(१) श्री. मोहनींच्या प्रतिपादनाने श्वेतकेतूचा दंडक उलथवला जातो. असे केल्याने समाज श्वेतकेतूच्या आधीच्या (प्रागैतिहासिक) पद्धतींकडे ढकलला जाईल. सोबतच स्त्रियांचे लैंगिक स्वातंत्र्य स्वैर कामाचाराकडे नेईल, व एडजचा धोका वाढेल. (इति के. रा. जो.)
मानवांच्या उत्क्रांतीचा इतिहास सांगतो की गर्भारपण व त्यानंतर अपत्ये ‘सुटी’ होणे यासाठी माणसांना जेवढा दीर्घ काळ लागतो तेवढा इतर कोणत्याच प्राण्याला लागत नाही. या सर्व काळात स्त्री असहाय असते. जर या दीर्घकाळच्या असहायतेसोबतच साहाय्य देणारी यंत्रणाही उत्क्रांत झाली नसती, तर मानववंश घडलाच नसता. असहायतेच्या काळात स्त्रीला पुरुषाने मदत करावी व संरक्षण द्यावे यासाठी पुरुषाला अमुक स्त्री ही आपल्या अपत्याची आई आहे, व आपली’ आहे, याची जाणीव असायला हवी.
आजचा सुधारकची सात वर्षे
आजचा सुधारकचा मार्च १९९७ चा अंक हा या मासिकाच्या आयुष्याची सात वर्षे पूर्ण झाल्याचे सांगत आहे. बुद्धिवादाने उद्बोधन या दृष्टीने चालविलेल्या मराठी मासिकाला सात वर्षे पूर्ण करता आली हीही एक उपलब्धी आहे. स्वच्छ व शुद्ध मुद्रण करण्याचा प्रयत्न, विज्ञापनांचा अस्वीकार, प्रायः नियमित प्रकाशन, पृष्ठसंख्या अल्प असली तरी विशिष्ट विचारांचा प्रचार व्हावा म्हणून दिला जाणारा भर – ही या मासिकाची वैशिष्ट्ये लक्षात राहण्यासारखी आहेत. ही सारी वैशिष्ट्ये स्वतःत दाखविणारा फेब्रुवारी १९९७ चा अंक नमुनेदार आहे. त्यात गेली सात वर्षे सामाजिक विचार आपल्या पद्धतीने चिकाटीने मांडणारे श्री दिवाकर मोहनी आहेत.
श्री. मा. गो. वैद्यांचे परंपरासमर्थन
गेल्या महिन्यात इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज या संघपरिवारातील संस्थेच्या वतीने नागपूरला एक परिसंवाद झाला. विषय होता ‘परंपरा आणि आधुनिकता’. या प्रसंगी परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून श्री. मा. गो. वैद्य यांनी जो समारोप केला ते भाषण याच अंकात अन्यत्र दिले आहे. श्री. मा. गो. वैद्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार-प्रमुख आहेत. त्यापूर्वी बौद्धिक प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आणि जवळजवळ तेवढाच काळ ते नागपूरच्या ‘तरुण भारत’ या दैनिकाचे संपादक होते. त्यांचे विचार जितके गंभीर तितकेच सुस्पष्ट आणि लेखनशैली जशी प्रासादिक तशीच मार्मिक असते असा लौकिक आहे.
परंपरा आणि आधुनिकता
प्रसिद्ध फ्रेंच विचारवंत व्होल्टेअर म्हणत असे, `If you want to talk with me, please define yourself.’ शब्दांच्या व्याख्या करून बोलले पाहिजे. हेमचन्द्राच्या कोशात ‘अविच्छिन्नधारायां परंपरा’ अशी परंपरेची व्याख्या आहे. परंपरा हा एक प्रवाह आहे. ती वाहती धारा आहे. नदीच्या प्रवाहाप्रमाणे ती बदलती आहे. मनुष्यजीवनाइतकी गतिशील आहे. तिचा प्राचीनतेशी संबंध आहे. ती वर्तमानात आहेच आणि तिचे दुसरे टोक भविष्यात आहे. रूढी हे साचलेले पाणी आहे. डबके आहे. आधुनिकतेचा विरोध रूढीशी राहू शकतो, परंपरेशी नाही. जी केवळ वर्तमानातच असते, जिला भूतकाळ नसतो ती फॅशन.
असे जग निर्मिणे शक्य आहे
जे जग आपल्याला निर्मायचे आहे त्यात सर्जक वृत्ती जिवंत असतील. त्यात जीवन हे आनंद आणि आशा यांनी परिपूर्ण असे साहस असेल. आपल्या जे मालकीचे आहे ते राखण्याच्या किंवा दुसन्याच्या मालकीच्या वस्तू लुबाडण्याच्या नव्हे, तर विधायक प्रवृत्तींवर आधारलेले ते जीवन असेल. त्या जगात स्नेहाला अनिबंध वाव असेल. त्यातील प्रेमातील अधिकारवृत्ती नाहीशी झालेली असेल. त्यातील क्रौर्य आणि असूया सुखानुभवाने नाहीशी झालेली असतील, आणि जीवनाला समृद्ध करणाच्या सर्व सहजप्रवृत्तींना वाव मिळून ते आनंदमय झालेले असेल, असे जग निर्मिणे शक्य आहे. ते फक्त ते इच्छिणाच्या मानवांची वाट पाहात आहे.
