मासिक संग्रह: जुलै, २००७

संपादकीय

प्रिय वाचक
पुनश्च हरि:ओम्

हे टिळकांनी म्हणणे ठीक आहे, पण सुधारकाला ही शब्दावली घेण्याचा अधिकार आहे का, असा विचार क्षणभर मनात चमकून गेला. सुधारकाला ‘श्री’वरही हक्क नाही असे बऱ्याच मंडळींना वाटते. ते पत्राच्या अग्रभागी ‘श्री’कार घालत नाहीत. पण लिखाणात ‘अथश्री’, ‘इतिश्री’चा प्रयोग वा मानत नसतील अशी आशा आहे.
‘भाषा बहता नीर है’ हा मुखपृष्ठावरचा विचार कसा वाटतो?
श्री. नंदा खरे ह्यांना काही एका अत्यावश्यक कामासाठी निदान वर्षभर सुटी हवी आहे त्यामुळे मला पुनश्च हरि:ओम् म्हणावे लागले आहे.
संपादकाच्या व्यक्तित्वातले उणेअधिक नियतकालिक उतरणे स्वाभाविक आहे.

पुढे वाचा

ठिकऱ्याः एक प्रतिक्रिया

[लेखक भारतीय राजस्व सेवा (खठड)च्या १९९४ च्या बॅचचा अधिकारी आहे आणि सध्या धारवाड, कर्नाटक येथे Joint Commission of Incom Tax म्हणून काम करतो.]
आ.सु.च्या फेब्रुवारी २००७ च्या अंकातील “ठिकऱ्याः बदलती जातिव्यवस्था’ या नावाचा सत्यजित भटकळ आणि नॅन्सी फर्नाडिस यांच्या पुस्तकाचा सुलभीकृत संक्षेप वाचला. जातिव्यवस्थेबद्दल मुळातून आणि सविस्तर चर्चा त्यात आढळली. लेखावर प्रतिक्रिया खालीलप्रमाणे:
१.एकंदर मांडणी; जातिव्यवस्था हा least count गृहीत धरून केलेली दिसते. त्यामुळे अनेक दुखण्यांचे मूळ जातिव्यवस्थेमध्ये शोधलेले दिसते. तसेच उपायही जातिव्यवस्थेभोवती फिरताना दिसतात. लेखकाचे ‘जातिव्यवस्था ही सभ्यता आहे आणि हिंदूंची शास्त्रे आणि मिथ्यकथांबद्दलच्या श्रद्धा ह्या जातिसंस्थेचा परिणाम आहेत’ हे विधानही न पटणारे आहे.

पुढे वाचा

पुस्तक परीक्षण – कोऽहम्

कादंबऱ्या सामाजिक असतात. ऐतिहासिक-राजकीय पौराणिक अशा विषयांवरून त्यांचे आणखीही प्रकार करता येतात. ह्या कादंबऱ्या कथानकाच्या बळावर लोकप्रिय होतात. लेखकाचे निवेदनकौशल्य, कथावस्तूतील नाट्य, चित्रित झालेले जीवनदर्शन वाचकाला मनोहारी वाटते. परंतु वामन मल्हार जोश्यांची रागिणी ह्या सर्वांपेक्षा वेगळ्या कारणाने आपल्या लक्षात राहिलेली असते. तिच्यातील तत्त्वचर्चा वाचकाला विविध विचारव्यूहांमधून फिरवीत राहते. रागिणी, सुशीलेचा देव ह्या कादंबऱ्या तुम्हाला नुसती कथा सांगत नाहीत, विचारात गुरफटत नेतात अन् शेवटी अशा बिंदूवर आणून सोडतात की तुम्हीच तुमचा निर्णय घ्यायला मोकळे असता.

सुरेश द्वादशीवारांची कोऽहम् ही लघुकादंबरी तशी आहे.

