अमर्त्य सेन यांच्या दुष्काळांच्या विश्लेषणाने जगातील गरिबांच्या स्थितीच्या आकलनाला मूलभूत मदत केली आहे. माल्थसपासूनची परंपरा अशी की अन्नाचे उत्पादन घटल्याने दुष्काळ पडतात. सेन यांनी हे प्रमुख कारण नसल्याचे दाखवून देण्यासाठी बंगाल, इथिओपिया, चीन व आयर्लंड येथील दुष्काळ तपासले. सामाजिक व राजकीय व्यवस्थांचे अपयश हे दुष्काळाचे प्रमुख कारण असल्याचे सेनना आढळले. खुली प्रसारमाध्यमे व तसल्या इतर लोकशाही यंत्रणांचा दुष्काळाच्या शक्यता कमी करण्यातील सहभागही स्पष्ट झाला. अन्नोत्पादन किंवा अन्नपुरवठा करण्याचे इतर मार्गही कमकुवत लोकशाह्यांना दुष्काळापासून वाचवू शकत नाहीत. सेन नोंदतात, “कार्यक्षम बहुपक्षीय लोकशाही असलेल्या एकाही देशात दुष्काळ पडलेला नाही.”
शेवटी जबाबदारी आपलीच आहे
हा पक्ष निवडून आला की तो पक्ष, याला फारसे महत्त्व नाही, कारण मुद्दे तेच आहेत, आव्हाने तीच आहेत गेल्या वर्षी होती, तीच.
मी योजना-आयोगाच्या विकासाबद्दलच्या अहवालाकडे पाहतो. छान वाटते. अर्थव्यवस्था चांगल्या पायावर उभी आहे. अडचणी, अडथळे असूनही अर्थव्यवस्था पुढे जायला तयार आहे. परदेशी गुंतवणूक वाढते आहे. नव्या भाग-भांडवल उभारण्यांना प्रतिसाद चांगला मिळतो आहे. पैसे असल्याची खूण आहे ती, विश्वासही असल्याची. परदेशी गंगाजळीही सव्वाशे अब्ज डॉलर्स आहे. गर्व वाटण्यासारखी स्थिती आहे, ही.
प्रश्न असा की आपण या पैशांच्या वापराची योजना काय करतो आहोत ?
‘कोषबद्धते’ ला थारा नाही!
अमेरिका एका कारमध्ये बसून लांबच्या प्रवासाला निघाली आहे. आतली माणसे एकमेकांच्या जिवावर उठत नाही आहेत कारण प्रत्येकाची खानपानाची व्यवस्था, बसायचे आसन आणि मनोरंजनाची व्यवस्था इतरांपासून सुटी केली गेली आहे. बाबा उपग्रह रेडिओ ऐकताहेत, आईच्या हातात मासिक आहे आणि मुलांसाठी डीव्हीडी, एम्पी-थ्री म्यूझिक सिस्टिम्स आणि व्हिडिओ गेम्स आहेत. वस्तूंचे प्रेम, वस्तूंमध्ये आश्चर्यकारक विविधता उपलब्ध असणे, आणि यांच्या मिश्रणातून प्रत्येकाने स्वतःचे इतरांपासून सुटे असे ‘विश्व’ घडवणे, यामुळे अमेरिका शांत आहे. इथल्या उपभोक्ता संस्कृतीत लोकांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असणे नुसतेच ‘हवेसे’ नाही, तर थेट आवश्यक आहे.
राष्ट्रवादाचे पुनर्मूल्यांकन
राष्ट्रवादाचा अस्त होतो आहे
मी काही तथाकथित देशभक्त नाही. उलट कधी कधी तर मला माझ्या देशबांधवांच्या काही कृत्यांबद्दल लाजच वाटते. मला असे वाटते की राष्ट्रवाद आणि देशभक्ती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भारतीय असणे ही काही माझी स्वतःची निवड नव्हती. मी इथे जन्माला आलो आणि म्हणून आपोआप भारतीय ठरलो. मी दुसऱ्या कोणत्या देशात जन्माला आलो असतो तर त्या देशाचा झालो असतो. समजा, मी भारतीय नागरिकत्व नाकारायचे ठरवले तरी ते तितके सहज सोपे नाही. माझा कोणताही विशेष उपयोग नसेल तर दुसरा कोणताही देश मला त्यांचा म्हणून कशाला स्वीकारेल ?
जाणीव आणि विचार, भाषा आणि भाषण
प्राणी शब्द वापरत नाहीत आणि शब्दांवर आधारलेल्या भाषेखेरीज विचार करता येत नाही, यावरून प्राणी विचार करत नाहीत; असे देकार्तचे (Descartes) मत होते. तो तर्कशुद्ध विचारांसाठी ख्यातनाम होता. विसाव्या शतकाच्या बऱ्याच कालखंडात लोकप्रिय असलेला वर्तनवाद (behaviourism) काही प्रमाणात देकार्तच्या मतावर आधारलेला होता. त्या वादाचा दुसरा आधार म्हणजे प्रत्यक्षार्थवाद (positivism). प्रत्यक्षार्थवादाचा पाया हा की निरीक्षणे व मोजमाप याच्या आवाक्यात नसलेल्या कोणत्याच गोष्टीचा विचार करण्यात अर्थ नाही. या दोन मतप्रवाहांच्या प्रभावामुळे वर्तनवाद्यांना प्राणी म्हणजे केवळ यंत्रे वाटत. त्यांच्या मते प्राणी ‘वागतात’, विचार करत नाहीत, आणि ते विचार करतात असे मानणे ही भोंगळ भावनाविवशता आहे.
