जुलै १९९९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या आ. सु. च्या अंकात अमेरिकानिवासी श्री. अनिलकुमार भाटे नावाच्या एका वाचकाची प्रतिक्रिया वाचनात आली. प्रा. देशपांडे ह्यांनी आपल्या लेखातून आत्मा, पुनर्जन्म, कर्मसिद्धान्त अशा भारतीय आस्तिक दर्शनशास्त्रातील संकल्पनांचे खंडन केले आहे. त्या संकल्पनांचे मंडन करण्यासाठी भाटे ह्यांनी जो काय तर्कशास्त्राचा अभ्यास केला असेल किंवा हेगेल, हुसेर्ल, हायडेगर. या हकाराच्या वाराखडीतील युरोपी विद्वानांच्या नावाची जंत्री पाठ केली असेल ते सारे निरर्थक ठरतात. प्रा. देशपांड्यांचा विचार भारतीय दर्शनशास्त्राशी संबंधित आहे. तो नास्तिक दर्शनाशी जिव्हाळ्याचे नाते सांगणारा आहे. त्याच्या खंडनार्थ श्री.
शरीराला जोडलेला आत्मा
मे ९९ च्या अंकातील दि.य. देशपांड्यांच्या सुमारे पाच पानी लेखावर जुलै ९९ च्या अंकात अनिलकुमार भाट्यांचे नऊ पानी उत्तर आहे; संतप्त आणि विस्तृत उत्तर आहे.
१) भाट्यांना दियदेंचे आत्म्याबाबतचे विवेचन पटत नाही. पण भाटे कशाला आत्मा म्हणतात हेही समजत नाही. ते फक्त सांगतात की “माझ्या ‘मी’ पणाच्या सर्व (कल्पनांचा) माझ्या आत्म्याशी काही संबंध नाही”. मग आत्मा आहे कशाशी संबंधित? असे काहीतरी मानवी व्यवहाराचे अंग असणारच, की ज्याच्या वर्णनासाठी ‘आत्मा’ हा शब्द घडवावा लागला आहे. आणि त्याचा माझ्याशी संबंध हवाच-जर आत्मा माझा असेल तर.
चर्चा
भांडवलाचे वास्तव स्वरूप
(आजचा सुधारक – जून १९९९)
– श्री. वि. खांदेवाले
आपण वरील स्फुटात भांडवलाची नवी व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. त्यासंबंधी माझी प्रतिक्रिया नोंदवीत आहे. ज्या ओघात आपण विचार मांडले त्यांना क्रमांक देऊन टिप्पणी करीत आहे.
१. उत्पादनासाठी भांडवल, श्रम, भूमी आणि कच्चा माल लागतो असे आपण म्हटले. परंतु कच्चा माल हा कृषि-उत्पादनांच्या (अन्नधान्ये, तेलविया, ज्यूट, ऊस, कापूस इत्यादी आणि खनिज पदार्थ, जंगलांपासून मिळणारी उत्पादने इत्यादींच्या) स्वरूपात निसर्गापासून (मूलतः) विनामूल्य मिळतो म्हणून त्याचा समावेश भूमी ह्या घटकात केला जातो. त्यामुळे भूमी व कच्चा माल हे आपण समजता त्याप्रमाणे वेगळे घटक मानले जात नाहीत.
अकादमीय विद्वज्जन आणि युटोपिया
विसाव्या शतकातील सर्वांत दूरगामी परिणाम घडवणारी वौद्धिक क्रांती घडली मात्र संथ, शांत गावांमध्ये. केंब्रिज, कोपनहेगन, म्युनिक, पॅरिस, गॉटिंगेन, अशी ही, गावे. गॉटिंगेन हे गाव हे भौतिकीतज्ज्ञांचे खरे केंद्र. गावाचा आत्मा म्हणजे तिथले प्राचीन जॉर्जिया ऑगस्टा विद्यापीठ. इतर गावांना त्यांच्या नरवीरांचा, त्यांच्या पदकांचा गर्व असायचा. गॉटिंगेनकरांना विद्यापीठातल्या विद्यार्थांच्या आणि अध्यापकांच्या पदव्यांचा आणि जगभरातल्या वैज्ञानिक संघटनांच्या सभासदत्वाचा गर्व वाटायचा. १९२० साली रात्री घरी परतणा-या विद्यार्थ्यांनी ‘करमणूक’ जास्त झाल्याने केलेला दंगा गावक-यांच्या सवयीचा होता – तसेच याच विद्यार्थ्यांनी वौद्धिक उत्तेजनेतून रात्री उशीरापर्यंत रस्त्यामध्ये उभे राहून चर्चा करणेही सवयीचे होते.
भांडण शब्दप्रामाण्याशी
मागच्या महिन्याच्या अंकामध्ये तीन मोठमोठे लेख आम्ही प्रसिद्ध केले. त्यांतील शेवटचा जो लेख होता-अनिलकुमार भाटे ह्यांचा तो आम्ही प्रकाशित करावयाला नको होता असे सांगणारी अनेक पत्रे आली तसेच दूरभाषदेखील आमच्याकडे आले. तो लेख का छापला त्याची कारणे आधी आणि नंतर त्या लेखासंबंधी.
श्री. भाट्यांच्या पत्रांत सतत आरोप होत होता की त्यांची वाजू आम्ही दडवून ठेवतो. प्रतिपक्षाला आम्ही आपले मत मांडू देत नाही; आम्ही एकाच पक्षाचा प्रचार करतो. त्यांची एकामागून एक अशी तीन पत्रे आली. आम्ही त्यांचे तिसरे पत्र प्रसिद्ध केले नाही.
