फायनल ड्राफ्ट

मी मांसकांची ग्रंथतात्पर्यनिर्णयपद्धती वर्गात शिकवली नि त्याच दिवशी फायनल ड्राफ्ट नाटक पाहिले. कदाचित त्यामुळे मीमांसकांनी दिलेल्या सात कसोट्यांच्या आधारे नाटकाचे मूल्यमापन करण्याचा मोह झाला. उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, अर्थवाद, उपपत्ती व फल ह्या सात कसोट्या ग्रंथांचे तात्पर्य ठरविण्यासाठी वापरता येतात. ग्रंथांप्रमाणेच एखाद्या नाटकाचे तात्पर्य ठरविण्यासाठीही त्यांचा वापर करता येईल. सुरूवात (उपक्रम) व शेवट (उपसंहार) यांचा येथे प्राधान्याने विचार करावयास हवा.
फायनल ड्राफ्ट च्या सुरुवातीलाच जाणवतो, तो प्रचंड ताण. तब्बल एक तास निव्वळ वाट पाहण्यात गेला नि आता पुण्याला जाणे बोंबलले म्हणून अस्वस्थतेने धुमसणारे सर नि, एकंदरीतच, हबकून गेलेली विद्यार्थिनी.

पुढे वाचा

आपल्या अस्तित्वाचे गूढ (The mystery of our being – Max Plank )

विज्ञानाचे एक यश म्हणजे चमत्कारांविषयी मानवी श्रद्धेला मर्यादा निर्माण होणे, असे आपण सहजच गृहीत धरतो. पण असे काही घडल्याचे दिसत नाही. गूढ शक्तींच्या क्षमतेवर विश्वास असणे हे आजच्या काळातही आहेच. गूढविद्या आणि अध्यात्माच्या अनेकानेक प्रकारांची लोकप्रियता पाहिली की हे दिसून येते. विज्ञानातून निघणारे निष्कर्ष अगदी कुतूहलशून्य असणाऱ्या सामान्य व्यक्तीच्या नजरेतूनही सुटणे अशक्य आहे. तरीही शिक्षित व अशिक्षित माणसे, अनेकदा, त्यांच्या जीवनातल्या सामान्य प्रश्नावर प्रकाश पडावा म्हणून गूढ व धूसर प्रदेशात शिरतात. एखादा म्हणेल, की अशा प्रश्नासाठी मी तरी विज्ञानाचाच आधार घेईन.

पुढे वाचा

गावगाडा २००६ (भाग-१)

[त्रिंबक नारायण आत्रे यांचे गांवगाडा हे पुस्तक गेल्या शतकाच्या सुरुवातीच्या ग्रामीण महाराष्ट्राच्या समाजजीवनाचे उत्कृष्ट चित्र रेखाटते. प्रथम प्रकाशन १९१५ साली झालेले हे पुस्तक आजही उपलब्ध आहे. (‘वरदा’, पुणे, १९८९). मधल्या काळात पुस्तकातील अनेक शब्द सामान्य वाचकांना अनोळखी झाले असतील, या भावनेतून रा.वि. मराठे यांनी ‘गांवगाडा’चा शब्दकोश लिहून प्रकाशित केला. (मंजिरी मराठे, मुंबई, १९९०). पुस्तकाला पन्नास वर्षे होत असताना प्रसिद्ध अर्थशास्त्री वि.म.दांडेकर आणि शेतकरी म.भा.जगताप यांनी गावरहाटी या नावाने आत्र्यांच्या पुस्तकाला समांतर असे, पण किस्से-कहाण्यांच्या रूपातले पुस्तक घडवले (ह.वि.मोटे, मुंबई, १९६३). मूळ गांवगाडा इंग्रजीत ढहश तळश्रश्ररसश उसी या नावाने भाषांतरित झाल्याचेही स्मरते.

