एकोणीसशे एकोणचाळीस सालच्या हिवाळ्याच्या सुरुवातीचा दिवस होता. आमच्या ‘अपार्टमेंट’च्या बाहेर वार्यावने पाने उडत होती. घरातल्या उबेत, सुरक्षिततेत बसायला बरे वाटत होते. शेजारच्या खोलीत आई स्वयंपाक करत होती. वडील लवकरच परतणार होते. आई माझ्याजवळ आली आणि आम्ही दोघे मावळत्या सूर्याच्या प्रकाशात बाहेर पाहायला लागलो.
“बाहेर भांडतायत माणसं, मारतायत एकमेकांना”, आई अटलँटिक समुद्राकडे हात दाखवत म्हणाली. मी निरखून पाहिले, म्हणालो, “माहीत आहे मला – मला दिसत आहेत ती.
आई जरा कडकपणे म्हणाली, “काही दिसत नाही आहे तुला. फार दूर आहेत ती.” माझ्या मनात आले, की इतक्या ठामपणे कसे सांगते आहे ती, की मला काही दिसत नाही आहे?डोळे
नैतिक बुद्धिमत्तेचा विकास
दक्षिण कोरियातील किम उंगयोंग या चार वर्षांच्या मेधावी बालकाच्या बुद्धिमत्तेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने १९६८ सालीच घेतलेली अनेकांना परिचित असेल. हा मुलगा वयाच्या चौघ्या वर्षापासूनच कविता करीत असे, चार भाषांमध्ये अस्खलितपणे संभाषण करी आणि टेलिव्हिजनवर त्याने इन्टिग्रल कॅलक्युलसचे प्रश्न सोडविण्याचे प्रात्यक्षिकही करून दाखविले होते. ह्या मुलाचा टर्मन बुद्धयंक २१० मानण्यात आला होता. याचप्रमाणे इंग्लिश तत्त्वज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ जॉन स्टुअर्ट मिल तसेच जर्मन कवी वुल्फगांग गटे यांचाही बुद्धयंक २०० च्या वरच असावा असे सांगण्यात येते. सामान्य माणसांचा बुद्धयंक १०० ते १४० या दरम्यान आढळतो.
विक्रम, वेताळ आणि समान नागरी कायदा
वेताळ : राजा, आजच्या सुधारकाचा ‘समान नागरी कायदा विशेषांक’ वाचलाच असशील ना? विक्रम : (गर्वाने) हो, तर! मी तर ताबडतोब माझ्या कायदेमंत्र्याला सांगून एक ‘आदर्श’ असासमान नागरी कायदा राज्यात लागूही केला. विद्वानांच्या सूचना मी नेहमीच तत्परतेनेअंमलात आणतो.
वेताळ: राजा, तू विद्वानांच्या सूचनाच फक्त अंमलात आणतोस, की त्याप्रमाणे केलेले कायदेहीअंमलात आणतोस?
विक्रमः (गडबडून) मला समजला नाही, तुझा प्रश्न.
वेताळ: (एक दीर्घ उसासा टाकून) म्हणजे तुला प्राथमिक शाळेतल्या नागरिकशास्त्राचे धडे पुन्हाघालून द्यायला हवेत! ऐक. समाजाने पाळायचे कायदे स्पष्टपणे घडवणे, त्याकायद्यांप्रमाणेसमाजाला वागायला लावणे, आणि जे लोक कायदे तोडताना दिसतात त्यांना न्याय देणे; या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
परंपरा, प्रगती, आधुनिकता वगैरे …
आपले पूर्वज फार थोर होते, ज्ञानी होते, असे समजणारा समाज परंपरापूजक असतो. धर्माच्या नावाखाली जे चालत आले आहे त्याला चिकटून राहावे; स्वतंत्रबुद्धी चालवू नये, ही सामान्य माणसाची मनोवृत्ती. शिवाय आणखी एका कारणाने भारतीय माणूस पारंपरिक बनतो. चाणक्य इष्ट गोष्टी धर्माच्या नावाने प्रसृत कराव्यात असा सल्ला देतो. तो म्हणतो, कन्येला चांगल्या कुळात, पुत्राला विद्येत, शत्रूला संकटात आणि इष्ट गोष्टींना धर्माच्या आवरणात बसवावे. चालत आलेली रीत, परंपरा निरर्थक वाटली तरी हा ती पुढे चालवतो. कोणी सांगावे, पूर्वजांनी कोणत्या हेतूने अमुक धर्म सांगितला असेल?म्हणून,
प्रा. ठोसर, प्रा. एकल्स आणि ईश्वर
या मासिकाच्या जानेवारी ९७ च्या अंकात प्रा. बा. वि. ठोसर यांचा ‘कार्ल पॉपर आणि जॉन एकल्स यांमधील एक महत्त्वाचा मतभेद – आस्तिकतेविषयी’ हा लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात कार्ल पॉपर हे विज्ञानाचे तत्त्वज्ञानी आणि जॉन एकल्स हे विख्यात मज्जाशास्त्रज्ञ या दोघांनी मिळून लिहिलेल्या The Self and its Brain ह्या पुस्तकाचा उल्लेख करून प्रा. ठोसर म्हणतात की हे पुस्तक जरी या दोघांनी मिळून लिहिले असले तरी त्यांच्या मनांत एक मोठा भेद आहे. तो म्हणजे पॉपर पूर्ण नास्तिक आहेत, तर एकल्स आस्तिक आहेत.
