शारदेच्या माहेरच्या माणसांची तिने सांगितलेली नावे
शारदेने तिच्या खापरपणजोबा, पणजोबा, आजोबा, वडील, दोन काका आणि दोन सावत्रभाऊ यांची नावे सांगितली आणि त्याप्रमाणेच (पणजोबा सोडून) नावे असणारी वंशावळ प्रा. अकोलकरांनी सादर केली आहे. या महत्त्वाच्या मुद्द्याची नीट छाननी होणे जरूर आहे. याबाबत प्रा. अकोलकरांना श्री. आर. के. सिन्हा यांच्याकडून त्यांनी मिळविलेली वंशावळ मिळाली आहे. याशिवाय डॉ. स्टीव्हन्सनना प्रो. पॉल यांच्याकडून वंशावळ मिळाली. श्री. सिन्हा व प्रो. पॉल यांचा शारदा केसशी कसा संबंध आला, ही माणसे कोण, त्यांनी कोणत्या प्रकारे आणि कोणत्या माहितीच्या आधारे तपास केला, अशा प्रकारच्या संशोधनात तपास करताना ज्या काळज्या घ्याव्या लागतात त्याची त्यांना जाण होती का, याची काहीच माहिती प्रा.
हिन्दुत्व-अन्वेषण (उत्तरार्ध)
आजचा सुधारक मासिकाच्या ऑक्टो. ९५ च्या अंकातील लेखातून हिंदुत्व या धार्मिक संज्ञेचा ऐतिहासिक शोध निष्फळ ठरतो याविषयीचा विचार मांडला आहे. राजकीय स्वार्थासाठी हिन्दुत्वाचा जयकार केला जात असेल तर प्रस्तुत लेखकाला या । विषयाची चर्चा करण्याची गरज नाही. पण ज्यावेळी जनजागृतीसाठी धर्मप्रचाराचा अभिनिवेश असतो त्यावेळी असे जाणवते की प्रचाराची माध्यमे ज्यांच्याजवळ आहेत ते कर्मठ आहेत, आणि या कर्मठांनी कोणत्याच समस्येचा अभ्यास केला नसतो. विचारही केला नसतो. कारण धर्मप्रचाराचे नाटक वठविण्यात ते स्वतःला धन्य समजतात. त्यांना मंदिरांविषयी आस्था नसते. कीर्तन-प्रवचनांचा त्यांना कंटाळा असतो.
नियति, दैव, विधिलिखित, नशीब, प्रारब्ध, इत्यादि
नियति, विधिलिखित, दैव, नशीब, प्रारब्ध या सर्व गोष्टी एकाच कुटुंबातील आहेत. पण त्यांपैकी काहींचे संदर्भ आणि अर्थ काहीसे भिन्न आहेत.
नियति (Fate). भविष्यात केव्हा काय घडणार आहे हे पूर्णपणे पूर्वनिश्चित आहे. मनुष्याने काहीही केले त्यापासून त्याची सुटका नाही. उदाहरण म्हणून पुढील गोष्ट देता येईल.
एका मनुष्याला दुपारी बाजारात मृत्यू भेटला आणि म्हणाला : ‘आज रात्री बारा वाजता येतो आणि तो नाहीसा झाला. तो मनुष्य स्वाभाविकच घाबरला, पण काहीतरी हातपाय हलवायचे म्हणून त्याने आपले घोडे काढले आणि त्यावर बसून तो भरधाव वाट फुटेल तिकडे जात राहिला.
कुटुंब : आजचे आणि उद्याचे (भाग २)
आतापर्यंत (मागच्या अंकामध्ये) मी माझी काही निरीक्षणे नोंदवली, तशीच आणखी काही पुढे मांडतो.