पुढे वाचा

मूल्यव्यवस्थेचा विकास

आमच्या मूल्यव्यवस्थेत मान्य व हव्याशा बदलांना जर विकास म्हटले, तर आम्ही विकासाचे केवळ विकास म्हणून विरोधक नाही. आमचा विकासाबाबतचा दृष्टिकोन श्रम-सघन, बेकारी उत्पन्न न करणाऱ्या तंत्रज्ञानांना महत्त्व देतो. अशी तंत्रज्ञाने संसाधनांच्या वापरात उपजीविकेच्या संधी उत्पन्न करतील. आम्ही नैसर्गिक संसाधने नष्ट किंवा प्रदूषित न करणाऱ्या तंत्रज्ञानाच्या पक्षाचे आहोत. आजच्या ग्रामीण समाजांच्या साध्या, उपभोगवादी नसलेल्या जीवनशैलीत ही संसाधने सुरक्षित आहेत. तंत्रज्ञानाची निवड अपरिहार्यपणे जीवनशैली व जीवनमानाच्या विकासाच्या दृष्टिकोनाशी निगडित असते.
मेधा पाटकरांची रॉबर्ट जेन्सेन यांनी घेतलेली मुलाखत मॉन्फकीरा (Monfakira) या कोलकात्याहून निघणाऱ्या नियतकालिकाने त्याच्या मे-जून २००६ च्या अंकात प्रकाशित (जुलै ७-१३, २००६) केली.

पुढे वाचा

अभ्यागत संपादकाचे संपादकीय : आपली आरोग्यव्यवस्था दिशा व प्रश्न

आजचा सुधारक हे आगरकरांचा वारसा सांगणारे विवेकवादाला वाहिलेले मासिक आहे. त्यात सर्वसाधारणपणे आरोग्याखेरीजचे अन्य सामाजिक विषय आजपर्यंत आलेले आहेत. आज आरोग्याचे नवनवे सामाजिक प्रश्न व आरोग्यसेवादेखील समाजाच्या सर्वच अंगांना भिडते आहे. त्याचे सध्याचे स्वरूप काय आहे, त्याचे भविष्य काय, त्याचा समाजावर आता व पुढे काय परिणाम होणार आहे या विषयांची चर्चा आवश्यक वाटल्याने ह्या अंकाचे प्रयोजन ! आरोग्यसेवेतील समस्या काय ? त्यावर उपाय काय ? अशा ढोबळ स्वरूपात या अंकातील लेख लिहिले गेलेले नाहीत. ह्यातील बहुतेक लेख कुठल्या ना कुठल्या स्वरूपात एकेका विषयाच्या काही मूलभूत पैलूंबद्दल विचार करताना आढळतील.

पुढे वाचा

आधार मिळतो

ज्या जगात आरोग्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे आणि मोठा निरोगी समाज आहे तिथे वैद्यकीय हस्तक्षेपाची गरज क्वचितच आणि माफक प्रमाणात भासते. निरोगी माणसे ती, जी निरोगी घरात राहतात, पौष्टिक आहार घेतात आणि त्यांचा परिसर जन्म, वाढ, रोगमुक्ती आणि मृत्यू ह्या सर्वांसाठी अनुकूल असतो. ज्या संस्कृतीमुळे ह्या निरोगी समाजाला आधार मिळतो त्या संस्कृतीने लोकसंख्येच्या मर्यादांचा, वार्धक्याचा, अपुऱ्या रोगमुक्तीचा आणि सतत निकट येणाऱ्या मृत्यूचा जाणीवपूर्वक स्वीकार केलेला असतो. निरोगी माणसांना संभोग, अपत्यजन्म, मानवी जीवनातील विविध अवस्थांमधला सहभाग आणि मृत्यू ह्याकरिता नोकरशाहीच्या हस्तक्षेपाची गरज कमीत कमी असते.

