मासिक संग्रह: सप्टेंबर, २००६

अभ्यागत संपादकाचे संपादकीय : आपली आरोग्यव्यवस्था दिशा व प्रश्न

आजचा सुधारक हे आगरकरांचा वारसा सांगणारे विवेकवादाला वाहिलेले मासिक आहे. त्यात सर्वसाधारणपणे आरोग्याखेरीजचे अन्य सामाजिक विषय आजपर्यंत आलेले आहेत. आज आरोग्याचे नवनवे सामाजिक प्रश्न व आरोग्यसेवादेखील समाजाच्या सर्वच अंगांना भिडते आहे. त्याचे सध्याचे स्वरूप काय आहे, त्याचे भविष्य काय, त्याचा समाजावर आता व पुढे काय परिणाम होणार आहे या विषयांची चर्चा आवश्यक वाटल्याने ह्या अंकाचे प्रयोजन ! आरोग्यसेवेतील समस्या काय ? त्यावर उपाय काय ? अशा ढोबळ स्वरूपात या अंकातील लेख लिहिले गेलेले नाहीत. ह्यातील बहुतेक लेख कुठल्या ना कुठल्या स्वरूपात एकेका विषयाच्या काही मूलभूत पैलूंबद्दल विचार करताना आढळतील.

पुढे वाचा

आधार मिळतो

ज्या जगात आरोग्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे आणि मोठा निरोगी समाज आहे तिथे वैद्यकीय हस्तक्षेपाची गरज क्वचितच आणि माफक प्रमाणात भासते. निरोगी माणसे ती, जी निरोगी घरात राहतात, पौष्टिक आहार घेतात आणि त्यांचा परिसर जन्म, वाढ, रोगमुक्ती आणि मृत्यू ह्या सर्वांसाठी अनुकूल असतो. ज्या संस्कृतीमुळे ह्या निरोगी समाजाला आधार मिळतो त्या संस्कृतीने लोकसंख्येच्या मर्यादांचा, वार्धक्याचा, अपुऱ्या रोगमुक्तीचा आणि सतत निकट येणाऱ्या मृत्यूचा जाणीवपूर्वक स्वीकार केलेला असतो. निरोगी माणसांना संभोग, अपत्यजन्म, मानवी जीवनातील विविध अवस्थांमधला सहभाग आणि मृत्यू ह्याकरिता नोकरशाहीच्या हस्तक्षेपाची गरज कमीत कमी असते.

पुढे वाचा

लेखक परिचय

डॉ. अनंत फडके, एम.बी.बी.एस.: ‘सेहत’ या स्वयंसेवी संस्थेमध्ये कार्यरत. लोकविज्ञान चळवळ, जनआरोग्य अभियान यासाठी चळवळ. जनतेच्या आरोग्यासाठी वेगळ्या वाटा शोधण्यात आयुष्यभर काम. औषधांच्या प्रश्नांवर लिखाण. ८, अमेय आशिष सोसायटी, कोकण एक्सप्रेस हॉटेल लेन, कोथरूड, पुणे ४११ ०३८. ०२०-२५४६००३८

डॉ. मोहन खामगांवकर, एम.डी. : सध्या लातूरच्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये सामाजिक व प्रतिबंधक औषधी वैद्यक विभागाचे प्रमुख प्रभारी प्राध्यापक. या विभागात विशेष रस. एम.बी.बी.एस.च्या विद्यार्थ्यांसाठी डेलळरश्र । शिर्शीशपींळींश मेडिसिनचे पुस्तक लिहिलेले. आणखी एक पुस्तक आहाराबद्दल, कौटुंबिक आहारमित्र’ प्राध्यापक व विभागप्रमुख, पी.एस.एम.डिपार्टमेंट, शासकीय मेडिकल कॉलेज, लातूर.