आपल्या भारतीय कुटुंबामध्ये कुटुंबीयाविषयीच्या सर्व जबाबदाच्या फक्त त्या कुटुंबाच्या सदस्यांनीच पेलावयाच्या आहेत असे आपल्याला वळण असल्यामुळे मुलामुलींचे शिक्षण करणे, त्यांना नोकर्याय मिळवून देणे, त्यांची लग्ने लावून देणे अशा जबाबदारीच्या कामांमध्ये कुटुंबाबाहेरचे लोक एकमेकांना मदत करीत नसतात. उलट ते एकमेकांच्या मार्गात अडथळे निर्माण करीत असतात. कारण आम्ही आपापले प्रश्न आपणच सोडवावयाचे अशी । सगळ्यांना शिकवण दिलेली असते. दुसऱ्याह शब्दांत ज्या शिकवणीतून आपली कुटुंबे घडतात ती शिकवण आपण फक्त आपल्यापुरते पाहावे अशी आहे; सगळ्यांनी मिळून आपले प्रश्न सोडवावे अशी नाही.
आगरकरांचे अर्थचिंतन
प्रस्तावना
प्रस्तुत निबंधाचे तीन भाग पाडले आहेत. पहिल्या भागात आगरकरांच्या अगोदरच्या काळात महाराष्ट्रात आर्थिक चिंतनाची स्थिती काय होती हे दर्शविले आहे. दुसन्या भागात आगरकरांच्या निबंधांमधून प्रकर्षाने दिसून येणारे विचारांचे पैलू दिग्दर्शित केले आहेत. निबंधाच्या तिसऱ्या भागात त्यांच्या एकूण आर्थिक चिंतनाचे समालोचन करण्याचा प्रयत्न
केला आहे.
(१) आगरकरपूर्व आर्थिक चिंतन
१८२० च्या सुमारास पेशवाईचे पतन झाल्यानंतरही ब्रिटिशांशी लढाया करून आपले उरलेसुरले स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याचे व ब्रिटिशांना घालवून देण्याचे प्रयत्न चालू होते. उत्तर भारतात हे प्रयत्न बराच काळ चालू होते. १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम, उत्तरप्रदेश व बिहारमधील उठाव ही त्या प्रयत्नांची काही उदाहरणे आहेत.
विश्वाचा हेतू
आपली पृथ्वी विश्वाचा एक लहानसा कोपरा आहे. आणि बाकीचे विश्व इथल्यासारखेच कदाचित् नसेल असे मानायला जागा आहे. अन्यत्र कुठे जीवन असेल हे सर जेम्स जीन्स शंकास्पद मानतात. ईश्वराच्या योजना विशेषतः पृथ्वीशी संबद्ध आहेत असे मानणे कोपर्निकन क्रांतीपूर्वी स्वाभाविक होते, पण आता ती कल्पना अयुक्तिक झाली आहे. जर विश्वाचा हेतू मनाची उत्पत्ती हा आहे असे मानले तर एवढ्या दीर्घ काळात इतके थोडे निर्मिल्यामुळे त्याला काहीसा अकुशल समजावे लागेल. अन्यत्र कुठेतरी केव्हातरी उन्नत मने निर्माण होतील याचा काहीही वैज्ञानिक पुरावा नाही. जीवन अपघाताने निर्माण झाले असे मानणे चमत्कारिक वाटेल, पण एवढ्या विशाल जगात अपघात होणे अपरिहार्य आहे.
पत्रव्यवहार
श्री. संपादक,
आजचा सुधारक ह्यांस,
आपल्या सप्टेंबर ९५ च्या अंकाच्या १८३-८४ पानांवर श्री. प्रभाकर नानावटी ह्यांची खरी स्त्रीमुक्ती कशात आहे ह्याविषयी एक प्रतिक्रिया प्रसिद्ध झाली आहे. त्याविषयी माझे मत पुढीलप्रमाणे :
(१) ह्यापुढे पुरुषांनी स्त्रियांना, किंबहुना सर्वांनीच एकमेकांना अधिक मानाने वागवावे, समतेने वागवावे आणि त्यासाठी आवश्यक तो बदल आपापल्या मनात घडवून आणावा अशी गरज आहे असे माझे म्हणणे आहे. त्यासाठी कोणतीही अट स्त्रीपुरुषांनी घालूनये. उदा. स्त्रिया/पुरुष जास्त पैसे मिळवतील तरच आम्ही त्यांना उचित मान देऊ वगैरे. मला जी सामाजिक दर्जाची समता अपेक्षित आहे ती कोणाच्याही धनार्जनयोग्यतेवर अवलंबून नसणारी अशी आहे.