पुढे वाचा

पुस्तक परीक्षण: ‘विवेकीजनी ह्या मज जागवीलें’

प्रा. प्र.ब. कुळकर्णी यांचा नुकताच प्रकाशित झालेला हा लेखसंग्रह वाचनात आला. ह्यातील बरेचसे लेख यापूर्वी ‘आजचा सुधारक’ या मासिकातून अधूनमधून प्रसिद्ध झालेले आहेत. प्रस्तुत पुस्तकात ते एकत्र संग्रहीत झाले आहेत. माझे वाचन तसेही सीमित. विशेषतः धार्मिक ऐतिहासिक अशा विषयांशी संबंधित असणारे! त्यामुळे समाजसुधारणा, स्त्री-समस्या, सुधारकाचे चरित्रग्रंथ, तसेच मानवी भवितव्यतेवर भाष्य करणारे ग्रंथ ह्यांविषयी काहीशी अनास्थामूलक उदासीनता असल्यामुळे कित्येक तत्त्वचिंतक मला अपरिचित राहून जातात. आगरकरांसारखे मोजके समाजसुधारक अपवाद म्हणून वगळता कित्येकांची नावे, कर्तृत्व, उपलब्धी, यांविषयी परिचय नसतो. माझ्यासारख्या सामान्य वाचकाला परिवर्तनवादी साहित्यक्षेत्रातील अज्ञात असणारे विचारधन प्रा.

पुढे वाचा

अरिस्टॉटलची न्यायसंकल्पनाः [अरिस्टॉटल (३८४-३२२ बी.सी.]

कायदा करण्याचा ज्यांना अधिकार आहे, अशा मंडळाने केलेले कायदे हे कायदेशीरच असणार आणि त्यांचा उद्देश न्याय प्रस्थापित करणे हाच असल्याने कायदा न्याय्यच असतो. समाजासाठी सुख निर्माण करणे आणि टिकविणे हे एका अर्थी ज्यांना आपण कायदेशीर किंवा न्याय्य वर्तने म्हणतो, त्यांचे कार्य आहे. शौर्याची, संयमाची, सुस्वभावी माणसांची कृत्ये आणि अन्य सद्गुणांची कृत्ये करण्यास कायदा आपणांस बाध्य करतो. म्हणून कायद्याचे पालन करणारा तो न्यायी आणि त्याचे उल्लंघन करणारा तो अन्यायी समजला पाहिजे. दुष्कृत्ये करण्यास कायदा मनाई करतो. न्याय हा नागरिकांच्या परस्परसंबंधाबाबत असतो. केवळ व्यक्तीपुरता मर्यादित नसतो.

पुढे वाचा

स्त्रीवादी साहित्य काय आहे?

[मार्च २००७ मध्ये नागपूर येथे वैदर्भीय लेखिकांचे सहावे संमेलन झाले. विदर्भ साहितय संघाच्या विद्यमाने ही संमेलने होतात. अध्यक्ष/अमरावतीच्या प्राचार्य विजया डबीर ह्या होत्या. त्यांचे उद्घाटनपर भाषण, स्वल्पसंपादित सं.]
येथे मंचावर उपस्थित असलेले नागपूर विद्यापीठाचे आणि विदर्भ साहित्यसंघाचे सर्व मान्यवर, साहित्यप्रेमी लेखक आणि वाचक मित्रमैत्रिणींनो,
ह्याप्रसंगी ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ विजेत्या पाच थोर लेखकांची नावे मला आठवताहेत. कलेची बूज राखून जीवनसंमुखतेला महत्त्व देणाऱ्या कुसुमावती देशपांड्यांचे योगदान आठवते आहे. आशा बगे यांना नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्याबद्दल मला त्यांचे अभिनंदन करायचे आहे.
हल्ली वाचनसंस्कृती लयाला जात आहे असे आपण सतत म्हणत असतो; पण त्याचवेळी लेखन भरपूर वाढते आहे असेही चित्र आपल्याला दिसते.