पुढे वाचा

एड्सः एक साथ … लक्षवेधी

गोष्ट १९७९ च्या सुमाराची. अमेरिकेतली. न्यूयॉर्कमधल्या एका मोठ्या इस्पितळात रोज सकाळी सगळ्या डॉक्टरांची, प्रमुख नर्सेसची एक बैठक होत असे. इस्पितळातल्या सगळ्या रुग्णांच्या प्रकृतीबद्दल तेव्हा चर्चा होई. लक्षणे, तपासण्याचे निकाल, निदान आणि उपचारांच्या योजना ह्यांचा आढावा घेतला जाई, आणि कार्यवाहीसाठी जबाबदाऱ्यांचे वाटप होई. ह्या बैठका रोजच्याच असत. त्यांची पद्धत ठरलेली, त्यामुळे बैठका चटपटीतपणे उरकत. प्रत्येकच रुग्णांबद्दल खूप चर्चा करायचे कारण नसते. काही विशेष आढळले, तरच त्यावर थोडीफार चर्चा व्हायची, आणि त्यातून कार्यवाहीच्या दिशा ठरत.

१९७९ च्या सुमाराला, ह्या चर्चा जरा लांबू लागल्या.

पुढे वाचा

मलेरियातील गोलमाल

लॅन्सेट या धारदार आरोग्याच्या मासिकाने भारतात जागतिक बँकेने मलेरियाचा फैलाव थांबवण्यासाठी आखलेले कार्यक्रम नीट राबवले जात नसून त्यासाठी भारत सरकारला दोषी ठरवले आहे. जागतिक आरोग्य संस्थेने आखून दिलेल्या इलाजाप्रमाणे न चालता आपले सरकार जीवघेण्या मलेरियासाठी अर्धवट इलाज किंवा चुकीचे इलाज करते आहे कारण आपली कार्यपद्धती सदोष, धीमी व कालबाह्य ठरलेली आहे.

१९९० सालापासून भारतात दरवर्षी २०लक्ष मलेरियाचे रोगी आढळतात. प्लाझ्मोडियम विवॅक्स आणि प्लाझ्मोडियम फॅल्सीपेरम. पहिला प्रकार कमी घातक आणि क्लोरोक्वीनने ठीक होणारा असतो. तर दुसऱ्या प्रकारात अनेक गुंतागुंती (Complications) उद्भवू शकतात.

पुढे वाचा

आरोग्य आणि आहार

तुम्ही जे खाता त्याप्रमाणे तुमचे व्यक्तिमत्त्व घडते. माणसाचे आचार-विचार, आरोग्य, बुद्धिमत्ता, स्वभाव, शारीरिक क्षमता, सारे आहारावरच अवलंबून असते. शरीराचे पोषण किंवा शरीर रोगग्रस्त होणे हे आहाराच्याच आधीन आहेत. योग्य आहार घेतला तर औषधांची गरज कमी राहील. आणि कितीही औषधे घेतली पण पथ्य केले नाही तर त्या औषधांचा उपयोग नीट होणार नाही.

कोणताही रोग एका रात्रीत उपटत नाही त्याच्या मुळाशी बऱ्याच वेळपर्यंत होत राहिलेली अन्नघटकांची कमतरता असते. आहार योग्य असेल तर आजारपण येणारच नाही असे नाही, परंतु त्याचे प्रमाण व तीव्रता कमी राहील.

पुढे वाचा

पोलिओ निर्मूलनाचे मृगजळ

(‘कोणत्याही लाभासाठी सत्याचा सोईस्कर भागच पुढे ठेवणे म्हणजे स्वतःला फसवणे. हे टाळायचे असेल तर तुम्ही ज्या गृहीतांवर आधारित प्रयोग करता, ती गृहीतेही तपासून पहायला हवीत,’ रिचर्ड फाईनमन या शास्त्रज्ञाचे हे मत. पोलिओ निर्मूलनाच्या कार्यक्रमातील गृहीतकांची ही तपासणी)

पोलिओ आजार पूर्णपणे, कायमचा उखडून टाकायचा यासाठी पोलिओ-निर्मूलन कार्यक्रम सरकारने गेली १० वर्षे हातात घेतला आहे.

