मुस्लिम स्थळांच्या वादातून काय साध्य करणार?

देशात सध्या ज्ञानवापी मस्जिदीचे प्रकरण सर्वच प्रसारमाध्यमातून गाजवण्यात येत आहे. ही ज्ञानवापी मस्जिद नसून खरेतर ते शिवालय आहे, असे एका हिंदुत्ववादी गटाचे म्हणणे आहे. याबाबतचे प्रकरण वाराणसीच्या स्थानिक कोर्टात चालू आहे. सदर कोर्टाने या मस्जिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्याचे सर्वेक्षण झाले आहे आणि त्याचा अहवालही मा.कोर्टाकडे सादर करण्यात आला आहे. त्यासाठी जो आयोग नेमला होता त्या आयोगातील हिंदुत्ववादी सदस्यांनी या मशिदीतील वजू करण्याचा पाण्याचा साठा असलेल्या तलावामध्ये शिवाचे लिंग आढळले असल्याचा दावा केला आहे. वाराणसी कोर्टाने सदर जागेला ताबडतोब सील करून तेथे कोणीही जाऊ नये व त्या जागेला अथवा लिंगाला नुकसान पोहोचवू नये, असे आदेश दिले आहेत.

पुढे वाचा

सांस्कृतिक गंड आणि गंडांतर

दोन जूनच्या द इंडियन एक्स्प्रेसमध्ये एक वृत्त प्रकाशित झाले होते. त्यात काही दिवसांपूर्वी टेनिस स्पर्धेत भाग घेण्यासाठी जाताना अपघातात मृत्यू पावलेल्या १८ वर्षीय विश्व दीनदयालम या होतकरू क्रीडापटूंच्या वडिलांची कैफियत मांडण्यात आली होती. त्यांचे असे म्हणणे होते की, भारतीय क्रीडा प्राधिकरण या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्थेने विश्वच्या आयुर्विमासंदर्भात त्यांच्या त्याआधी तीन आठवड्यांपुर्वी पाठवलेल्या पत्राला साधे उत्तरही दिले नाही.

हे वाचून मला २००९ मधील माझ्या एका पत्रव्यवहाराची आठवण झाली. तेव्हा मी द इंडियन एक्स्प्रेसचा पत्रकार म्हणून कृषीविषयक एका वृतांकनासाठी अमेरिकेला गेलो होतो.

पुढे वाचा

इतिहास – डावं.. उजवं..

इतिहास हा माणसाला शहाणपण शिकवणारा विषय आहे असे एका युरोपीयन विचारवंताने नोंदवले आहे. हे वाक्य जसेच्या तसे केवळ तेव्हाच लागू होऊ शकते जेव्हा इतिहास हा विषय वैयक्तिक आणि तत्संबंधित हितसंबंधापासून दूर ठेवण्याचे किमान शहाणपण लोकांच्या अंगवळणी पडेल. हे सहजासहजी घडून येणारच नाही. याचे स्पष्ट कारण म्हणजे इतिहास हा देशभरातील आणि जगभरातील बहुतेक लोकांच्या हितसंबंधाचा मुद्दा बनून राहिला आहे. त्यासंबंधित आवश्यक अशा सर्व रचना आणि प्रणाली जमवत हा हितसंबंधी समूह सतत जागता राहत असतो. कोणत्याही प्रकारे आपले हितसंबंध धोक्यात येणार नाहीत याची दक्षता अगदी काटेकोरपणे वाहत हा समूह ऐतिहासिक सत्यांची मोडतोड करत समाजातील आपले वर्चस्व राखत असतो.

पुढे वाचा

तू हसत रहा….

