मासिक संग्रह: ऑगस्ट, २००७

संपादकीय प्र.ब.कुळकर्णी

प्रिय वाचक,
ह्या अंकात अव्वल इंग्रजीतील समाजसुधारक आणि प्रबोधनकार भाऊ महाजन यांचा त्रोटक परिचय दिला आहे. तसेच त्यांच्या ‘धूमकेतु’ या साप्ताहिकातील ‘गुजराथ्यांचे महाराज’ हा लघुलेखही पुनर्मुद्रित केला आहे. नुकतीच गुरुपौर्णिमा झाली. तिच्या अनुषंगाने आपल्या संस्कृतीतील गुरु ह्या संस्थेबद्दल काही विचार मनात येतात. सर्वप्रथम जाणवते ते हे की आपल्या संस्कृतीत गुरुमाहात्म्य म्हणा किंवा गुरुमहिमा म्हणा ह्याचे अतोनात स्तोम आहे. सगळे लहान-मोठे गुरु, महाराज, संत-महंत, आपल्या शिष्यमंडळींना स्वतःच्या गुरुची महानता वर्णन करण्याची एकही संधी दवडत नाहीत. जेणकरून श्रोत्यांच्या किंवा शिष्यांच्या गुरुचे माहात्म्य म्हणजे स्वतःचे माहात्म्य आपोआपच वाढते.

पुढे वाचा

परित्यक्तांची स्थिती व सामाजिक संस्थांचे कार्य (मुक्काम नाशिक)

परित्यक्ता स्त्रियांच्या समस्येची कारणे पुढील असू शकतात. १) हुंडा, २) व्यसनाधीनता, ३) आर्थिक समस्या, ४) पालक, सासू सासरे इतर यांच्याकडून होणारा छळ, ५) दैन्यावस्था, गरिबी, निराधार स्थिती, माहेरचे नातलग नसणे, ६) घरगुती समस्या व जबाबदारी यामुळे निर्माण होणारे संघर्ष, ७) अपत्य नसणे, ८) नवऱ्याचा संशयी स्वभाव, ९) फक्त मुलींनाच जन्म देणे, १०) मनोरुग्णता, ११) कुमारी माता होणे इ. .
अशा अनेक कारणांमुळे स्त्रियांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. ह्या स्त्रियांना आधार देऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अनेक संस्था स्थापन झालेल्या आहेत. महाराष्ट्रात ‘शॉर्ट स्टे होम’ची सुविधा आहे.

पुढे वाचा

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे कवित्व

भारताच्या राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांची निवड होणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्या सर्व स्तरांतील निवडणुकींमध्ये जे होते ते म्हणजे व्यक्तिगत आरोप, प्रत्यारोप, उमेदवारांच्या आयुष्यातील घटना व सत्तेच्या किंवा संपत्तीच्या दुरुपयोगासंबंधी टीकाटिप्पणी, उमेदवाराच्या निवडीबाबत ऐनवेळेस केलेली घाई व शेवटी निवडणुका हे राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या स्तरावर पहिल्यांदाच बघायला मिळाले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीचे स्वरूप कसे असावे याची चर्चा म्हणूनच नव्याने करायला हवी व शक्य झाल्यास काही उचित परंपरा व पायंडे पाडायला हवेत असे वाटू लागले आहे.

या निवडणुकीच्या समग्र प्रक्रियेत राष्ट्रपतिपदासारख्या महत्त्वाच्या पदासाठी कोणाला उमेदवार करायचे याचा पुरेसा विचार राष्ट्रीय पक्षांनी बरेच दिवस केलाच नव्हता.

पुढे वाचा

कुरूप असण्यातही मजा

तशी ही नवल वाटावी अशी गोष्ट आहे. पण तिला भक्कम ऐतिहासिक आधार आहे. गोष्ट अशी की अगदी कुरूप माणूस असला तरी त्याने हताश होऊ नये. स्त्रियांचे अगदी रुपवतींचेसुद्धा, लक्ष, आपल्याकडे वेधून घेण्याचे प्रयत्न सोडू नयेत. ब्रिटनचे उपपंतप्रधान जॉन प्रिस्कॉट आणि त्यांचे प्रेमपात्र ह्यांच्यासंबधात उठलेले वादळ ह्याचे उत्तम उदाहरण आहे. अर्थात् ह्या प्रकरणात सत्ता ही कामात करणारी गुटी होती असे म्हणता येईल. हेन्री किसींजर अशा मामल्यांचा मोठा दर्दी अभ्यासक. त्याचा दावा असा की, सत्ताच, काय साधे अधिकारपददेखील बायकांना वश करण्याचे हुकमी साधन आहे.