पुढे वाचा

जग खाऊन टाकणारे! जनअरण्य…

जेफ्री साक्स हे आजचे आघाडीचे अर्थतज्ज्ञ आहेत. अनेक देशांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे आणि रशियासारख्या देशांना आर्थिक संकटातून बाहेरही काढले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे ते विश्वासू मित्र. त्यांनीच ब्लेअर यांना निराळा ‘आफ्रिका निधी’ उभारायला लावला. या पैशातून गरिबी आणि अज्ञानात रेंगाळलेल्या आफ्रिकन देशांना सावरण्यासाठी मदत होते.
जेफ्री साक्स यांना यंदा बीबीसीची अतिशय प्रतिष्ठेची अशी रीथ व्याख्यानमाला गुंफण्याचा मान मिळाला. एण्ड ऑफ पॉव्हर्टी या पुस्तकामुळे साक्स जगभर परिचित आहेतच. अर्थशास्त्र हा केवळ घडणाऱ्या घटनांचा ताळा मांडण्याचा बौद्धिक खेळ नाही.

पुढे वाचा

मानवी स्वभाव व डार्विनवाद (६)

[जेनेट रॅडक्लिफ रिचर्ड्स (Janet Radcliffe Richards), यांच्या ह्यूमन नेचर आफ्टर डार्विन, Human Nature After Darwin (Routledge, 2000) या पुस्तकाचा परिचय काही लेखांमधून करून देत आहोत. विद्यार्थ्यांना तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी डार्विनचा उत्क्रांतिवाद व त्याभोवतीचे वादवादंग वापरायचे रिचर्ड्सना सुचले. त्या अनुभवांवर प्रस्तुत पुस्तक बेतले आहे.
प्रभाकर नानावटींनी संपूर्ण पुस्तकाचे भाषांतरही केले आहे व ते प्रकाशनाच्या प्रयत्नात आहेत. सं.]
आदर्श जगाच्या भ्रमात!
डार्विनवादाचा समाजरचनेवर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो याचा अभ्यास करणाऱ्या समाज-जीवशास्त्र या विद्याशाखेवर ‘या शास्त्राला सामायिक न्याय मान्य नाही; डार्विनवादी व समाज-जीवशास्त्रज्ञ उजव्या विचारांचे आहेत’ असा आरोप केला जात असतो.

पुढे वाचा

भाषा बहता नीर है

कितीतरी शब्द आपण बेफिकिरीने, बेपर्वाईने वापरत असतो. त्यांच्या सांस्कृतिक संदर्भांचा आदर न ठेवता! मध्यंतरी चंद्रपूर जिल्ह्यातील वणव्याची वार्ता देताना एका वृत्तपत्राने ‘आग वडवानळासारखी पसरत आहे’ असे छापले होते. वडवानळसुद्धा अग्नीचाच अवत हे खर तील सुप्त अग्नीचा एक काल्पनिक, पौराणिक प्रकार आहे. त्या ठिकाणी ‘दावानळ’ असा शब्द साजरा नसता का ठरला ? केरळचे थोर मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते ई. एम. एस. नंबुद्रीपाद वर्षभर नियतकालिके काळजीपूर्वक वाचून पुढील वर्षारंभी मल्याळम भाषेतील प्रमाद, विसंगती, नवी वळणे यांचे विवेचन करणारा एक सालगुदस्त आढावा निरलसपणे लिहीत असत.

पुढे वाचा

पत्रचर्चा

संपादक, आजचा सुधारक यांस, आपल्या २००७ च्या अंकात श्री टी.बी. खिलारे ह्यांचे पत्र प्रकाशित झाले आहे. त्यांचे मला समजलेले मुद्दे खालीलप्रमाणे: १) अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणासाठी कोणताही कालावधी निश्चित केलेला नाही. (ही माहिती माझ्यासाठी नवीन आहे ती त्यांनी दिली ह्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.) २) मी आजच्या जातिविषयक वास्तवाकडे दुर्लक्ष करीत आहे. ३) मी पर्यायी व्यवस्था सुचवलेली नाही. ४) आरक्षणाला इतकी वर्षे झाली असूनसुद्धा वरिष्ठ जातींचा कनिष्ठ जातींवरील अन्याय चालूच आहे.
खिलाऱ्यांनी माझे म्हणणे समजून घेण्याचा पुरेसा प्रयत्न केलेला नाही असे मला दुर्दैवाने म्हणावे लागते.

पुढे वाचा