तू हसत रहा
क्रांतीच्या विचारांवर 
मी पेटवत जातो
एक एक रान 

तू ओढत जा 
तुझ्या कुजल्या विचारांची 
एक एक रेघ आडवी 
नवनिर्माणाच्या स्वच्छ फळ्यावर 
मी पुसत जातो 
ती हर एक रेघ आडवी

तू बोल छाती फुगवून 
आम्ही करोडोंमध्ये आहोत 
मी ढोल लावून 
एक एक जमवीत जाईन

तू करत जा चर्चा 
आमच्यावरील खोट्या आरोपांची 
मी चिरत जाईन 
तुझ्या  वाफाळ शब्दांच्या 
तुफानी वादळांना 

तू फवारत जा 
विष फुटीरतेचं 
मी सावरत जातो 
पडत चाललेल्या 
प्रत्येक  खिंडारीला

तू मारत जा 
एका एका बिनीच्या शिलेदाराला 
तोंडावर काळे बुरखे घालून 
मी वावरत जाईन 
असाच निधड्या छातीने 
तुझ्या कुजक्या परंपरेला तोडण्यासाठी 

रावतभाटा, राजस्थान.

ठिणगी

ए.सी.चे तिकीट न मिळाल्यामुळे मृदुलाला साधे स्लीपरचेच तिकीट काढावे लागले होते. रात्रभर प्रवास करून उद्या सकाळी घरी जाऊन सगळे आवरायचे आणि पुन्हा ऑफिस गाठायचे. ए.सी.चे तिकीट मिळाले असते तर एवढा शीण नसता जाणवला. तरीपण ट्रेनमध्ये बसल्यावर तिला जरा निवांत वाटले. दोन दिवस सारखी लोकांची, पाहुण्यांची ये-जा. आईला बरे नव्हते म्हणून दोन दिवस ती आईला भेटायला आली होती. आजच सकाळी आईला डिस्चार्ज मिळाला म्हणून तिला निघता आले. आईला काही दिवस तरी मुंबईला आपल्याकडे घेऊन यायची तिची खूप इच्छा होती, पण आपले मुंबईचे एकंदरीत आयुष्य बघता ती गोष्ट किती अशक्य आहे हेही तिला कळत होते.

पुढे वाचा

संवैधानिक, सांस्कृतिक राष्ट्रीयत्व आणि भारताची अखंडता

काही दिवसांपूर्वी एका प्रमुख राजकीय पक्षाच्या शीर्षस्थ नेत्याने भारताच्या ‘राष्ट्र’ म्हणून अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. ‘भारत तेरे टुकडे होंगे’ या घोषणा काही भारतीय विद्यापीठात पूर्वीही दिल्या गेल्या आहेत. तारुण्यसुलभ बंडखोरीतून केलेली बालिश बडबड समजून विद्यार्थ्यांच्या घोषणांकडे दुर्लक्ष करणे शक्य असते. पण प्रस्तुत वक्तव्य ज्या नेत्याने केले आहे, त्याच्या पक्षाने भारताच्या स्वातंत्र्यचळवळीचे नेतृत्व केले होते आणि स्वातंत्र्योत्तर भारताच्या राष्ट्र-उभारणीतही मोठी भूमिका बजावली होती. त्यामुळे त्याच्या वक्तव्याकडे तितक्या सहज दुर्लक्ष करणे योग्य ठरत नाही. 

भारताचे तुकडे करण्यात परकीय शक्तींचे हितसंबंध गुंतलेले असू शकतात.

पुढे वाचा

संघ काही करणार नाही,संघाचे स्वयंसेवक सारे काही करतील !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री. मोहनजी भागवत यांनी अलिकडेच केलेले ‘प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नये‘ असे विधान चर्चेत आले आहे. सरसंघचालकांच्या या विधानाचे स्वागत झाले आहे. या विधानामुळे देशातील धार्मिक वाद तूर्तास शमतील असे अनेकांना वाटत आहे. एकप्रकारे देशातील धार्मिक स्थळे जशी आहेत तशी राहावीत या ‘राव सरकार’च्या काळातील कायद्याची ही पाठराखण आहे असे वाटू शकते. संघ बदलला, असेही अनेकांना वाटू शकते. व्यक्तिशः मला तसे वाटले नाही म्हणून हा लेखनप्रपंच!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांची भाषणे एरवीही सुरू असतात. संघातील प्रचलित भाषेत त्याला ‘बौद्धिक’ असे म्हणतात.