पुढे वाचा

पुस्तक परामर्श लोकमान्य ते महात्माः लेखक – सदानंद मोरे,

राजहंस प्रकाशन पुणे यांनी “लोकमान्य ते महात्मा या शीर्षकाचा डॉ. सदानंद मोरेलिखित एक ग्रंथ दोन खंडात प्रकाशित केला आहे. या ग्रंथाचे स्वरूप “स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सत्ताकारणाचा घेतलेला वेध’, अशा प्रकारचे असल्याची भूमिका लेखकाने प्रारंभीच ठळकपणे नमूद केली आहे. पन्नास साठ वर्षांपूर्वी भारतात झालेल्या या अभूतपूर्व, ऐतिहासिक स्वातंत्र्यलढ्यावर आतापर्यंत अनेक ग्रंथ लिहिले गेले. त्यातून लोकमान्य टिळक व महात्मा गांधी याच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेसने या लढ्यात केलेल्या महनीय कामगिरीविषयी साधारणतः गौरवात्मक विवेचन आलेले आहे. तद्वतच या दोन राष्ट्रीय नेत्याच्या व विशेषतः महात्मा गांधी यांच्या त्यातील कर्तृत्वाबद्दल महाराष्ट्रात तरी भरपूर प्रतिकूल, असद्हेतूनी भरलेली जहरी टीका मोठ्या प्रमाणात केली गेली आहे.

पुढे वाचा

पुस्तक परामर्श गांधीनंतरचा भारत

रामचंद्र गुहा यांच्या गांधीनंतरचा भारत या पुस्तकासंबंधी त्यांची एक मुलाखत अंजली पुरी यांनी घेतली. ती ७ मे २००७ च्या आउटलूक मध्ये प्रकाशित झाली आहे. ह्या मुलाखतीत अनेक धक्कादायक गोष्टी पुढे आल्या. त्यांचा अल्पसा आढावा पुढे सादर केला आहे.
खरे तर गांधीनंतरचा भारत म्हणजे स्वातंत्र्योत्तरकालीन भारताचा इतिहास असेच त्याचे स्वरूप ठरते. विषयाची कथावस्तू एवढी मोठी असल्यामुळे श्री. गुहा यांना त्याची तयारी करताना आठ वर्षे लागली. त्यांनी जुन्या दप्तरखाने व त्यांमधील कागदपत्रांचे ७० संग्रह तपासले. आपल्या पुस्तकाचा आराखडा आणि ग्रंथातील प्रकरणांची मांडणी कशी करावी हे ठरवायलाच त्यांना दोन वर्षे लागली १०० कोटी लोकसंख्या असलेला भारत, त्यात ५०० जातिजमाती आणि २३ राजमान्य भाषा हे सगळे कसे कवेत घ्यायचे ?

पुढे वाचा

लिओनार्डो डा व्हिन्ची

सध्या लिओनार्डो डा विंची ह्याचे नाव, डॅन ब्राऊन या अमेरिकन लेखकाने लिहिलेल्या, “डा व्हिन्ची कोड’ या कादंबरीवर निर्मित त्याच नावाच्या चित्रपटातील वादग्रस्त विषयामुळे, बरेच चर्चेत आलेले आहे. लिओनार्डो या इटालियन चित्रकाराची, येशूख्रिस्ताच्या जीवनातील एका प्रसंगावर आधारित “दि लास्ट सपर’ आणि ‘मोना लिसा’ ही चित्रे इतर चित्रांबरोबर जगभर अतिशय गाजली. परंतु तो जगद्विख्यात चित्रकार होता तसा एक थोर शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ होता हे किती जणांना माहीत असेल?
सर्वांत प्रसिद्ध असतील तर त्याची शास्त्रीय संशोधने! त्याच्या चित्रांच्या पसाऱ्यात, अनेक यंत्रांच्या, काही नुसत्या यंत्राच्या प्रयोगात्मक कल्पना तर काही पूर्णपणे विकसित केलेल्या यंत्रांचे आराखडे आणि नोंदी सापडतात.