पत्रव्यवहार
श्री. संपादक, आजचा सुधारक यांस,
मी आपल्या मासिकाचा एक फार जुना वाचक आहे. जो विवेकवाद आपल्या लेखांमधून आपण वेळोवेळी मांडला आहे तो सगळा मी काळजीपूर्वक वाचला आहे आणि तो मला पटला आहे. त्यामुळे मी ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल अत्यंत साशंक झालो आहे. एवढेच नाही तर त्यामुळेच मी कोणत्याही एका धर्माचा अनुयायी नाही असे मानू लागलो आहे. माणूस आपल्या जातीने किंवा धमनि सांगितलेले आचार सोडून देऊ शकतो व आपल्या स्वतःच्या बुद्धीने आपले आचरण ठरवू शकतो असे मला वाटू लागले आहे.
पण तरीसुद्धा मला एक गुंता सोडविता आलेला नाही; आणि त्यासाठीच हे पत्र आपणाला पाठवीत आहे.
संवेदनशैथिल्य आणि सामाजिक आरोग्य
मनुष्यजातीच्या वृत्तीतला थंडपणा, जाणिवांचा बोथटपणा वा कोडगेपणा याला मी संवदेनशैथिल्य असे म्हणते.
संवदेनशील असणे, संवेदनांना सचेतन करणे किंवा उत्तेजना देणे (stimulation) हे माणसाच्या विकासासाठी व वाढीसाठी अत्यावश्यक असते. अशी उत्तेजना (Stimulation) जर वातावरणामधून मिळाली नाही तर माणसात मानसिक व शारीरिक गोंधळ निर्माण होतो. त्यातून विकृती निर्माण होऊ शकते. या उत्तेजनाही विविध प्रकारच्या असल्या तरच माणसाचे कुतूहल, काहीतरी करण्याची आस व इच्छा व निरनिराळे शोध लावण्यासाठी लागणार्याह ऊर्मी जागृत होऊ शकतात, अन्यथा नाही. अशा ऊर्मी जागृत होणे, ही आजच्या समाजात एक दुरापास्त गोष्ट होत चालली आहे.
माझे शिक्षक
एकोणीसशे एकोणचाळीस सालच्या हिवाळ्याच्या सुरुवातीचा दिवस होता. आमच्या ‘अपार्टमेंट’च्या बाहेर वार्यावने पाने उडत होती. घरातल्या उबेत, सुरक्षिततेत बसायला बरे वाटत होते. शेजारच्या खोलीत आई स्वयंपाक करत होती. वडील लवकरच परतणार होते. आई माझ्याजवळ आली आणि आम्ही दोघे मावळत्या सूर्याच्या प्रकाशात बाहेर पाहायला लागलो.
“बाहेर भांडतायत माणसं, मारतायत एकमेकांना”, आई अटलँटिक समुद्राकडे हात दाखवत म्हणाली. मी निरखून पाहिले, म्हणालो, “माहीत आहे मला – मला दिसत आहेत ती.
आई जरा कडकपणे म्हणाली, “काही दिसत नाही आहे तुला. फार दूर आहेत ती.” माझ्या मनात आले, की इतक्या ठामपणे कसे सांगते आहे ती, की मला काही दिसत नाही आहे?डोळे
नैतिक बुद्धिमत्तेचा विकास
दक्षिण कोरियातील किम उंगयोंग या चार वर्षांच्या मेधावी बालकाच्या बुद्धिमत्तेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने १९६८ सालीच घेतलेली अनेकांना परिचित असेल. हा मुलगा वयाच्या चौघ्या वर्षापासूनच कविता करीत असे, चार भाषांमध्ये अस्खलितपणे संभाषण करी आणि टेलिव्हिजनवर त्याने इन्टिग्रल कॅलक्युलसचे प्रश्न सोडविण्याचे प्रात्यक्षिकही करून दाखविले होते. ह्या मुलाचा टर्मन बुद्धयंक २१० मानण्यात आला होता. याचप्रमाणे इंग्लिश तत्त्वज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ जॉन स्टुअर्ट मिल तसेच जर्मन कवी वुल्फगांग गटे यांचाही बुद्धयंक २०० च्या वरच असावा असे सांगण्यात येते. सामान्य माणसांचा बुद्धयंक १०० ते १४० या दरम्यान आढळतो.
विक्रम, वेताळ आणि समान नागरी कायदा
वेताळ : राजा, आजच्या सुधारकाचा ‘समान नागरी कायदा विशेषांक’ वाचलाच असशील ना? विक्रम : (गर्वाने) हो, तर! मी तर ताबडतोब माझ्या कायदेमंत्र्याला सांगून एक ‘आदर्श’ असासमान नागरी कायदा राज्यात लागूही केला. विद्वानांच्या सूचना मी नेहमीच तत्परतेनेअंमलात आणतो.
वेताळ: राजा, तू विद्वानांच्या सूचनाच फक्त अंमलात आणतोस, की त्याप्रमाणे केलेले कायदेहीअंमलात आणतोस?
विक्रमः (गडबडून) मला समजला नाही, तुझा प्रश्न.
वेताळ: (एक दीर्घ उसासा टाकून) म्हणजे तुला प्राथमिक शाळेतल्या नागरिकशास्त्राचे धडे पुन्हाघालून द्यायला हवेत! ऐक. समाजाने पाळायचे कायदे स्पष्टपणे घडवणे, त्याकायद्यांप्रमाणेसमाजाला वागायला लावणे, आणि जे लोक कायदे तोडताना दिसतात त्यांना न्याय देणे; या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.