simulation) करण्याचा प्रयास होय.

पुढे वाचा

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माणूस

माझ्यासारख्या १९७० च्या दशकात जन्मलेल्या अनेक लोकांसाठी आजच्या तंत्रज्ञानाची झेप भंजाळून टाकणारी आहे. १९८५ च्या काळात दुसऱ्या गावातल्या नातेवाईकांना फोन करण्यासाठी सार्वजनिक टेलिफोन कार्यालयात रांगेत एक-दोन तास उभे राहून वाट बघावी लागायची. आता आपण आपल्या हातातल्या वैयक्तिक फोनवरून जगात कुठेही क्षणात फोन लावू शकतो आणि त्या व्यक्तीला प्रत्यक्ष बघू शकतो, बोलू शकतो, तसेच एकाच वेळी अनेक लोक एकत्र गप्पा मारू शकतात. 

हे फक्त एक क्षेत्र आहे. आपल्या जगण्यातल्या प्रत्येकच क्षेत्रात कल्पनातीत बदल झाले आहेत. आमच्या पिढीचेच लोक काय पण आजच्या पिढीचे लोकही या बदलाच्या प्रपाताला सामोरे जाताना गडबडून जात आहेत. 

पुढे वाचा

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आपली तरुणाई 

डिसेंबर २०२२ पासून जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेची म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सची म्हणजेच एआयची चर्चा पुन्हा जोरात सुरू झाली आहे. त्याला कारण आहे कृत्रिमप्रज्ञेचा नवा अवतार. यंत्रमानव हा तसा जुना प्रकार आहे. त्यावर अनेक चित्रपटही आले. मायक्रो चिपमधील प्रोग्रामिंगनुसार आधीच देऊन ठेवलेल्या सूचनांप्रमाणे ठरलेली कामे करणारा यंत्रमानव आपण पाहिलेला आहे. पण प्रोग्रामिंगमध्ये दिलेल्या सूचनांपेक्षा वेगळी परिस्थिती उद्भवली तर विचार करून वेगळा निर्णय घेत त्याची कार्यवाही करणारा परिपूर्ण यंत्रमानव अद्याप बनलेला नाही. यंत्रमानव बनवणे हे प्रकरण खर्चिक आहे. सध्या सुरू असलेली कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा यंत्रमानवापेक्षा फारच वेगळी आहे.

पुढे वाचा

माकडाच्या हाती कोलीत

जंगलात भटकणाऱ्या आदिमानवाने प्रगती करत विज्ञानात आज एवढी झेप घेतली आहे, की आता त्याने निर्माण केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे माणसाच्या अस्तित्वालाच धोका उत्पन्न होईल की काय अशी शंका येऊ लागली आहे. संगणकाची निर्मिती झाल्यापासून मानवी जीवनात खूपच उलथापालथ झाली आहे हे मान्य व्हावे. संगणकाच्या सहाय्याने अनेक माणसांचे काम एकच माणूस, आणि तेही बिनचूक करू लागल्याने ते अनेक आस्थापनांना फायदेशीर ठरत आहे. पण त्यामुळे कर्मचारी कपात होऊन बेरोजगार लोकांची संख्या वाढू लागली आहे. हा मानवी समाजाला धोकाच ठरत आहे. एकीकडे लोकसंख्यावाढ आणि दुसरीकडे नोकऱ्यांची संख्या कमी होणे; असा दुहेरी ताण देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडू लागलेला आहे.

पुढे वाचा