व्याख्या
Faith: Belief without evidence in what is told by one who speaks without knowledge, of things without parallel.
श्रद्धाः ज्या गोष्टींना समांतर असे काही नाही, अशा गोष्टींबद्दल ज्याला ज्ञान नाही अशा व्यक्तीच्या सांगण्यावरील विश्वास, ज्याला पुरावा नाही. Rational: Devoid of all delusions save those of observation, experience & reflection.
विवेकीः निरीक्षण, अनुभव आणि विचार यांमधून उद्भवणारे भ्रम सोडून इतर सर्व भ्रम टाळणारे/टाळणारा.
अंब्रोज बिअर्सच्या द डेव्हिल्स डिक्शनरी मधून (डोव्हर, १९७४)
संपादकीय
यान ब्रेमन व छायाचित्रकार पार्थिव शहा ह्यांचे पुस्तक Working in the Mills No More आता गिरण्यांमध्ये काम करीत नाही आम्ही. हे चित्रकाराने चिडून काळ्या रंगाचे दोन फराटे मारून आपल्या भावना व्यक्त कराव्या, तसे आहे. त्या प्रयत्नात कलाकृतीत रंग काही ठिकाणी आवश्यकतेपेक्षा अधिक असतो तर काही ठिकाणी अगदीच कमी असतो, तसेच ह्या (किंवा इतर कोणत्याही) पुस्तकाचे आहे. यान ब्रेमन व पार्थिव शहांनी ह्या पुस्तकात भारतीय भांडवलशाहीच्या एकूण कार्यकलापांपैकी कापड गिरणी उद्योगाचा कंठमणी असलेल्या अहमदाबाद शहरात गिरणी उद्योगांचा उदयास्त चित्रित केला आहे. त्यात मुख्य भर आहे तो समाजातल्या एका मोठ्या घटकाचे (मजुरांचे) निम्न पातळीवर का असेना,पण थोडे स्थिरावलेले जीवन कसे उद्ध्वस्त झाले ते सर्वांच्या समोर बोलक्या पद्धतीने मांडण्यावर.
पत्रसंवाद
‘साधना’ दिवाळी अंकात ज्येष्ठ समाजवादी विचारवंत बुद्धिवादी ग.प्र.प्रधान सर यांचा बुद्धिवादाकडून आस्तिकतेकडे प्रवास, याविषयी एक लेख आहे. कोणत्या प्रकारच्या ईश्वराची कामना त्यांच्या मनात आहे, हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. परंतु आस्तिक राहूनही ते बुद्धिवादाची उपाधी लावू शकतात! बुद्धिवाद हा आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ पुरावा मागत असतो एवढेच. असा पुरावा प्रधान सरांनी दिला नसला तरी ब्रिटनचे रहिवासी प्रा. अँटोनी फ्ल्यू (Antony Flew) ह्या ८१ वर्षांच्या तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकांनी ईश्वराच्या कल्पनेबद्दलच पुरावा देऊ केला आहे. “Has Science discovered God?’ ह्या चित्रफितीमध्ये त्यांनी आपली मते मांडली आहेत.
विवेकवाद – भाग ७
धर्मवाद्यांच्या, श्रद्धावाद्यांच्या शस्त्रागारातील एक महत्त्वाचे आयुध म्हणजे शब्दप्रमाण. जगातील सर्व धर्मांनी शब्दाचे (म्हणजे विशिष्ट वाक्यांचे किंवा वचनांचे) प्रामाण्य मानले आहे. ख्रिस्ती लोक बायबलातील वचने, मुसलमान कुराणातील वचने, बौद्ध गौतम बुद्धाची वचने पूर्णपणे सत्य आणि अशंकार्ह मानतात, तसेच हिंदूही वेद, उपनिषदे, आणि विविध स्मृती यांतील वचने पूर्णपणे विश्वसनीय आणि संशयातीत मानतात. शब्दाला किंवा एखाद्या वाक्याला हा अधिकार कोठून प्राप्त होतो? अशी काही वचने आहेत हे खरे आहे काय ? अशी वचने आहेत हे का मानले जाते ? इत्यादि प्रश्न येथे उपस्थित होतात.
रोजगार हमी कायदा न्याय्य नियम
केंद्रात काँग्रेस व डाव्यांचे UPA सरकार आले. त्याच्या किमान समान कार्यक्रमात रोजगार हमी कायद्याचा मुद्दा असल्याने अनेक जण हरळून गेले. ज्या ‘नव-उदार’ धोरणामुळे अशा कायद्याची गरज उत्पन्न झाली, त्याच धोरणाचे पुरस्कर्ते आता पुस्त्या पुरवण्या जोडून रोजगार हमी विधेयकाला खच्ची करत आहेत. आणि नव-उदार धोरणाचा उत्साहाने पाठपुरावा करणारे आधीच्या छअ सरकारमध्ये होते तसेच सध्याच्या णझअ सरकारातही आहेत.
ढोबळमानाने रोजगार हमी कायद्याबद्दल तीन भूमिका आढळतात. एक मत असे की अशा कायद्याने व्यापक आणि न्याय्य विकासाला चालना मिळेल. लोकांच्या हाती पैसा आल्याने मागणी वाढून शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन साधले जाईल.