जुलमी सरकार वाघांहून भयंकर
थाई पर्वताच्या बाजूने जाताना कन्फ्यूशसला एक स्त्री एका थडग्याजळ धाय मोकलून रडताना दिसली. प्रभू तिच्याकडे गेले आणि त्यांनी त्सेलूला तिची विचारपूस करण्यास सांगितले. तो त्या स्त्रीला म्हणाला, “तुझ्या विलापावरून तुझ्यावर दुःखाचा कडेलोट झाला आहे असे वाटते.’ ती म्हणाली, “खरे आहे. माझ्या नवर्याुचे वडील येथे वाघाने मारले. माझा नवराही तसाच गेला. आणि आता माझा मुलगाही त्याच प्रकारे मारला गेला आहे. प्रभूने विचारले, ‘मग तू ही जागा सोडून दुसरीकडे का बरे जात नाहीस?’ ‘इथे जुलमी सरकार नाही -‘ तिने उत्तर दिले. प्रभू नंतर म्हणाले, ‘मुलांनो, हे लक्षात ठेवा, जुलमी सरकार वाघापेक्षाही जास्त भयंकर असते.
समान नागरी कायद्याचा मसुदा : एक चिकित्सा (२)
श्री. सत्यरंजन साठे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती जया सागडे आणि श्रीमती वैजयन्ती जोशी ह्यांच्या चमूने जो नवीन, भारतातील सर्व नागरिकांसाठी समान, असा विवाहविषयक कायदा सुचविला आहे त्यामुळे विवाह एक अत्यन्त गंभीर असा विधी होण्याला, त्याचे ऐहिक स्वरूप स्पष्ट होण्याला त्याचप्रमाणे त्याचे पावित्र्य आणि मांगल्यसूचक पारलौकिकाशी आजवर असलेले नाते संपुष्टात यावयाला मदत होईल ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे हे मान्य करून त्याविषयीची चर्चा पुढे चालू ठेवू या.
(२)एकपतिपत्नीक विवाहालाच मान्यता देण्याच्या तरतुदीमध्ये असा विवाह सहसा कोणाला मोडूद्यावयाचा नाही हा विचार प्रामुख्याने कार्य करताना दिसतो.
पत्रव्यवहार
संपादक,
आजचा सुधारक,
जाने. ९७ चा अंक मिळाला. इंदुमती यार्दी ह्यांचे विचार योग्य असले तरी त्यांनी दिलेले गिलचे उदाहरण चूक आहे. एक ओली पार्टी होती. अशा पार्टीला बजाज ह्यांनी जावयासच नको होते. दारू प्यालेल्या गिलने त्यांना जवळ बोलाविल्यावर त्या गिलजवळ गेल्या व गिलने चापट मारली. बजाजांनी गिलजवळ जावयाचे नाही.
आम्ही पुरुषसुद्धा रस्त्यात दारू प्यालेला कोणी असेल तर लांबून जातो. जवळ गेले तर तो भटांना शिव्या देतो. हा अनुभव अनेकांना असेल. माझ्या मते गिल खुर्चीतून उठून बजाजकडे जाऊन त्यांनी चापट मारली असती तर ते दोषी ठरतात.
हुसेनसाहेबांचे अश्लील चित्र
सुप्रसिद्ध चित्रकार हुसेन साहेब ह्यांनी आपल्या धर्मातील देवदेवतांची विटंबना करणारे अश्लील चित्र रंगविले आहे. त्या चित्राची अस्पष्ट प्रतिमा ‘इंडियन एक्सप्रेस’च्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेली आहे. ती कृष्ण धवल आहे. त्यातून रंग संगती, रंगाचा तरलपणा, सुस्पष्ट होत नाही. चित्र परंपरावादी शैलीचे (क्लासिकल) नसून नूतन चित्रकलेचा नमुना आहे. या चित्रात गणपती वाटावा अशी आकृती आहे.
शंकराचे नुसते तोंड दर्शविले असून जटेतून प्रवाह दाखविला आहे. त्या प्रवाहात अवगाहन करणारी एक नग्न वाटणारी देवता बाजूला आहे आणि शेवटी एक सटवी रोग लागल्यासारखा वाकडा तिकडा कृष्ण आहे.
विरोध नेमका काय आणि कशाला आहे?
गेल्या काही दिवसांत दोन जाहीर कार्यक्रमांनी सार्वजनिक जीवनात बरीच खळबळ माजविली, मुंबईचा मायकेल जॅक्सन यांचा पॉप संगीताचा कार्यक्रम आणि बंगलोरचा विश्वसुंदरीचा स्पर्धात्मक कार्यक्रम. दोन्ही कार्यक्रमांचे आश्रयदाते १५०००-२०००० हे. रुपयांचे तिकीट सहज परवडू शकणारे होते. बिनधास्त, बेपर्वा अशा या बाजारू संस्कृतीच्या बटबटीत कार्यक्रमांना दोन्ही ठिकाणच्या राज्य सरकारांनी ठाम, निर्धारपूर्वक, करडा पाठिंबा दिला. ही दोन्ही सरकारे त्यांच्या राजकीय मतप्रणालीत दोन ध्रुवांइतकी दूर आहेत. परंतु खुल्या अनिर्बध बाजारपद्धतीबाबत त्यांच्यात एकमत दिसते.
ही खुली बाजारू संस्कृती व्यक्तीच्या बाबतीत किती संवेदनशून्य असू शकते याची दोन उदाहरणे इथे देण्यासारखी आहेत.