श्रद्धा
संस्कृत तथा प्राकृत भाषेमध्ये श्रद्धा ह्या शब्दाचा सर्वत्र उपयोग केला जातो. परंतु ह्याचा निश्चित अर्थ दिसत नाही. जो काही मिळतो त्याचा हा असा प्रकार आहेः ‘श्रद्धा = गुरुपु शास्त्रेषु निरतिशयः विश्वासः शास्त्राचार्योपदिष्टऽथै अननुभूतेऽपि एवमेव एतदितिविश्वासः, एवं विश्वासः- वंचकत्वाभावसंभावना.’ हे विवरण समाधानकारक नाही. वचन विश्वासानुयायी आहे. …..
“विश्वास हा अनुभव व अनुमान या दोहोंचा परिणाम आहे. अनुभवाला परीक्षण (बुद्धि व शक्ति) अनुमानाला विवेक (बुद्धि) लागते. अनुभवाचे निरीक्षणपूर्वक परीक्षण पाहिजे व अनुमानाला पूर्वानुभव मदतीला घ्यावा लागतो. या दोन गोष्टींशी व्यस्त प्रमाणात विश्वास उत्पन्न होतो.
संपादकीय
अन्यायकर्त्याला सर्व समाजाचे संमोदन वा मूक अनुमोदन असते
ह्या अंकामध्ये अन्यत्र श्री. नाना ढाकुलकरांची दोन पत्रे प्रकाशित होत आहेत. त्यांच्या पूर्वीच्या पत्राला आम्ही जे उत्तर दिले त्याने त्यांचे समाधान झाले नाही हे उघड आहे. आजचा सुधारकचे धोरण व्यक्तीवर किंवा व्यक्तिसमूहावर (एखाद्या जातिविशेपावर) केलेली टीका शक्यतोवर न छापण्याचे आहे. त्या धोरणाला अपवाद करून ही पत्रे छापत आहोत. आमच्याकडे आलेल्या आणखीही काही लेखांत व्यक्तीवर टीका करणारा मजकूर आलेला आहे. तेवढा प्रसिद्ध करून ह्यानंतर असा मजकूर वगळला जाईल. आम्हाला विचारांशी भांडावयाचे आहे, व्यक्तींशी नाही, कारण व्यक्तीचे विचार बदलू शकतात ह्यावर आमचा ठाम विश्वास आहे.
चर्चा
हिन्दु कोण?
आपल्या में ९९ च्या संपादकीयामध्ये “ज्याने परदेशाचे नागरिकत्व स्वीकारले त्याला आपल्याला हिंदू म्हणवून घेण्याचा अधिकार नाही. हिंदुत्वाचे मुख्य लक्षण ह्या भूमीवरची निष्ठा आहे” अशा धर्तीची विधाने आहेत. मला संपादकांना पुढील प्रश्न विचारावयाचे आहेत.
१. भारताचा नकाशा कायम वदलत आलेला आहे. (उदा. वांगला देश, पाकिस्तान) असे झाले तर भारतावाहेर राहिलेले हिंदू अहिंदू होणार का?
२. जगात असे अनेक लोक आहेत की ज्यांनी भारतात पाऊलही ठेवलेले नाही पण ते स्वतःला हिंदू मानतात. अगदी छोट्या कॉस्टारिका ह्या देशात स्वतःला हिंदू मानणारी माणस मला भेटलेली आहेत.
जिज्ञासा
सत्यदर्शनातील अडथळ : उदाहरणे द्यावी.
संपादक, आजचा सुधारक, यांस –
जानेवारी ९९ च्या अंकात “जिज्ञासा” ह्या शीर्षकाखाली ‘हेमलेखा’ ह्यांनी “सत्यदर्शनातील खरा अडथळा कोणता?” ह्या विपयावर “हिरण्यमयेन पात्रेण – – ” ह्या पंक्तींच्या आधारे काही विचार मांडले आहेत. त्यात शेवटी “- – – आज व्यवहारात वस्तूच्या यथार्थज्ञानासाठी पूर्वसंस्कारांचा पडदा (मनाचे conditioning) दूर करणे अत्यावश्यक आहे” असे त्यांना वाटत असल्याचे लिहिले आहे. व त्यानंतर त्या लिखाणासंबंधी आलेल्या दोन पत्रांना उत्तरे देताना जून ९९ च्या अंकात, “दैनंदिन जीवनातील अनुभव घेत असताना त्याचा (म्हणजे मनावरील पूर्व संस्कार (conditioning of mind) हाच सत्यदर्शनातील खरा अडथळा आहे याचा) सतत प्रत्यय येत असतो” असे म्हटले आहे.
दि. य. देशपांडे ह्यांचा प्रचंड वैचारिक गोंधळ
प्रा. दि. य. देशपांडे यांनी घातलेला प्रचंड वैचारिक गोंधळ व अध्यात्माला ‘गोंधळ’ ठरविण्याच्या अट्टाहासापायी केलेले स्वतःच्या अज्ञानाचे प्रदर्शन
प्रा. दि. य. देशपांडे यांनी आ. सु. च्या मे ९९ च्या अंकात लिहिलेला अध्यात्म : एक प्रचंड गोंधळ” हा लेख म्हणजे वैचारिक गोंधळाचा उत्कृष्ट नमुना आहे. हा संपूर्ण लेख अत्यंत तर्कदुष्ट पद्धतीने लिहिलेला असून इतकी तर्कदुष्ट विधाने देशपांड्यांसारखे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक कशी काय लिहू शकतात ही खरोखरच । आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. या लेखात अनेक चुकीच्या विधानांचीही रेलचेल आहे. काही उदाहरणे खाली देत आहे.