मासिक संग्रह: सप्टेंबर, १९९३

पडद्यातला देश

गावी शेजारच्या देवकरण भटजींना ज्योतिष चांगले समजत असे. एकदा माझा हात पाहून ते म्हणाले, ‘याला विद्या नाही. हे भविष्य ऐकून माझी माय कष्टी झाली. पण ते भविष्य तिच्या अंदाजाबाहेर मी खोटे ठरविले. दुसरे, शेंदुर्णीकरांचे भविष्य : ‘तुम्हाला वाहनयोग (चारचाकी) आहे.’ तेही मी आतापर्यंत तरी खोटे ठरवले आहे. परदेशप्रवास घडेल असे मात्र माझ्या हातावर कोणालाच दिसले नव्हते. तो घडला. आणि मुळातील भविष्यावर माझा अविश्वास अधिक पक्का झाला.
मात्र परदेशप्रवासातही एक प्रकारची वर्णव्यवस्था आहे. युरप-अमेरिका अव्वल दर्जाचे, दुबई-आफ्रिका त्या मानाने दुय्यम, सिंगापूर-हाँगकाँग यांना शूद्र म्हटले तर नेपाळ अतिशूद्रात गणले जाईल.

पुढे वाचा

महाविद्यालयांतील प्रवेशांच्या निमित्ताने

८ ऑगस्ट १९९३ च्या लोकसत्ताच्या अंकामध्ये प्रदीप कर्णिक आणि विजय तापस ह्यांचा एक लेख आला आहे. विषय आहे – महाविद्यालयीन प्रवेशाचे राजकारण’. तो वाचून मला ही महाविद्यालये कशाला हवी आणि एकूणच शिक्षण खरोखरच कशासाठी हवे असा प्रश्न पडला.
१० वी च्या परीक्षा झाल्या आणि निकाल प्रसिद्ध झाले की महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी पास झालेली मुले आणि त्यांचे आईबाप ह्यांच्या चकरा सुरू होतात. हर प्रयत्नाने प्रवेश मिळविला जातो. वशिला, चिठ्ठी, फोन, ओळख ह्या सामनीतीने काम भागले नाही तर दामनीतीचा अवलंब करण्यात येतो. तेवढ्यानेही भागले नाही तर राजकीय पक्षांचे दबाव, स्थानिक नेतृत्वाचा हस्तक्षेप, मंत्रालयातून आणि शासकीय अधिकाऱ्यांकडून फोन, एवढेच नव्हे तर दादागिरी म्हणजे दमदाटी किंवा प्रत्यक्ष मारहाणीपर्यन्तसुद्धा मजल जाते.

पुढे वाचा

‘सय्यदनांचा हस्तक्षेप कोठपर्यंत?

अस्मा ताहेर बारावीच्या परीक्षेत राज्यात सर्वप्रथम आलेली औरंगाबादची गुणवान, बुद्धिमान विद्यार्थिनी. तिचा कल वैद्यकीय शाखेकडे; परंतु ‘सय्यदनां’नी – बोहरा धर्मगुरूंनी परवानगी दिल्याशिवाय ती वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकणार नाही. का ?
जुलेखाची कहाणी हृदयद्रावक. जन्मतःच हृदयाला छिद्र असलेली जुलेखा वेळीच उपचार न झाल्याने ‘अल्लाला प्यारी झाली. शस्त्रक्रिया करायची की नाही, याविषयीचे आदेश ‘सय्यदनांकडून मिळविण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी मधली तब्बल पस्तीस वर्षे वाया घालविली होती ! असे का घडावे ?
माझ्या पत्नीने-झेनबने १९५१ मध्ये पुणे विद्यापीठातून एम.एस्सी. ची पदवी संपादन केली, दिल्ली विद्यापीठात पीएच.डी.