इ.स. २००० पर्यंत पोलिओ निर्मूलन होईल असे आधी जाहीर करण्यात आले होते. सरकारची सर्व आरोग्य-सेवा यंत्रणा या पोलिओ-लसीकरणाच्या कार्यक्रमाला जुंपली गेली. पण पोलिओच्या केसेस होतच गेल्या व ‘पोलिओ-निर्मूलना’साठीची ‘डेड लाइन’ दरवर्षी पुढे ढकलण्यात आली.

पुढे वाचा

नजीकच्या भविष्यातील भारतीय आरोग्यसेवा

पाच ठळक गोष्टी नजीकच्या भविष्यातील भारतीय आरोग्यसेवा काय स्वरूप धारण करील हे ठरवतील.

पहिली असांसर्गिक रोगांचे वाढते प्रमाण ज्याचा पुरेसा ऊहापोह शिक्षणावरच्या लेखात झाला आहे. सांसर्गिक रोगांचे प्रमाण जरी घटत चालले असले तरी त्यांचे प्रमाण एकूण वैद्यक व्यवसायामध्ये अगदी कमी होईल हे शक्य नाही. त्यामुळे सांसर्गिक व असांसर्गिक रोग्यांचा दुहेरी भार आपल्याला वाहावा लागणार आहे.

दुसरी ठळक बाब म्हणजे विमायोजनांचे आरोग्यसेवेत पदार्पण. तिसरी बाब वैद्यकीय पर्यटन (medical tourism) व चौथी पेटंट्स् आणि औषधे. विमा प्रभागात परदेशी गुंतवणुकीला परवानगी देता देता, सरकारने सार्वत्रिक आरोग्यविमा योजना आखल्या आहेत.

पुढे वाचा

नैराश्यग्रस्तता आघाडी घेत आहे !

जागतिकीकरणाबरोबर माणूस बदलतो आहे. नातेसंबंध बदलत आहेत. माणूस जास्त आत्मकेंद्री होतो आहे. हिशोबी होतो आहे. पैसा खूप मिळतोय पण त्याचबरोबर वेळेचा बळी – सामाजिकीकरणाचा बळी व माणुसकीचाही बळी जातो आहे. कामाचे तास वाटेल तसे वाढताहेत. आरामाला वेळ नाही. खुल्या बाजारपद्धतीमुळे वाढती स्पर्धा, विदेशी उत्पादनाची आयात, यामुळे वाढती महागाई होणार. गरीब-श्रीमंतांमधली दरी वाढते आहे. मुलांना लहान वयात जीवघेण्या स्पर्धेत उतरावे लागते आहे. त्यामुळे ताण वाढताहेत. त्याचबरोबर निराशाही वाढते आहे. आत्मकेंद्री विचार करण्याची पद्धत, वाढत्या गरजा, छानछोकी-मौजमजा यांच्याशी संबंधित. यातून ताण-तणाव वाढायलाच मदत होते.

पुढे वाचा

भारताचे मानसिक आरोग्य: आज आणि उद्या

भारतात जन्मलेल्या आणि भारतात कार्यरत असलेल्या मनोरोग-तज्ज्ञाच्या भूमिकेत एक महत्त्वाचा प्रश्न माझ्यासमोर उभा राहतो तो असा की एका सर्वसाधारण भारतीयाचे व्यक्तिमत्त्व त्याच्या परदेशी बांधवांपासून कोणत्या दृष्टीने भिन्न असते व ह्या विशिष्ट ‘भारतीय व्यक्तिमत्त्वाचा’ परिणाम त्याच्या मानसिक आरोग्यावर व मानसिक रोगांवर कशा प्रकारे पडतो? आपली ‘भारतीयता’ आपल्याला मानसिक आरोग्याकडे नेते किंवा नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

“निरोगी मानसिकता” म्हणजे काय ? निरोगी मानसिकता म्हणजे नेमके काय व आपल्या भारतीय विचारसरणीचा त्यावर काय प्रभाव पडतो हे सर्वप्रथम आपण समजायचा प्रयत्न करू या.

मानसशास्त्रीय विश्लेषणानुसार निरोगी मानसिकतेचे खालीलप्रमाणे दहा पैलू आहेत.

पुढे वाचा