सततचा पहारा ही स्वातंत्र्याची किंमत आहे!
ज्ञान मिळविण्यासाठी बुद्धीला पर्याय शोधण्याच्या शक्यतांबाबतच्या चर्चेत (आजचा सुधारकऑगस्ट ९५, ऑक्टोबर ९५) आजवर अशा दोन पर्यायांचा उल्लेख झालेला आहे. एक आहे साक्षात्कारी (revelatory) ज्ञान, उदा. थिआसॉफिस्टांचे अणु-संरचनेचे ज्ञान. दुसरे आहे अंतःस्फूर्तीचे (intuitive) ज्ञान, उदा. रामानुजन, Kekule वगैरेंचे ज्ञान.
या दुसऱ्या( जातीतले ज्ञान काही बर्या.पैकी स्पष्ट अशा गृहीतकांपासून किंवा पेंद्रिय माहितीपासून काही प्रमेयांपर्यंत किंवा नव्या माहितीपर्यंत जाणारे आहे. साक्षात्कारी ज्ञानाच्या बाबतीत मात्र गृहीतके किंवा पेंद्रिय माहिती यांना पाया मानले जात नाही. एका रूपकाने हा फरक स्पष्ट करतो- एक लांब, नदीसारखे टाके आहे.
कारण आणि reason
मराठीत आपण ‘कारण हा शब्द आणि त्याच्या विलोम converse अर्थाचा’ म्हणून हा शब्द अनेक अतिशय भिन्न अर्थांनी वापरतो. ‘विलोम अर्थ’ याचा अर्थ उदाहरणाने स्पष्ट करता येईल. उदा. पति याचा विलोम शब्द पत्नी’, ‘शिक्षक’ याचा विलोम शब्द ‘विद्यार्थी’. ‘अ’ चा ‘ब’ शी जो संबंध असेल त्याचा विलोम संबंध म्हणजे ‘ब’ चा ‘अ’शी संबंध. उदा. जरअ ब-पेक्षा मोठा असेल तर ब अ-पेक्षा लहान असला पाहिजे. म्हणजे च्यापेक्षा मोठा या संबंधांचा विलोमसंबंध च्यापेक्षा लहान . कारण या शब्दाचा म्हणून विलोम शब्द होय, कारण जरआपण म्हणालो की ‘अ, कारण ब, तर ‘ब, म्हणून अ असे आपण म्हणू शकतो, एवढेच नव्हे तर तसे आपल्याला म्हणावे लागते.
कुटुंब : आजचे आणि उद्याचे (भाग १)
परिपूर्ण स्त्रीमुक्तीच्या संकल्पनेला जो विरोध होत आहे त्याचे मुख्य कारण, माझ्या समजुतीप्रमाणे, त्याचा परिणाम कुटुंबविघटनामध्ये होईल अशी भीती आम्हाला वाटते; हे आहे. म्हणून जी आमची कुटुंबे आम्ही प्राणपणाने जपत आहोत त्यांचे खरे स्वरूप कसे आहे ते पाहू. त्यासाठी आपणाला कुटुंबाची शास्त्रशुद्ध व्याख्या करण्याची गरज नाही. पण साधारणपणे असे म्हणता येईल की कुटुंबामध्ये एका घरात राहणारे, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, एकमेकांशी ज्यांना आपले नाते सांगता येते असे कमीअधिक वयाचे स्त्रीपुरुष असतात. त्यांचे नाते रक्ताचे असतेच असे नाही, व त्यांचे एकमेकांशी संबंध पैशांवर अवलंबून नसतात.