पुढे वाचा

करुणानिधी आणि रॅशनॅलिझम

रॅशनॅलिझमचा कडवा पुरस्कार करणारे व त्याप्रमाणे वागणारे तामिळनाडूचे मुख्यमंत्री मुभूवेल करुणानिधी ह्यांनी सत्यसाईबाबाला आपल्या घरी बोलावून व त्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून rationalism च्या तत्त्वांला तिलांजली दिली, रॅशनॅलिझमच्या तत्त्वांचा करुणानिधींनी आयुष्यभर पुरस्कार केला व डीएमके पक्षासाठी आपल्या कार्यकर्त्यांनाही त्या तत्त्वानुसार आचरण करायला भाग पाडले. आयुष्यभर लोकांसमोर ते नास्तिक व एक कडवे रीिंळेपरश्रळीीं म्हणून आले. त्यापूर्वी एकदा आपल्या पक्ष कार्यकर्त्यांनी कपाळाला टिळा लावला म्हणून त्यांचा खरपूस समाचार त्यांनी घेतला होता. ‘धार्मिकतेची खूण असणारा टिळा कपाळाला लावून आपण पेरियारच्या (१८७९-१९७३) विचारसरणीस मूठमाती देत आहोत; पक्षाच्या मूलभूत तत्त्वांपासून आपण ढळत आहोत’ असे त्यांनी पक्ष-कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले होते.

पुढे वाचा

‘गुजराथ्यांचे (गुरु)महाराज’

कोणाचेहि वास्तविक दोष काढून दाखविणे म्हटले म्हणजे मोठे कठीण काम होय. जरी आपण त्यांचे हित इच्छून प्रीतीने उपेदश केला तरी तो त्यांस कडू लागेलच. तथापि परस्परांस सन्मार्गास लावण्यास प्रयत्न करीतच असावें; हा आपला धर्म आहे, असें जाणून कोणाची भीड न धरितां आपलें काम बजवावें. या मुंबईत गुजराथी लोकांचे गुरु जांस साधारण शब्दकरून महाराज असी संज्ञा आहे, त्यांचे महात्म फार वाढले आहे. युरोप खंडांत रोमन क्याथोलीक पंथाचा मुख्य गुरु जो पोप त्याचप्रमाणे एथें चारपांच पोप आहेत. यांचा लोकांचे मन, बुद्धी, विचार, आत्मा यांवर इतका अधिकार आहे, की ते सर्वस्वी त्यांचे दासानुदास किंकर होऊन बसले आहेत.

पुढे वाचा

इमान

पाकिस्तानात १९५३ साली अहमदिया पंथाविरुद्ध धर्मवादी गटाने आंदोलन केले. या आंदोलनाचे पर्यवसान लाहोर येथे अहमदियाविरोधी क्रूर दंगली होण्यात झाले. या दंगलींची चौकशी करण्यासाठी पाकिस्तान सरकारने न्या.मू. महंमद मुनीर आणि न्या.मू. कयानी यांची नियुक्ती केली. पाकिस्तानातील धार्मिक नेत्यांना श्री. मुनीर यांनी भारतीय मुसलमानांसंबंधी एक प्रश्न विचारला. भारत-पाकिस्तान युद्ध झाले तर भारतीय मुसलमानांनी कसे वागावे ? सर्वांनी भारतीय मुसलमानांनी पाकिस्तानच्या हिताच्या विरुद्ध वागता कामा नये असे उत्तर दिलेले आहे. मौ. मौदुदी म्हणाले, भारतीय मुसलमानांनी कोणत्याही परिस्थितीत पाकिस्तानच्या विरुद्ध वर्तन करता कामा नये. त्यांची निष्ठा पाकिस्तानलाच असली पाहिजे.

पुढे वाचा