पुढे वाचा

हिंदुराष्ट्राच्या अमानुष परंपरेचे वाहक

भारताच्या आधुनिक लोकशाहीचा इतिहास आणि आज हिंदुराष्ट्राच्या स्वागतार्थ पडत चाललेली पावले पाहता लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्यांच्या मनात हे काहीतरी विपरीत, अनाकलनीय, अघटित घडते आहे असे वाटत राहते. विनाशाकडे नेणारे हे वास्तव आणि त्याच्या वेगासमोर वाटणारी प्रचंड असहाय्यता हा स्थायीभाव सतत चहूबाजूला जाणवत राहातो. आणि वाटत राहते की काल एवढे काही नव्हते ते आज कुठून आले? असे आणि एवढे विदारक?

इतिहासाच्या नजरेने पाहू लागल्यावर असेही लक्षात येते की आपण डोळे झाकले होते. पण त्यामुळे ते जे विदारक होते ते असत्याचे नव्हते होत नाही.

पुढे वाचा

पता नही

पता नही हममें 
इतनी उम्मीद – ए – मुहब्बत 
किसने भर दी है ।

कोई नफरत के बीज भी बोये,
हम प्यार की फसल ही उगाते है ।
टूटती हुई शाखों पर भी 
घरौंदे बनाते है ।

और तो और
हमारी आंख से आँसू भी टपके
वो किसीके हमदर्द होने का अहसास ही जताते है ।

ना जाने किस मिट्टी से बने है हम 
कोई रौंद भी जाये
तो नया रूप धर कर दुबारा उठते है हम ।
और नफरत भी नही करते 
उन कुचलने वाले पैरों से ।

हमारी तादाद भी सराहनीय है 
हम जुडे है एक दुसरे से कुछ इस कदर 
तवारीख गवाह है,
हम रहे है एकसाथ और बेखौफ ।

कोई हमें कायर कहे 
या कहे मौजूदा से बेखबर 
हम भाषा जानते है सिर्फ प्यार की 
जिसने जिंदा रखा है हमें आजतक 

बाकी तो कुछ बचता नही कहने सुनने को ।   
हमारा यकीन है  हमारी  उम्मीद-ए-मुहब्बत पर। 

जुने वैज्ञानिक सिद्धांत आणि मिथके

जुन्या सिद्धांताऐवजी अधिक व्यापक आणि अधिक अचूक असे नवे सिद्धांत येत जाणे ही विज्ञानाची रीत आहे. यातील जुन्या सिद्धांतांची कधी कधी चांगल्यापैकी हेटाळणी झालेली पाहण्यात येते. म्हणजे पृथ्वी जगाच्या केंद्रस्थानी आहे हा सिद्धांत हेटाळणीस प्राप्त झालेला दिसतो. गॅलिलिओने जे दुर्बिणीतून पहिले ते कुणीही पाहिले तर ताबडतोब पृथ्वी केंद्रस्थानी हे मान्य केले जाईल असे बऱ्याच जणांना वाटते. जुन्या टॉलेमीच्या सिद्धांतांना चिकटून राहणारे कूपमंडूक प्रवृत्तीचे असावेत अशी धारणा केली जाते. पण ते तेवढे खरे नाही. जर पृथ्वी सूर्याभोवती फिरत असेल तर त्यामुळे जशी ग्रहांची वक्री गती होते तशी तारामंडळातील तारकांची का होत नाही या आक्षेपाचे उत्तर सूर्यकेंद्री स्थानीं सिद्धांतींना त्यावेळी देता येत नव्हते.

पुढे वाचा