पुढे वाचा

बुद्धिवादाचा एक पंथ होऊ नये

भूत-भावी घटना प्रत्यक्ष जाणणे या संदर्भात मी मांडलेले विचार व दुसरेही काही विचार कदाचित काही बुद्धिवादी मंडळींना पटणार नाहीत. माणसाचा स्वभाव असा आहे की तो एकदा एखाद्या पंथातं सामील झाला की त्याच्या नकळत त्याची बुद्धी त्या पंथाच्या अधिकृत विचारसरणीला बांधली जाते. मग तो दुसऱ्या त-हेच्या प्रतिपादनाचा विचार अलिप्तपणे करू शकत नाही. निदान बुद्धिवादी मंडळींचा तरी असा कर्मठ पंथ बनू नये असे मला वाटते. मी हे का म्हणतो ते सांगण्यासाठी पुढील उदाहरणे देतोः
‘विश्वाचा गाडा आपोआप आपल्या नियमानुसार चाललेला आहे, त्याच्यामागे कसलीही जाणीवयुक्त प्रेरणा नाही.’

पुढे वाचा

तत्त्वज्ञानाची ओळख (भाग ६)

विधानांची काही महत्त्वाची विभाजने

आपण आतापर्यंत विधानांची काही विभाजने पाहिली आहेत. उदा. अस्तिवाचक (affirmative) आणि नास्तिवाचक (negative) विधाने, तसेच सार्विक (universal) आणि कातिपयिक (particular) विधाने.
आज आपण आणखी तीन विभाजनांची ओळख करून घेणार आहोत. ही विभाजने आहेतः (१) विश्लेषक (analytic) आणि संश्लेषक (synthetic) विधाने; (२) अवश्य (necessary) आणि आयत्त (contingent) विधाने; आणि (३) प्रागनुभविक (a priori) आणि आनुभविक (empirical) विधाने. ही सर्व विभाजने अतिशय महत्त्वाची असून त्यांचा तत्त्वज्ञानात वारंवार उल्लेख येतो.
(१) विश्लेषक आणि संश्लेषक विधाने
हे विभाजन तसे पुष्कळ जुने आहे.

पुढे वाचा

अगोदर मुस्लिम जातीयवाद नष्ट करा

अगोदर मुस्लिम जातीयवाद नष्ट करा
भारतातील मुस्लिम प्रश्नाच्या संदर्भात हिंदु जातीयवादाचा विचार करावयाला हवा. पण माझे मत असे आहे की हिंदु जातीयवाद हा मूलतः मुस्लिम जातीयवादाला प्रत्युत्तर देण्याच्या स्वरूपात आपल्या देशात निर्माण झाला आहे. हिंदु जातीयवाद असण्याची कारणे नष्ट करा – थोडक्यात मुस्लिम जातीयवाद नष्ट करा – आपल्याला या देशात मूठभरदेखील प्रभावी हिंदु जातीयवादी आढळणार नाहीत.

चर्चा

श्री. मा. श्री. रिसबूड यांना उत्तर
स.न.
आपले दि. १५-७ चे पत्र आणि आपले पुस्तक ‘फलज्योतिष दोन्ही मिळाली. त्याबद्दल आभारी आहे.
आधी आपल्या पत्राला उत्तर देतो, मग आपल्या पुस्तकातील ‘बुद्धिवादाचा एक पंथ होऊ नये या परिशिष्टाविषयी लिहितो.
प्रथम विवेकवाद्याच्या तोंडी आपण जो युक्तिवाद घातला आहे त्यात थोडी दुरुस्ती सुचवितो.
आपण म्हणता की ‘सृष्टीचे आदिकारण म्हणजे एक अज्ञेय अशी शक्ति हा आजच्या घटकेला तरी दुर्भेद्य स्तर आहे. यावर माझे म्हणणे पुढीलप्रमाणे आहे असे आपण म्हणता. ‘त्या दुर्भेद्य स्तरापर्यंत जायचेच कशाला? थोडे आधीच थांबावे, म्हणजे सृष्टीला आदिकारण नसून हे सर्व आपोआप चालले आहे असे मानावे.’

पुढे वाचा