पुढे वाचा

लेखक परिचय

डॉ. अनंत फडके, एम.बी.बी.एस.: ‘सेहत’ या स्वयंसेवी संस्थेमध्ये कार्यरत. लोकविज्ञान चळवळ, जनआरोग्य अभियान यासाठी चळवळ. जनतेच्या आरोग्यासाठी वेगळ्या वाटा शोधण्यात आयुष्यभर काम. औषधांच्या प्रश्नांवर लिखाण. ८, अमेय आशिष सोसायटी, कोकण एक्सप्रेस हॉटेल लेन, कोथरूड, पुणे ४११ ०३८. ०२०-२५४६००३८

डॉ. मोहन खामगांवकर, एम.डी. : सध्या लातूरच्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये सामाजिक व प्रतिबंधक औषधी वैद्यक विभागाचे प्रमुख प्रभारी प्राध्यापक. या विभागात विशेष रस. एम.बी.बी.एस.च्या विद्यार्थ्यांसाठी डेलळरश्र । शिर्शीशपींळींश मेडिसिनचे पुस्तक लिहिलेले. आणखी एक पुस्तक आहाराबद्दल, कौटुंबिक आहारमित्र’ प्राध्यापक व विभागप्रमुख, पी.एस.एम.डिपार्टमेंट, शासकीय मेडिकल कॉलेज, लातूर.

पुढे वाचा

एड्सः एक साथ … लक्षवेधी

गोष्ट १९७९ च्या सुमाराची. अमेरिकेतली. न्यूयॉर्कमधल्या एका मोठ्या इस्पितळात रोज सकाळी सगळ्या डॉक्टरांची, प्रमुख नर्सेसची एक बैठक होत असे. इस्पितळातल्या सगळ्या रुग्णांच्या प्रकृतीबद्दल तेव्हा चर्चा होई. लक्षणे, तपासण्याचे निकाल, निदान आणि उपचारांच्या योजना ह्यांचा आढावा घेतला जाई, आणि कार्यवाहीसाठी जबाबदाऱ्यांचे वाटप होई. ह्या बैठका रोजच्याच असत. त्यांची पद्धत ठरलेली, त्यामुळे बैठका चटपटीतपणे उरकत. प्रत्येकच रुग्णांबद्दल खूप चर्चा करायचे कारण नसते. काही विशेष आढळले, तरच त्यावर थोडीफार चर्चा व्हायची, आणि त्यातून कार्यवाहीच्या दिशा ठरत.

१९७९ च्या सुमाराला, ह्या चर्चा जरा लांबू लागल्या.

पुढे वाचा

मलेरियातील गोलमाल

लॅन्सेट या धारदार आरोग्याच्या मासिकाने भारतात जागतिक बँकेने मलेरियाचा फैलाव थांबवण्यासाठी आखलेले कार्यक्रम नीट राबवले जात नसून त्यासाठी भारत सरकारला दोषी ठरवले आहे. जागतिक आरोग्य संस्थेने आखून दिलेल्या इलाजाप्रमाणे न चालता आपले सरकार जीवघेण्या मलेरियासाठी अर्धवट इलाज किंवा चुकीचे इलाज करते आहे कारण आपली कार्यपद्धती सदोष, धीमी व कालबाह्य ठरलेली आहे.

१९९० सालापासून भारतात दरवर्षी २०लक्ष मलेरियाचे रोगी आढळतात. प्लाझ्मोडियम विवॅक्स आणि प्लाझ्मोडियम फॅल्सीपेरम. पहिला प्रकार कमी घातक आणि क्लोरोक्वीनने ठीक होणारा असतो. तर दुसऱ्या प्रकारात अनेक गुंतागुंती (Complications) उद्भवू शकतात.

पुढे वाचा

आरोग्य आणि आहार

तुम्ही जे खाता त्याप्रमाणे तुमचे व्यक्तिमत्त्व घडते. माणसाचे आचार-विचार, आरोग्य, बुद्धिमत्ता, स्वभाव, शारीरिक क्षमता, सारे आहारावरच अवलंबून असते. शरीराचे पोषण किंवा शरीर रोगग्रस्त होणे हे आहाराच्याच आधीन आहेत. योग्य आहार घेतला तर औषधांची गरज कमी राहील. आणि कितीही औषधे घेतली पण पथ्य केले नाही तर त्या औषधांचा उपयोग नीट होणार नाही.

कोणताही रोग एका रात्रीत उपटत नाही त्याच्या मुळाशी बऱ्याच वेळपर्यंत होत राहिलेली अन्नघटकांची कमतरता असते. आहार योग्य असेल तर आजारपण येणारच नाही असे नाही, परंतु त्याचे प्रमाण व तीव्रता कमी राहील.

पुढे वाचा